शुक्रवार, १६ जून, २०१७

कायद्याचा वायदा आणि फायदा कोणाला?

ब्रिटिश राजवटीत त्यांच्या विकासाला अनुकूल असे अनेक भले-बुरे कायदे या देशात केले. आता आपण स्वतंत्र आहोत; परंतु त्यांच्याच अनेक जुन्या कायद्याचे अस्तित्व कायम ठेवले. अनेक जुनाट कालबाह्य कायदे बदलण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रात लोकपाल कायदा व राज्यात जादूटोणा विरोधी कायदा याबाबत सार्वत्रिक चर्चेला उधाण आले होते. ते दोन्हीही कायदे विधिमंडळात संमतही झाले. त्यापाठोपाठ ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधानातील (1860) कलम 377 च्या नेमक्‍या अर्थाचा सर्वोच्च न्यायालयाने उलगडा करून दाखवला. आपल्या देशात या कायद्यान्वये अनैसर्गिक लैंगिक संबंध हा गुन्हाच असल्याचे बजावले. खरेतर भारताने नेमलेल्या 172 व्या कायदा आयोगाने कालबाह्य कायद्यांबाबत पुनर्विचार करण्याबद्दल सुचविले होते त्यात या कायद्याचा समावेश आहे. या निकालाविरोधात सरकार आता पुनर्विचार याचिका दाखल करत आहे. यानंतर देवयानी खोब्रागडे या अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्त यांच्या अमेरिकेत कायदे पालनाबाबत दोन्ही देशांचे वेगवेगळे दृष्टिकोन पुढे आले आहेत. भारतात भूसंपादन कायदा 1894 हाही असाच दीर्घकाळ अस्तित्वात असलेला कालबाह्य कायदा केंद्राने रद्द करून त्या जागी भूसंपादन पुनर्वसन, पुनर्स्थापना कायदा 2012 मंजूर केला आहे. अर्थात त्यासाठी जनतेला प्रदीर्घ लढा द्यावा लागला, हे आपणास आठवत असेलच.
या देशावर ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केले. त्यांच्या राजवटीत त्यांना विकासाला अनुकूल असे अनेक भले-बुरे कायदे केले. आता आपण स्वतंत्र आहोत; परंतु त्यांच्याच अनेक जुन्या कायद्याचे अस्तित्व आपण कायम ठेवले. काही कायदे नवीनही केले; परंतु ब्रिटिशांची छाप आपण विसरलो नाहीत. अनेक जुनाट कालबाह्य कायदे बदलण्याची गरज आहे. एखाद्या कायद्यासंबंधात विवाद उपस्थित होऊन जनआंदोलने झालीत की मगच सरकारला जाग येते.
कायद्यामुळे समाजाचे भले झाले पाहिजे, हे कायद्याचे मूलभूत तत्त्व आहे. अनेक कायद्यातल्या तरतुदी आजच्या बदलत्या परिस्थितीत-संदर्भात जाचक वाटतात त्यामुळे जनतेत उद्रेक होतो. अशा परिस्थितीत न्यायलयीन वाद उभा राहिला, तर कायद्याचा अभिप्रेत अर्थ न्यायालये स्पष्ट करतात. तो कायदा अयोग्य असेल, तर तो बदला असा सल्ला न्यायालय देते.

भारत हा जगात सर्वांत जास्त कायदा असणारा देश आहे; परंतु येथे अनेक कायद्यांची कठोर अंमलबजावणी होत नाही. कायदे मोडणाऱ्यांची संख्याही इथे जास्त आहे. किंबहुना व्यक्तीची प्रतिष्ठा त्याच्या कायदे मोडण्याच्या क्षमतेवर आधारित असते, असा समज दृढ केला गेला आहे. शासकीय "गॅझेट'मध्ये कायदा प्रसिद्ध झाला, त्याक्षणी सर्व भारतीयांना कायदा माहीत झाला असे गृहीत धरले जाते. कायद्याचे अज्ञान हा बचावाचा मुद्दा होऊ शकत नाही. कायद्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे, असा दंडक आहे. आदर्श समाज रचनेत नीतिनियमाने वागत त्यामुळे तेथे कमीत-कमी कायदे असत; पण समाजस्वास्थ्य बिघडले, व्यक्तिगत स्वार्थासाठी "बळी तो कान पिळी' असे प्रकार वाढायला लागले आणि कायद्याच्या बंधनाची गरज वाटायला लागली. त्यातून कायद्यांची भरमार सुरू झाली. चीनमध्ये कमीतकमी कायदे आहेत. ते कमी शब्दांतले आहेत आणि सर्वांना समजू शकतील, असे सुटसुटीत आहेत, असे जाणकार सांगतात.

आपल्या देशात बहुसंख्य समाजाचे जीवन शेतीशी निगडित आहे. साहजिकच शेतीविषयक तंटे व त्याचा निपटारा करण्याची इथे पूर्वापार काही एक व्यवस्था होती. खानदेशात फड-बागायती नावाची एक नामांकित सिंचनपद्धती होती. 650 वर्षांपूर्वीच्या या सिंचन व्यवस्थेत इंग्रजांच्या राजवटीत तसेच स्वातंत्र्यानंतरही कुठलाही वाद उपस्थित झाल्याची नोंद नाही. देशात स्वातंत्र्याच्या काळात शेती सुधारणा विषयक 272 कायदे झाले आणि आज कुठल्याही कोर्टात गेले तर सर्वांत जास्त दावे, तसेच प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेले दावे हे शेतीविषयक वादाचे आहेत. न्यायाला विलंब म्हणजे एक प्रकारे न्याय नाकारणे, या प्रसिद्ध वाक्‍याची प्रचिती त्यामुळे येते.

शेतीविषयक नोंदी, त्यांचे वाद याचा आणि महसूल खात्याशी जवळचा संबंध आहे. शेतीसंबंधाचे कागदपत्र - वाटणी-हिस्से, खरेदी-विक्री, हे सर्व व्यवहार म्हटले म्हणजे पटकन "तलाठी' डोळ्यासमोर येतो. त्याचा उल्लेख सर्व जण ब्रह्मदेवाचा लिपिक "चित्रगुप्त' म्हणूनच करतात. "जे नसे ललाटी ते देई तलाठी' किंवा "कुलकर्णी अप्पा, नकोरे बाप्पा' असे त्यांच्या बाबतीत म्हणायची पाळी जनतेवर येते.

उत्तर प्रदेशात समाजवादी चळवळ जोरात होती. त्या वेळी मुलायमसिंगांचे पहिल्यांदा सरकार स्थापन झाले. मुलायमसिंग यांचा खेडोपाडी सत्कार होत असे. एका गावात त्यांचा सत्कार गावातील सर्वांत ज्येष्ठ आजीबाईंच्या हस्ते झाला. सत्कार स्वीकारून, मुलायमसिंग त्या वयोवृद्ध म्हातारीपुढे आशीर्वादासाठी झुकले. तेव्हा म्हातारीने आशीर्वाद दिला, की भाई, मुलायम तू इतना बडा हो, इतना बडा हो, की हमारे गावके पटवारीसे भी बडा हो ! याचा अर्थ त्या खेड्यातील बाईला मुख्यमंत्र्यापेक्षा गावातला तलाठीच मोठा वाटला होता.

झारखंड राज्यातील धनबाद जिल्हा जलदगती न्यायालयातील ही एक घटना आहे. जिल्ह्यातील एका गावातील सुमारे दीड कोटीपेक्षा जास्त किमतीच्या शेत जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे. खालच्या कोर्टाने वीस वर्षांनंतर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला होता; परंतु त्या गावच्या मनमोहन पाठक या पुजाऱ्याने त्या जागेवर दावा खालच्या कोर्टात सुरू असतानाच राम व हनुमानाचे मंदिर बांधले. तेथील महसूल यंत्रणेला विशेषतः तलाठ्याला "वश' करून सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर राम व हनुमानाचे नाव कब्जेदार सदरी नोंदवून घेतले आणि या पुजाऱ्याने जिल्ह्यातील जदलदगती न्यायालयाकडे अपील केले. त्यांच्या वकिलाने न्यायमूर्ती सुनीलकुमार सिंह यांना सांगितले, की सातबारा उताराऱ्यावर राम व हनुमानाची नावे आहेत, त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय या दाव्याचा निकाल होऊ शकत नाही. न्यायमूर्तीनाही त्यांचे म्हणणे पटले. त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाहीर समन्स बजावला. त्यावरही हे कब्जेदार हजर राहिले नाहीत. तेव्हा बेलीफाला पाठवून समन्स बजावयला फर्मावले. कोर्टात सुनावणीच्या वेळी शिरस्तेदारामार्फत राम-हनुमानाचा पुकारा करण्यात आला व पुढे अनेक तारखांना त्याचीच पुनरावृत्ती होत आहे व न्याय लांबतो आहे. शेती बळकावण्यासाठी कायद्याचा गैरफायदा घेऊन बलदंड व्यक्ती कोणकोणत्या थराला जाऊ शकतात ! यावर ही सत्य घटना बरेच काही भाष्य करून जाते.









सुभाष काकुस्ते
  9422798358
(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)





















by- Agrowon

शेती विषयी कायद्यातील तरतुदी...

सादरकर्ता : शेखर गायकवाड

विवरण कायद्यातील तरतुदी - पान १

प्रिय शेतकरी बंधूंनो,

अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्‍यांच्य दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांची व जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतीलअनेक शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला, हे आपणास माहीत आहे.

.देशभरामध्ये विविध न्यायालयात सध्या सुमारे अडीच कोटीच्या वर खटले प्रलंबित आहेत. एकटया महाराष्ट्रातच अशा खटल्यांची संख्या 30 लाखाच्यावर आहे. प्रत्येक खटल्यातील दोन बाजू व त्यामध्ये गुंतलेली कमीतकमी दोन कुटुंबे विचारात घेतली तर खटल्यामध्ये किती व्यक्ती गुतलेल्या आहेत याचा अंदाज बांधलेला बरा! यातील बहुतांश खटल्यांमध्ये, खटल्याचे मूळ कारण हे मुख्यत: मालमत्ता किंवा मिळकत हे आहे.

अत्याधुनिक पध्दतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी आपल्या शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन्न वाढीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्या प्रयत्नांना कायदेविषयक ज्ञानाची जर जोड दिली गेली तर असा शेतकरी निश्चितपणे प्रगती करु शकेल. यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने जमिनीबाबतचे रेकॉर्ड सतत अद्यावत ठेवणे आवश्यक आहे व कायद्याच्या तरतुदी समजावून घेतल्या पाहिजेत.

खरेतर प्रत्येक शेतकर्‍याने आता स्वत:च्या जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांची एक मुलभूत फाईल तयार केली पाहिजे. अशा फाईलमध्ये किमान खालीलप्रमाणे कागदपत्रे ठेवावीत.

(1) मालकीविषयीची कागदपत्रे :
जमीन आपल्या मालकीची कशी झाली हे दाखविणारी कागदपत्रे मूळ स्वरुपात प्रत्येक शेतकर्‍याने आपल्याकडे ठेवली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: खरेदीचा दस्त, बक्षीसपत्राचे दस्त, मृत्युपत्र, किंवा अन्य स्वरुपाचा मूळ दस्तऐवज यांचा समावेश होतो. जर वडीलोपार्जित जमीन नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकर्‍याने एका कोर्‍या कागदावर वंशवेल लिहून काढला पाहिजे. त्यामध्ये आजोबांचे नांव, त्यांना असणारी एकूण मुले व मुली, त्यांच्या मृत्युनंतर झालेल्या वारसाच्या नोंदी, कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमीनीपैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेले आहे हे शेतकर्‍याला समजले पाहिजे. यामध्येच सर्व वारसांच्या नोंदी, फेरफार नोंदीचे उतारे, वारस ठरावाचे उतारे लावावेत.

(2) 7/12 उतारा :
आपल्या हक्काची नोंद दरवर्षी योग्यरित्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांने दरवर्षी आवर्जुन 7/12 च्या उतार्‍याची नक्कल घेऊन मूळ फाईलला लावली पाहिजे. जमीन मालकीची झाल्यापासूनचे सर्व 7/12 उतारे या फाईलमध्ये लावल्यास शेतकर्‍याच्या नवीन पिढीलादेखील आपले हक्क समजण्यास मदत होईल.

(3) जमीन मोजणीचे नकाशे :
ज्या ज्या जमीनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीच्या आहेत, अशा जमीनीच्या मोजणीचे नकाशे प्रत्येकशेतकर्‍याजवळ असणे आवश्यक आहे. शेजारच्या शेतकर्‍याने अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करुन किंवा अर्जंटमोजणीची फी भरुन जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमीनी एकदा रितसर मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ
ठेवले पाहीजेत.


कायद्यातील तरतुदी - पान २

(4) जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे :
शासनामार्फत जमाबंदी करतांना राज्यातील सर्व जमीनी मोजण्यांत आल्या असून त्यांचे मोजमाप टिपण पुस्तकात नोंदविलेले असते. आपल्या मालकीच्या जमीनीचे टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरिक्षक, भूमी अभिलेख (मोजणी खात्याच्या कार्यालयाकडून) प्राप्त करुन घेऊन आपल्या मूळ फाईलला लावावेत. या नकलांमुळे जमीनीचे एकूण क्षेत्रफळ, लांबी, रुंदी व आकार समजण्यास शेतकर्‍याला मदत होईल.

(5) 8अ चा उतारा :
आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. जमीन जर खरेदीची असेल तर, खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा. जमीन जर वडीलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन घेऊन फाईलला लावले पाहिजेत.

(6) इतर हक्कातील नोंदीविषयक कागदपत्रे :
मालकीच्या कोणत्याही जमीनीबाबत इतर हक्कांमध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकर्‍यांनी मूळ फाईलमध्ये लावली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: सोसायटीच्या कर्जाच्या बोजाच्या नोंदी ज्या "ई" करारपत्राच्या आधारे करण्यांत त्या "ई" करारपत्राचा नमुना, किंवा बँकेचे कर्ज घेतलेले असल्यास गहाणखताची प्रत इत्यादींचा समावेश होतो. जमीनीमध्ये हक्क सांगणार्‍या काही व्यक्तिंची नांवे इतर हक्कात असल्यास ती नोंद कशाच्या आधारे आली हे सांगणारी कागदपत्रे मूळ फाईलला लावणे आवश्यक आहे.

(7) जमीन महसूलाच्या पावत्या :
दरवर्षी जमीन महसूल भरल्यानंतर तलाठयामार्फत दिल्या जाणार्‍या पावत्या हा एक कायद्याच्या ञ्ृष्टीने अतिशय महत्वाचा पुरावा मानला जातो. हा पुरावा शेतकर्‍याने व्यवस्थित सांभाळून व अद्यावत स्वरुपात ठेवला पाहिजे.

(8) घराच्या मालकी हक्काबाबतचे रेकॉर्ड :
शेतकर्‍याने शेतात किंवा अन्यत्र घर बांधले असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा, खरेदी पत्र, घरपट्टी भरल्याच्या पावत्या इत्यादी महत्वाची कागदपत्रे देखील या फाईलमध्ये लावावीत.

(9) पूर्वीचे खटले व त्या विषयीची माहिती :
स्वत:चे हितसंबंध असणार्‍या सर्व जमीनींच्या बाबतीत पूर्वी कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चालली असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र, इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजेत.

(10) इतर कागदपत्रे :
या शिवाय शेतकर्‍याच्या जमीनीचा ज्या ज्या प्रकरणी संबंध येतो, त्या संदर्भात जो कागदोपत्री व्यवहार केला असेल, त्या संबंधीची सर्व कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे. यामध्ये तगाई माफीचे आदेश, सारा माफीचे आदेश, नवीन शर्तीने जमीन दिली असल्यास त्याबाबतचे आदेश, भूसंपादनाची नोटीस, कृषी गणनेच्या वेळी दिलेली माहिती, किंवा अन्य महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश होतो.

अशा तर्‍हेने जर प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या जमीनीचे रेकॉर्ड ठेवले तर, प्रत्येक शेतकर्‍याला व त्यांच्या मुलांनादेखील आपले जमीनविषयकहक्क अधिक चांगल्या दृष्टीने समजून घेता येती दृष्टीनेनेत्ते मधील भांडणे कमी होण्याला मदत होईल. शिवाय ऐनवेळी कोणतीही कागदपत्रे मिळवण्यासाठी फारशीधावपळ करावी लागणार नाही. पिढयानपिढया कष्ट करणार्‍या शेतकर्‍याला सुध्दा आपल्या नावावर कोणकोणते गट नंबर आहेत, त्यापैकी कोणत्या गटावर कर्जकाढलेले आहे, कोणता गटनंबर कूळ कायद्याच्या वादात अडकलेला आहे असा फरक कळून येत नाही. जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड वरीलप्रमाणे अद्यावत ठेवल्यास त्याच्याहिताचे संरक्षण होण्यास निश्चितपणे चांगली मदत होऊ शकेल.

कायद्यातील तरतुदी - पान ३

7/12 म्हणजे काय?
प्रिय शेतकरी बंधुनो,

जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीतकमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकीहक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला.

7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही. सर्व शेतकर्‍यांनी हा मुद्दा अतिशय काळजीपुर्वक समजाऊन घेतला पाहिजे.

उदाहरणार्थ गणपत नांवाच्या शेतकर्‍याने त्यांच्या मालकीची 1 हेक्टर जमीन 5 मे 2000 रोजी गोविंद नावाच्या शेतकर्‍यास रजिष्टर खरेदीखताने विकली. रजिष्टर दस्त 5 मे रोजीच नोंदविला. 6 मे 2000 रोजी या जमीनीचा मालक कोण? असा प्रश्न विचारला तर खरेदीदार रामचंद्र हाच मालक ठरतो. परंतु 6 तारखेला 7/12 वर गणपतचेच नांव असू शकते. बर्‍याचवेळा खरेदीविक्रीनंतर 3 - 4 महिन्यांनी 7/12 वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकीहक्क 3 - 4 महिन्यांनी निर्माण होतो असे नाही !!!

7/12 उतारा हा प्रत्येक शेतकर्‍याला वाचता आला पाहिजे. त्यावर गांवाचे नांव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पध्दती, कब्जेदाराचे नांव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नांव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-7) लिहिलेला असतो.

तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजुला (नमुना-12) मध्ये लिहिलेला असतो.

सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी 7/12 पुस्तके नव्याने लिहीली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने 7/12 उतारे लिहिले जातात.

7/12 वरील मालकीहक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय 7/12 वर येऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, कोणत्याही शेतकर्‍याला जर अशी शंका आली की, पूर्वी अमुक नांव 7/12 वर कसलाही कायदेशीर आधार नसतांना नोंदलेले आहे, तर त्याने जुने 7/12 उतारे काढून, फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नांव कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.

दैनंदिन जीवनांत आपणास रेशनचा फॉर्म, शाळेचा फॉर्म, टेलिफोनचा फॉर्म, पासपोर्टचा फॉर्म, ट्रॅक्टर नोंदणीचा फॉर्म, इलेक्ट्रीसिटीचा फॉर्म असे विविध फॉर्म भरावे लागतात. परंतु वर्षानुवर्षे हाताळला जात असलेला 7/12 चा नमुना अनेकांना अनाकलकनीय वाटतो. त्यामुळे जाणीवपूर्वक 7/12 उतारा म्हणजे काय हे शांतपणे समजून घेतले पाहिजे.

7/12 च्या संदर्भात खालील महत्वाचे मुद्दे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावेत.

(1) आपल्या नावांवर असणार्‍या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी एक 7/12 उतारा असतो.



कायद्यातील तरतुदी - पान ४

1) जमिनीचे रेकॉर्ड

अत्याधुनिक पध्दतीने शेती करण्याबरोबरच शेतीविषयक बदलत्या कायद्याचे ज्ञान होणे शेतकर्‍यांच्य दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. विविध कायद्यांचीव जमिनीच्या रेकॉर्डची माहिती नसल्यामुळे मागच्या पिढीतील अनेक शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला, हे आपणास माहीत आहे.

देशभरामध्ये विविध न्यायालयात सध्या सुमारे अडीच कोटीच्या वर खटले प्रलंबित आहेत. एकटया महाराष्ट्रातच अशा खटल्यांची संख्या 30 लाखाच्यावर आहे. प्रत्येक खटल्यातील दोन बाजू व त्यामध्ये गुंतलेली कमीतकमी दोन कुटुंबे विचारात घेतली तर खटल्यामध्ये किती व्यक्ती गुतलेल्या आहेत याचा अंदाज बांधलेला बरा! यातील बहुतांश खटल्यांमध्ये, खटल्याचे मूळ कारण हे मुख्यत: मालमत्ता किंवा मिळकत हे आहे.
अत्याधुनिक पध्दतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी आपल्या शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन्न वाढीचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्या प्रयत्नांना त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची जर जोड दिली गेली तर असा शेतकरी निश्चितपणे प्रगती करु शकेल. यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने जमिनीबाबतचे रेकॉर्ड सतत अद्यावत ठेवणे आवश्यक आहे व कायद्याच्या तरतुदी समजावून घेतल्या पाहिजेत.
खरेतर प्रत्येक शेतकर्‍याने आता स्वत:च्या जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांची एक मुलभूत फाईल तयार केली पाहिजे. अशा फाईलमध्ये किमान खालीलप्रमाणे कागदपत्रे ठेवावीत.

(1) मालकीविषयीची कागदपत्रे :
यामध्ये आपण कसत असलेली जमीन ही आपल्या मालकीची कशी झाली हे दाखविणारी कागदपत्रे मूळ स्वरुपात प्रत्येक शेतकर्‍याने आपल्याकडे ठेवली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: खरेदीचा दस्त, बक्षीसपत्राचे दस्त, मृत्युपत्र, किंवा अन्य स्वरुपाचा मूळ दस्तऐवज यांचा समावेश होतो. जर वडीलोपार्जित जमीन नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकर्‍याने एका कोर्‍या कागदावर वंशवेल लिहून काढला पाहिजे. त्यामध्ये आजोबांचे नांव, त्यांना असणारी एकूण मुले व मुली, त्यांच्या मृत्युनंतर झालेल्या वारसाच्या नोंदी, कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमीनीपैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेले आहे हे शेतकर्‍याला समजले पाहिजे. यामध्येच सर्व वारसांच्या नोंदी, फेरफार नोंदीचे उतारे, वारस ठरावाचे उतारे लावावेत.


(2) 7/12 उतारा :
आपल्या हक्काची नोंद दरवर्षी योग्यरित्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांने दरवर्षी आवर्जुन 7/12 च्या उतार्‍याची नक्कल घेऊन मूळ फाईलला लावली पाहिजे. जमीन मालकीची झाल्यापासूनचे सर्व 7/12 उतारे या फाईलमध्ये लावल्यास शेतकर्‍याच्या नवीन पिढीलादेखील आपले हक्क समजण्यास मदत होईल.

(3) जमीन मोजणीचे नकाशे :
ज्या ज्या जमीनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीच्या आहेत, अशा जमीनीच्या मोजणीचे नकाशे प्रत्येक शेतकर्‍याजवळ असणे आवश्यक आहे. शेजारच्या शेतकर्‍याने अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करुन किंवा अर्जंट मोजणीची फी भरुन गरजेनुसार जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमीनी एकदा रितसर मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ ठेवणे शेतकर्‍याच्या हिताचे आहे.

(4) जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे :
शासनामार्फत जमाबंदी करतांना राज्यातील सर्व जमीनी मोजण्यांत आल्या असून त्यांचे मोजमाप या टिपण पुस्तकात नोंदविलेले असते. आपल्या मालकीच्या जमीनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरिक्षक, भूमी अभिलेख (मोजणी खात्याच्या कार्यालयाकडून) प्राप्त करुन घेऊन आपल्या मूळ फाईलला लावावेत. या नकलांमुळे जमीनीचे एकूण क्षेत्रफळ, लांबी, रुंदी समजण्यास शेतकर्‍याला मदत होईल.

(5) 8अ चा उतारा :
आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. जमीन जर खरेदीची असेल तर, खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा. जमीन जर वडीलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन घेऊन फाईलला लावले पाहिजेत.

(6) इतर हक्कातील नोंदीविषयक कागदपत्रे :
आपल्या मालकीच्या कोणत्याही जमीनीबाबत इतर हक्कांमध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकर्‍यांनी मूळ फाईलमध्ये लावली पाहिजेत. यामध्ये मुख्यत: सोसायटीच्या कर्जाच्या बोजाच्या नोंदी ज्या "ई" करारपत्राच्या आधारे करण्यांत त्या "ई" करारपत्राचा नमुना, किंवा बँकेचे कर्ज घेतलेले असल्यास गहाणखताची प्रत इत्यादींचा समावेश होतो. जमीनीमध्ये हक्क सांगणार्‍या काही व्यक्तिंची नांवे इतर हक्कात असल्यास ती नोंद कशाच्या आधारे आली हे सांगणारी कागदपत्रे मूळ फाईलला लावणे आवश्यक आहे.

(7) जमीन महसूलाच्या पावत्या :
दरवर्षी जमीन महसूल भरल्यानंतर तलाठयामार्फत दिल्या जाणार्‍या पावत्या हा एक कायद्याच्या ञ्ृष्टीने अतिशय महत्वाचा पुरावा मानला जातो. हा पुरावा शेतकर्‍याने व्यवस्थित सांभाळून व अद्यावत स्वरुपात ठेवला पाहिजे.

(8) घराच्या मालकी हक्काबाबतचे रेकॉर्ड :
शेतकर्‍याने शेतात किंवा अन्यत्र घर बांधले असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा, खरेदी पत्र, घरपट्टी भरल्याच्या पावत्या इत्यादी महत्वाची कागदपत्रे देखील या फाईलमध्ये लावावीत.

(9) पूर्वीचे खटले व त्या विषयीची माहिती :
स्वत:चे हितसंबंध असणार्‍या सर्व जमीनींच्या बाबतीत पूर्वी कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चालली असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र, इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजेत.

(10) इतर कागदपत्रे :
या शिवाय शेतकर्‍याच्या जमीनीचा ज्या ज्या ठिकाणी संबंध येतो, त्या संदर्भात जो कागदोपत्री व्यवहार केला असेल, त्या संबंधीची सर्व कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे. यामध्ये तगाई माफीचे आदेश, सारा माफीचे आदेश, नवीन शर्तीने जमीन दिली असल्यास त्याबाबतचे आदेश, भूसंपादनाची नोटीस, कृषी गणनेच्या वेळी दिलेली माहिती, किंवा अन्य महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश होतो.

अशा तर्‍हेने जर प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या जमीनीचे रेकॉर्ड ठेवले तर, प्रत्येक शेतकर्‍याला व त्यांच्या मुलांनादेखील आपले जमीनविषयकहक्क अधिक चांगल्या दृष्टीने समजून घेता येती दृष्टीनेनेत्ते मधील भांडणे कमी होण्याला मदत होईल. शिवाय ऐनवेळी कोणतीही कागदपत्रे मिळवण्यासाठी फारशीधावपळ करावी लागणार नाही. पिढयानपिढया कष्ट करणार्‍या शेतकर्‍याला सुध्दा आपल्या नावावर कोणकोणते गट नंबर आहेत, त्यापैकी कोणत्या गटावर कर्जकाढलेले आहे, कोणता गटनंबर कूळ कायद्याच्या वादात अडकलेला आहे असा फरक कळून येत नाही. जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड वरीलप्रमाणे अद्यावत ठेवल्यास त्याच्याहिताचे संरक्षण होण्यास निश्चितपणे चांगली मदत होऊ शकेल




by - Internet

अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान!


मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला. अग्निहोत्राचा नित्य सराव शेतीसाठी खरोखरीच उपयोगी पडू शकतो हे जाणवले. तेव्हा पासून ही माहिती आपल्या इतर मराठी शेतकरी बांधवांपर्यंत विनासायास कशी नेता येईल ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. आंतरजालावर मराठीत काही माहिती उपलब्ध होते का, हे धुंडाळले. परंतु हाती विशेष काही आले नाही. इंग्रजी व अन्य विदेशी भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, पोलिश इ. ) मात्र विपुल माहिती उपलब्ध आहे. विज्ञान किंवा शेती हा काही माझा प्रांत नव्हे. परंतु तरीही माझ्या अल्पमतीला अनुसरून अग्निहोत्राविषयीची मला मिळालेली व शेतकरी बंधूंसाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी उपयुक्त वाटणारी माहिती आपल्या समोर ठेवत आहे! (जाणकारांनी ह्या माहितीत भर घातली तर स्वागतच आहे!)

मानवाच्या व जीवसृष्टीच्या इतिहासात सूर्य व अग्नी यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सूर्याने औष्ण्य दिले, प्रकाश, प्राणऊर्जा, अन्न दिले तर अग्नीने भयमुक्त केले, अन्न रांधता येणे शक्य केले व पोषण केले. त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अनुसरून जगातील बहुविध संस्कृतींमध्ये सूर्य व अग्नी वंदनीय मानले गेले असून त्यांना देवत्व बहाल केलेले आढळते. त्यांचा आदरसन्मान, त्यांचे प्रती कृतज्ञता आणि त्यांची उपासना हा त्यामुळे अनेक संस्कृतींचा अविभाज्य भाग न बनला तरच नवल!

भारतात शेती व गोधनाच्या दृष्टीने अग्नी व सूर्य फारच उपयोगी! कदाचित त्यामुळे भारतीय संस्कृतीतही सूर्योपासना व अग्नीपूजा पुरातन कालापासून दिसून येते. ह्या उपासना व पूजांमधील एक भाग म्हणजे अग्निहोत्र. अग्नी व सूर्याची आराधना. प्रजापतीला अभिवादन. बल, पुष्टी, औष्ण्य, ऊर्जा यांची आराधना. अग्निहोत्राची सुरुवात नक्की कोणी, कशी, केव्हा केली याविषयी बरेच संशोधक बरेच काही सांगू शकतील. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती अग्निहोत्राची शेतीसाठीची उपयुक्तता. भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठे, संशोधकांनी व कृषी तंत्रज्ञांनी केलेल्या आधुनिक, विज्ञानाधारित संशोधनानुसार अग्निहोत्राचा शेतीला खूप चांगला फायदा होतो हे निष्पन्न झाले आहे. एका शेतीप्रधान देशासाठी असे संशोधन व त्याची उपयुक्तता अमूल्य आहे.

पूर्वी अग्निहोत्र हे परंपरा, रूढींच्या जोखडात अडकले होते. परंतु आताचे त्याचे स्वरूप सर्वसामान्य माणसास अनुसरण्यास व समजण्यास सोपे, सहज झाले आहे. शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आपल्या शेतीसाठी अग्निहोत्र करू शकतात. त्याला कसलेही बंधन नाही. अग्निहोत्र ही एक प्रकारची विज्ञानाधारित, शास्त्रशुद्ध वातावरण-प्रक्रियाच आहे असे म्हणता येईल. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या आधारे अग्निहोत्राचे सभोवतालच्या वातावरणावर, पिकांवर, जमिनीच्या कसावर, पाण्यावर होणारे परिणाम अभ्यासू जाता हा प्रकार खूपच लाभदायी व पर्यावरणपूरक आहे हे संशोधकांच्या लक्षात आले आणि सुरू झाली अग्निहोत्राचा पूरक वापर करून कसलेली शेती.

ह्या आधुनिक अग्निहोत्रात काय असते तरी काय?

१. सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन वेळांना हे अग्निहोत्र करतात.
२. त्यासाठी लागणारी सामग्री अतिशय कमी खर्चात, शेती व्यवसायात सहज उपलब्ध होणारी, पर्यावरणपूरक असते. अग्निहोत्राचे तांबे धातूचे पिरॅमिड आकारातील पात्र भारतात माफक किमतीत सामान्यतः पूजा भांडार, भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.
३. अग्निहोत्राला लागणारा वेळ सकाळ-सायंकाळ मिळून जास्तीत जास्त अर्धा तास, व त्याचे होणारे फायदे मात्र दूरगामी आहेत.
४. सर्व परिवार अग्निहोत्रात सामील होऊ शकतो. त्याला संख्या, जाती, धर्म, लिंग, पंथाचे बंधन नाही.
५. अग्निहोत्र करताना उच्चारण्याचे मंत्र अतिशय सोपे असून परदेशी लोकही ते सहज पाठ करू शकतात.

साहित्य :

१. तांबे धातूचे ठराविक आकाराचे पिरॅमिड पात्र
२. गायीच्या शेणाची गोवरी, गायीचे तूप, हातसडीचा अख्खा तांदूळ (महिनाभरासाठी पावशेर तांदूळ पुरेसा)
३. काडेपेटी
४. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचे नेमके वेळापत्रक.
५. काटक्या वापरायच्या असल्यास वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस यांच्या वाळक्या काटक्या.

अग्निहोत्राचा प्रत्यक्ष विधी :

स्थळ : शेताच्या मध्यात एखादे खोपटे बांधून तिथे हे अग्निहोत्र केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

सूर्याला सन्मुख बसावे. (सकाळी पूर्वेस व सायंकाळी पश्चिमेस तोंड करून) समोर तांब्याच्या पिरॅमिड पात्रात गोवरीचा छोटा तुकडा तळाशी ठेवून त्याच्या भोवती गोवरीचे इतर तुकडे रचत जाणे, ज्यामुळे मध्यात थोडा खळगा तयार होईल. मग एका गोवरीच्या तुकड्याच्या टोकाला थोडे तूप लावून तो आगकाडीने पेटविणे व तो तुकडा अग्निहोत्र पात्रात ठेवणे. अग्निहोत्र प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मधल्या खळग्यात कापूर वडी ठेवू शकता. नेमक्या सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी गायीच्या तुपात भिजलेले दोन चिमटी तांदूळ (अक्षता) ह्या पेटत्या अग्नीला अर्पण करणे. दोन्ही वेळा भिन्न मंत्र म्हटले जातात. दोन्ही वेळा अग्नीत अक्षता अर्पण केल्यावर ते तांदूळ पूर्णपणे जळेपर्यंत तुम्ही बसले असाल त्याच जागी डोळे मिटून स्थिर, शांत बसू शकता.

१. सूर्योदयाचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र :

सूर्याय स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) सूर्याय इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

२. सूर्यास्ताचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र :

अग्नये स्वाहा । (चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ अग्नीत घालणे) अग्नये इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

अग्निहोत्र हे वातावरण, जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी व मानवास आरोग्यदायी असून दोषनिर्मूलनाचे, शुद्धीकरणाचे काम करते असा अभ्यासकांचा दावा आहे. मंत्रांसहित अग्निहोत्राचे परिणाम फक्त पिकावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावर, मनस्थितीवर सकारात्मक पद्धतीने दिसून आले आहेत. मंत्र म्हणजे मनाला जे तारतात ते. संस्कृत मंत्रांची कंपने/ तरंग व त्यांचा मानवी चेतासंस्थेवरील, जीवसृष्टीवरील सकारात्मक परिणाम ह्यांवर संशोधन चालू आहेच! अग्निहोत्रात म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाही सभोवतालच्या जीवसृष्टीवर व मानवी आरोग्यावर -स्वास्थ्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे.

भारतात अग्निहोत्र करण्याच्या वेळापत्रकासाठी ही लिंक पहा.

रोज अग्निहोत्र करून जोपासलेल्या, कसलेल्या शेतीचा भारतातील वेगवेगळ्या कृषी संशोधन संस्था, अभ्यासक व भारताबाहेरील तज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांनी खालील प्रमाणे निष्कर्ष काढले :

१. अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर गायीच्या तुपामुळे ऍसिटिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते.

२. पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ.

३. कृषी रसायनांच्या फवारणीच्या खर्चात घट.

४. चव, रंग, पोत व पोषणमूल्यांच्या दृष्टीने सरस पीक.

५. अधिक टिकाऊ व निर्यातीस अनुकूल उत्पादन.

६. कमी काळात जास्त पीक. एका वर्षात अधिक वेळा पीक घेऊ शकता.

७. अग्निहोत्रात वापरल्या जाणाऱ्या तुपाची सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया होऊन त्यामुळे वनस्पतींना हरितद्रव्य उत्पन्न करण्यास मदत मिळते.

८. मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

९. अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.

अग्निहोत्र वापरून केलेल्या शेती/ पिकात खालील प्रमाणे फरक दिसून आला :

टोमॅटो : ( अगोदर, कृषी रसायने वापरून) : आकार - ७ सेंमी, वजन -८५ ग्रॅ., जाडी - १३ सेंमी, चव - बेचव,पोत - निस्तेज, रंग - फिकट लाल , दर झाडागणिक उत्पादन - १ ते २ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - १२ आठवडे.
टोमॅटो : ( अग्निहोत्र वापरून) : आकार - १० सेंमी, वजन - १२० ग्रॅ., जाडी - २० सेंमी, चव - चांगली , पोत - टणक , रंग -गडद लाल, ,दर झाडागणिक उत्पादन - ३ ते ४ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - ७ आठवडे.

आंबा : (अगोदर, कृषी रसायने न वापरता) : १०,००० किलो प्रती हेक्टर ( ८,९२५ पाऊंडस/ एकर)
(अगोदर, कृषी रसायने - कीटकनाशके व खते वापरून): ३०,००० किलो/ हेक्टर ( २६,७०० पाऊंडस/एकर)
(अग्निहोत्र वापरून) : ८४,००० किलो प्रती हेक्टर ( ७४,८०० पाऊंडस/ एकर)

केळी :
१. पाचव्या पिढीतील केळीची बाग, फळाचा आकार लहान आणि कमी उत्पादन.
२. बाग फुसॅरियम (Fusarium) ह्या बुरशीने ७०% ग्रस्त.
३. ४०% moco Pseudomona Solanace.
४. एका झाडापासून जास्तीत जास्त ६ ते ७ नवीन झाडे तयार.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ८ ते १२ महिने.

चार महिने अग्निहोत्राचा शेतात/ बागांमध्ये नियमित वापर केल्यावर :
१. सर्व बागेचे एकसंध पुनरुज्जीवन.
२. रोग व कीड यांचा अभाव.
३. केळीचे घड आकाराने व वजनाने जास्त मोठे. सरासरी १२० केळी.
४. एका झाडापासून १० ते १२ नव्या झाडांची निर्मिती.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ६ महिने.

भाताच्या पिकाच्या बाबत, अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत होते का या विषयी बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेने केलेल्या पाहणी व निष्कर्षांबद्दलचा हा दुवा :

अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत.

तसेच मायक्रो-बायॉलॉजिस्ट व संशोधक यांनी वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग करून अग्निहोत्राची वातावरणासाठी व पिकांसाठीची उपयुक्तता सिद्ध केली आहे. अग्निहोत्र व सूक्ष्म-जीव (मायक्रोब्ज), अग्निहोत्राची राख व पाण्यात विरघळणारी फॉस्फेटस, अग्निहोत्र व द्राक्षे, अग्निहोत्र व व्हॅनिला वनस्पती यांविषयी केलेल्या प्रयोगांमधून त्याचे महत्त्व व उपयुक्तता अधोरेखितच झाली आहे. ह्या प्रयोगांविषयीचा दुवा :

अग्निहोत्रासंदर्भात शास्त्रीय प्रयोग व निष्कर्ष

अग्निहोत्राचे अन्य उपयोग :

१. अनेक मनोकायिक आजारांवर, जुन्या दुखण्यांवर तसेच नशाखोरीतून सुटण्यासाठी पूरक व उपयुक्त.

दुवा : नशाखोर व्यक्तीवरील उपचार

दुवा : इतर उपयोग

२. ध्यान, एकाग्रता यांसाठी पोषक.

३. आरोग्यास उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढविते, ताण कमी करते, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी पूरक.

अग्निहोत्र व होम उपचार ( होमा थेरपी) विषयी आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्याचा अनेक देशी-विदेशी लोक लाभ घेत आहेत. अग्निहोत्रा विषयीची अनेक संकेतस्थळेही उपलब्ध आहेत.
कर्नाटकातील एका शेतकऱ्याची ही अनुभव गाथा व आपल्या शेतातील अग्निहोत्राच्या प्रयोगानंतर त्याने अनुभवलेले बदल ह्या विषयीचा अजून एक लेख :

अभय मुतालिक देसाई यांचा आत्मनिर्भर शेतीचा शास्त्रीय प्रयोग

श्री. देसाई ह्यांनी आपल्या शेताच्या मध्यावर अग्निहोत्रासाठी छोटेसे खोपटे बांधले. त्याचा उपयोग फक्त अग्निहोत्र करणे व मंत्रोच्चारण करणे एवढ्यासाठीच केला. रोज सूर्योदय व सूर्यास्त समयी अग्निहोत्र केल्याने त्यांना कशा प्रकारे आपल्या शेतीत सुधारणा घडवता आली ह्याचा आढावा त्यांचा लेख घेतो.

हिमाचल प्रदेशातील शेतकर्‍यांनी अग्निहोत्र शेती करण्यास सुरुवात केल्याची ही बातमी : हिमाचल प्रदेशात अग्निहोत्र शेती

यूट्यूबवरही ह्याविषयीच्या ध्वनिचित्रफीती उपलब्ध असून त्या अवश्य पाहाव्यात :

श्री. रवी वाडेकर, रत्नागिरी ह्यांची मुलाखत

श्री. रमेश तिवारी ह्या उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादकाची परदेशी वृत्तवाहिनीवर अग्निहोत्र शेतीबद्दलची बातमी

ठाण्याच्या श्री. व्यंकटेश कुलकर्णी या कृषी उत्पादकाची मुलाखत

दक्षिण जर्मनीतील हाल्डेन्होफ अग्निहोत्र शेती

श्री. अभय मुतालिक देसाई, कर्नाटक यांची मुलाखत

श्री. वसंत परांजपे यांची मुलाखत व अग्निहोत्र प्रात्यक्षिक

भारतातील गरीब शेतकऱ्याला परवडणारी, त्याला सहज करता येणारी व अनुभवसिद्ध अशी ही अग्निहोत्राची पद्धती जर आधुनिक शेतकऱ्याने अवलंबली तर परंपरागत ज्ञानाचा व्यवहारी उपयोग करून त्याला आपले व घरादाराचे आयुष्य तर समृद्ध बनवता येईलच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते एक फार मोठे योगदान ठरेल. सर्वसामान्य माणसालाही अग्निहोत्र करणे सहज शक्य असून रोज किमान एका वेळी अग्निहोत्र करता आले तरीही ते लाभदायकच आहे!









अग्निहोत्राविषयी अधिक माहितीसाठी :

तपोवन, मु.पो. : रत्नपिंपरी, तालुका : पारोळा, जि : जळगाव, महाराष्ट्र, भारत

दूरभाष : +९१ २५९७ २३५ २०३, +९१ २५९७ २८६ ०९१.

मोबाईल : श्री. अभय परांजपे : +९१ ९९८१३ ५२४६३.

ईमेल : tapovan3@yahoo.com

वेबसाईट : http://www.tapovan.net/

--- लेखिका : अरुंधती कुलकर्णी.











(माहितीस्रोत : आंतरजाल व अन्य)

प्रोफेशनल शेतीकडे..

.

शेतीचे बदलते रूप यामुळे ग्रामीण भागाचे चित्र पालटत आहे. पण झपाट्याने वाढणाऱ्या इतर क्षेत्रामुळे वाढत्या महागाईचा सामना करण्याची ताकद शेतीमध्ये निर्माण व्हायला हवी. तरच शेती भावी काळात तग धरू शकेल. यासाठी नवनव्या पद्धतींचा विकास व्हायला हवा. पण पर्यावरणाचेही संवर्धन गरजेचे आहे.






जवळपास इसवी सन पूर्व 8000 मध्ये शेतीचा उदय झाला. पण गेल्या सुमारे पाच हजार वर्षांमध्ये शेतीचा विकास झाला आहे. पिकांना पाणी देण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्यानंतर शेतीत मोठा बदल झाला. पण अशा या बदलांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्येक मिनिटाला 50 टन सुपीक जमिनीची धूप होत आहे; तर 51 एकरावरील जंगल नष्ट होत आहे. प्रत्येक तासाला 1692 एकर सुपीक जमीन नापीक होत आहे. याबरोबरच लोकसंख्यावाढीचा वेगही वाढत आहे. प्रत्येक दिवसाला दोन लाख 30 हजार नवबालकांचा जन्म होत आहे. हा वाढीचा दर जर असाच राहिला तर 2050 पर्यंत अन्नधान्याचे उत्पादन दुप्पट करावे लागणार आहे. नाहीतर भूकबळींची संख्या वाढणार आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक तासाला 1800 मुले कुपोषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत. असे आव्हान आजच्या शेतीसमोर उभे राहिले आहे. यातूनच उत्पादनवाढीसाठी नवनव्या पद्धती विकसित केल्या जात आहेत.

रासायनिककडून पुन्हा सेंद्रिय शेतीकडे

सतराव्या शतकाच्या सुरवातीला जमिनीशिवाय शेती ही संकल्पना उदयास आली होती. पाण्यावरच पिकांची लागवड केली जात होती. पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारे सेंद्रिय घटक पाण्यातूनच पिकांना मिळत असत. सध्याच्या रासायनिक शेतीला हा मोठा पर्याय ठरू शकेल, असा विचार आता पुढे येत आहे. कारण यामध्ये जैवविविधतेचे, पर्यावरणाचे मोठे संरक्षण होते. भारतामध्येही सध्या सेंद्रिय शेती या पारंपरिक शेती पद्धतीचा पुन्हा नव्याने विचार केला जात आहे. 1960 नंतरच्या हरित क्रांतीच्या संकल्पनेपूर्वी भारतात सेंद्रिय शेती केली जात होती. रासायनिक खतांचा वापर नव्हताच. रासायनिक खतामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते असे लक्षात आल्याने खतांचा वापर वाट्टेल तसा होऊ लागला. यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट झाली. पाण्याच्या आणि खताच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड होऊ लागल्या. अशा कारणामुळेच आता सेंद्रिय शेती, गांडूळ शेती या पारंपरिक शेतीकडे पुन्हा शेतकरी वळू लागला आहे.

बदलत्या पीक पद्धतीचा परिणाम

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुख्यतः नगदी पिकात झालेल्या नुकसानीमुळे झाल्या आहेत. बदलत्या ट्रेंडचा हा परिणाम म्हणावा लागेल. पाण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी आदी तृणधान्याकडे पाठ फिरविली व नगदी पिकावर भर दिला. पण शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्वारीची परंपरागत शेती करणारा शेतकरी मात्र सुखी राहिला. खराब हवामान किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे अन्न उत्पादनात घट झाली, पण मोठे नुकसान झाले नाही. ज्वारीचा धाटांचा चारा म्हणूनही वापर होत असल्याने जनावरांपासून मिळणारे उत्पादन सुरूच राहिले. यामुळे तृणधान्याचे उत्पादन घेणारे शेतकरी हे फायद्यातच राहिले. बदललेल्या ट्रेंडमध्ये ज्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला, त्यांचे दिवस फुलले; पण जे त्या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत, ते मात्र नुकसानीत गेले. यासाठी शेतकरी, अन्न सुरक्षा आणि शेत जमिनीची प्रत टिकविण्याच्या दृष्टीने मात्र तृणधान्यांचे उत्पादन हे महत्त्वाचे आहे.

वाढत्या तापमानामुळेही बदल

1901 पासून नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीत 2009 हे सर्वात उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंदविण्यात आले. गेल्या काही वर्षांत होणारी तापमान वाढ ही शेतीतील बदलास कारणीभूत ठरत आहे. तापमानवाढीचा थेट उत्पादनावर परिणाम झाला आहे. पाण्याची कमतरता, कार्बंन डायऑक्‍साईड व तापमानवाढीमुळे तृणधान्याच्या उत्पादनात घट होत आहे. सन 2100 पर्यंत 10 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत पीक उत्पादन घट होण्याचे अनुमान आहे. तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले तर 3 ते 7 टक्के घट होते. रब्बी हंगामात उत्पादन घट मोठी होते. तापमानातील सततच्या चढउतारामुळे हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात मोठी तफावत जाणवत आहे. बदलत्या तापमानात तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करणे हे आता कृषी संशोधकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हरितगृहामुळे फूलशेतीचा विकास

हरितगृहामुळे फूल आणि फळभाज्यांच्या शेतीचे उत्पादन वाढले आहे. अद्यापही या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत जवळपास 30 हजार 924 हेक्‍टरवर फूलशेती केली जाते. तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये यामध्ये आघाडीवर आहेत. 1992-93 मध्ये भारताने 149.1 दशलक्ष रुपयांच्या फुलांची निर्यात केली होती. जगाच्या निर्यातीच्या तुलनेत हा आकडा केवळ 0.2 टक्केच आहे.

प्रक्रिया उद्योगांची गरज

फळ उत्पादनात भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्राक्षे, आंबा, संत्रा, केळी, सफरचंद आदी फळांची निर्यात भारतातून केली जात आहे. महाराष्ट्रातून अरब देशात द्राक्षाची मोठी निर्यात केली जात आहे. असे असूनही भारतातील शेतकऱ्यांना योग्य नफा या पिकांतून मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अद्यापही भारतात प्रक्रिया उद्योग म्हणावे तितक्‍या प्रमाणात विकसित झालेले नाहीत. जगात ब्राझील आणि अमेरिकेच्या खालोखाल भारतात फळाचे उत्पादन होते. पण एकूण उत्पादनाच्या केवळ 0.5 टक्केच फळावर प्रक्रिया होते. ब्राझीलमध्ये उत्पादित होणाऱ्या 70 टक्के फळावर प्रक्रिया केली जाते.

मासेपालन हा जोडधंदा

कुक्‍कुटपालन, पशुपालन हे जोडधंदे शेतीसोबत केले जात होते. पण आता मासेपालन हा जोडधंदा शेतीसोबत केला जात आहे. शासनाच्या शेततळ्यांच्या योजनेमुळे मासेपालन व्यवसायास मोठी चालना मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवा जोडधंदाही मिळाला असून ग्रामीण जनतेला पोषक आहारही मिळू शकत आहे. सद्य:स्थितीत देशाच्या एकूण उत्पन्नात 0.8 टक्के उत्पन्न मत्स्यव्यवसायाचे आहे. तसेच 90 ते 95 लाख व्यक्तींना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध झाला आहे. शासनाने 422 मत्स्य शेतकरी विकास संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थेमुळे 1995-96 पर्यंत 3.87 लाख हेक्‍टर मत्स्य शेतीखाली आणण्यात आले असून 5.04 लाख शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

देशातील मत्स्य उत्पादन

वर्ष......मत्स्य उत्पादन

1950-51..... 7.5लाख टन

1990-91..... 33 लाख टन

1999-2000..... 56.56 लाख टन

















-- राजेंद्र घोरपडे

अल्पभूधारक शेतकरी जगवणे हेच आव्हान



गेल्या पन्नास वर्षांचा विचार करता शेतीमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. लाकडी नांगर आता इतिहास जमा झाले आहेत. त्याची जागा आता ट्रॅक्‍टरने घेतली. असे होताना शेताचा आकारही कमी होत चालला आहे. याचा विचार व्हायला हवा. तसे आधुनिक तंत्रज्ञानात कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेता येऊ शकते. पण हे ग्रीनहाऊसचे तंत्र सर्वसामान्य शेतकरी आत्मसात करू शकत नाही. तसे भांडवलही त्याच्याकडे नाही. यामुळे भावी काळात शेती आणि शेतकरी टिकवायचा असेल तर योग्य नियोजनाची गरज भासणार आहे. दुरदृष्टीचा विचार करून नियोजन आखायला हवे तरच देशातला शेतकरी शेतीत टिकून राहणार आहे.



1991 ते 2001 या काळात 80 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. 1991 मध्ये 11.3 कोटी शेतकरी शेती कसत होते. तर 2001 मध्ये 10.5 कोटी शेतकरी शेती कसत होते. दररोज दोन हजार शेतकरी शेती सोडून उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधत आहेत. उदारीकरणाचा परिणाम म्हणून याकडे पाहीले जाते. पण इतरही कारणे आहेत. याचा आढावा घेणे गरजेचे आहे.



शेतकऱ्यांच्या आत्महत्यातही 2001 नंतर वाढ झाली. याचाही परिणाम विचारात घ्यायला हवा. 1995 ते 2009 या काळात महाराष्ट्रात 47 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वीस वर्षात शेतीवर इतके भयाण संकट का कोसळले आहे.? सरकारला शेतकरी जगवायचा आहे. का नुसते पॅकेज जाहीर करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचे आहे. पॅकेज हा विकासासाठीचा मार्ग होऊ शकत नाही. नुकसान भरपाई, पॅकेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का?



2006 मध्ये बर्ड फ्लूने अनेक पोल्ट्रीधारक शेतकरी उद्धवस्थ झाले. शासनाने काही पोल्ट्री धारकांना नुकसान भरपाई दिली. पण आजही काही शेतकरी या नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. आज सहा वर्षे झाले हे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. अधिवेशनानंतर निधीच्या तरतुदीचा सरकारी अध्यादेश (जीआर) निघतो. पण निधीचे वाटप काही होत नाही. इतक्‍या वर्षानंतर तो शेतकरी ती नुकसानभरपाई घेऊन प्रगती काय करणार? विकास कसा साधणार? यामुळेच नुकसान भरपाई किंवा पॅकेज हा पर्याय होऊ शकत नाही. यासाठी आगामी काळात नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे. नवा पर्याय हा पारदर्शी असायला हवा. शेतीला जोड व्यवसाय करणारा शेतकरी या नुकसानीमुळे जोड धंदा तर सोडत आहेत. पण शेतीही सोडत आहे. त्याची भावी पिढी या शेतीत येत नाही. शेतकरी मुलाला शेतीमध्ये आणण्यास इच्छुक दिसत नाही.



गेल्या पन्नास वर्षात दोन हेक्‍टर पेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्यात वाढ झाली आहे. दहा हेक्‍टरच्यावर क्षेत्र असणाऱ्या शेतकरी केवळ 1.3 टक्केच राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार कमी होत चालला आहे. देशातील 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र आहे. 1960 साली 60 टक्के शेतकऱ्यांजवळ दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र होते. भावी काळात या पेक्षाही भयानक चित्र पाहायला मिळेल. देशातील शेतकऱ्यांच्याकडे कसायला शेतच नाही अशी परिस्थिती असणारे शेतकरी पाहायला मिळतील. देश श्रीमंत होत चालला आहे पण शेतकरी मात्र गरीब होत आहे. नियोजन करताना ही आकडेवारी विचारात घ्यायला हवी. शेतकरी शेतमजूर झाला आहे. याची आकडेवारीही पाहायला हवी. काही शेतकरी भागाने घेऊन शेत करत आहेत. याचा अर्थ तो शेतकरी आहे पण त्याच्या जवळ कसायला आवश्‍यक तेवढे क्षेत्र नाही. किंवा तो शेत नसणारा शेतकरी आहे. सध्या एखाद्या गावात साधारण असे 20 ते 30 टक्के शेतकरी पाहायला मिळतील. यामध्ये भावी काळात वाढ होणार आहे. कसेल त्याची जमीन हा कायदा सरकारने केला आहे. असे कायदे शेतकऱ्यांच्याच मुळा उठतात. याचा विचार सरकारने करायला हवा. कायदा करताना याचे भान सरकारने ठेवायला हवे. शेतकरी संपवायचा नाही तर तो जगवायचा आहे. सरकारी कायद्याने जमीनीवरुन तंटेच वाढत आहेत. कायदा हा अशा गोष्टीसाठी नसावा. अशा कायद्यानेच शेतकरी संपतो आहे. त्याच्यातील माणूसकी संपवली जात आहे. सरकारने दूरदृष्टी ठेवून विचार करायला हवा.



शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने चरितार्थ चालवायचा कसा? हा प्रश्‍न शेतकरी कुटुंबाजवळ पडला आहे. यामुळेच तो शेती सोडून शहराचा रस्ता पकडतो आहे. वाढत्या महागाईमुळे यात मोठी भरच पडत आहे. शेतकऱ्यांनी शेती सोडण्याचा वेग वाढतो आहे. हे थांबविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वाढती महागाई रोखण्यात कोणत्याही सरकारला यश आलेले नाही. हा प्रश्‍न आवाक्‍याबाहेर गेला आहे. शेतीचा उत्पादन खर्चही वाढला आहे पण उत्पन्नात वाढ झालेली नाही. शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. गरजेपुरते अन्न पिकविणेही आता या शेतकऱ्याला शक्‍य नाही. यासाठी सरकारने भावी धोरणे ठरविताना याचा विचार करायला हवा. जिराईत शेती बागायती झाली म्हणजे सर्व प्रश्‍न सुटले असे होत नाही.



अशा या भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची जाणीव सरकारला असेलही पण यावर पर्याय कोणते सुचविले जाऊ शकतात याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. हे मात्र निश्‍चित. कारण यामुळेच शेतीसाठीचे पाणी आता उद्योगाकडे वळविले जाऊ लागले आहे. ही सरकारची पळवाट आहे. प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याऐवजी सरकार पळवाटा शोधत आहे हे यापेक्षाही भयाण आहे. पळवाटा शोधून शेतीचे प्रश्‍न सुटत नाहीत. पळवाटांनी शेतीची प्रगती झाली असल्याचे भासत आहे. पण ही प्रगती मर्यादीत आहे. याचा विचार करायला हवा. जागतिक मंदीच्या काळात देशाला शेतीनेच सावरले आहे याचा विचार अर्थमंत्र्यांनी नियोजन करताना करायला हवा. पर्याय शोधण्यासाठी जनतेला आवाहन करायला हवे. या प्रश्‍नावर सरकारने संसदेत चर्चा घडवायला हवी. अनेक पर्याय यातून खुले होऊ शकतील. पळवाटा शोधल्यानेच शेतकरी शेती सोडून पळतो आहे. याचा विचार करायला हवा. देशाला शेतीच तारू शकते. यासाठी शेतकरी जगवायला हवा.



कर्जबाजारीपणा, शेतीत नुकसान, कौटुंबिक जबाबदाऱ्यामुुळे वाढता तणाव आदी कारणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मुख्यता सावकारीपाशात अडकलेला शेतकरी आत्महत्या करतो आहे. यासाठी शेतकऱ्यांची कर्जे माफही केलीत. पण याचा लाभ उठविणारेही अनेक आहेत. बोगस कर्ज प्रकरणे करून सरकारची फसवणूक केली. सरकारच्या अशा योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांना होतच नाही. यासाठी शेतकरी जगविण्यासाठी योग्य नियोजन असायला हवे. 100 टक्के पारदर्शी योजना राबविणेही कठीण आहे. पण पर्यायही उभे करताना या अशी प्रकारांना रोखण्याची उपाययोजना ठेवायला हवी. यासाठी त्वरीत कारवाई हाच उपाय योग्य ठरू शकतो. प्रलंबित प्रश्‍नांमुळे कोणालाच फायदा होत नाही. गरजूंना योग्य वेळी मदत केली तरच फायदा होतो. अन्यथा पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचाच प्रकार होतो. यासाठी वेळेचे भान ठेवायला हवे. योजनांचा लाभ शेतकऱ्यांनाच होतो का याचाही आढावा वारंवार घेणे गरजेचे आहे. शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देऊन सावकारी नष्ट करायला हवी. शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्याला योग्य मार्गदर्शन करायला हवे. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सांगून अशा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन देऊन त्याची खचलेली मानसिकता नष्ट करायला हवी. तणावमुक्ती हाच आत्महत्या रोखण्याचा मुख्य उपाय आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन वेळोवेळी कसे होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.



भावी काळात शेती टिकवायची असेल तर या प्रश्‍नावर हे करता येणे शक्‍य आहे.

- पाच वर्षात 100 टक्के बागायती क्षेत्र करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवायला हवे.

- पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक, तुषार सिंचनाची सक्ती करायला हवी. विशेषतः पाणी पुरवठा सोसायट्यामध्ये याची सक्ती करायला हवी. यामुळे सर्व शेतकऱ्यांना मुबलक व योग्य प्रमाणात पाणी मिळेल. यामुळे कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकेल तसेच पाण्याचे समान वाटप होऊन जास्तीत जास्त क्षेत्र बागायती करता येऊ शकेल. अल्पभूधारक शेतकरीही ठिबक करू शकल्याने कमी क्षेत्रातही जास्तीत जास्त उत्पादन तो घेऊ शकेल.

- गटशेतीस प्रोत्साहन देऊन बाजारभावापेक्षा अधिक किंमतीत शेतमालाच्या खरेदीची हमी सरकारने द्यायला हवी.

- अनुदान, नुकसान भरपाई ऐवजी हमी भावाने शेतमाल खरेदीची हमी यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन शेतकऱ्यास प्रोत्साहन मिळेल.

- अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, कीडनाशकांचे वाटप करून त्याच्या शेतमालाची हमी भावाने खरेदी करायला हवी.

- नैसर्गिक आपत्तीच्या काळात (कीड, रोग) सरकारने एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन करणारी पथके तयार करायला हवीत. ही पथके शेतकऱ्यांना मार्गदर्शन तर करतीलच शिवाय या परिस्थितीत शेतकऱ्याने काय करायला हवे याचेही प्रशिक्षण ते देतील. बेरोजगार कृषी पदवीधरांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

- घरातील फ्रिझ, एसी बंद झाल्यानंतर कंपनीची माणसे येऊन तो दुरुस्त करून देतात. तशी वार्षिक देखभाल ठेवणाऱ्या गटांची स्थापना करायला हवी. या गटास सरकारच्या वतीने प्रोत्साहन दिले जाईल पण त्यांचा पगार हा शेतकरी ठरवतील. शेताच्या नांगरटीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांची जबाबदारी या गटावर असेल. बागायतदार शेतकऱ्यांना या पथकांचा निश्‍चितच चांगला फायदा होऊ शकेल. इतकेच नव्हेतर हा गट प्रक्रिया उद्योगांची उभारणीस प्रोत्साहन देईल. आजही फणस, करवंदे आदी फळावर प्रक्रिया केली जात नाही. पश्‍चिम घाटात असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा उत्तम लाभ होऊ शकेल. फक्त .अशी कामे करणारी यंत्रणा उभी करायला हवी. बदलत्या शेती पद्धतीत असे नवे तंत्र अवलंबणे गरजेचे होणार आहे.



गेल्या पन्नास वर्षात शेतकऱ्यांकडील जमिनीचे बदललेली टक्केवारी

1960-61 1981-82 , 1991-92 2002-03

एक हेक्‍टर पेक्षा कमी क्षेत्र असणारे 39.1 45.8 56.0 62.8

एक ते दोन हेक्‍टर क्षेत्र असणारे 22.6 22.4 19.3 17.8

दोन हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असणारे 61.7 68.2 75.3 80.6

दोन ते चार हेक्‍टर असणारे 19.8 17.7 14.2 12.0

चार ते दहा हेक्‍टर असणारे 14.0 11.1 8.6 6.1

दहा हेक्‍टरच्या वर क्षेत्र असणारे 4.5 3.1 1.9 1.3














- राजेंद्र घोरपडे    9011087406
 

10 वर्षांत 80 लाख शेतकऱ्यांचा शेतीला रामराम...

10 वर्षांत 80 लाख शेतकऱ्यांचा शेतीला रामराम
उदारीकरणाचा ग्रामीण भागावर अतिशय वाईट परिणाम झाला आहे. 1991 ते 2001 या काळात 80 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. याला ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनीही पुष्टी दिली आहे. 1991 मध्ये 11.3 कोटी लोक शेती कसत होते, तर 2001 मध्ये 10.5 कोटी शेतकरीच शेती करत आहेत. दररोज दोन हजार शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत. असे चित्र असताना दुसरीकडे रोजगारातही घट होत आहे. यामुळे ग्रामीण भागाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होणार आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, शेतमजुरांची टंचाई, कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेत येणाऱ्या अडचणी आदी वाढत्या समस्यांमुळे शेतीकडे वळणाऱ्यांची संख्या घटतेय. कर्जबाजारीपणाला कंटाळून 1995 ते 2009 या काळात महाराष्ट्रातच जवळपास 47 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उदारीकरणानंतर देशात बियाणे उत्पादन करणाऱ्या मोन्सॅन्टो, सिंजेटा, कारगिल यांसारख्या परदेशी कंपन्या भारतात आल्या. यामुळे उत्पादनात वाढ झाली. किडीला प्रतिबंधक जाती या कंपन्यांनी दिल्याने उत्पादन वाढले; पण हे महागडे बियाणे घेऊन शेतमालाला योग्य भाव नसल्याने ते शेतकऱ्यांना परवडले नाही. वाढत्या उत्पादन खर्चाबरोबर शेतमालाला भावही मिळणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. जागतिक पातळीवर भाव वाढल्यावर केली जाणारी निर्यातबंदी शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. उदारीकरणामुळे शेतीच्या संरचनेत बदल झाला आहे. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आले. जिरायत शेती बागायती होऊ लागली. तृणधान्यांची जागा नगदी पिकांनी घेतली. आता तर अचूक निदानाची शेती देशात विकसित होत आहे. शेतीतील या बदलत्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होत आहे. पेरलं म्हणजे उगवतंय इतकी उतावीळपणे शेती करून यापुढे चालणार नाही. बाजारात कोणत्या वस्तूला मागणी आहे याचा विचार करूनच यापुढे शेती करावी लागणार आहे. तरच शेतीत शेतकरी तग धरू शकेल. उदारीकरणामुळे शेतमालाच्या निर्यातीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला. जागतिक व्यापारी संघटनेने (डब्ल्यूटीओ) ठरवून दिलेल्या नियमानुसार निर्यातीत बदल झाला. युरोपमध्ये निर्यात होणाऱ्या पिकांच्या डीएनएची तपासणी केली जाते. त्यानंतरच निर्यातीस परवानगी दिली जाते, असे बदल आता होत आहेत. शेतीचे हे बदलते रूप विचारात घेऊनच शेती व्यवसायात उतरायला हवे. यापुढे एकट्याने शेती करून चालणारे नाही. एकात्मिकपणे शेती करायला हवी. यामुळेच गटशेती, सहकारी शेती यांसारख्या कल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. काही कॉर्पोरेट कंपन्याही शेतीच्या क्षेत्रात उतरत आहेत. हरितगृहांनी पारंपरिक शेतीच बदलून टाकली आहे. काही ठिकाणी संगणकाच्या साहाय्याने केवळ पाच-सहा व्यक्तींच्या सहकार्याने 100 एकर शेतीत उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. हे बदलते रूप सर्वसामान्य शेतकऱ्यांना पेलवणारे नाही. यामुळेच तो आता यातून बाहेर पडू लागला आहे. हेच एक मोठे आव्हान आता सरकारपुढे आहे.


































राजेंद्र घोरपडे

बायोगॅस बांधकाम आणि व्यवस्थापन

बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा.
बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.
केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन बायोगॅसच्या बांधकामाचे नियोजन करावे.
ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे. ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री- फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.
बायोगॅस संयंत्रास आयएसआय मार्क असलेली शेगडी जोडणे आवश्‍यक आहे. शेगडीची छिद्रे अधूनमधून स्वच्छ करावीत.
खताचा खड्डा मधूनमधून साफ करावा. खताचे किमान दोन खड्डे करावेत. त्यांचा आळीपाळीने वापर करावा. खड्ड्यातील शेणाची पातळी नेहमी आऊटलेटमधून शेण बाहेर पडण्याच्या सांडीपेक्षा कमी असावी म्हणजे शेणाची रबडी सहजरीत्या बाहेर पडेल.
संयंत्राच्या आऊटलेटवर फरशीचे झाकण घालणे बंधनकारक आहे, कारण संयंत्राचे आऊटलेट उघडे राहिल्यास त्यामध्ये पशू-पक्षी, माणसे वगैरे पडून धोका होण्याची शक्‍यता असते.
आपणाकडे उपलब्ध असलेली जनावरे, व्यक्ती यांचा विचार करूनच संयंत्राची क्षमता ठरविण्यात यावी.
दररोज आपणाकडे उपलब्ध असलेले शेण व तेवढेच पाणी घालून त्याचा शेणकाला करून संयंत्रामध्ये सोडावा. थंडीच्या दिवसांत शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा.
शेणाशिवाय स्वयंपाकघरातील खरकटे, भाजीपाल्याचे अवशेष यांचे लहान भाग करून घातले तरी चालू शकते.
गॅसवाहक पाइपमध्ये हवेचा गारवा लागल्यास पाणी होते, त्यासाठी गॅसवाहक पाइप शक्‍यतो एका बाजूने उतरता जोडावा. ज्या ठिकाणी गॅसवाहक पाइप वाकलेला (बेंड झालेला) असेल, त्या ठिकाणी पाणी काढण्याची नळी जोडावी व नळीतून मधूनमधून नियमित पाणी काढावे.
गॅस वापरण्याच्यावेळी शेगडी भडकू लागली अगर निळ्या ज्योतीऐवजी ज्योत तांबडी पेटू लागली किंवा भांडी काळी पडू लागली, तर पाइपमध्ये पाणी साठलेले आहे असे समजावे व त्वरित पाणी बाहेर काढून घ्यावे.
बायोगॅसला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करताना फिनेल, जंतुनाशके, साबण, सोडा, डिटर्जंट पावडर इत्यादी रासायनिक द्रव्यांचा वापर करू नये. राखेने शौचालय स्वच्छ करावे.
शेगडी वापरात नसेल तेव्हा किंवा रात्री संयंत्रावरील मुख्य व्हॉल्व्ह बंद करावा.
स्वयंपाक करून गॅस शिल्लक राहात असेल तर बायोगॅसवर चालणाऱ्या दिव्याचा वापर करावा. स्वयंपाकाशिवाय प्रकाश, वीजनिर्मितीकरिताही बायोगॅसचा वापर करता येतो.
बायोगॅस संयंत्रापासून मिळणारे खत हे एक उत्तम सेंद्रिय खत आहे. याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारे खत आपण लागलीच द्रवरूपात पिकास देऊ शकतो. हे खत पीकवाढीसाठी फायदेशीर ठरते.





























http://www.liveratnagiri.com

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय?...

वातावरणाची सुरक्षितता अबाधित राखून सेंद्रीय, रासायनिक, जैविक खते तसेच हिरवळीचे पीक, पीक फेरपालट, आंतर पिक पद्धती, पीक अवशेष आदींचा एकत्रित वापर करून जमिनीची आणि पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या पध्दतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात.

एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबरच सेंद्रीय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडीकचरा, इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून पीक अन्नद्रव्य पुरवठ्याचा समतोल साधला जातो. या पद्धतीत द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपिकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना ही जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता कायमस्वरुपी टिकविणे ही आहे. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवून ती शाश्‍वत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यासाठी उपलब्ध सर्व स्रोतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. या पध्दतीत अन्नद्रव्यांचे नियोजन विविध स्रोतांतून करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षता वाढविली जाऊन उत्पादनात वाढ होते. तसेच जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याकरिता सर्वसाधारणपणे सेंद्रिय स्वरूपातून पुरविणाऱ्या अन्नद्रव्यांचा सहभाग 25 ते 30 टक्के असावा, जैविक स्वरूपातील 20 ते 25 टक्के आणि रासायनिक स्वरूपातील सहभाग 50 टक्के असावा.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज

सध्या देशातील खतांचे उत्पादन गरजेपेक्षा फारच कमी आहे. स्फुरद, पालाशसारखी रासायनिक खते परदेशातून आयात करावी लागतात. त्यावर सरकारला अनुदान द्यावे लागते. अनुदानाचा भार वाढत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यात अनुदान कमी होऊन रासायनिक खते महाग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर करमी करून त्यांची कार्यक्षमता वाढविली पाहिजे.

जमिनीची सुपिकता आणि पिकांची उत्पादकता केवळ रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांचे एकत्रित वापरानेच वाढवून ती टिकविता येईल. देशात विविध ठिकाणी 25 ते 30 वर्षे सतत चाललेल्या प्रयोगांती हे सिद्ध झाले आहे.

हरितक्रांतीत पीक उत्पादकता वाढविताना जमिनीच्या सुपिकतेकडे/ आरोग्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. ते आता देणे अत्यंत गरजेचे आहे हे डॉ. स्वामीनाथन यांच्या अहवालाने प्रकर्षाने लक्षात आणून दिले आहे.

-संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आवश्‍यक आहे.
-जमिनीच्या जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मात सुधारणा करण्यासाठी याची गरज आहे.
-जमिनीतील व पिकांमधील जैव रासायनिक प्रक्रियांचा समतोल यामुळे राखला जातो.
-अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रुपांतर करता येते.
-रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविता येते.
-तसेच जमिनीतील सर्व पीक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे वाढविता येते.






















Ref - Govt.of Maharahtra
Rani
Bsc Agri.
9665223385

सेंद्रिय शेतीला राजाश्रय मिळावा...

सेंद्रिय शेतीचा सिक्कीम पॅटर्न
ऋतुजा सावंत

सिक्कीम आकाराने लहानसं राज्य. पर्वरांगांवर वसलेलं असल्याने काही ट्रेकर्सना खुणावणारं. पण आता अनेक पर्यटकही सिक्कीमला भेट देत आहेत. यामागील मुख्य आकर्षण आहे , ते येथील सेंद्रिय शेतीचं. २०१५पर्यंत हे संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं मिशन सरकारने हाती घेतलं आहे. त्यामुळे असा प्रयोग राबवणारं ते जगातलं पहिलं राज्य ठरण्याची शक्यता आहे.

हरितक्रांतीनंतर अधिकाधिक उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले. परिणामी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचा मोठा प्रश्न समोर आला. यासाठी पंजाबचं उदाहरण सर्वपरिचित आहेच. हा धोका लक्षात घेऊन १९३०च्या दरम्यान सेंद्रिय खतांची चळवळ सुरू झाली. भारतात खरंतर त्याआधीच सेंद्रिय शेतीचा प्रयोग झाल्याचे दाखले आहेत. परंतु त्याचा हवा तसा प्रचार झाला नाही. म्हणूनच रासायनिक खतांचा वापर सुरूच राहिला. याला सिक्कीम मात्र अपवाद ठरलं. याबाबतीत ते एक आदर्श राज्य म्हणून समोर येतंय. २०१५पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं ' मिशन ' सिक्कीम सरकारने हाती घेतलं आहे. आता ५८ हजार १६८पैकी ८ हजार हेक्टर शेती सेंद्रिय म्हणून प्रमाणित आहे. उर्वरित क्षेत्रावरही हा प्रयोग करण्यासाठी धोरण आखण्यात आलं आहे. भात , आलं , मका , गहू , कांदा , मोहरी , बटाटा , मिरची , टोमॅटो , मोसंबी या पिकांबरोबरच फुलांवरही प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं आहे. ' सिक्कीम ' हाच सेंद्रिय ब्रॅण्ड म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच सिक्कीम केवळ भारतातीलच नव्हे , तर जगातील संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य ठरेल.

सिक्कीममध्ये सेंद्रिय शेतीची संकल्पना खरंतर २००३मध्ये पुढे आली. तज्ज्ञांकडून हे ' मिशन ' पूर्ण करण्यासाठी लागलीच आराखडे बांधण्यात आले. याबाबत संशोधन , प्रशिक्षणाच्या पाठबळासाठी स्वित्झर्लंडच्या एफआयबीएल इन्स्टिट्यूट ऑफ ऑरगॅनिक रिसर्चशी सामंजस्य करण्यात आला. राज्यात ' सिक्कीम ऑरगॅनिक बोर्ड ' ही स्थापन करण्यात आलं. २००६-०७पासून राज्य सरकारने केंद्र सरकारकडून मिळणारा रासायनिक खतांचा कोटा घेणं बंद केलं. तसंच रासायनिक खतांची विक्रीकेंद्रेही बंद करण्यात आली. शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्यासाठी २००९पर्यंत २४ हजार ५३६ कंपोस्ट खत आणि १४ हजार ४८७गांडुळ खतांचे युनिट शेतात तयार करण्यात आले.

मार्केटही सज्ज

अशा प्रकारे एक एक पायरी चढत असतानाच या पिकांच्या उत्पन्न आणि उत्पादनाची समस्या होतीच. सेंद्रिय शेतीचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे असले तर उत्पादन , मार्केटिंग , किंमत अशा सगळ्याच अंगाने प्रश्न उभे राहतात. परंतु सिक्कीमने या प्रश्नांवरही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ ग्राहकच नाही तर शेतकरीही समाधानी राहील , हे या ' मिशन ' च्या अनेक उद्दीष्टांपैकी एक मुख्य उद्दिष्ट. उत्पादनाची किंमत कमी राहावी , यासाठी शेतकरी थेट माल ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकेल , अशी सोय करण्यात आली आहे. यासाठी राज्यात १० ' किसान मंडी ' तयार करण्यात आल्या आहेत. या व्यवहारात दलालांची साखळी नसते. तसेच दिल्लीमध्ये सेंद्रिय उत्पादनांसाठी खास रिटेल शॉप सुरू करण्यात आलं. या उत्पादनांची विक्री करण्यासाठी १५० शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले असून यामध्ये जवळपास १७५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या उत्पादनांचं ब्रॅण्डिंग करण्यासाठीही योजना हाती घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक गांडुळ खत युनिटच्या उभारणीसाठी सरकार १५ हजार , तर कंपोस्ट खताच्या युनिटसाठी २० हजार रुपयांचं अनुदान देतं. तसंच शेतीची गुणवत्ता राखण्यासाठी तज्ज्ञगट नेमण्यात आले आहेत. या गटातील सदस्य प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतात. शालेय वयापासून सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळावं , याकरिता पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमात सेंद्रिय शेतीविषयक अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. कोणत्याही शेती उत्पादनांसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहू नये , हे राज्याचं आणखी एक ध्येय. म्हणजे आयात केलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत शंका तर असतेच , शिवाय अधिक पैसेही मोजावे लागतात. म्हणून आमच्या शेतकऱ्याने आपल्याच शेतात सगळी उत्पादनं घेण्याइतकं सक्षम व्हावं , असं या मिशनसंबंधी मंत्र्यांचं म्हणणं आहे.

या ' मिशन ' ची व्यापकता मोठी आहे. ते केवळ शेतकऱ्यांच्या फायद्यापुरतं मर्यादित नाही. तर या माध्यमातून टुरिझम व्यवसायाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सेंद्रिय शेती पाहण्यासाठी पर्यटक पसंती देत आहेत. ते उत्सुकतेने अन्नधान्य विकतही घेतात. हे लक्षात घेऊन गावांना टुरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्यासाठी काही कुटुंबांना अतिथ्य आणि विविध पदार्थ बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याआधी १४ हजार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या पर्यावरणस्नेही प्रयोगांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत जागृती करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीमुळे डेअरी व्यवसायालाही फायदा होतो. चांगल्या दर्जाच्या दुधाचे प्रमाण वाढत आहे. एकूणच हा प्रयोग अनेक अंगाने राज्याची आर्थिक बाजू भक्कम करणारा ठरतोय.

सिक्कीमचा हा प्रयोग आता इतर राज्यांनाही खुणावतो आहे. केरळमधील कसारगड जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचा पायलट प्रकल्प राबवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. याबाबत सिक्कीमचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. सिक्कीमच्या तुलनेत लोकसंख्या अधिक असल्याने केरळमध्ये अनेक आव्हानं आहेत. पण पुढील दुष्परिणाम लक्षात घेतले तर आता मेहनत करायलाच हवी , असं केरळच्या शेती संचालकांचे म्हणणं आहे.

लोकसंख्या आणि आकाराच्या दृष्टीने सिक्कीम हे लहान राज्य असल्याने तेथे हा प्रयोग यशस्वी होत आहे , असा एक सूर आळवला जातो. पण सिक्कीम पॅटर्नवर अजून थोडं काम केलं तर मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांनाही तो राबवणं कठीण नाही. त्यासाठी प्रबळ इच्छा आणि सांघिक प्रयत्नांचं भांडवल मात्र हवं.
सेंद्रिय शेती काळाची नव्हे तर आरोग्याची गरज
राजकुमार चौगुले
by - agrowon
अनेक मठांमध्ये केवळ धार्मिक संस्कार केले जातात. पण कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील "सिद्धगिरी" मठ मात्र याला अपवाद आहे. येथे केवळ धर्म प्रभावना न करता त्याला सेंद्रिय शेतीच्या प्रसाराची जोड दिली जाते. मठात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. त्याला सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. असे प्रयत्न सर्वत्र व्हावेत, अशी भावना मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर यांची आहे
सध्या रासायनिक घटकांचा अतिरेक होतोय, याबाबत आपले मत काय?
सध्याचे युग हे रासायनिक घटकांच्या अतिवापर करणारे बनत आहे. रासायनिक खते, कीडनाशके यांचा अतिवापर, जनुकीय बदल केलेली अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, फास्टफूड याचा अमर्याद वापर, याबरोबरच कारखाने व उद्योगांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे नद्या, झरे, विहिरी, तळी, समुद्र यांतील जलचरांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचीही अपरिमित हानी झाली आहे. जमिनी नापिक होत आहेत. अन्नधान्य, दुग्धोत्पादन, मांस उत्पादनातही विषारी अंश आढळत आहेत. याचा विपरीत परिणाम शरीरातील महत्त्वाच्या संस्थांवर होत आहे. पुढील पिढीच्या जनुकावरही त्याचा विपरीत परिणाम होतोय. एकूणच परिस्थिती चिंताजनकच आहे.

हे संकट टाळायचे असेल तर याला काय उपाय आहे?
सध्या शेती नापिक होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आपले गोधन, पशुधन, निरोगी कसे राहील, याबाबत गंभीर राहावे लागेल. सेंद्रिय शेती ही आता काळाची नाही, आरोग्याचीच गरज आहे. गोवंश आधारित शेतीमुळे परिस्थिती बदलणे शक्य आहे. हजारो वर्षांपूर्वीचा आपला शेतीचा इतिहास पाहिला तर गोपालन व शेती याचा अतूट संबंध आहे. या दोन्ही गोष्टी वेगळ्या करून आपण निरोगी व सुखी होऊ शकत नाही. गुरुमाऊली, जलमाता, भूमाता, गोमाता यांचे सहजीवनातूनच आपली संस्कृती फुलली आहे. मात्र पाश्चात्त्यांच्या नादाने आपण आपली संस्कृती विसरलो आहोत. आपल्याच हाताने आपल्या आरोग्यरूपी पायावर दगड पाडून घेत आहोत. रासायनिक खते व औषधे वापरल्याशिवाय शेतीत उत्पादनच देत नाही, अशी ठाम समजूत झाल्यानेच सगळा घोटाळा व गोंधळ झाला आहे. पाश्चात्त्य देश भारतीय ज्ञान, विज्ञान, तत्त्वनीती, देशी बी-बियाणे यांच्या मूळ जातीचे संवर्धन करून त्यापासून विज्ञानाच्या साहाय्याने प्रगती साधत आहेत. आम्ही मात्र पाश्चात्त्यांनी टाकाऊ ठरवून फेकून दिलेला चोथा आवडीने स्वीकारत आहोत, याला शहाणपणा म्हणता येईल का? सध्या तरी सेंद्रिय शेती करणे व त्या उत्पादनांचा वापर आहारात करणे याशिवाय कोणताही उपाय नाही.




सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त कसे करता येईल?
अलीकडच्या काळात रासायनिक घटकांच्या प्रभावामुळे सध्या याच प्रकारची शेती करणे शेतकऱ्यांना आवश्यक वाटते. अनेकदा शेतकरी जमीन व आरोग्य वाचविण्यासाठी सेंद्रिय शेती करतो. पण त्याला अपेक्षित यश मिळत नाही. ते केवळ या मालाचे मार्केटिंग नसल्यामुळे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्न हे उपकारक आहे. या अन्नाची एक वेगळी "व्हॅल्यू' आहे. हे ग्राहकांपर्यंत पोचायलाच हवे. यासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी यापेक्षा सेंद्रिय पदार्थ कसे विकावेत, त्याला वेगळे मार्केट तयार कसे होईल, हे पाहणे गरजेचे आहे. माझ्या मते सेंद्रिय उत्पादनाला सातत्यपूर्ण मागणी करणारा ग्राहक तयार करणे आवश्यक वाटते. मठ, विविध धार्मिक ठिकाणे, जिथे सर्व थरातील लोक जमतात तिथे सेंद्रिय उत्पादनाची जागृती करण्याबाबत प्रयत्न व्हायला हवेत. आपले उत्पादन जर चांगल्या दामाने विकू लागले, तर शेतकऱ्यांत उत्साह निर्माण होईल. असे झाले तर शेतीसाठी लाखो, करोडो रुपयांची रासायनिक खते, तणनाशके, जंतुनाशके यावरील खर्चाची बचत होईल. आरोग्यासाठी होणारा खर्च वाचेल, जमिनीचे नापिकतेचे प्रमाण कमी होऊन उपजाऊ जमिनी वाढतील. निरोगी, बलवान, बुद्धिमान पिढ्या तयार होतील.

सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी आपल्या मठाने आतापर्यंत काय प्रयत्न केले आहेत?
"सिद्धगिरी" मठाने केवळ धार्मिक कार्यच न करता या कार्याला सेंद्रिय शेतीची किनार दिली आहे. मठाच्या मालकीच्या शेतात गेल्या कित्येक वर्षांपासून सेंद्रिय शेती सुरू आहे. सुमारे शंभर एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जात आहे. यामध्ये उसासह भुईमूग, हळद, आंबा, आवळा, सागवान आदी प्रकारची शेती केली जाते. आता पॉलिहाऊसमधूनही सेंद्रिय शेती करण्यात येत आहे. यातून येणाऱ्या उत्पादनाची सिद्धगिरी मठातच विक्री केली जाते. मठाला हजारो लोक भेट देतात. त्यांच्यामध्ये ही उत्पादने आता सवयीची झाली आहेत. याशिवाय मठाच्या वतीने सेंद्रिय शेती वाढविण्याबाबत विविध संस्थांच्या, शासनाच्या साहाय्याने शिबिरांचेही आयोजन केले जाते. यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय प्रवाहात यावा यासाठी आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. त्याला आता चांगले यश येऊ लागले आहे. देशभरातील भक्तगणांच्या माध्यमातून विविध मार्गांनी आम्ही ही चळवळ पुढे नेत आहोत. उदाहरण जर द्यायचे झाले तर मठातील प्रवचन झाल्यानंतर त्याला प्रसाद म्हणून संकरितपेक्षाही जादा उत्पन्न देणारे देशी बी आम्ही देतो. कोणत्याही मार्गाने हे बी संबंधितांच्या शेतात जावे व देशी वाण वृद्धिंगत व्हावे हा आमचा उद्देश आहे. याशिवाय सुमारे दोनशे गाईंचा समावेश असलेली गोशाळा आम्ही उभारली आहे. येथे केवळ दुर्मिळ देशी गायींचा संग्रह आहे. यातून मिळणारे शेणखताचा वापर आम्ही सेंद्रिय शेतीसाठी करतो. यामुळे आमची जमीनही सुपीक राहते आणि आरोग्यही. याशिवाय गोमूत्र, दूध, तूप आदींची विक्री आम्ही मठातच करतो. आमचा सेंद्रिय गूळ तर सत्तर रुपये किलो या दराने जातो. तुपाची पंधराशे रुपये किलोने विक्री होते. असे अनेक पदार्थ मठातून विकले जातात.


"सेंद्रिय शेती"ला बळकटी देण्यासाठी भविष्यात आपले काय प्रयत्न असणार आहेत?
शेतकऱ्याला पहिल्यांदा सेंद्रिय शेतीकडे वळवायला लागेल. तत्पूर्वी त्याच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हे महत्त्वाचे काम आम्ही करणार आहोत. यासाठी सेंद्रिय शेतकऱ्यांची चळवळ मठाच्या वतीने आम्ही उभी करणार आहोत. गाववार शेतकऱ्यांचे गट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक गावातील सुमारे शंभर शेतकरी यात सहभागी व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. प्रत्येकाने भाजीपाला, धान्य, देशी गाईंच्या दुधाचे निरंतर उत्पादन करावे यासाठी आमचे प्रयत्न राहतील. शहरातील लोकांना ते हमीभावाने कसे देण्यात येईल याचाही विचार सुरू आहे. मठाचे भक्तगण देशभरात आहे. त्यांच्याकडून याबाबत माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. सुरवातीला मागणी किती येते, हे पाहून उत्पादनाचे गणित मांडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शहरी ग्राहकांनी जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पादने वापरावीत यासाठी प्रामुख्याने कोणते प्रयत्न करता येतील, हे सध्या आमच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राहकांना देशी गाईचे दूध व दररोजचा भाजीपाला दररोज मागणीप्रमाणे देणे महत्त्वाचे आहे. शहरी लोकांनीही या चळवळीत सहभागी व्हावे, असे आमचे आवाहन आहे. कारण खरा फायदा त्यांचाच आहे. विषमुक्त अन्न खाऊन आरोग्य जपणे, पुढच्या पिढीला सुदृढ बनविण्यासाठी सेंद्रिय पदार्थाशिवाय आता पर्यायच उरला नाही. देशी गाईंचे महत्त्व कळावे यासाठी येत्या काही दिवसांत गाववार गोपरिक्रमा, देशी गाईंच्या स्पर्धा व प्रदर्शनही घेत आहोत.

काडसिद्धेश्वर यांच्याविषयी...
महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आदी राज्यांतील आध्यात्मिक परंपरेत काडसिद्धेश्वर हे दीपस्तंभ आहेत. साधी राहणी, अभ्यासपूर्ण मांडणी, चौकस व कुशाग्रबुद्धी आणि प्रेमळ बोलणे यातून त्यांनी समाजाशी असलेले नाते कायमपणे दृढ ठेवले आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाच्या नैसर्गिक ओळखीचे संवर्धन करत त्यांनी साकारलेले सिद्धगिरी म्युझियम, सिद्धगिरी प्राचीन प्रतिभावंत प्रकल्प त्यांच्या भारतीय संस्कृती विषयीच्या आस्थेची उदाहरणे आहेत. केवळ धार्मिक मठ म्हणून कार्यरत न राहता मठाला येणाऱ्या भक्तांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळातही धार्मिक कार्यक्रमांबरोबर सेंद्रिय शेती वाढविण्याबाबतचे कामही त्यांच्या मठामार्फत होणार आहे.

------------------------------
---------------------------
"देशभरातील भक्तगणांच्या माध्यमातून अनेक मार्गांनी सेंद्रिय शेती चळवळ पुढे नेत आहोत. उदाहरण जर द्यायचे झाले तर मठातील प्रवचन झाल्यानंतर त्याला प्रसाद म्हणून संकरितपेक्षाही जादा उत्पन्न देणारे देशी बी आम्ही देतो. कोणत्याही मार्गाने हे बी संबंधितांच्या शेतात जावे व देशी वाण वृद्धिंगत व्हावे हा आमचा उद्देश आहे.''
- मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर
---------------------------------------------------------

*********************************


सेंद्रिय शेतीला राजाश्रय मिळावा
-
- by - agrowon
जगभर सेंद्रिय उत्पादनांना मागणी वाढत आहे. भारतातही सेंद्रिय चळवळ जोर धरत आहे; मात्र योग्य तंत्रज्ञान, बाजारपेठेअभावी शेतकरी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करण्यास धजावत नाहीत. कमी खर्चात विषमुक्त, आरोग्यदायी अन्न उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या या शेतीला राजाश्रयाची गरज आहे.

भारतीय शेतीस प्राचीन संस्कृती आहे. पूर्वी ऋषी- मुनी जंगलात राहून नैसर्गिक शेतीच करीत असत. समाजप्रिय मानव पुढे समूहाने राहू लागला. त्यातून गाव, वाड्या-वस्त्या निर्माण झाल्या. लोकसंख्या वाढत असल्याने मर्यादित शेतीक्षेत्रातून अधिक उत्पादन घेणे गरजेचे बनले. पिकांच्या नवनवीन जाती आणि त्यास रासायनिक खते, कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर होऊ लागलाय. याद्वारे उत्पादनात मोठी वाढ झाली, मात्र किंमतही मोठीच मोजावी लागली. माती, पाणी आणि अन्न प्रदूषित झाले. एवढेच नव्हे, मातेच्या दुधातही कीडनाशकांचे अंश आढळले आहेत. अनेक ठिकाणी जमिनी नापिक होत आहेत. रासायनिक खते, कीटकनाशकांच्या किमती भरमसाट वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला. शेतीतील खर्च कमी करत विषमुक्त अन्न तयार करण्याच्या हेतूने "सेंद्रिय शेती' संकल्पना विकसित झाली, ती शेतकऱ्यांमध्ये रुजली; मात्र अजूनही या शेतीला राज्यात राजाश्रय मिळाला नाही.

आज राज्यात अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत; मात्र त्यात अप्रमाणित सेंद्रिय शेती करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रमाणित शेतकरी "लेबल' लावून, तर अप्रमाणित शेतकरी केवळ नावावर सेंद्रिय माल अधिक दराने विकत आहेत. ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आल्याने सेंद्रिय मालाकरिता ते चार पैसे अधिक मोजू लागले आहेत. अप्रमाणित शेतीमाल खरेदीत ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. सेंद्रिय खते, वनस्पतिजन्य- जैविक कीडनाशके, संजीवके यांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक ठिकाणी बोगस उत्पादने देऊन काही नफेखोर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार उघड झाले आहेत. यावर राज्यात शासनस्तरावर काहीही नियंत्रण नसावे, ही दुर्दैवी बाब आहे. कर्नाटक राज्यात "आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती स्पर्धाक्षम केंद्रा'च्या पुढाकाराने सेंद्रिय साखळी उभी राहत आहे. ईशान्येकडील सिक्कीम, मिझोराम ही राज्ये विशिष्ट मिशनद्वारे संपूर्ण सेंद्रिय राज्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. बिहार सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील एक- एक गाव सेंद्रिय करण्याचा आराखडा बनविला आहे. पाश्चात्त्य देशांतही सेंद्रिय शेतीमालाची बाजारपेठ विस्तारत आहे. महाराष्ट्रातही अनेक शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वळू लागला असतानाही शासनस्तरावर फारसे प्रयत्न झालेले नाहीत. तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काळात "सेंद्रिय शेतीचा मसुदा' तयार करण्यात आला, त्यास अजूनही अंतिम स्वरूप मिळालेले नाही. कर्नाटक, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्राने विशिष्ट "मिशन'द्वारे सेंद्रिय चळवळीच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. शासनस्तरावर विशिष्ट यंत्रणेद्वारे सेंद्रिय शेतीस मान्यता मिळाली नाही, तर शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल; तसेच शेतकऱ्यांची लूट आणि ग्राहकांची फसवणूक थांबणार नाही, हेही ध्यानात ठेवावे.
s-----

हिरवळीचे खते

हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.

हिरवळीच्या खताचे फायदे :-

• ही ळते जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .
• फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते .
• मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते .
• मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते
• मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.
• सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते .
या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .
हिरवळीच्या खतांचे प्रकार -
हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत .

१) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.


हिरवळीचे खते


२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .

हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती -
१) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .
२) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .
४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल .
५) कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य ,शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे ,उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन ,तूर व ज्वारी सोबत पेरून ,सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल ;ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल .

हिरवळीच्या खतांची पिके :-
१) ताग / बोरु - ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे .ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे .सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही .तसेच पाणी साचून राहणा-या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही .पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे .पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से .मी .उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे .तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते .

२) धैचा - तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ िकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात .

या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते .

३) घेवडा :- हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते .पाणथळ जमीनीस हे पीक योग्य नाही .पावसाळ्याच्या सुरूवातील प्रती हेक्टरी ५० किलो बियोण पेरावे .नतर आँगस्टच्या दुस-या आठवड्यात ते जमिनीत गाडावे .

४) सेंजी :- रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे . सिचनाची सोय असलेल्या ठिकाणी हेक्टरी ३०त े ४० किलो बियाण्याचा वापर करून पेरणी करावी .जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडण्यास ते योग्य होते.उसाच्या पिकास ते योग्य हिरवळीचे खत आहे .

५) द्विदल कडधान्याची पिके :- पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग ,चवळी ,उडीद ,कुळी्थ ,गवार ,यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाी चांगला उपयोग होतो जमिनीची पुर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यासाठी २५ ते ३० कि .ग्रँ . प्रति हेक्टरी बियाणे पेरावे पेरणीपुर्वी बियाण्यास राय़झॊबियम जीवाणु चोळूण आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .पीक फुलो-यावर येण्यापुर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० कि .ग्रँ .नत्र पिकास उपल्ब्ध होतो.

६) गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) - झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यामानाच्या प्रदेशात चांगले येते .या झाडाची लगवड दोन प्रकारे करतात .पहिल्या पध्दतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० से .मी . लांब ३ सेमी .व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सेमी .आकाराचा खड्डा करून बाधावर अथवा पडीक जमिनीत लगवड करावी .दुस-या

पध्दतीत गादी वाफे तयार करून अथवा प्लँस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे .ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत .पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुस-या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो .या झाडाच्या फांद्याची वरचे वर छाटणी करूनही या झाडांना नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते .

गिरीपुष्पाची पाने धैचा .मेंड व वनझाडाचा पालापाचोला यापेक्षा जलद कुजतात .गिरीपुष्पाच्या पानांम्ध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते .सेंद्रिय कर्ब ३६ टक्के ,नत्र २. ७० टक्के ,स्फूरद ०. ५ टक्के व पालाश १ .१५ टक्के आहे म्हणून नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मोठा सहभाग आहे .

सेंद्रिय पध्दतीने शेती करण्याच्या शेतक-यांचे हिरवळीच्या खतांचे प्रयोग :-
काही सेंद्रिय शेतक-यानी हिरवळीच्या खतांचे अनेक प्रयोग पीक उत्पादनातील वाढ अनुभवली आहे . जागेवरच हिरवळीच्या खतांची लगवड करण्याच्या प्रयोगात तीन फुट अंतरावर कापूस किंवा तुराची पेरणी करून पिकात मूग , उडीद ,अशी अल्प मुदतीची पिके घेऊन त्यामुळे निर्माण होणा-या हिरवळीचा फायदा मुख्य पिकाला होतो . पाँण्डेचरीमधील आँरव्हिले या गावी मिश्न बियाणे पेरुन २५ ते ३० दिवासांनी जागेवरच गाडून त्यापासून खत व आच्छादन म्हणून वापर केला जातो .काही शेतकरी पिकांच्या दोन ओळींमध्ये एकदल ,द्विद्ल तेलबिय ताग ,धने इत्यादी सर्व प्रकारचे बी एकत्र मिसळून एकरी १० कि .ग्रँ .या प्रमाणात फेकून मातीने झाकतात पेरणीनंतर ३० दिवसांनी मुख्य पीक स्वच्छ ठेवून नंतर अॅरोग्रीन पेरावे व ते मूळ पिकापेक्षा उंच होऊ लागले की जागेवरच पाडावे .अशाप्रकारे १० किलो बियाण्यांपासून ४ ते ५ टन हिरवळीचे खत मिळते .या हिरवळीच्या खताचे पूथ:करण केले असता त्यापासून एकरी ४० किलो नत्र उपलब्ध होतो शिवाय यासाठी लागणारा खर्चही कमी असून आपल्या शेतात अधिकधिक जैविक विविधता निर्माण करून पिकांना आवश्यक असणा-या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविता येते.

गांडूळ खत
अँरिस्टाँटल या ग्रीक शास्तज्ञाने प्रथम गांडूळाचे जमिनीतील कार्य ऒळखले ,त्यानी गांडूळांना पुथ्वीची आतडीअ से म्हटले आहे .

डार्विनच्या मताप्रमाणे गाडूळ जमिनीतील मेलेल्या प्राण्यांचे ,वनस्पतीचे ,काडी कच-याचे विघटन करून जमिनीची संरचना सु्धारून जमीन सुपिक करतात .गांडूळामुळे जमिनीत हवा खेळत

गांडूळाचे फायदे :-
१) सेंद्रिय पदार्थाचे विघटन
२) सेंद्रिय पदार्थाचे जमिनीतील वितरण.
३) गवत व झाडांच्या पानांचा थर साठून झालेली घटट चटई गांडुळ फोडून काढ्तात.
४) जमिनीतील जीवाणूंची कार्यक्षमता वाढते .
५) सेंद्रिय पदा्र्थापासून पीकांचे अन्नद्रव्य पीकांना उपलब्ध करतात .
६) जमिनीच्या कणांची कणीदार संरचना करण्यास गांडुळ मदत करतात .
७) जमिनीची जलधारण क्षमता वाढते .
८) गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळ्या खोल वाढतात ,पाणी लवकर मुरते व हवा खेळती राहते.
९) पाण्यचा निचरा चागंला होतो.
१०) पिकांचे व गवताचे उत्पादन वाढते .
११) जमिनीची उत्पादन क्षमता वाढते .
१२) गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे करून खातात व जमिनीत मिसळतात त्यामुळे जीवाणूंची चागंली वाढ होते .

सेंद्रिय पदार्थाचे विघटन

सेंद्रिय पदार्थ (वनस्पतीचे व मेलेल्या प्राण्याचे अवशेष ) जमिनीत असतात.त्यावर सुक्ष्म जीवाणूं ,गाडूळ व इतर सुक्ष्म जीवजंतु व प्राणी उपजीविका करुन त्या पदार्थाचे विघटन करतात .व वाढीसाठी हे विघटन पदार्थ पिकांचे अन्नद्रव्य म्हणून पिकांच्या वाढीसाठी वापरले जातात .

गांडूळ जमिनीतील पाला-पाचोळा,मुळ्या इ . विघटन करतात हे पदार्थ त्यांच्या (गांडूळांच्या) पचन संस्थेत प्रवेश केल्यानतंर विविध विकरांचा परिणाम होऊन त्यांचे विघटन होते .

सेंद्रिय पदार्थ हे गांडूळांचे अन्न आहे म्हणून ते मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थ खातात .गांडूळाच्या काही जाती सेंद्रिय पदार्थासोबत मातीपण खातात .

गांडूळाच्या विष्ठेत कँलशियम ,मँग्रेशीयम ,पलाश ,स्फुरद व मालीबडेनम ही अन्नद्रव्ये असतात.

गांडूळे व जमिनीची सुपिकता
गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व खनिज नत्राचे प्रमाण वाढते .

गांडूळ खत (व्हमी कंपोस्ट )

ज्या खतात गांडूळाची विष्ठा नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ ,गाडूळाची अंडीपुंज ,त्यांच्या बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो त्या खतास गांडूळ खत म्हणतात .
जाती :आयसेनिया फिटीडी ,युड्रीलस ,लँम्पेटो मारूटी
संरक्षण :-उन्हाळ्यात ताट्याचे छप्पर, पावसाळ्यात प्लास्टिकचे छप्पर

१) गादी वाफे पध्दत

गादी वाफ्याची रुदी २ .५ फुट ते ३ फुट
लांबी आवश्यकतेनुसार
उंची ३-४ इंच ,एक किवा अनेक वाफे तयार करावयाचे असल्यास दोन वाफ्यातील अंतर १ फुट असावे. वाफ्यात ऊसाची वाळलेली पाने,गवत ,पालापाचोळा ,शेतातील काडीकचरा इ . पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून वापरावे.

२) गांडूळाच्या खाद्य पदार्थाचे मिश्नण तयार करणे
असे मिश्नण मोकळ्या जागेत तयार करावे .

३ ते ५ दिवसापूर्वी गोळा केलेले शेण व घरातील ,शेतातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचे मिश्नण समप्रमाणात फावड्याने एकत्र करावे आणि हे मिश्नण पाणी टाकून मऊ होईपर्यत एकत्र करावे.

३) खाद्यपदार्थाचे मिश्नण तयार केलेल्या गादी वाफ्यावर घमेल्याच्या साहाय्याने टाकावे .दोन घमेल्यांच्या मध्ये तिसरे घमेले या पध्दतीने सर्व वाफभर टाकावे .


४) खाद्य मिश्नणावर गांडूळ किवा ताजे गांडूळ खत टाकणे

५ घमेले खाद्य मिश्नणावर १०० गांडूळे किंवा १ किलो अंडी (मातीसहित ) सोडावी .

५) खाद्यमिश्नणावर गवत किवा जुनाट पोती (बारदान ) अच्छादन

गांडूळाचे पाली,बेडूक ,साप ,उंदीर ,कोंबडी इतर पक्षी यांच्यापासून रक्षण करण्यासाठी जुनाट पोत्यांचे आच्छादन करावे
६) खाद्यमिश्नणाच्या आच्छादनावर नियमित पाणी टाकावे .

उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळेसे ( सकाळ / संध्याकाळ ) पाणी टाकावे .

७) गाडूळखत तयार झाल्यानंतर त्यापासून गांडूळ वेगळॆ करणॆ :-


४० ते ४५ दिवस खत तयार होण्यासाठी लागतात ,पुढे कमी कालावधी लागतो . शेवटच्या ४ ते ५ दिवसात खाद्यमिश्नणावरील आच्छादन बाजुला काढून पाणी टाकणॆ बंद करावे .जसे जसे खत कोरडे होईल तसे गांडूळ आत खाली शिरतील ,कोरडे खत चाळणीच्या ( २ .५ मि.मि ) साहाय्याने चाळून घ्यावे .जे गांडूळ चाळणीत येतील त्यांचा वापर परत करावा .

गांडूळ खत तयार करण्याच्या दोन पध्दती

१) खाद्य पदार्थाचे मिश्नण तयार करणे व गांडूळ सोडणे .
२) थर पध्दती :- ही पध्दत कमी प्रमाणात गांडूळ खत तयार करावयाचे असेल तर वापरतात .
पाला-पाचोळा,वाळलेली पाने ,नारळाच्या काथ्या असा पहिल थर २ इंचाचा थर द्यावा .


दुस-या थरात वाळलेल्या शेणाच्या भुकटीचा एक इंचाचा थर द्यावा व नंतर १० इंचाचा गांडूळाच्या खाद्याचा थर द्यावा व त्यावर ताजे खत टाकावे .या नंतर तयार केलेल्या वाफ्याला भिजवावे व ५०० गांडूळ /घनफूट जागेसाठी सोडावीत व नंतर पोत्याने आच्छादन द्यावे .


गांडूळ खत तयार करण्याच्या प्रक्रिया


गांडूळ पाणी (स्त्राव ) (वर्मी वाँश )

गांडूळाच्या शरीरातून पाझरणा-या सिलोमिक फ्युइडला व मुत्राला "गांडूळपाणी " अथवा वर्मी असे म्हणतात .
गांडूळखत करतांना सुध्दा आपण गांडूळ पाणी काढू शकतो .



गांडूळपाणी तयार करण्याच्या पध्दती :-

१) एकात एक जाणारी दोन भांडी घ्यावी .आतील भांड्याच्या तळाजवळ एका बाजूने तोटीची सोय केलेली असावी .आतील १२ ते १६ लिटरच्या भांड्यात शेण मिश्नीत अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ भरावे .त्यामध्ये १ ते २ कि .ग्रँ .गांडूळे सोडावी .सेंद्रिय पदार्थ जलद कुजण्यासाठी पुरेसे पाणी या पदार्थावर फवारावे .गांडूळे जसजशी सेंद्रिय पदार्थाचे सेवन करतात तसतसे त्याचे गांडूळ खतात रुपांतर होते .या गांडूळखतावर थोडे अधिक पाणी काही कालांतराने फवारावे ,त्यामुळे आतील भांड्यामधुन बाहेरच्या भांड्यात जाडसर रंगीत द्रव तोटीद्वारे बाहेर पडून बाहेराच्या भांड्यात साचतो .हा द्रव रबरी तोटीने ओढून बाटलीत गोळा केला जाती यालाच "गांडूळ पाणी " असे म्हणतात .



गांडूळ खत

२) गांडूळ पाणी तयार करण्यासाठी चांगली पूर्ण वाढलेली १ कि.ग्रँ वजनाची गांडूळ गोळा करावीत .त्याची कात बाजूला वेगळी करावी .नंतर १५ ते २० मिनीट त्यांना एका प्लास्टिकच्या पसरट भांड्यात ठेवून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे टाकाऊ सेंद्रिय पदार्थ वेगळे करून गांडूळे स्वच्छ करुन घ्यावीत .नंतर प्लास्टिकच्या भांड्यात ५०० मिली .कोमट पाणी घेऊन ही गांडूळे ३ मिनीट या पाण्यात सोडून ती चांगली ढवळून घ्यावीत ,नंतर दुस-या भांड्यात ५०० मि .ली . थंड पाणी घेऊन त्यामध्ये दोन मिनीट ढवळून घ्यावीत .ही गांडूळे पुन्हा गांडूळ खत निर्मितीसाठी वापरता येतात .आता दोन्ही भांड्यातील द्रावण एकत्र मिसळून पिकांवर फवारण्यासाठी वापरावे





************************************************



सेंद्रिय शेतीतील जिवंत घटक

प्राचीन काळापासुन जमिनीला मातेचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आपण या जमिनीला भूमाता असे संबोधतो .ज्याप्रमाणॆ पशुपक्षी मनुष्य ,प्राणि आणि वनस्पती जिवंत आहे .त्यावप्रमाणे माती सुध्दा जिवंत आहे .त्यात असंख्य जीवजंतु वास्तव्य करुन राहतात .त्यामुळे आपण या भू-मातेला सजीव आहे असे समजतो.

मनुष्य दिवसेदिवस स्वार्थी होत आहे .तो स्वत:च्या फायद्यासाठी जमिनीकडे दुर्लक्ष करत आहे ज्याप्रमाणे मनुष्य श्वासोच्छवास करतो .त्याप्रमाणे माती सुध्दा श्वास घेते .मनुष्याला ज्याप्रमाणॆ ऊन,वारा ,पाऊस रोग यापासुन संरक्षण करण्याची गरज आहे .त्याचप्रमाणे मातीचे सुध्दा यांपासुन संरक्षण करण्याची गरज आहे ,कारण सुध्दा निसर्गाचा एक जिवंत घटक आहे .आपल्याला पुर्वजांनी ही संपत्ती जशी जीवंत सोपवली आहे ,त्याप्रमाणे आपणसुध्दा तिचा सांभाळ करून येणा-या पिढीला ती जिवंत स्थितीतच सोपवली पाहिजे त्यामुळे अमुल्य अशा मातच्या थरांचे जतन करणे, शेतीचे अस्तित्व टिकवून ठेवणॆ हे आवश्यक आहे महत्त्वपूर्ण मूदेचे संरक्षण करणॆ आधुनिक जीवनाचा अविभाज्य घटक ठरतो .

पुर्वी, जमिअनीवर झाडे -झुडपे व गवत यांचे आच्छादन होते, त्यामुळे वारा ,पाऊस इ पासून जमिनीचे संरक्षण व संवर्धन नैसर्गिकरित्या होते असे .पंरतू कालांतराने जमिनीवरील झाडे गवत इत्यादीचा नाश होऊ लागला, परिणामत:जमिनीच्या धुपेचे प्रमाण वाढत गेले .जमिनीच्या धुपेमुळे झाडांच्या मुळांचा आधार निघून जातो आणि त्यांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा नाश होतो व जमिनीची सुपीकता कमी होते .पीक उत्पादन घटण्यास जमिअनीची धुप व त्याबरोबर होणारा पाण्याचा -हास ही दोन प्रमुख कारणे आहेत .एक इंच मातीचा थर निर्माण करण्यास निसर्गाला साधारण ३०० ते १००० वर्ष लागतात . परंतु मानवाच्या निष्काळजीपणामुळे हा थर नाहीसा होऊ शकतो .धुपेचे भयानक रुप विचारात घेतले तर मातीचे संरक्षण आणि संवर्धन करणॆ अत्यंत आवश्य्क आहे.

मुख्यत्त्वे करुन सहा प्रकारच्या जमिनी आढळून येतात .

१) अतीउथळ जमीन - या जमिनीचा रंग करडा, खोली ७ .५ से .मी . पर्यत ,पोत मध्यम ते जाड निचरा जास्त व उपलब्ध पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आढळते .या जमिनीचा सामु ७ ते ८ च्या दरम्यान असून ह्या जमिनीची धुप कमी करण्यासाठी वेगाने वाढणारी वनपिके जसे कडुलिंब ,बाभूळ ,सीरस ,निलगीरी,बांबु वनकर्णी आणि कोरडवाहू ,फळझाडे जसे - बोर ,सिताफळ इ लावणे फायदेशीर ठरते .धुप कमी करण्यासाठी तसेच ओलावा टिकविण्यासाठी सलग कंटुरचर पध्दतीचा वापर करणे योग्य ठरते .

२) उथळ काळी जमिन - या जमिनीचा रंग करडा ते सौम्य काळा ,खोली ७ .५ ते २५ से .मी .च्या दरम्यान पोत मध्यम ,निचरा जास्त आणि उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी आढळून येते ,या जमिनीचा सामु ७ .५ ते ८ .५ च्या दरम्यान असुन या जमिनीत कडधान्ये तेलबियांची पिके, कूषी ,वनशेती कूषी, फळबागा घेणॆ फायद्याचे ठरते ओलावा टिकविण्यासाठी समतल चर वरील वनस्पती ,बांधाला समांतर मशागत तसेच झाडे लावतांना समतल चर पध्दतीचा वापर करणे फायदेशीर ठरते .

३) मध्यम खोल काळी जमिन - या जमिचा रंग करडा ते काळा, खोला २५ ते ५० से .मी .सामू ७ .५ ते ८ .५ च्या दरम्यान आढळतो .या जमिनीचा पोत मध्यम ,तर उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी आढळून येते .या जमिनीमधे चुनखडी भरपूर प्रमाणात आढ्ळून येते . अशा जमिनीचा कपाशी (देशी ) ,तुर ( लवकर येणारी) कडधान्य व तेलबियांची पिके घ्यावीत .ओलावा टिकविण्यासाठी कंटूरवरील वनस्पती ,बाधाला समंतर मशागत ,तसेच रुद वरबा-सरी पध्दतीचा वापर करणॆ फायदेशीर ठरते .

४) खोल काळी जमिन - या जमिनीचा रंग करडा ते अती काळा ,खोली ५० ते १०० से .मी .सामु७.५ ते ८ .५ व चुनखडीयुक्त आढळून येते .या जमिनीत संकरीत कपाशी ,तुर ( उशीरा येणारी ) आंतरपिके तसेच दुबार तसेच रुद वरंबा सरी पध्दतीचा वापर करणे फायदेशीर ठरते .
५) तपकीरी रंगाची जमिन - या जमिनी मध्यम ते खोल ,धुप झालेल्या ,आम्ल ते निष्क्रीय, सामू ६ .५ ते ७ .५ आढळून येतात .अशा जमिनीत उपलब्ध पाण्याचे प्रमाण व पाणी मुरविण्याची क्षमता मध्यम आणि उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण कमी आढळून येते .या जमिनी भात विकास तसेच साग ,बांबू ,निलगीरी या वनविकासास योग्य आढळून येतात .ओलावा टिकविण्यासाठी वनपीकांची समतल लागवड करणॆ योग्य ठरते .

६) खारवट व चोपण जमिनीची सुधारणा-

प्रकार गुणधर्म

१) खारवट जमिन विद्राव्यक्षाराचे प्रमाण जमिनीत अधिक असते .विद्युत वाह
कता ४ डेसीसायमन / मिटरपेक्षा जास्त ,विनिमयात्माक सोडीयम१५ टक्के पेक्षा कमी व जमिनीचा आम्लविम्ल निर्देशाक ८ .५ पेक्षा कमी
२) चोपण जमिन आम्लविम्ल निर्देशांक ८ .५ पेक्षा जास्त विद्युत वाहकता ४ डेसीसायमन / मिटरपेक्षा कमी व जमिनीत विनिमयात्मक सोडियम १५ टक्केपेक्षा जास्त.

खारवट जमिनीची सुधारणा -

१) शेतात चर खोदावेत .
२) शेतात पुरेसे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करून ते द्वारे शेताबाहेर काढावे .


३) पीकांच्या फेरपालटित हिरवळीची पीके घ्यावीत .
४) भात ,गहू ,कपाशी ऊस या सारखी क्षार सहनशील पीके घ्यावीत व मध्यम सहनशिल असणारी धान,ज्वारी,गहू, सुर्यफुल ,सोयाबिन ,बाजरी ,पे्रु ,चिकू ,डाळिंब ,बोर ही पीके घ्यावीत ,धैचा पीक घेऊन त्याचे हिरवळीचे खत करावे .
५) ओलीताखालील शेत पडीक ठेवू नये ,जमिन नेहमी पिकाखाली ठेवावी अन्यथा शेत जमिन क्षारयुक्त होऊ शकते .

चोपण जमिनीची सुधारणा -
१) जमिन सपाट करुन योग्य अंतरावर चर काढावेत .
२) क्षारांचा निचरा केल्यानंतर अशा जमिनत भात ,गहू ,ऊस ,कापूस यासारखी क्षारसहनशील पिके घ्यावीत .

जमिनीची धुप म्हणजे काय ?

भुपूष्ठावर पडणारे पावसाचे थेंब ,वाहते पाणी आणि गतीमान वारा यांच्यामुळे अलग होऊन एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी मातीच्या कणांच्या स्थालतर होण्याच्या क्रियेला जमिनीची धुप म्हणतात .

मातीच्या या कणांची धुप पुढील दोन प्रकारे होते .
१) विधायक धुप :- भुपूष्ठावर गवताचे आच्छादन असते ,दाट झाडी असते .या जमिनीची धुप इथे फार मंद असते . २ते ३ से .मी .थरापर्यत जमिनीचीधुप होण्यास ५ ते ७ हजार वर्ष लागतात .उलट पालापाचोला ,सेंद्रिय पदार्थ यापासून माती बनण्याची क्रिया माती वाहून जाण्याच्या क्रियेपेक्षा पुष्कळ जलद असते .त्यावेळी जमिनीची झीज ,वहन व भरण या क्रिया एक दुस-याची उणीव भरुण काढून जमिनीत समतोल कायम ठेवतात .उंचवट्यावरील मातीचे कण सखल प्रदेशात साठविले जातात .या कणांमध्ये सेंद्रिय पदार्थाचे कण असल्यामुळे सुपीक जमीन तयार होते .या प्रकारच्या धुपेस नैसर्गिक धुप असे म्हणतात .ही धुप विध्वंसक नसुन विधायक समजली जाते .
२) विध्वंसक धुप :- दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मानवाने जमिनीवरील झाडॆ,गवत ,अरण्ये इ नायनाट करुन जमिनीला नांगरले ,कुळवले व जमिनीवरील आच्छादन नाहिसे केले .त्यामुळे धुपोत्पदक शक्तीची गती वाढली .कालांतराने माती तयार होण्याची क्रिया व धुपून / धुवून जाण्याची क्रिया यामधील समतोल नष्ट झाला .
ज्या भारी संपन्न जमिनी तयार करण्यास निसर्गास सहस्त्रावधी वर्ष लागली त्याजमिनी काही वर्षात नष्ट झाल्या ,अशा धुपेला "विध्वंसक धुप " म्हणतात .

जमिनीच्या धुपेस पुढील बाबी प्रामुख्याने कारणीभूत आहेत :-

१) पावसाचे आदळणारे थेंब २) वाहते पाणी ३) गतीमान वारा ४) सुर्याची प्रखर उष्णता ५) भुभागावरील क्रियाशील घडामोडी :-

जमिनीवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब जोराने व वेगाने आघात करतात त्यामुळे जमिनीच्या वरचा भाग ठीसुळ होऊन पूष्ठभागापासून हा अलग होतो . त्याचप्रमाणे नेहमी ही क्रिया घडत असल्यास जमिनीची पोत बिघडतो जमिनीवरुन वाहणारे पाणी जमिनीला खरवडून माती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्य़ाचे काम करते .त्याचप्रमाणे वाहते पाणी नद्यांमधून किंवा नाल्यांमधून वाहत असतांना किना-याची व तळाची बारीक झीज या वाहत्या पाण्यामुळे होत असते .

वाळ्वंटीय भागावरुन जोराने वाहणारा वारा किंवा धुळ वा-याबरोबर एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी वाहुन जाते .भूपुष्ठावर व भूगर्भात बरेच जीव-जीवाणू असतात, त्यांच्या हालचालीमुळे जमिनीचा टणकपणा नष्ट होतो व ती वा-याने किंवा पाण्याने सहज दुस-या ठिकाणी वाहून जाते . मनुष्यप्राणी जमिनीचा अधिक पण चुकीचा वापर करतो, त्यामुळे जमीन धुपेला बळी पडते .सुर्याच्या प्रखर किरणांनी व अत्यंत थंडीमुळे सुध्दा जमिनीच्या पूष्ठभागाचे आकुंचन व प्रसरण हिऊन जमिनीची धुप होण्यास मदत होते.

शेतक-यांनी करावयाचीमूद संधारणाची कामे :-

समपातळीतील वरंबे :- समपातळीत वाहणा-या पाण्याला अडवून जमिनीत मुरण्यासाठी असे वरंबे कमी पावसाच्या भागात ३ % पर्यत उताराच्या जमिनीवर ठरतात .जमिनीत पाणी मुरण्याचा वेग जास्त व पाऊस कमी असेल तर समपातळीतील वरंबे टाकावेत .३० से .मी. उंचिचे वरंबे समपातळीतील तयार करावेत ,दोन वरंब्यातील अंतर सर्वसाधारणपणे ५ मीटर ठेवावे .
ठाळीचे वरंबे :- अती पावसाच्या प्रदेशात ५ ते १० टक्के उताराच्या जमिनीत तसेच पाणी मुरण्याचा वेग कमी असणा-या ठिकाणी ,मूद व जल संधारणासाठी त्रिकोणी आकाराचे ३० से .मी . उंच व ० .६ टक्के ठाळ असलेले आणि एकमेकांपासून ३ मी .अंतरावर असलेले ठाळीचे वरंबे घालावेत .अशा प्रकारच्या वरंब्यामुळे जमिनीची धुप कमी होते .पाणी सर्व शेतात व्यवस्थितरित्या मुरल्यामुळॆ ५- १५ टक्के पर्यत उत्पादनात वाढ होते .


उताराला आडवे वाफे :- अवर्षणप्रवण क्षेत्र जेथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे व अजमिनीला फारसा उतार नाही अशा ठिकाणी उताराला आडावे वाफे तयार करुन मूद व जल संधारण करता येते .यात मुख्य वरंबे व टाय वरंबे तयार करतात .दोन मुख्य वरंब्यात ३ मीटर अंतर ठेवावे तर टाय वरंब्यात ६ मीटर अंतर ठेवावे .दोन मुख्य वरंबे उताराला आडवे ठेवावेत ,तर टाय वरंबे उताराच्या दिशेने ठेवावेत .अशा रितीने उताराला आडवे वाफे तयार करावेत मुख्य वरंब्याची उंची ३० से .मी .पर्यत ठेवावी ,तर उपवरंब्याची उंची २० से .मी . ठेवावी जास्त पाऊस झाला तरी उप वरंबे फुटून संथ गतीने शेतीतून पाणी बाहेर जाईल व मुख्य वरंब्याना काहीही हानी होणार नाही व शेतातील माती व पीक दोन्हीचे संरक्षण होईल .या पध्दतीत पडणारा पाऊस जागीच मुरविल जातो,माती व पीक दोन्हीचे संरक्षण होईल .पीक उत्पादनात साधारणपणॆ ५-१५ टक्के वाढ होते .

आच्छादन :- पीक लागवडित आच्छादनाचा उप्योग केला तर पावसामुळे होणा-या धुपेपासून जमिनीचे संरक्षण होते .तसेच जमिनीतील ओलावा दिर्घकाळ टिकून पीक वाढीवरत्याचा चांगला परिणाम होतो .खरीप,र्ब्बी व उन्हाळी तीनही हंगामात आच्छादनाचा उपयोग करावा. आच्छादनासाठी शेतातील टाकावू पदार्थ उदा. उसाचे पाचट भूसा, पाला पाचोळा इ वापर करावा.
अती उतारावरच्या जमिनीची धुप थांबविण्यास गवत स्वरुपाची झाडे वापरता येतील .उदा .लेमन ग्रास,सिट्रोनोला ,खस इअत्यादी .फळबागांभोवती विशेष:पश्चिम दिशेला हवेच्या अवरोधा करीता झाडांचा समुह एका रांगेत लावल्यास फळझाडांचे व जमिनीचे नुकसान टाळता येईल ,या करिता सू-बाबूळ ,निलगीरी ,गिरीपुष्प, इत्यादीचा वापर करता येईल .
बायोडायनामिक कूषी पध्दती

बायो ( जीव ) डायनामीक ( शक्ती / चैतन्य ) :- 








तत्वज्ञानी डाँ .रुडाल्फ स्टेइनर ( जर्मनी ) याने १९२२ साली हिंदूधर्म ,बौध्द धर्म व्वैदिक सिध्दांत याचा सखोल अभ्यास

नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खताचे सूत्र ...!!! "

नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खताचे सूत्र ...!!! "

 " नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खताचे सूत्र ...!!! "
रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापरामुळे शेतीची अपरिमित हानी झाली. ती भरून काढणे अशक्यअसले, तरी भावी काळात होणाऱ्या दुष्परिणामा पासून वाचण्यासाठी, आजहीनैसर्गिक शेतीकडे वळणे शक्य आहे. अनेक रोगांना आमंत्रण देणाऱ्या पद्धतीलाटाळून, " प्राचीन भारतीय नैसर्गिक शेतीची" कास धरणे आवश्यक आहे.नैसर्गिक शेती करताना ती दुसऱ्यावर दुसर्यांवर अवलंबून राहता कामा नये.शेतीचे टानिक म्हणजे खत ते स्वतः तयार करून वापरणे केव्हाही किफायतशीरच होय.हे खत स्वस्तात आणि प्रभावशाली शेतकऱ्याला बनविणे सहज शक्य आहे.खत बनविण्याचे सूत्र खालीलप्रमाणे :
अ) नैसर्गिकरित्या खत बनविण्याचे तंत्र
१) शेण (गाय, बैल, म्हैस) - १५ किलो
२) जनावरांचे मूत्र (गाय, बैल, म्हैस) - १५ लिटर
३) गुळ - १ किलो
४) डाळीचे पीठ (उडीद,मुग,तुल,चना,अन्य) - १ किलो
५) पिंपळ,वड,आंबा,निंब अशा झाडाखालील माती - १ किलो
वरील सर्व घटक एकत्र मिसळून एका प्लास्टिकच्या पिंपात १५ दिवसपर्यंत ठेवावे, दररोज काठीने ढवळत राहावे.
पंधरा दिवसानंतर या द्रावणात १५० ते २०० लिटर पाणी मिसळावे, त्यानंतर ते द्रावण शेत मोकळे असल्यास सडा शिंपल्यासारखे शिंपडावे.जर शेतात पिक असेल तर पाणी देताना पाण्याच्या धारेवर डब्याने सोडावे.ह्या प्रयोगाची पुनर्रावृत्ती पिक निघेपर्यंत दर २१ दिवसांनी करत राहावी.यामुळे पिकांना पाणी कमी लागेल, शिवाय रोग कमी येतील. सतत तीन वेर्षेपर्यंत प्रयोग केल्यास शेतातील विषयुक्त तत्व नष्ट होतील.शेतात भरघोस उत्पन्न येईल. रासायनिक खताचा वापर करू नये,विश्वास नसल्यास पहिल्या वर्षी एकाच
एकरात प्रयोग करावा.
पर्यायाने शरीरात विषतत्व जाणार नाहीत.असाध्य रोगांपासून मुक्ती मिळेल.शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल.
ब) नैसर्गिक किटकनाशक निर्मिती तंत्र
१) जनावरांचे मूत्र (गाय,बैल,म्हैस,शेळी) - २० लिटर
२) कडूनिंबाच्या पानांची/ निम्बोळीची चटणी (पेस्ट) - अडीच किलो
३) धोतरा/ धतुरा च्या पानांची चटणी - अडीच किलो
४) रुई/ आक च्या पानांची चटणी - अडीच किलो
५) बेला च्या पानांची चटणी - अडीच किलो
६) सीताफळाच्या पानांची चटणी - अडीच किलो
७) अळू / कोचई च्या पानांची चटणी - अडीच किलो
८) गराडी च्या पानांची चटणी - अडीच किलो
९) बेशरम च्या पानांची चटणी - अडीच किलो
१०) तंबाखू च्या पानांची भुकटी - एक किलो
वरील सर्व दहाही घटक एकत्र करून पाण्यामध्ये दीड ते दोन तास उकळावे. थंड झाल्यावर बनलेले किटकनाशक गळून ठेवावे.
शेतात फवारणी करताना जेवढे किटकनाशक घेतले, त्याच्या २० पट (एका लिटरला वीस लिटर पाणी हे प्रमाण सर्वोत्तम) पाणी मिसळून फवारणी करावी. सर्वात प्रभावकारी स्वस्त किटकनाशक आपण स्वतः बनवू शकतो. ह्याचा कोणत्याही पिकावर वापर करण्यास हरकत नाही रोगाचे स्वरूप लक्षात घेऊन किटकनाशकाचे प्रमाण कमी अधिक करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना आहे
अशाप्रकारे स्वतः खत आणि किटकनाशक बनवून शेतकरी आपिली शेती विषमुक्त करून संपन्नता मिळवू शकते,तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुलामगीरीतून मुक्तता मिळवू शकते

http://nlohabare.blogspot.in/2011/03/blog-post_16.html


---------------------


परसबाग
परसबाग म्हणजे घराभोवतालच्या जमिनीवर आवश्यक भाजीपाला, फळझाडं, औषधी वनस्पती आणि फुलझाडं लावणे. शहरात जागेची कमतरता लक्षात घेता गच्ची/गॅलरीत कुड्यांमध्ये परसबाग विकसित करता येते.

परसबागेमध्ये उपलब्ध जागेनुसार भेंडी, गवार, वांगी, मिरची यासारख्या फळभाज्या, दुधी भोपळा, लाल भोपळा, कारली, दोडकी, पडवळ, तोंडली, घेवडा या वेलवर्गीय भाज्या, तर मेथी, पालक, शेपू, पालक, कोथिंबीर अशा पालेभाज्या लावता येतात. दररोजच्या वापरातला कढीपत्ता, लिंबू, तसेच पपई, केळी, सिताफळ, चिकू, आंबा, फणस, पेरू, नारळ अशी फळझाडंही आपण लावू शकतो. याशिवाय तुळस, गवती चहा, पुदिना, अडुळसा, ब्राह्मी, शतावरी, माका यासारख्या औषधी वनस्पती आणि गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, पारिजातक यासारखी फुलझाडंही वाढवता येतात. यांच्या वाढीसाठी आपल्या घरातील दररोजच्या जैविक कचर्या चे कंपोस्ट किंवा गांडूळ खत केल्यास बाहेरून कोणतेही जैविक किंवा रासायनिक खत वापरण्याची आवश्यकता नाही.

भेंडी, गवार, वांगी यांची ५-१० तर वांग्याची ४-५ रोपे आठवड्यातून एक दोन भाज्या पुरवू शकतात. दूधी भोपळा, कारली, दोडका यांच्या एक-दोन वेली पुरेशा असतात. यांच्या लागवडीसाठी देशी किंवा सरळ वाण असलेल्या बियाणांचा उपयोग केल्यास आणि त्यांच्या सिझनप्रमाणे लावल्यास त्यांच्यावर विशेष कीड पडण्याचा धोका नसतो. शिवाय कीड प्रतिबंधक उपाय म्हणून निंबार्क किंवा दशपर्णी अर्क फवारता येतो. आणि तो आपण स्वतः बनवू शकतो. दूधी भोपळा, लाल भोपळा यासारख्या वेलांमध्ये नर आणि मादी फुले असतात. त्यामुळे मधमाशी किंवा अन्य कीटकांमार्फत परागीभवन न झाल्यास फलधारणा होत नाही. अशा कीटकांच्या अभावी आपण नर फुलातील परागकण ब्रशच्या सहाय्याने किंवा नर फूल तोडून त्यातील परागकण मादी फुलावर शिंपडून फलधारणा वाढवू शकतो.

मेथी, पालक, शेपू यासारख्या पालेभाज्या १५-२० दिवसांनी खाण्यायोग्य होतात. अशा वेळी त्या मुळासकट न उपटता त्यांची खुडणी करावी. खुडणी केल्यामुळे आपल्याला किमान तीनवेळा भाजी मिळू शकते. गवती चहा, पुदिना, तुळस यांचा उपयोग दररोजचा चहा आरोग्यदायी बनवण्यासाठी करता येतो. तर यांच्या जोडीला अडुळसा, पारिजातक यांच्या पानाचा काढा केल्यास तो सर्दी, खोकला आणि ताप आल्यावर प्रभावी ठरतो. देशी गुलाब लावला असेल तर घरच्या घरी गुलकंद तयार करता येईल. जास्वंदीचं तेल केसांसाठी गुणकारी ठरेल आणि त्याचं सरबत उन्हाळ्यात थंडावा देईल.

सध्या बाजारात मिळणार्या् भाजीपाल्यांवर प्रचंड प्रमाणात कीटकनाशकं फवारलेली असतात. तसंच हायब्रिड बियाणं आणि रासायनिक खतं यामुळे त्यांच्यातली पोषणमूल्यं कमी असतात. त्यामुळे परसबागेतला विषमुक्त आणि ताजा भाजीपाला आपले आणि आपल्या कुटुंबियांचे चांगलेच पोषण करू शकतो.



- शुभदा पांढरे












http://pune.thebeehive.org/content/1621/4854

माझ्याबद्दल