रविवार, २ फेब्रुवारी, २०२०



रामशेज किल्ल्याचा इतिहास 

रामशेज किल्ला हा समुद्रसपाटीपासून ३२७० मीटर उंचीवर आहे. परंतु पायथ्यापासून किल्ल्याची उंची जास्तनाही. गावातून गडावर पोहोचण्यासाठी पंचेचाळीस ते साठ मिनिटे लागतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्यामुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ल्यावर जाणारी वाट किल्ला डावीकडे ठेवत जाते. या वाटेने पुढे गेल्यावरपायऱ्या लागतात. गडावर शिरताना गुहा दिसते. त्या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शीलालेखकोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला गार पाण्याचे एक टाके आहे. गुहेसमोरच्या तुटलेल्या पायऱ्या थेटगडावर जातात. त्यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोहोचतो. हा भागबराचसा अरुंद आहे. गडमाथ्यावर बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोरदेहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसऱ्या टोकाकडे जाते. वडावीककडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात,मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यासकाही पायऱ्या दिसतात. एका कड्यांवर या पायऱ्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्यदरवाजा दिसतो. 




दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला धवजस्तंभ दिसतो. याठिकाणाहून सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर असलेला चामर लोणीचा डोंगर दृष्टीस दिसतो. त्याही पलीकडेदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल,तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्राम्हागिरीचेपर्वत न्याहाळता येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल याअपेक्षेने ओरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले. त्यानेरामशेज किल्ल्यावर चांदसितारा फडकवावा आणि त्यानंतर त्रंबक,अहिवंत,मार्कडा साल्हेर असे किल्ले जिंकूनघ्यावेत असा ओरांगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच छत्रपती संभाजीराजांनी रामशेज किल्ल्याच्या सौरक्षणासाठी साल्हेर किल्ल्याचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रात रामशेजच्या किल्लेदाराचे नाव स्पष्ट सापडत नाही. ओरांगजेबाच्या आज्ञेनुसारशहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला. आणि त्याच्यासोबत दहा हजाराची फौज होती. आणि अफाटदारुगोळा शस्त्रास्त्रे व तोफा होत्या . आणि त्या वेळी रामशेज किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते. 


ते मूळचे मावळातील धाडसी हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. शहाबुद्दीन खानाने चार-पाच तासात किल्ला ताब्यातघेऊ या विचाराने किल्ल्यावर नाना तर्हेने हल्ला केला. किल्ल्याभोवतीचा वेढा कडक होता. सुरुंग लावले,मोर्चेबांधले,तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. पण किल्ला त्याच्या ताब्यात येईना. रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या. पण संभाजी राजांनी प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळाउपलब्ध करून ठेवला होता. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी तोफा बनवल्या. मराठ्यांनी किल्ल्यावरूनतोफांचा मारा सुरु केला. त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला. पाच महिने झाले त्याला ,किल्ला काहीजिंकता येईना. मोगलांचे तोफगोळे किल्ल्यांवर पोहोचत नव्हते. तेव्हा मोगलांनी जंगलातील झाडे तोडूनकिल्याच्या उंचीचा बुरुज बनवला. आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला. त्यावरून तेकिल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. घनघोर युद्ध चालू होते. दोन वर्षेझाली,मात्र रामशेज किल्ला अजिंक्य राहिला. त्यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलावून ती मोहीमफत्तेखानकडे सोपवली. फत्तेखानने रामशेज किल्ल्यावर आक्रमण चढवले. तरीही मराठ्यांनी माघार घेतलीनाही. 


मोगल किल्ल्याजवळ आले. कि किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोफणीतून दगड सुटायचे. दगड इतके जोरातसुटायचे,कि काही मोगल जागेवरच ठार व्हायचे. फत्तेखानचा मावळे तसूभरही पुढे सरकू देत नव्हते. आणिइतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईना. फत्तेखानचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोचायचा आणित्यामुळे किल्ल्याची तटबंदी किव्वा बुरुज ढासळायचा. ते पाहून तो खुश व्हायचा. पण सकाळ झाली कि तोबुरुज परत बांधून झालेला असायचा. ते पाहून फत्तेखान आश्चर्यचकित व्हायचा. अनेक महिने सरले,हजारोमोगल मारले गेले,दारुगोळा वाया गेला. फत्तेखानने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर तोफांचा मारा चालू केला.त्याने मुख्य दरवाजाशी मावळे गुंतून ठेवले. मग फत्तेखानने निवडक सैन्य घेऊन किल्ल्याच्या मागून लढाईसुरु केली. वाट अवघड होती तरी त्याचे सैनिक वर चढत होते. आपले मावळे हि अशा परिस्तिथीत गाफीलराहिले नव्हते. किल्लेदाराने दोनशे मावळे आपल्या सोबत घेऊन चहुबाजूनी पहारा चालू केला. त्यांनाफत्तेखानचा अंधारात चाललेला डाव समजला,मावळे बुरुजावर दबा धरून बसले. जसे मोगल सैनिक वरपोहोचले तसे मावळ्यांनी गोफणी फिरवल्या. किल्ल्यावरच्या मोठमोठ्या शीळा ढकलून दिल्या. अचानकझालेल्या हल्ल्यामुळे मोगल जीव मुठीत धरून उड्या मारू लागले. 


शत्रू पळून जाताना बघून मावळे आनंदित झाले. हे पाहून औरंगजेबाने फत्तेखानला परत बोलावले आणिकासमखानला स्वारीवर पाठवले. कासमखानने कडेकोट पहारा ठेवला. त्याने किल्ल्त्यावर दारुगोळा आणिअन्नधान्य पोहोचण्यासाठी वाट ठेवली नाही. किल्ल्यापासून काही कोसावर रुपजी भोसले,मानाजी मोरे रसदघेऊन तयार होते. पण त्यांना रसद पोहोचवता येत नव्हती. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवसआले,अन्नावाचून हाल होऊ लागले. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला आला,जोराचा पाऊस पडला,तो सलगदोन दिवस पडत होता. किल्ल्याच्या बाजूला मेलेल्या जनावरांची दुर्गंधी सुटली. मोगल सैनिकांना पहारा देणेअशक्य झाले. मग कासमखानने पहारा सैल केला. तो दिवस सरला रात्र झाली. रात्रही सरली पहारे पूर्ववतझाले. कासमखानच्या लक्षात आले,कि मावळे ताजेतवाने दिसत आहेत. कासमखानला त्याची चूक लक्षातआली, त्या दोन दिवसाच्या सैल पहाऱ्यात मावळे गडावर पोहोचले होते. रुपाजी आणि मानाजी यांनीअन्नधान्य,आणि दारुगोळा गडावर पोहोचवला होता. कासमखानला कळून चुकले,कि रामशेज किल्ला काबीजकरणे हे स्वप्नच राहणार आहे. कासमखानाही किल्ला जिंकू शकला नाही. केला साडेपाच वर्षे झुंजत होता


















by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल