शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

हा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…

भारताला स्वातंत्र्य सहजासहजी नाही मिळाले. यासाठी हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला, शेकडो शहिदांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. परंतु यानंतर भारताला फाळणीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. आज खासरेवर आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी नसती तर भारत आज 2 ऐवजी चक्क 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता.
स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या नजरा जोधपूर रियासातवर होत्या. त्यावेळी तिथले राजा हनुमंत सिंह पाकिस्तान मध्ये समाविष्ट होऊ इच्छित होते. परंतु त्यावेळी तिथे असे काही घडले ज्यामुळे जोधपूर रियासात पाकीस्तान मध्ये समाविष्ट होऊ नाही शकली. स्वातंत्र्य मिळण्याच्या एक हप्ता अगोदरच जोधपूर रियासातचे राजा हनुमंत सिंह यांनी जोधपूर भारतात समाविष्ट होणार नाही अशी घोषणा केली होती. तुमच्या माहीतीसाठी सांगतो की जर जोधपूर पाकिस्तान मध्ये समाविष्ट झाले असते तर भारताचा राजस्थान सोबत संपर्क तुटला असता. एवढेच नाही तर जोधपूर पाकिस्तान मध्ये समाविष्ट झाल्याने हनुमंत सिंह यांच्या नातेवाईकांच्या रियासात असलेले जैसलमेर आणि बिकानेर सुद्धा पाकिस्तान मध्ये समाविष्ट झाले असते. विचार करा जर असे झाले असते तर आज भारताची स्थिती कशी असती.
या गोष्टीची माहिती मिळताच महात्मा गांधी यांना खूप शॉक बसला. त्यांना माहिती होते की असे झाल्यास भारताची हालत काय होईल. त्यामुळे त्यांनी तात्काळ सरदार पटेल याना बोलावले. सरदार पटेल जेव्हा गांधीजींना भेटायला पोहचले तेव्हा त्यांनी सरदार पटेल यांना पहिला प्रश्न तोच विचारला की तुम्ही जोधपूर च्या राजांसोबत बोलणं का नाही करत. महात्मा गांधी यांना परेशान बघून सरदार पटेल यांनी गांधीजींना सांगितले की हनुमंत सिंह यांनी त्यांना भारतात समाविष्ट राहायचे सांगितले आहे. परंतू पाकिस्तान जोधपूरला खूप कमी देत होता. पाकिस्तान ने जोधपूर च्या राजांना कराची पोर्ट जोधपूर मध्ये देण्याचा विश्वास दिलाझ त्यामुळे ते कदाचित भारतात समाविष्ट नाही होणार.
पाकिस्तान मध्ये समाविष्ट होण्याचं बोलणं करण्यासाठी जोधपूरचे राजा त्या वेळचे वायसराय माउंट बेंटन याना भेटायला गेले. माउंट बेंटन यांनी जोधपूरच्या राजांची भेट घेतली आणि समजावले की जोधपूरचे भविष्य पाकिस्तान सोबत नाही तर भारतात खूप चांगले राहील. बोलले जाते की वायसराय यांच्या समजावण्याचा हनुमंत सिंह यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी पाकिस्तान मध्ये जायचा त्यांचा निर्णयच बदलला. वायसराय माउंट बेंटन यांच्यामुळेच आज जोधपूर भारताचा हिस्सा आहे.






by - http://khaasre.com/history-of-jodhpur-riyasat-1947/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल