शुक्रवार, १६ जून, २०१७

गांडूळा चे शेतीसाठी फायदे -...

गांडूळा चे शेतीसाठी फायदे -
१) गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
२) मातीच्या कणांच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो.
३) गांडूळाच्या विष्टे पासून वनस्पतींना आवश्यक नत्र, फॉस्फरस, --- व अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य मिळत असून ताबडतोब पिकांना उपलब्ध होत असते.
४) मुळे अथवा झाडांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत होऊन जमिनीत हवा खेळती राहते. व झाडांची चागली वाढ होते.
५) जमिनीची जलधारणा क्षमता वाढते
६) जमिनीत धूप कमी होते
७) पाण्याचे बाष्पीभवन फार कमी होते
८) जमिनीचा सामू योग्य राखला जातो
९) गांडूळ खालची माती वर आणतात व तिला उत्तम व सकस बनवितात
१०) जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्याची वाढ होते.
१ १) जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन इतर खते कमी द्यावी लागतात.
१२) झाड सशक्त होऊन झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते
१३) फळांत टिकाऊपणा येउन लवकर पक्वता येण्याचे प्रमाण वाढते व फळांना रंग, चव, प्रत सुधारते
१४) नापीक जमीन सुपीक करण्याचे सामर्थ्य गांडूळात असते

व्हर्मीवॉश म्हणजे काय ?

"व्हर्मीवॉश म्हणजे गांडूळाच्या सर्वांगावरून निथळून आलेले (आंघोळीचे) पाणी होय

व्हर्मीवॉशचे फायदे -
१) व्हर्मीवॉश हे जेंविक बुरशी नाशकाची भूमिका पार पाडते
२) सूक्ष्म अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश याद्वारे सेंद्रिय स्वरुपात पिकांना उपलब्ध होत असल्याने रासायनिक खतांची बचत करण्यास नकळत पणे मदत करणे.
३) व्हर्मीवॉश हे सेंद्रिय असल्याने पिके निरोगी सशक्त व सुरक्षित अन्न म्हणून वापरतात
४) यांच्या वापराने शेतमाल निर्यातक्षम प्रतीचा देखील बनू शकतो
५) बाजारातून व्हर्मीवॉशचा अंश असलेली ओषधे विकत आणण्यापेक्षा ती घरच्याघरी तयार करावी. त्यामुळे आपल्याला ९० % नी स्वस्त पडते.
६) व्हर्मीवॉशची आवश्यकतेनुसार १:५ अथवा १:१० या प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादन वाढीला लागते. उदा. फुलशेतीत हे व्हर्मीवॉश मूळस्वरुपात १:१ या प्रमाणात मिसळून फवारले असता फुलझाडांच्या १५ % नी वाढ होते, तर उत्पन्नात ८०% नी वाढ झाल्याचे निदर्शनास दिसून आले आहे.
७) व्हर्मीवॉशच्या फवारणीमुळे कडधान्य वेलवर्गीय पिकांच्या उत्पादनात १० ते १९ % नी वाढ होते.
८) ग्रीन हाउस, पॉली हाउस अथवा नेटमध्ये लागवड केलेल्या एक्झीस्टीक व्हेजिटेबल मध्ये सुध्दा व्हर्मीवॉश फवारतात
९) व्हर्मीवॉश तयार करण्याचे तंत्र अल्पखर्चिक व सोपे असल्याने ते साध्या व गरीब शेतकऱ्याला सुध्दा आत्मसात करता येऊ शकते.
१०) व्हर्मीवॉश हे विषारी नसल्याने त्याची फवारणी करतांना मजुरांना कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तसेच ते दीर्घकाळ साठवता येवू शकते.
११) व्हर्मीवॉशच्या कितीही फवारन्या केल्या तरी ते सेंद्रिय असल्याने त्याचा पिकांवर कोणताही अनिष्ठ परिणाम होत नाही. व याउलट आपल्याला रासायिक औषधांची बचत होते.
१२) गांडूळाना झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी व्हर्मीवॉशचा वापर केला जातो.
१३) व्हर्मीवॉशचे युनिट / सयंत्र उभारणीसाठी फार मोठी जागा / भरपूर मोठी भांडवलाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे ते कमी जागेत व कमी खर्चात तयार होते.
१४) व्हर्मीवॉश विकून अर्थार्जन होतो. व एक व्यवसाय सुरु करण्यास फायदेशीर ठरते.
१५) व्हर्मीवॉश फळभाज्या पालेभाज्या, शेंगभाज्या आणि जमिनीतल्या पिकांना हे खूप फायदेशीर ठरू शकते. उदा. आले, बटाटा, कांदा, हळद इ. साठी वापर सध्या पश्चिम महाराष्ट्रात अनिवार्य ठरू लागल्या आहेत.

------------------------------
-----------------------------
दशपर्णी अर्क
१. सीताफळ २. करंज ३. गुडवेल / धोतरा ४. घानेणी ५. कन्हेर ६. रुई मंदार ७. कडुलिंब ८. पपई ९. निर्गुळी १०. वन एरंड

अशा विषारी अंश वनस्पतीच्या पाल्यापासून तयार केले जाते त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी कीड व्यवस्थापन करता येते
 
 
 
 
 
by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल