रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्रातील शिवकालीन दुर्ग

महाराष्ट्रातील शिवकालीन दुर्ग




महाराष्ट्रातील  दुर्ग 















शिवाजी महाराज किल्ल्यावर खूप खर्च करतात असे काही अनाहुत हितचिंतकांना वाटलेत्यांनी राजांजवळचिंता व्यक्त केलीतेव्हा महाराज म्हणाले, ''जैसा कुळंबी शेतात माळा घालून शेत राखतो तसे किल्ले राज्यासरक्षक आहेततारवांस नाव खिळे मारून बळकट करतात तशी बळकटी किल्ल्यांची आहेकिल्ल्यांच्या मार्गानेऔरंगशहा सारख्यांची उमर गुजरून जाईल.''पुढे अगदी तंतोतंत तसेच झालेऔरंगजेब मेला परंतु महाराजांचेकिल्ले आजही आपण पहातो दुर्ग म्हणजे स्वराज्याची शल्पे आहेतराजे दुर्गावर खर्च करत नव्हते,त्यांनी तीस्वराज्यासाठी,स्वराज्याच्या भावी पिढ्यांसाठी केलेली गुंतवणूक होतीराजे दुर्गामातेचे पुत्र होतेते दुर्गांचीपूजा करीत असतआणि दुर्गांवरती राहत असतमहाराष्ट्राच्या दुर्गानी राष्ट्राचे सौरक्षण  निर्मितीमध्ये फारमोलाची भूमिका बजावलीते भाग्य राजस्थानातील सुंदर महालांच्या नशीबी आले नाहीमहाराष्ट्राचे दुर्गम्हणजे भारतमातेच्या मुकुटातील गौरवमानीहिंदुस्थानचे पुनरुज्जीवन महाराष्ट्राच्या या ओबड धोबडदुर्गानीच केले आहेत्यांची तुलना राजपुतांच्या महालांशी होऊ शकत नाही.


 रत्नाजडित  म्यानामध्ये पडून राहिलेल्या सोनेरी तालवारीसारखेच राजपुतांचे महाल आहेतत्यांनीस्वातंत्र्याची हवा कधी अनुभवलीच नाहीराजपुतांचे महाल म्हणजे मूर्तिमंत शापित सौंदर्य आहेलढाईत शौर्यगाजवून आलेल्या सैनिकांचे सौंदर्य कशात आहे,आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्याने शरीरावरअनेक घाव झेललेले असतातत्या सर्वांच्या खुणा तो चेहेऱ्यावर,अंगावर मोठ्या गौरवाने मिरवत असतो.  त्यारक्ताळलेल्या खुणा म्हणजे स्वातंत्र्य देवतेने त्यांना केलेले कुंकुम-तीलक होयत्या जखमा म्हणजे स्वातंत्र्यदेवतेचे सौभाग्य होयसौभाग्याची तुलना हि हिरे,माणिक,मोती  पाचू इत्यादीने केली जात नाहीस्वातंत्र्यदेवाता बाह्य सौंदर्यावर फिदा होतनाहीपुरुषार्थाला ती जीवेभावे ओवाळतेमहाराष्ट्राचे लढवय्ये दुर्ग असूनहीत्या शौर्याच्या खुणा,स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अंगावर बाळगून आहेतह्या दुर्गांकडे पाहिले कि मन भरूनयेतेस्वातंत्र्य-देवतेने दिवस रात्र एकत्र करून घडवलेली ती शल्पे आहेतआपल्या रक्त  अश्रूंचा अभिषेकतिने त्या शिल्पांवर केला आहेस्वराज्याची सुगंधी फुले त्यावर उधळलेली आहेतआणि त्या अप्रतिमशिल्पाला तिने मनोभावे वंदन केले आहेमहाराष्ट्राचे दुर्ग म्हणजे काळे पाषाण आणि दगडगोटे नाहीत

हे दुर्ग म्हणजे स्वराज्याच्या शिल्पकाराने शिवरायांनी घडवलेली स्वराज्याची महान शील्पे आहेतजेव्हा कधीआपण ह्या दुर्गावर जातो तेव्हा शिवरायांचा भीम पराक्रम साक्षात डोळ्यापुढे दिसू लागतोघोड्याच्या टापांचाआवाज कानामध्ये घुमू लागतो,श्वासामध्ये स्वराज्याचा प्रेमळ सुगंध दरवळत रहातोडोळ्यांमध्येकृतज्ञतेच्या गंगा-यमुना वाहू लागतात,अंतःकरण पवित्र होते,मनाची जळमटी निघून जातात आणि एकानव्या उमेदीने स्फूर्तीने जीवनाचे युद्ध खेळायला मर्द मराठा गडी सुसज्ज होतोभक्त प्रल्हादाला भगवान विष्णूदगडी स्तंभामध्ये दिसले होते असे म्हणतातआपल्यालाही या पोलादी दुर्गांमधे स्वराज्याच्या नरर्सिह राजाचेदर्शन होईलआज भले या नरसिहाचे सोन्याचे सिंहासन कुठे अस्तित्वात नसेल परंतु हा नरश्रेष्ठ आमच्याहृदयस्थ सिंहासनावर कधीच विराजमान झालेला आहे,आणि तो आम्हाला सदैव प्रेरणा देत आहेअशा यापवित्र शिवतीर्थाची चिमूटभर धूळ आपल्या कपाळी धारण करू याखरोखरच आपल्या जीवनाचे सार्थकझाल्याशिवाय राहणार नाहीकुणी सांगावे,या धुळीमधूनच पुढे भविष्यात,अनुकूल वेळी एखादा वीर शिवाजीपुन्हा जन्माला येईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल