रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

तानाजी मालुसरे...

तानाजी मालुसरे


तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई,दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड ताकदीने भारी आणि बुद्धीने चलाख होता. तानाजी म्हणजे महाराजांचा जीव कि प्राण. त्यांचा बालपणीचा सवंगडी स्वराज्याचा सुभेदार आणि मूळचा महाडजवळील उमरठ गावचा, तानाजी सह्याद्रीचा वाघ कुणालाही घाबरत नसे. महाराजांनी सांगावे आणि त्याने काम फत्ते करावे असा शिस्ता पडला होता. सूर्यराव सुर्वेला त्याने लढाईमध्ये पळूवून लावले होते. आगऱ्याला महाराजांसोबत तो होता. जिजाऊ साहेबाना कोंढाण्याचा सल होता. राजांनी तानाजीवर कोंढणत्याची कामगिरी सोपवली. त्या मुलाचे लग्न होते. पण तानाजी म्हणाला आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. एवढं बोलून तानाजी शांत बसला नाही. तर त्या स्वामिनिष्ठ सेवकाने पोटच्या पोराच्या लग्नाकडे पाठ फिरवली. आणि कोंढाण्याच्या कामगिरीसाठी 











तानाजी स्ववंगड्याना घेऊन कोंढाण्याच्या दिशेने निघाला. प्रथम त्याने गोंधळ्याचे रूप घेतले. आणि गडाखालच्या भागात फिरला. बारीक माहिती गोळा केली. आणि मग सारा बेत पक्का ठरला. तानाजीने शंभर मावळ्यांसह उंच सरळ अवघड कड्यावरून घोरपडीच्या मदतीने वर जायचे ठरवले. तानाजीचा भाऊ सूर्याजी पाचशे मावळ्यांसह कल्ल्यान दरवाजाशी यायचे. शेलारमामांनी आपली जागा सांभाळायची तानाजी वर पोहोचताच दोघातिघानी गडावर प्रवेश करून दरवाजा उघडायचा. सूर्याजीने एकदम सर्व सैन्यासह गडात घुसायचे आणि रात्रीच गडकाबीज करायचा. हा सारा बेत पक्का झाला ४ फेब्रुवारी १६७० रात्रीच्या भयाण आंध्रारात तानाजी डोणागिरीच्या कड्यापाशी आला. त्या सरळसोट सुळक्यावर तानाजी आपल्या तीनशे मावळ्यांसह चढून गेला. त्याचप्रमाणे काळोख्या रात्री त्या उंच खड्या कड्यावरून तानाजीने घोरपडीच्या साहाय्याने गडावर आपले मावळे चढवले. त्यातील दोघातिघांनी रात्री डुलक्या घेणाऱ्या पहारेकर्यांची नजर चुकवून कल्ल्यान दरवाजा उघडण्याची कामगिरी फत्ते केली. त्याबरोबर शेलारमामा,सूर्याची आणि जवळ जवळ पाचशे मावळे किल्ल्यात घुसले. 


प्रत्येकाची समशेर आडव्या येणाऱ्याची गर्दन उडवू लागली. तानाजी सिहासारखा लढत होता. उदेभानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरु झली. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी एकमेकांच्या वारांनी दोघेही जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. तानाजी पडला हे पाहून मावळे पळू लागले. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. आणि पाळणाऱ्या मावळ्यांना तो म्हणाला,अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागुबाईसारखे का पळता मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उद्या टाकून मारा नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजीसारखा शूर धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. राजे धावत सहगडावर आले त्यांना कळले कि त्यांचा लाडका तान्या त्यांना सोडून गेला. राजांनी हंबरडा फोडला महाराज खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिह गेला.















by - Internet







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल