रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे

आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
१. वजन कमी करण्यासाठी लाभदायक
- नारळ पाण्यात कमी प्रमाणात फॅट असतात. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्यात तुमच्यासाठी चांगला आहे. यातील पोषक घटकामुळे तुमच्या भूकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे तुमचे जेवण नियंत्रित राहते.
२. त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर
- तुमची त्वजा उजळण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. कोणत्याही औषधापेक्षा ते कमी नाही. चेहऱ्यावरील डाग घालविण्यासाठी हे पाणी काम करते. नारळपाणी त्वचेला हायड्रेटेड आणि  मॉश्चराईज्ड करते.

३. हॅंगओव्हर कमी करण्यास मदत
- तुम्ही ज्यावेळी हॅंगओव्हर होतात. त्यावेळी नारळ पाणी पिणे योग्य. कारण हॅंगओव्हरपासून नारळ पाणी वाचविते. तसेच शरीरात नविन ऊर्जा निर्माण करण्यास मदत होते. जर तुमचे डोके दुखत असेल तर नारळ पाणी प्या.
४. पचन क्रियेसाठी लाभदायक
- तुमची पचनाबाबत तक्रार असेल तर नारळ पाणी पिण्यानंतर दूर होते. नारळ पाण्यापासून शरीराला पोषक घटक मिळतात. तसेच काही अनावश्यक घटक रोखण्यास  पाणी मदत करते.
५. पोषक घटक भरपूर
- बाजार मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री (बॉटल) होते. या पाण्यापेक्षा १०० टक्के नारळ पाणी केव्हाही चांगले. नारळ पाण्यात शरीराला आवश्यक असणारी पोषक घटक भरपूर असतात. यात कॅल्शिअम, मॅग्नशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, सोडिअम यांची मात्रा सर्वाधिक आहेत.


100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी

 

कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.
आपले शरीर अधिक चांगले ठेवण्यासाठी नारळ पाणी महत्वाचे काम बजावते. गरोदर महिला जर नियमित नारळ पाणी प्राशन करत असतील तर त्यांच्यासाठी ते चांगले शिवाय गर्भअवस्थेतील शिशु सुंदर, त्याचे चांगले आरोग्य राहण्याबरोबच शिशु गोरा होतो. त्यामुळे नारळ पाणी पिणे बाळाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. नारळाला एक धार्मिक महत्व आहे. तसेच आैषधी गुणधर्म नारळात आहेत. त्यामुळे त्याला जास्त महत्व आहे. नारळात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नीशिअम, व्हिटॅमिन आणि खनिज युक्त अधिक मात्रा असते. नारळ पाणी अनेक आजार पळवून लावते. फॅक्ट आणि कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही जाड होत नाहीत. जाडी रोखण्यास ते मदत करते.
गर्मीमध्ये नारळ पाणी प्राशन केल्याने आनंद आणि उत्साहाचे वातावरण शरीरात राहते. केवळ उत्साह नाही तर आरोग्यवर्धक पाणी असल्याने त्याचे चांगले लाभ होतात. नारळ पाण्यात व्हिटॅमिन, मिनरल, इलेक्ट्रोलाईट्स, एमिनो अॅसिड, सायकोकाईन अधिक प्रमाणात असते. नारळ पाणी महिलांच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. जुलाब आणि आग होत असेल किंवा त्वचा कोरडी होत असेल तर नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.
उष्णता कमी करण्यास नारळ पाणी मदत करते. वीर्यवर्धक आहे. लघवी साफ होण्यासाठी नारळ पाणी उत्तम आहे. नारळ पाण्यात आरोग्य पुरक घटक असल्याने ते चांगले आहे. यामुळे नारळ पाणी जगात महत्वाचे आरोग्यवर्धक औषध ठरत आहे.
तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामानंतर नारळ पाणी पिणे चांगले. शरीरातील मेटाबोलिस्म रेट वाढविण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत करते. तसेच शरीरातील अन्य रोगांचा मुकाबला करण्यासाठी नारळ पाणी मदत करते. त्यामुळे अनेक आजारांवर गुणकारी ठरणारे नारळ पाणी पिणे आवश्यक आहे.







सौजन्य :- झी २४ तास 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल