रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

छत्रपती संभाजी महाराज


छत्रपती संभाजी महाराज





शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांना अफजलखानाने दग्याने ठार केले होते. जिजाऊसाहेब दुःखी होत्या. पण लवकरच एक चांगली बातमी पुरंदरावरून आली. सौ. सईबाईसाहेबानी पुत्रास जन्म दिला. महाराजांनाआनंद झाला. त्यांनी बाळाचे नाव 'संभाजी'असे ठेवले. बाळराजे संभाजी आपल्या शूर काकांचा वारसा घेऊनजन्माला आले. दि. १४ मे १६५७ अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता. दिवस धामधुमीचे होते.त्यातच सईबाईंची तब्बेत ढासळली. संभाजी बाळाला अंगावरचे दूध मिळत नव्हते. जिजाऊंनी धाराऊ नावाच्यास्त्रीची बाळराजांना दुधासाठी व्यवस्था केली. सईबाईसाहेब राजगडावर इ.स. ५ सप्टेंबर १६५९ रोजी स्वर्गवासीझाल्या. शंभूबाळ केवळ दोन वर्षाचा होता. महाराज स्वराज्यस्थापनेच्या कार्यामध्ये गुंतलेले,आजीनेशंभूबाळाला आईची माया दिली. पुढे पुरंदरचा तह झाला. तहामध्ये ठरलेल्या अटीनुसार युवराज संभाजीराजेआपल्या पिताश्रींबरोबर आगऱ्याला गेले. औरंगजेबाने दग्याने शिवरायांना कैद केले. 






शंभूराजे या वेळी अवघ्या नऊ वर्षाचे होते. एवढ्या लहान वयात त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ झाला होता. मोठीजबाबदारी त्यांच्या लहानग्या खांद्यावर येऊन पडली. शंभूबाळ फार हुशार होते. सहनशील व समजूतदारहोते. महाराज आगऱ्याहून निसटले. शंभूराजे मथुरेला कृष्णाजी त्रिमळ यांच्याकडे राहिले. इकडे बाळराजे वारलेम्हणून स्वराज्यात आकांत चालू होता. पण औरंगजेबापासून शंभुराजांना वाचवण्याकरिता शिवरायांनीच हिअफवा पसरवून दिलेली होती. नंतर यथावकाश शंभूराजे सुखरूप स्वराज्यात आले. शिवरायांचा राज्याभिषेकझाला. त्यावेळी संभाजीराजे सतरा वर्षांचे होते. जिजाऊसाहेब फार वृद्ध झाल्या होत्या. राज्याभिशेखा नंतरअवघ्या अकरा दिवसांनी त्यांना देवाज्ञा झाली. शंभूराजांचे मायेचे छत्र हरपले. सोयराबाईसाहेब व इतर आयाहोत्या परंतु संभाजीराजांना फारच एकटे वाटू लागले. महाराज सतत मोहिमेमध्ये गुंतलेले असत. शंभूराजांचेमन भांबावले होते. महाराजांनी आपल्याला शाबासकी द्यावी असे त्यांना सारखे वाटत होते. महाराजांचेशंभुराजांवर फार प्रेम होते. पण आईची माया केवळ आईच देऊ शकते. संभाजीराजे संस्कृतमध्ये प्रवीण होते.


त्यांनी ग्रंथलिखानही केले होते. ते जाणते होते. पण हात पराक्रमाला शिवशिवत होते. अखेर सिंहाचाच छावातो संभाजीराजे व सौ. येसूबाई यांना लवकरच कन्यारत्न झाले. मुलीचे नाव भवानी ठेवले. युवराज संभाजीराजेतडखाफडकी मोगलांना जाऊन मिळाले. सारेजण हादरले. औरंगजेबाने दिलेरखानाला संभाजीराजांना घेऊनयेण्यास सांगितले. तेव्हा मात्र संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात आले. त्यांनी महाराजांची माफी मागितली वआपण स्वराज्याची मरेपर्यंत सेवा करू,स्वराज्यासाठी प्राण अर्पण करू अशी शपथ घेतली. केलेल्या चुकीचात्यांना पच्छाताप झाला. शिवाजीराजांचे दि. ३ एप्रिल १६८० रोजी देहावसाण झाले. संभाजीराजांवर फार मोठीजबाबदारी येऊन पडली. तरीही त्यांनी न डगमगता शत्रूला सळो कि पळो करून सोडले. महाराज गेल्यानंतरवतनदारानी उचल खाली होती. स्वकीय शत्रूंचा विळखा संभाजीराजाभोवती पडू लागला. संभाजीराजांनी अनेकलढाया केल्या पण एकही गड शत्रूच्या हाती जाऊ दिला नाही. स्वराज्य कमी झाले नव्हते ते संभाजीराजांनीव्यवस्थित सांभाळले होते. पण वतणापायी लाचार झालेल्या लोकांनी मोगलांना गुप्त खबर देऊनसंभाजीराजांना दग्याने पकडले.


औरंगजेबाचं तो त्याचे डोके एकाच पद्धतीने चालायचे हो मुसलमान नाहितर मर. त्याने संभाजीराजांचे फारहाल केले. पण संभाजीराजे त्याला शरण गेले नाही. संभाजीराजांनी शिवाजीराजांना शपथ दिली होती. स्वराज्याच्या रक्षणाची. ती त्यांनी अखेरपर्यंत पाळली . दि. ११ मार्च १६८९ मध्ये पापी औरंग्याने त्यांचीक्रूरपणे हत्या केली. संभाजीराजांसमोर औरंगजेबाचा वैचारिक पराभव झाला होता. संभाजीराजांनी आपल्याप्राणाचे बलिदान देऊन हिंदुधर्माचा गौरव वाढवला. त्यांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजीमहाराजांची नैतिक आणि आध्यत्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनंत पटींनी उज्वलतर आणिप्रबलशाली केली. आणि प्रचिती लवकरच आली. अवघा महाराष्ट्र आपल्या राजाचा सूड घेण्यास सज्ज झाला.औरंगजेब तीन लाख फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. मराठ्यांनी त्याच्याशी तब्बल वीस वर्ष झगडा सुरुठेवला. औरंगजेब १७०७ साली अपयशाने मेला परंतु मराठे शाही पूर्वीपेक्षाहि प्रचंड आणि बलवान झाली.
















by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल