गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

कोणता व्यवसाय सुरु करावा ?

कोणता व्यवसाय सुरु करावा ? व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?

कोणता व्यवसाय सुरु करू ?

कोणता व्यवसाय सुरु करावा ?

कोणता व्यवसाय सुरु करावा ? अनेकजण ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात. प्रश्न लहान आहे. पण उत्तर नाही. ह्या प्रश्नाच उत्तर तुमच जीवन बदलू शकत. ह्या प्रश्नाच्या उत्तराने तुम्ही जगही बदलू शकता.

बदल

मागील १० वर्षात कोणते व्यवसाय जन्माला आले ? आणि कोणते नाहीसे झाले ?
Coin box, आठवतात का ? काही वर्षा अगोदर जागोजागी दिसणारे Coin box आता कुठे आहे ? सर्वांच्या घरी दिसणारे Kodak कॅमेरा रोल कुठे आहेत ? Cassettes, Radio कुठे आहेत ? जर तुम्हाला कोणी १० वर्षा आधी सल्ला दिला असता ह्या पैकी काही व्यवसाय कर तर काय झाले असते ? १० वर्षात काही नवीन व्यवसाय पण जन्माला आलेत म्हणा. ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग, मोबाइल recharge सेंटर, Mobile चा विमा पण आलाय. आधी लोकांना दूरदर्शन पाहून मजा यायची पण आज शेकडो tv channels कमी पडून लोकांना youtube पाहिजे आहे.  मागील १० वर्षात काही व्यवसाय जन्माला आले तर काही मरण पावले. मग मी कोणता व्यवसाय करावा ?
तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल कि जग बदलत आहे, आणि ते आता फार वेगाने बदलत आहे. तुम्ही कल्पना केली कि माझा फोन पाण्यात पण चालावा आणि काही वर्षात तसे फोन आले पण. तुम्ही कल्पना केली कि घर बसल्या मला खरेदी करता यावी आणि आता आपण ते करत पण आहोत. घरबसल्या आपल्या नातेवाईकांना आपण पैसे पाठवू शकतो. आता तर नवीन 3d प्रिंटर येत आहेत. आपण घरी बसल्या अनेक वस्तू आता प्रिंट करू शकतो. हे सर्व सांगण्याचा उद्देश काय ? तर मी कोणता व्यवसाय करू हा प्रश्न आजच्या जगात योग्य प्रश्न नाही.

बरोबर प्रश्न कोणता ?

तर बरोबर प्रश्न आहे, मी या जगाला काय देऊ शकतो ? मी हे जग आणखी चांगल कस करू शकतो ? तुम्ही जर का हा विचार केला तर तुम्ही खरच जीवनात काही चांगल करू शकाल. हे जग चांगल करायला आपल्याला फक्त समाजकार्य करावे लागेल असे नाही. आज Jack Ma यांनी चीन मध्ये अलिबाबा हि वेबसाईट सुरु केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे त्यांना फायदा झाला. Steve Jobs यांनी Apple कंपनी सुरु केली, आज आपण अनेक गोष्टींसाठी फोनचा वापर करून करतोय. Bill Gates यांनी Microsoft कंपनी बनवली, त्यामुळे computer सहज वापरणे आज जगाला शक्य झाले. या सर्व लोकांनी जग बदलण्यात मदत केली नाही का ? त्यांनी स्वताला विचारलं कि मी कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकतो ? विचार करा, कधी ह्या लोकांनी कोणाला जाऊन विचारलं का ? मी कोणता व्यवसाय सुरु करू ? याउलट ह्या लोकांनी आपल्या व्यवसायासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यांना सर्वांनी मुर्खात काढले असताना जगाविरुद्ध जाऊन हे लोक लढले. आपल्या व्यवसायास त्यांनी आपल जीवन अर्पण केल.

व्यवसाय कि नोकरी ?

मी कोणता व्यवसाय सुरु करू, हा मुख्य प्रश्न नाही आहे. मुख्य प्रश्न आहे मी व्यवसाय करू कि नाही ? आधी तुम्ही हे ठरवा कि तुम्हाला व्यवसाय करायचा कि नोकरी करायची आहे. कोणता व्यवसाय करावा हि नंतरची गोष्ट आहे.
नोकरी आणि व्यवसाय मध्ये मूळ फरक हा आहे कि व्यवसायात तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात. तुम्हाला सर्व गोष्टींची जवाबदारी स्वीकारावी लागते. इथे तुम्ही तुमच्या साहेबाला दोष देऊन सुटू शकणार नाही. इथे तुम्हाला नोकरी पेक्षा जास्त धोका पत्करावा लागेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हा प्रश्न विचारता मी कोणता व्यासाय करू ? तर   तुम्हाला काय उत्तर अपेक्षित असत ? कि असा व्यवसाय सांगावा जो मस्त चालेल, असा व्यवसाय सांगावा जो करणे सोपे असेल, असा व्यवसाय सांगावा ज्यात कमी गुंतवणूक असेल. कोणता व्यवसाय सुरु करू ? हा प्रश्नच मुळात सुरक्षात्मक आहे. तुम्हाला उत्तरात असा व्यवसाय अपेक्षित आहे ज्यात धोका कमी आहे. तुम्हाला जर सुरक्षा हवी असेल तर तुम्ही नोकरी कडे जावे. तुम्हाला जर जास्त धोका घ्यायचा आहे तर व्यवसायाकडे यावे. व्यवसाय कि नोकरी ? मग काय उत्तर आहे तुमच्या प्रश्नाच ?
जेव्हा तुम्ही विचारता कोणता व्यवसाय सुरु करू ? तेव्हा तुमच्या व्यवसायाची सुरवात उधारीच्या ज्ञानावर सुरु होते. उद्या ज्याने तुम्हाला सल्ला दिला तो नसेल मग ? जेव्हा व्यवसायात वाईट वेळ येईल तेव्हा तुम्ही काय करणार ? तुम्ही पहिला ना, जग कसे पटापट बदलत आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय पण आता पटापट बदलेल. तुम्ही कदाचित तोच व्यवसाय कराल पण त्याच स्वरूप बदलेल. तुम्ही आताही कदाचित किरणा मालच विकाल, पण online, home delivery, cash back. हे शब्द तुमच्या व्यवसायात जमा होत जातील. तुम्ही कदाचित कपडेच विकाल पण होऊ शकते भविष्यात तुमचे कपडे एवढे smart होतील, के तुमच्याशी सवांद साधतील, तुमच्या mood नुसार तुमचे कपडे रंग बदलतील, तुम्हाला कदाचित कधी दुसरा ड्रेस घ्यावाच नाही लागेल, तुमचा ड्रेस हवा तस रूप घेईल.
महत्वाचा सांगायचा मुद्दा इथे हा कि, आपण जो व्यवसाय करणार आहोत, त्यात यश मिळेल कि नाही ? तो टिकेल का नाही ? किंवा त्याच प्रारूप किती बदलून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवसाय करायचाच, हे तुमच नक्की झाले तर हा ना तो व्यवसाय तुम्ही करालच. महत्वाचं आहे तुमची मानसिकता व्यवसाय करण्याची होणं, ती झाली की, तुम्ही स्वतःसाठी योग्य व्यवसाय शोधून काढणार वा निर्माण करणारच.
आता आपला प्रश्न कोणता व्यवसाय सुरु करावा ? जसे मी वर बोललो कि मी या जगाला काय देऊ शकतो. मी हे जग कसे अजून चांगले करू शकतो ? हा विचार करणे. असे का ? कारण ह्या प्रश्नांचं उत्तर शोधताना तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी मिळतील.
१. माझी आवड काय ?
२. माझ्याकडे कोणते गुण आहेत  ?
आपण दुसरा प्रश्न आधी पाहू. मी नक्कीच हि गोष्ट मानतो, कि जी गोष्ट आपल्याला येत नाही ती सराव करून आपण शिकू शकतो. पण तुम्ही स्वत:ला ओळखणे फार आवश्यक आहे. तुमच्यात काय गुण आहे ? तुम्ही कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकता हा पण विचार करा. आपल्याला काय आवडत हा प्रश्न बहुतेक वेळा बरोबर उत्तर देत नाही. कारण आपली आवड हि आजूबाजूच्या गोष्टींमुळे प्रभावित होते. अनेक लोकांना सचिन तेंडूलकर बनायचे होते आता काहींना विराट कोहली. हळूहळू कबड्डी प्रसिद्ध होत आहे, काहींना त्यात कारकीर्द करावी वाटेल. हिरो तर आपण सर्वांना कधी ना कधी बनायची इच्छा झालीच असेल.
आवड अशी नको जमलं तर करून पाहू, ६ महिने – १ वर्ष टिकणारी. आयुष्याची बांधिलकी असणारी आवड हवी.
आपल्याला काय आवडत ? आणि आपण कोणत काम चांगल्या प्रकारे करू शकतो. या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य जर तुम्ही गाठला तर फार चांगले होईल. म्हणजे अशी गोष्ट शोधणे जी मला आवडते आणि जी करण्यासाठी लागणारे थोडेफार गुण माझ्यात आहेत. मला फिल्म्स पाहायला फार आवडत, म्हणून मी actor वा director व्हायचा निर्णय घेतला नाही. कारण ते बनण्यासाठी लागणारे गुण माझ्यात आहेत असा मला वाटले नाही.  म्हणून अशी गोष्ट निवडणे जी तुम्हाला आवडते आणि तुमच्यात ती करण्याचे गुण पण आहेत.

तुम्हाला व्यवसायात यश कधी मिळेल ?

जेव्हा तुमच्याकडे प्रतिस्पर्ध्यापेक्षा काहीतरी चांगले असेल. तुम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगल काही केव्हा करू शकाल ? त्यासाठी तुम्हाला काय कराव लागेल ?   तुम्हाला त्या गोष्टीचा तज्ञ बनाव लागेल. गोष्ट मनापासून आवडली नाही तर तुम्ही त्या गोष्टीचे तज्ञ होवू शकाल का ? तज्ञ झाल्याशिवाय तुम्ही ती गोष्ट इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकाल का ? आणि तुम्ही ती इतरांपेक्षा चांगली करू शकत नाही, मग लोक तुमच्याकडे का येतील ?
जर तुम्हाला गाण म्हणायला आवडत आणि तुम्ही इलेक्ट्रोनिक्स चा व्यवसाय सुरु केला, कारण तुम्हाला कोणी हा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. आता तुम्हाला lcd आणि led मधला फरकच कळत नाही, मग तुम्ही तो व्यवसाय कसा करणार ? पण दोन संगीतातील रागांमधील फरक तुम्हाला अचूक ओळखता येतो. तर तुम्ही कोणता व्यवसाय केला पाहिजे ?

व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?


नेता

व्यवसाय मालकाला चांगला नेता होणे फार आवश्यक आहे. त्याच्या हाताखाली नेहमी लोक काम करतात. त्या लोकांकडून त्याला काम करवून घेता आले पाहिजे. त्याला लोकांना प्रशिक्षित करता आले पाहिजे. नाहीतर तो आपल्या व्यवसायात अडकून जाईल आणि तिथला कर्मचारी बनून जाईल.
तुम्ही अनेक कपड्याचा दुकानात हे दृश्य पहिले असेल कि. मालक गुजराती, मारवाडी लोक आहेत. जे फक्त काउंटरवर पैसे घ्यायचं काम करतात. आपल्याला कपडे दाखवणे. बिल तयार करणे हि सर्व कामे मराठी माणसे करतात. अनेक दुकानात तुम्हाला दिसून येईल कि manager हा मराठीच आहे आणि मालक हजर नसताना पण तेच दुकान चांगल्या प्रकारे चालत आहे.
जो माणूस manager बनू शकतो तो मालक का नाही ? त्या दुकानाच्या मालकाने एका इमानदार आणि कर्तुत्वशील माणसाला नोकरीवर ठेवण्यात यश मिळवले आहे. आता तो आपल्या दुसऱ्या व्यवसायाकडे लक्ष्य द्यायला तयार झाला आहे. कोणत्या समाजा बद्दल असंतोष पसरवणे हा उद्देश नाही, तर फरक लक्ष्यात घेऊन स्वतः मध्ये सुधारणा घडवणे आहे.
अनेक लोक स्वतःच्या व्यवसायात नोकरी करू लागतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढीवर ते स्वत:च बंधन लावतात.

विकता येणे

विकता येण का आवश्यक आहे ? आपण सर्वजण काय करतोय ? नोकरीच्या मुलाखतीला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही काय करता ? लग्नासाठी स्थळ पाहायला जाता तेव्हा तुम्ही काय करता ? नातेवाईकांना, मित्रांना  तुमच्या नवीन विकत घेतलेल्या गोष्टी दाखवताना काय करता ? बॉस ला गुड मॉर्निंग बोलून काय करता ? तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला दिसली कि तुम्ही काय करता ? आपण स्वतःला विकत असतो. स्वतःला विकणे म्हणजे पैशासाठी काहीही करायला मी तयार आहे आहे, असे नाही. तर दुसऱ्याच लक्ष्य स्वत:वर ओढवणे दुसऱ्यांना म्हणने मी चांगला आहे. माझी निवड करा. आपण जीवनात स्वत:ला विकतच असतो. आपल्याकडची गोष्ट किंवा आपल मत इतरांना पटवून देणे हि विक्रीकलाच आहे.
व्यवसाय म्हणजे काय ? वस्तूंची देवाणघेवाण, खरेदी विक्री. म्हणजे जेव्हा लोक तुमच्याकडून विकत घेतील, तेव्हा तुम्ही व्यवसाय करू शकाल. आता लोकांनी तुमच्याकडे येण्याची तुम्ही वाट पाहणार की  त्यांच्या जवळ जावून तुम्ही बोलणार माझ्याजवळून विकत घ्या ?
आपला समाजात विकणाऱ्या व्यक्तीकडे हीन भावनेने पहिले जाते. असे समजल्या जाते , जो विकू पाहतो, त्यात काही कमी आहे. जर कोणती वस्तू तुम्ही चांगली बनवली आहे. लोकांचा ती वापरून फायदा होणार आहे. तर त्याची जाहिरात का करू नये ? जर आपण जाहिरात केली नाही तर लोकांना आपल्याबद्दल कसे कळेल ? आपण जर फक्त असे बोललो कि माझा ग्राहक माझी प्रशंसा करेल तोच माझी जाहिरात. तर त्याप्रमाणे तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता किती वेळ लागेल ?
आपण काही विकतोय म्हणजे आपल्यात काही कमी आहे, हा न्यूनगंड मनातून काढून टाका. मी उत्पाद तयार केले आहे. मला वाटत लोकांचा ते उत्पाद वापरून फायदा होईल. हे उत्पाद लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचे फायदे लोकांना कळविणे हे माझ काम आहे, हा विचार करा. तुमचा व्यवसाय तुम्हाला जर वाढवायचा नसेल, तर जाहिरात करू नका. पण तुम्हाला व्यवसायच वाढवायचा असेल, नवीन ग्राहक जोडायचे असतील, तर मात्र तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचावेच लागेल.

संयम

व्यवसाय करणे हे रात्रीच्या काळोखात दिव्याचा प्रकाशाकडे चालत जाणे आहे. आपल्याला कुठे जायचे हे आपल्याला माहित आहे. पण आपल्याला किती लांब जायचे आहे, हे आपल्याला माहित नाही.  अंधारात आपल्याला अंदाज येत नाही कि तो प्रकाश किती दूर आहे. आपण त्या दिव्याच्या प्रकाशाकडे चालत राहतो. आपल्याला वाटत फार वेळ झाला आपण चालतोय. अजून किती दूर आहे तो प्रकाश ? परत जाऊ का ? कि दुसरा प्रकाश शोधू मी ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात यायला सुरवात होते.
व्यवसायात उतरताना आपल्याला आपल ध्येय माहित असत. आपला व्यवसाय आपल्याला केवढा वाढवायचा आहे. त्यात झालेल्या कमाईने आपण काय काय विकत घेऊ ? याची पण यादी बनलेली असते. आपल यश कसे असेल, याच एक चित्र आपल्या डोक्यात असत. पण तिथपर्यंत कस पोहोचायचे ? कधी पोहोचणार ? पोहचू कि नाही ? पोहोचलो तर टिकू का नाही ? असे अनेक प्रश्न मनात येतात. या गोंधळातच अनेक जण माघार घेतात. व्यवसाय सुरु करण्याधी, अशा स्थितीचा विचार करा. या परिस्थितीमध्ये तुम्ही टिकून राहणार का ?
कोका कोला कंपनी जेव्हा सुरु झाली तेव्हा ती दिवसाला ९ bottle विकत होती.आज कोका कोला कंपनी पूर्ण जगभर दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकते. यावरून तुम्हाला कळून येईल कि व्यवसाय करताना किती संयम लागतो. फक्त ९ bottle विकल्या जातात म्हणून जर कोका कोला थांबले असते तर ते आज दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकू शकले असते का ?

वातावरण

तुमच्या व्यवसायामध्ये असे वातावरण असले पाहिजे कि कर्मचारी येऊन तुम्हाला नवीन कल्पना सांगू शकतील. त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर रागावता वा बदला घेता कामा नये.
नेहमी घडणाऱ्या गोष्टींसाठी एक आदर्श नियमावली बनवली पाहिजे. म्हणजे तुमचे कर्मचारी दरवेळी तुमच्याकडे येणार नाहीत. त्यांना माहित असेल कि आपण अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे.
कर्मचाऱ्यांची प्रशंसा सर्वांसमोर करा, पण चुका एकट्यात काढा. तुमच्या व्यवसायामधल्या इतर सर्व गोष्टींची किंमत कमी-कमी होत जाईल, फक्त कर्मचारी सोडून. प्रशिक्षण आणि अनुभवामुळे कर्मचाऱ्यांची किंमत वाढतच जाईल. कर्मचारी आपले गुलाम आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्या. असा दृष्टीकोन न ठेवता, कर्मचारी हे आपले व्यवसायाचे साथीदार आहेत, हा व्यवसाय वाढवायला तेच मदत करतील. असा दृष्टिकोन असावा.
तुम्ही व्यवसायाचे नेता आहात, तुम्ही निष्पक्ष ठाम, मैत्रिपुर्वक आणि दूरदृष्टी ठेऊन काम केले पाहिजे.

भाव करणे

कोणत्या वस्तूच मूल्य कशावरून ठरलं ? समजा एक प्लॉट आहे, तो कोणी १० लाखात घ्यायला तयार आहे, तर कोणी ७  तर कोणी १५ लाखात. तर त्या प्लॉटच मूल्य काय ?  कोणत्याच गोष्टीला ठराविक मूल्य नसत. कोणत्याही गोष्टीच मूल्य हे घेणारा आणि देणारा हे दोघ स्वीकारतील ते असत. म्हणून व्यवसाय करताना आपल्याला भाव करता आला पाहिजे. भाव करताना कोणाकडे शक्ती आहे ते पहिले जाणून घ्या. हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.

भाव कशावर ठरतो ?

  1. माहिती – त्या सामानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे ? भविष्यात त्याची किती उपलब्धता असेल ? ते कोण विकत घेईल ? ते कुठे विकत मिळेल ? तुम्हाला जितकी जास्त माहिती तितकी तुमची बाजू मजबूत.
  2. वेळ –  माझ्या एका मित्राला अर्जंट फोटो फ्रेम हवी होती, त्याच्याकडे वेळ नव्हता, दुसऱ्या दुकानात फिरून भाव करायला. दुकानदाराला कळल, ह्या माणसाकडे वेळ नाही आहे. त्यामुळे तो त्याचा भाव सोडायला तयार नव्हता. लवकरात लवकर सामान पाहिजे असेल, तर त्याची जास्त किंमत मोजावी लागते.

win-win

भाव करताना सर्वात चांगली स्थिती कोणती ? जिथे तुम्ही पण जिंकता आणि समोरचा पण जिंकतो. असे झाले तरच दोन्ही बाजूचे लोक खुश होतील. एकमेकांशी भविष्यात परत परत व्यवहार करतील. फक्त तुम्ही जिंकलात किंवा समोरचा जिंकला, तर तो व्यवहार परत होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते.
भाव करताना कधीच एका गोष्टीवर अडून राहू नका. अशा वेळी जिंकणे व हरणे केवळ हाच पर्याय उरतो. कधीच गृहीत धरू नका, समोरच्याला काय पाहिजे हे तुम्हाला माहित आहे म्हणून. प्रत्येक माणूस वेगळा आहे. भाव करताना तो वेगळा विचार करतो. पैसाच सर्वकाही नसतो भाव करताना. भाव हा नेहमी दोन पक्षांवर अवलंबून असतो.

नफा

व्यवसाय करण्याचा मूळ उद्देश हाच आहे कि नफा मिळवणे. यावर्षी आपण बातम्यांमध्ये पाहिले अनेक online कंपनी बंद झाल्यात. त्या कंपनी नफा बनवत नव्हता. नफा न बनवणारा व्यवसाय जास्त वेळ चालवणे फार कठीण काम आहे. वाढीसाठी कर्ज घेणे आवश्यक आहे. पण कर्ज किती घ्यावे ? ते कसे फेडणार ? हे तुम्हाला ठरवावं लागेल. सर्वात उत्तम हेच आहे कि, तुम्हाला होणारा नफा हा तुमच्या व्यवसायाच्या वाढीकरिता वापरावा. व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणे जास्त धोकदायक आहे. त्यामुळे कर्जाच्या चक्रात सापडू शकता. तुम्ही सामान कितीला विकणार आहे ? कितीला विकत घेणार आहे ? तुमचा नफा किती ? ह्याच गणित करूनच व्यवसाय सुरु करा.
अनेक लोकांना व्यवसाय सुरु करायचा असतो. काहीना तो चालवायचा असतो आणि फार कमी लोकांना तो टिकवायचा असतो. व्यवसाय करणे म्हणजे शिकत राहणे. 













http://www.guntavnuk.com/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल