शुक्रवार, १६ जून, २०१७

शेती विषयी कायद्यातील तरतुदी...

सादरकर्ता : शेखर गायकवाड

विवरण कायद्यातील तरतुदी - पान १

प्रिय शेतकरी बंधूंनो,

अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्‍यांच्य दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतीलअनेक शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला, हे आपणास माहीत आहे.

.देशभरामध्ये विविध न्यायालयात सध्या सुमारे अडीच कोटीच्या वर खटले प्रलंबित आहेत. एकटया महाराष्ट्रातच अशा खटल्यांची संख्या 30 लाखाच्यावर आहे. प्रत्येक खटल्यातील दोन बाजू व त्यामध्ये गुंतलेली कमीतकमी दोन कुटुंबे विचारात घेतली तर खटल्यामध्ये किती व्यक्ती गुतलेल्या आहेत याचा अंदाज बांधलेला बरा! यातील बहुतांश खटल्यांमध्ये, खटल्याचे मूळ कारण हे मुख्यत: मालमत्ता किंवा मिळकत हे आहे.

अत्याधुनिक पध्दतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी आपल्या शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन्न वाढीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्या प्रयत्नांना कायदेविषयक ज्ञानाची जर जोड दिली गेली तर असा शेतकरी निश्चितपणे प्रगती करु शकेल. यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने जमिनीबाबतचे रेकॉर्ड सतत अद्यावत ठेवणे आवश्यक आहे व कायद्याच्या तरतुदी समजावून घेतल्या पाहिजेत.

खरेतर प्रत्येक शेतकर्‍याने आता स्वत:च्या जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांची एक मुलभूत फाईल तयार केली पाहिजे. अशा फाईलमध्ये किमान खालीलप्रमाणे कागदपत्रे ठेवावीत.

(1) मालकीविषयीची कागदपत्रे :
जमीन आपल्या मालकीची कशी झाली हे दाखविणारी कागदपत्रे मूळ स्वरुपात प्रत्येक शेतकर्‍याने आपल्याकडे ठेवली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: खरेदीचा दस्त, बक्षीसपत्राचे दस्त, मृत्युपत्र, किंवा अन्य स्वरुपाचा मूळ दस्तऐवज यांचा समावेश होतो. जर वडीलोपार्जित जमीन नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकर्‍याने एका कोर्‍या कागदावर वंशवेल लिहून काढला पाहिजे. त्यामध्ये आजोबांचे नांव, त्यांना असणारी एकूण मुले व मुली, त्यांच्या मृत्युनंतर झालेल्या वारसाच्या नोंदी, कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमीनीपैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेले आहे हे शेतकर्‍याला समजले पाहिजे. यामध्येच सर्व वारसांच्या नोंदी, फेरफार नोंदीचे उतारे, वारस ठरावाचे उतारे लावावेत.

(2) 7/12 उतारा :
आपल्या हक्काची नोंद दरवर्षी योग्यरित्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांने दरवर्षी आवर्जुन 7/12 च्या उतार्‍याची नक्कल घेऊन मूळ फाईलला लावली पाहिजे. जमीन मालकीची झाल्यापासूनचे सर्व 7/12 उतारे या फाईलमध्ये लावल्यास शेतकर्‍याच्या नवीन पिढीलादेखील आपले हक्क समजण्यास मदत होईल.

(3) जमीन मोजणीचे नकाशे :
ज्या ज्या जमीनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीच्या आहेत, अशा जमीनीच्या मोजणीचे नकाशे प्रत्येकशेतकर्‍याजवळ असणे आवश्यक आहे. शेजारच्या शेतकर्‍याने अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करुन किंवा अर्जंटमोजणीची फी भरुन जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमीनी एकदा रितसर मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ
ठेवले पाहीजेत.


कायद्यातील तरतुदी - पान २

(4) जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे :
शासनामार्फत जमाबंदी करतांना राज्यातील सर्व जमीनी मोजण्यांत आल्या असून त्यांचे मोजमाप टिपण पुस्तकात नोंदविलेले असते. आपल्या मालकीच्या जमीनीचे टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरिक्षक, भूमी अभिलेख (मोजणी खात्याच्या कार्यालयाकडून) प्राप्त करुन घेऊन आपल्या मूळ फाईलला लावावेत. या नकलांमुळे जमीनीचे एकूण क्षेत्रफळ, लांबी, रुंदी व आकार समजण्यास शेतकर्‍याला मदत होईल.

(5) 8अ चा उतारा :
आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. जमीन जर खरेदीची असेल तर, खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा. जमीन जर वडीलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन घेऊन फाईलला लावले पाहिजेत.

(6) इतर हक्कातील नोंदीविषयक कागदपत्रे :
मालकीच्या कोणत्याही जमीनीबाबत इतर हक्कांमध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकर्‍यांनी मूळ फाईलमध्ये लावली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: सोसायटीच्या कर्जाच्या बोजाच्या नोंदी ज्या "ई" करारपत्राच्या आधारे करण्यांत त्या "ई" करारपत्राचा नमुना, किंवा बँकेचे कर्ज घेतलेले असल्यास गहाणखताची प्रत इत्यादींचा समावेश होतो. जमीनीमध्ये हक्क सांगणार्‍या काही व्यक्तिंची नांवे इतर हक्कात असल्यास ती नोंद कशाच्या आधारे आली हे सांगणारी कागदपत्रे मूळ फाईलला लावणे आवश्यक आहे.

(7) जमीन महसूलाच्या पावत्या :
दरवर्षी जमीन महसूल भरल्यानंतर तलाठयामार्फत दिल्या जाणार्‍या पावत्या हा एक कायद्याच्या ञ्ृष्टीने अतिशय महत्वाचा पुरावा मानला जातो. हा पुरावा शेतकर्‍याने व्यवस्थित सांभाळून व अद्यावत स्वरुपात ठेवला पाहिजे.

(8) घराच्या मालकी हक्काबाबतचे रेकॉर्ड :
शेतकर्‍याने शेतात किंवा अन्यत्र घर बांधले असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा, खरेदी पत्र, घरपट्टी भरल्याच्या पावत्या इत्यादी महत्वाची कागदपत्रे देखील या फाईलमध्ये लावावीत.

(9) पूर्वीचे खटले व त्या विषयीची माहिती :
स्वत:चे हितसंबंध असणार्‍या सर्व जमीनींच्या बाबतीत पूर्वी कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चालली असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र, इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजेत.

(10) इतर कागदपत्रे :
या शिवाय शेतकर्‍याच्या जमीनीचा ज्या ज्या प्रकरणी संबंध येतो, त्या संदर्भात जो कागदोपत्री व्यवहार केला असेल, त्या संबंधीची सर्व कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे. यामध्ये तगाई माफीचे आदेश, सारा माफीचे आदेश, नवीन शर्तीने जमीन दिली असल्यास त्याबाबतचे आदेश, भूसंपादनाची नोटीस, कृषी गणनेच्या वेळी दिलेली माहिती, किंवा अन्य महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश होतो.

अशा तर्‍हेने जर प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या जमीनीचे रेकॉर्ड ठेवले तर, प्रत्येक शेतकर्‍याला व त्यांच्या मुलांनादेखील आपले जमीनविषयकहक्क अधिक चांगल्या दृष्टीने समजून घेता येती दृष्टीनेनेत्ते मधील भांडणे कमी होण्याला मदत होईल. शिवाय ऐनवेळी कोणतीही कागदपत्रे मिळवण्यासाठी फारशीधावपळ करावी लागणार नाही. पिढयानपिढया कष्ट करणार्‍या शेतकर्‍याला सुध्दा आपल्या नावावर कोणकोणते गट नंबर आहेत, त्यापैकी कोणत्या गटावर कर्जकाढलेले आहे, कोणता गटनंबर कूळ कायद्याच्या वादात अडकलेला आहे असा फरक कळून येत नाही. जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड वरीलप्रमाणे अद्यावत ठेवल्यास त्याच्याहिताचे संरक्षण होण्यास निश्चितपणे चांगली मदत होऊ शकेल.

कायद्यातील तरतुदी - पान ३

7/12 म्हणजे काय?
प्रिय शेतकरी बंधुनो,

जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीतकमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकीहक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला.

7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही. सर्व शेतकर्‍यांनी हा मुद्दा अतिशय काळजीपुर्वक समजाऊन घेतला पाहिजे.

उदाहरणार्थ गणपत नांवाच्या शेतकर्‍याने त्यांच्या मालकीची 1 हेक्टर जमीन 5 मे 2000 रोजी गोविंद नावाच्या शेतकर्‍यास रजिष्टर खरेदीखताने विकली. रजिष्टर दस्त 5 मे रोजीच नोंदविला. 6 मे 2000 रोजी या जमीनीचा मालक कोण? असा प्रश्न विचारला तर खरेदीदार रामचंद्र हाच मालक ठरतो. परंतु 6 तारखेला 7/12 वर गणपतचेच नांव असू शकते. बर्‍याचवेळा खरेदीविक्रीनंतर 3 - 4 महिन्यांनी 7/12 वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकीहक्क 3 - 4 महिन्यांनी निर्माण होतो असे नाही !!!

7/12 उतारा हा प्रत्येक शेतकर्‍याला वाचता आला पाहिजे. त्यावर गांवाचे नांव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पध्दती, कब्जेदाराचे नांव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नांव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-7) लिहिलेला असतो.

तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजुला (नमुना-12) मध्ये लिहिलेला असतो.

सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी 7/12 पुस्तके नव्याने लिहीली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने 7/12 उतारे लिहिले जातात.

7/12 वरील मालकीहक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय 7/12 वर येऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, कोणत्याही शेतकर्‍याला जर अशी शंका आली की, पूर्वी अमुक नांव 7/12 वर कसलाही कायदेशीर आधार नसतांना नोंदलेले आहे, तर त्याने जुने 7/12 उतारे काढून, फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नांव कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.

दैनंदिन जीवनांत आपणास रेशनचा फॉर्म, शाळेचा फॉर्म, टेलिफोनचा फॉर्म, पासपोर्टचा फॉर्म, ट्रॅक्टर नोंदणीचा फॉर्म, इलेक्ट्रीसिटीचा फॉर्म असे विविध फॉर्म भरावे लागतात. परंतु वर्षानुवर्षे हाताळला जात असलेला 7/12 चा नमुना अनेकांना अनाकलकनीय वाटतो. त्यामुळे जाणीवपूर्वक 7/12 उतारा म्हणजे काय हे शांतपणे समजून घेतले पाहिजे.

7/12 च्या संदर्भात खालील महत्वाचे मुद्दे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावेत.

(1) आपल्या नावांवर असणार्‍या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी एक 7/12 उतारा असतो.



कायद्यातील तरतुदी - पान ४

1) जमिनीचे रेकॉर्ड

अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्‍यांच्य दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांचीव जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला, हे आपणास माहीत आहे.

देशभरामध्ये विविध न्यायालयात सध्या सुमारे अडीच कोटीच्या वर खटले प्रलंबित आहेत. एकटया महाराष्ट्रातच अशा खटल्यांची संख्या 30 लाखाच्यावर आहे. प्रत्येक खटल्यातील दोन बाजू व त्यामध्ये गुंतलेली कमीतकमी दोन कुटुंबे विचारात घेतली तर खटल्यामध्ये किती व्यक्ती गुतलेल्या आहेत याचा अंदाज बांधलेला बरा! यातील बहुतांश खटल्यांमध्ये, खटल्याचे मूळ कारण हे मुख्यत: मालमत्ता किंवा मिळकत हे आहे.
अत्याधुनिक पध्दतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी आपल्या शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन्न वाढीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्या प्रयत्नांना त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची जर जोड दिली गेली तर असा शेतकरी निश्चितपणे प्रगती करु शकेल. यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने जमिनीबाबतचे रेकॉर्ड सतत अद्यावत ठेवणे आवश्यक आहे व कायद्याच्या तरतुदी समजावून घेतल्या पाहिजेत.
खरेतर प्रत्येक शेतकर्‍याने आता स्वत:च्या जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांची एक मुलभूत फाईल तयार केली पाहिजे. अशा फाईलमध्ये किमान खालीलप्रमाणे कागदपत्रे ठेवावीत.

(1) मालकीविषयीची कागदपत्रे :
यामध्ये आपण कसत असलेली जमीन ही आपल्या मालकीची कशी झाली हे दाखविणारी कागदपत्रे मूळ स्वरुपात प्रत्येक शेतकर्‍याने आपल्याकडे ठेवली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: खरेदीचा दस्त, बक्षीसपत्राचे दस्त, मृत्युपत्र, किंवा अन्य स्वरुपाचा मूळ दस्तऐवज यांचा समावेश होतो. जर वडीलोपार्जित जमीन नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकर्‍याने एका कोर्‍या कागदावर वंशवेल लिहून काढला पाहिजे. त्यामध्ये आजोबांचे नांव, त्यांना असणारी एकूण मुले व मुली, त्यांच्या मृत्युनंतर झालेल्या वारसाच्या नोंदी, कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमीनीपैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेले आहे हे शेतकर्‍याला समजले पाहिजे. यामध्येच सर्व वारसांच्या नोंदी, फेरफार नोंदीचे उतारे, वारस ठरावाचे उतारे लावावेत.


(2) 7/12 उतारा :
आपल्या हक्काची नोंद दरवर्षी योग्यरित्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांने दरवर्षी आवर्जुन 7/12 च्या उतार्‍याची नक्कल घेऊन मूळ फाईलला लावली पाहिजे. जमीन मालकीची झाल्यापासूनचे सर्व 7/12 उतारे या फाईलमध्ये लावल्यास शेतकर्‍याच्या नवीन पिढीलादेखील आपले हक्क समजण्यास मदत होईल.

(3) जमीन मोजणीचे नकाशे :
ज्या ज्या जमीनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीच्या आहेत, अशा जमीनीच्या मोजणीचे नकाशे प्रत्येक शेतकर्‍याजवळ असणे आवश्यक आहे. शेजारच्या शेतकर्‍याने अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करुन किंवा अर्जंट मोजणीची फी भरुन गरजेनुसार जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमीनी एकदा रितसर मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ ठेवणे शेतकर्‍याच्या हिताचे आहे.

(4) जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे :
शासनामार्फत जमाबंदी करतांना राज्यातील सर्व जमीनी मोजण्यांत आल्या असून त्यांचे मोजमाप या टिपण पुस्तकात नोंदविलेले असते. आपल्या मालकीच्या जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरिक्षक, भूमी अभिलेख (मोजणी खात्याच्या कार्यालयाकडून) प्राप्त करुन घेऊन आपल्या मूळ फाईलला लावावेत. या नकलांमुळे जमीनीचे एकूण क्षेत्रफळ, लांबी, रुंदी समजण्यास शेतकर्‍याला मदत होईल.

(5) 8अ चा उतारा :
आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. जमीन जर खरेदीची असेल तर, खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा. जमीन जर वडीलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन घेऊन फाईलला लावले पाहिजेत.

(6) इतर हक्कातील नोंदीविषयक कागदपत्रे :
आपल्या मालकीच्या कोणत्याही जमीनीबाबत इतर हक्कांमध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकर्‍यांनी मूळ फाईलमध्ये लावली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: सोसायटीच्या कर्जाच्या बोजाच्या नोंदी ज्या "ई" करारपत्राच्या आधारे करण्यांत त्या "ई" करारपत्राचा नमुना, किंवा बँकेचे कर्ज घेतलेले असल्यास गहाणखताची प्रत इत्यादींचा समावेश होतो. जमीनीमध्ये हक्क सांगणार्‍या काही व्यक्तिंची नांवे इतर हक्कात असल्यास ती नोंद कशाच्या आधारे आली हे सांगणारी कागदपत्रे मूळ फाईलला लावणे आवश्यक आहे.

(7) जमीन महसूलाच्या पावत्या :
दरवर्षी जमीन महसूल भरल्यानंतर तलाठयामार्फत दिल्या जाणार्‍या पावत्या हा एक कायद्याच्या ञ्ृष्टीने अतिशय महत्वाचा पुरावा मानला जातो. हा पुरावा शेतकर्‍याने व्यवस्थित सांभाळून व अद्यावत स्वरुपात ठेवला पाहिजे.

(8) घराच्या मालकी हक्काबाबतचे रेकॉर्ड :
शेतकर्‍याने शेतात किंवा अन्यत्र घर बांधले असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा, खरेदी पत्र, घरपट्टी भरल्याच्या पावत्या इत्यादी महत्वाची कागदपत्रे देखील या फाईलमध्ये लावावीत.

(9) पूर्वीचे खटले व त्या विषयीची माहिती :
स्वत:चे हितसंबंध असणार्‍या सर्व जमीनींच्या बाबतीत पूर्वी कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चालली असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र, इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजेत.

(10) इतर कागदपत्रे :
या शिवाय शेतकर्‍याच्या जमीनीचा ज्या ज्या ठिकाणी संबंध येतो, त्या संदर्भात जो कागदोपत्री व्यवहार केला असेल, त्या संबंधीची सर्व कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे. यामध्ये तगाई माफीचे आदेश, सारा माफीचे आदेश, नवीन शर्तीने जमीन दिली असल्यास त्याबाबतचे आदेश, भूसंपादनाची नोटीस, कृषी गणनेच्या वेळी दिलेली माहिती, किंवा अन्य महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश होतो.

अशा तर्‍हेने जर प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या जमीनीचे रेकॉर्ड ठेवले तर, प्रत्येक शेतकर्‍याला व त्यांच्या मुलांनादेखील आपले जमीनविषयकहक्क अधिक चांगल्या दृष्टीने समजून घेता येती दृष्टीनेनेत्ते मधील भांडणे कमी होण्याला मदत होईल. शिवाय ऐनवेळी कोणतीही कागदपत्रे मिळवण्यासाठी फारशीधावपळ करावी लागणार नाही. पिढयानपिढया कष्ट करणार्‍या शेतकर्‍याला सुध्दा आपल्या नावावर कोणकोणते गट नंबर आहेत, त्यापैकी कोणत्या गटावर कर्जकाढलेले आहे, कोणता गटनंबर कूळ कायद्याच्या वादात अडकलेला आहे असा फरक कळून येत नाही. जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड वरीलप्रमाणे अद्यावत ठेवल्यास त्याच्याहिताचे संरक्षण होण्यास निश्चितपणे चांगली मदत होऊ शकेल




by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल