रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त...


शत्रूंचा बंदोबस्त


स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त


शिवरायांच्या अवती भोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले. महाराज सांगलीतील महत्वाची कामगिरीबजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे,असे ते मावळे मानत होते. आपली माणसे साधी भोळी मराठमोळी माणसे ती होती. त्यांना शिवाजी महाराज म्हणजे त्यांचा जीव कि प्राण वाटत असे,पण काहि लोकांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. अशा लोकांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भागपडले. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना शिवरायांच्याविरुद्ध चिथवले. कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला;पण महाराजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. महाराजांनी त्यांना पिटाळून लावले. तसेच फलटणचे बाजाजी नाईक निंबाळकर,हे शिवरायांचे मेहुणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊन लढाया कराव्या लागल्या;तथापि या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्याबरोबर राहिल्या. शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते. हा त्यांचा सुपे परागण्या होता. आणि त्यानेहीमहाराजांविरुद्ध कारवाया सुरु केल्या. 




शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले. आणि त्याला कर्नाटक प्रांतात पाठवले. कर्तव्यापुढे महाराजनातेगोते मानत नव्हते. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली. आणि त्यांचे नाव सगळीकडेदुमदुमले. शिवराय लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरेहे जावळीचे जहागीरदार होते. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्याआदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना 'चंद्रराव' हा किताब दिला होता. जावळीचे जंगल खूपघनदाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शरकाव नव्हता. त्या घनदाट जंगलामध्ये वाघ,लांडगे,अस्वल,इ. प्राण्यांचा संचार होता. मोऱ्यांची जावळी जणू वाघाची जावळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कुणीही जातनसे,पण ती हिम्मत केली शिवरायांनी. त्याला कारण असे होते कि दौलतराव मोरे १६४५ साली मरण पावला. आणि नंतर त्याच्या वारसांमध्ये भांडण तंटे सुरु झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. महाराजांच्या हदतीनेच यशवंतराव मोरे जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. 


आणि त्या वेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबुल केले. त्यांच्या सर्व कार्यात त्यांना मदतकरण्याचे हि कबुल केले,पण गादीवर बसल्यानंतर तो सर्व काही विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला करार. आणि तो बेपर्वाईने वागू लागला. स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या करणे,प्रजेला त्रास देणे,अशी दांडगाईयशवंतराव करू लागला. शिवरायांनी ओळखले कि वेळीच याला थांबवले नाही तर स्वराज्याला धोका आहे. म्हणून महाराजांनी यशवंतराव मोरे याला एक खरमरीत पत्र पाठवले. 'तुम्ही स्वतःला राजे म्हणविता. राजेआम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे,तर तुम्ही राजे न म्हणावे. यशवंराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तरलिहिले, 'तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणी दिधले. येता जावळी,जाता गोवली... आम्हांस श्रींचेकृपेने आदिलशहाने राजे हा किताब,छत्रचामर,सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. येथे उपाय कराल तर अपायहोईल. शिवरायांनी त्यांना उलट उत्तर दिले,'जावळी खाली करून,राजे न म्हणोन, छत्रचामर दूर करून,हातरुमाले बांधून,भेटीस येऊन,हुजुराची चाकरी करणे. ईतकीयावर बंडखोरी केलिया, मारले जाल. 


जावळी भोवती घनदाट जंगल होते. आणि मोरे मंडळीही पुष्कळ होती. रायरीचा किल्ला अजिंक्य होता. जावळी जिंकणे एवढे सोपे नव्हते. म्हणून भरपूर तयारी करून शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली. एक महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली,पण त्याचे खूप सैन्य मारले गेले. आणि शेवटी यशवंतराव आपल्यामुलांना घेऊन रायरीवर पळाला. महाराजांनी जावळी घेतली. आणि नंतर राजे रायरीवर चालून गेले. महाराजांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. यशवंराव तीन महिने लढला,पण शेवटी त्याला माघारघ्यावी लागली. जाणवळीचा विजय फार महत्वाचा होता. आणि त्या विजयामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्यपूर्वीपेक्षा दुप्पट झाले. आणि शेवटी यशवंरावांचे सैन्यही शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. रायरीचा प्रचंडकिल्ला स्वराज्यात आला. हा किल्ला पाहून महाराजांना धंन्य वाटले. त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे प्रतापगड हे नावठेवले. 















by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल