सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

गुणकारी नारळपाणी

2014_9image_11_38_325056000coconut-water-splash-e14102-ll

श्रीफळाचा उपयोग हा फक्त पुजेपुरता मर्यादित नसून, आरोग्यासाठीदेखील नारळ बहुपयोगी आहे. नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी असून, नारळाचे औषधी गुणही समोर येत आहेत.
याचे सेवन केल्याने शरीर सदृढ राहण्यास मदत होते. यात ए, बी आणि सी व्हिटॅमीनचा समावेश असतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने नारळपाणी ती कमी भरून काढते. पोटाच्या सर्व आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी नारळपाणी उपयोगी ठरते.
नारळपाण्यामुळे चेहऱयाची त्वचा चमकदार राहते. तसेच त्वचेच्या रोगासाठीदेखील उपयुक्त असते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी नारळ पाणी आरोग्यदायी असते. याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नारळ पाण्याचे सेवन केल्याने किडनी स्टोनपासून मुक्तता मिळू शकते. नारळ पाणी रोज प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. नारळ पाणी चेहऱयावर लावल्याने सुरकुत्यांपासून सुटका मिळू शकते. नारळ पाण्यातील अँटी ऑक्सीडेंट कॅन्सर सारख्या रोगाशी लढण्याची प्रतिकार शक्ती वाढवते.












सौजन्य : दै- तरुण भारत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल