रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

शिवरायांचे व्यवस्थापन...


शिवरायांचे व्यवस्थापन

जाणत्या राजाचे व्यवस्थापन



व्यवस्थापनशास्त्राचे अवास्तव रान सर्वत्र माजलेले दिसते. आणि खरे रान कमी होत चालले आहे. अद्यापिएखाद्या कंपनी पलीकडे जाऊन सामान्य रयतेला, राष्ट्राला जगाला सुखी करण्यात त्याला यश आलेले नाही.शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभे केले ते उत्कृष्ट नियोजन व सुक्ष्म व्यवस्थापन शास्त्राशिवाय शक्यचनव्हते. रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ म्हणजे राजांचा व्यवस्थापनेचा अभ्यास. चाणक्याचामहाराजांनी अभ्यास केला होता कि नाही ते इतिहासाला ठाऊक नाही. परंतु समर्थाच्या दासबोधाचा त्यांनीनिश्चित परामर्श घेतला. खरे व्यवस्थापन हे मनाचे असते. म्हणून व्यवस्थापनशास्त्र हे मनाचे शास्त्रम्हटल्यास वाउगे ठरू नये. लोकांचे,जनतेचे कल्याण करणे हा त्यांचा व्यवस्थापनाचा पाया होता. 





औरंगजबाप्रमाणे ते स्वार्थपणा,रानटीपणा,दुसऱ्याच्या शोषणावर आधारलेले नव्हते. वापरा आणि फेका हेकचरा निर्माण करणारे व्यवस्थापन त्यांनी राबवले नव्हते. अफाट लोकसंग्रह,त्यांच्याशी संपर्क साधने,रयतेचेजनमत चाचपणे,त्यांचे लोकशिक्षण व त्यांच्या मूलभूत गरजा पाहणे ह्या सर्वांना राजे प्राधान्य देत असत.स्वराज्याचे आर्थिक नियोजन,न्यायव्यवस्था,सॊरक्षणसिद्धता,परराष्ट्रखाते,धर्मकारण, समाजकारण आणिराजकारण यांचा अचुक समन्वय महाराजांनी साधला होता. महाराजांची इतिहासात डोकावून पाहण्याची शक्तीविलक्षण होती. इतिहास म्हणजे अनुभव,महाराजांनी स्वतःच्या व दुसाऱ्यांच्या अनुभवातून शिकण्याची क्षमतादांडगी होती. कोणत्या वेळी नेमके काय करावे आणि काय करू नये याचा महाराज अगदी अचूक निर्णय घेतअसत. इतिहासाचे अवलोकन करूनच महाराजांनी नवा इतिहास घडवला होता. इतिहासाचा अभ्यास करूनचमहाराजांनी आपल्या स्वराज्याचा भूगोल वाढवला होता. महाराज संकटांकडे संधी म्हणून पाहत होते. 


जमले तर राजकारण नाहीतर शिक्षण हे त्यांचे प्रमुख सूत्र होते. राजे सतत विचारशील व क्रियाशील असत. आपापले स्वराज्य कसे वाढवावे,रयतेला सुखी कसे करावे. दुर्जनांचा निप्पात कसा करावा. आपल्या राष्ट्राचीउन्नती कशी होईल ह्याचेच ते सर्वत्र चिंतन करत असत. राजे पुरंदरच्या ताहासाठी मिर्झाराजेंच्या छावणीतगेले होते. तेव्हा तेथे मनुची नावाचा एक गृहस्थ होता. राजांनी ह्या माणूची बरॊबर बातचीत केली. अर्थातच हावाडा महाल बांधायला किती वर्षे लागली त्या महालात किती हिरे जड्वले. त्याचे दगड कुठून आणले अशींवरपांगी चर्चा केली तर नसणारच,राजांनी मनुचीकडून युरोपचे धर्मकारण,समाजकारण,व राजकारण याचीचांगली माहिती मिळवली होती. या माहितीचा वापर महाराजांनी आपल्या पुढील समाजकारण राजकारणातकेला.


महाराज मुळातच कुशाग्र बुद्धिमत्तेचे,संकटकाळी ती अधीकच सूक्ष्म होत असे. माहाराज क्षणाक्षणाला शिकतहोते. ज्ञान वेचत होते. महाराजांची वृत्ती जिज्ञासू व अभ्यासू होती. आपल्या कर्मचारी वर्गामध्ये व रायतेमध्येहे गन रुजवण्याचा ते प्रयत्न करत असत. सुरतेवर हल्ला करण्याआधी शिवाजी महाराजांनी सुरतेचीवत्तमबातमी बहर्जी नाईकांकडून मिळवली होती . येण्या-जाण्याचा मार्ग,त्यांच्या वेळा,मोहिमेचीगुप्तता,अखंड सावधानता व चपळपणा ह्या सर्वांचा राजांनी येथे सुरेख संगम केला होता. राजे आपल्या आठहजार फौजेसह शत्रूच्या मुलखात तब्बल तीनशे किलोमीटर आत घुसले होते. ते सुरतेला जात असतानाकोंढाण्याच्या बाजूने सहा किमी नटरावरून जात होते. त्याचवेळी मुघलांचा जयवंतसिह नावाचा सरदारकोंढाण्याला वेढा देऊन होता. परंतु त्यालाही हि गोष्ट कळली नव्हती,महाराज असे चालाख होते. राजांची नजरगरुडासारखी होती. महाराज छोट्या छोट्या गोष्टीही बारकाइने पाहत असत. हेच महाराजांचे सूक्ष्मव्यवस्थापन होते.























by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल