सोमवार, ३१ जुलै, २०१७

धंदा करतोय ..... ये येड़ा झाला का ?

कॉलेज ला असताना एक वाक्य एकल होत " In business or life if you wans to become successful , then keep a cube of ice on head and a little bit sugar in mouth "
आणि दुसर एक , "जंहा ना पौहुचे बैल गाडी , वँहा पौहुचे मारवाड़ी ".
" अरे आपल् काम नाही हे धंदा वैगरे ,गुजराथी मारवाड़ी च करू शकतात, आपण काय मस्त नोकरी करायची, आपल्याला काही कोण उभ नाही करणार."अशी वाक्य मला रोजच एकावी लागायची अथवा रोजच एकतो आपण,का तर आपल्या बाप जाद्याने कधी व्यवसाय नाही केला म्हणूनच ना.
आजची परिस्थिती अशी आहे की जिथे जिथे अती महत्वाची जागा आहे तेथे आपलेच माणस आहेत कामाला,जस की purchase officer, service head का तर मालकांना माहीत आहे की हे घरुन पैसे टाकतील पण गैर व्यवहार नाही करणार आणि वयाची 58 वर्ष हे नोकरीच करतील, हे काही दूसरा व्यवसाय नाही टाकनार ,जरी सोडून गेलेत तरी इमानदारींने इकडचि माहीती गुप्त ठेवतील.
आपण trading मधे,भांडवालात कमी पडू शकतो ,पण service industry ही आपली जहाँगीर बनु शकते.कारण मराठी माणूस जितका लवकर शिकतो तितका दूसरा क्वचित शिकतो व सहसा अतिशय इमानदारीत आपले काम करतो,चोरी चपाटी करत नाही, वेळेवर सर्विस देतो.
फक्त एकच समस्या आहे ती म्हणजे लवकर आळशी बनतो, अथवा त्याला वाटु लागत की तोच कर्ता धरता कार्य करता आहे, त्याच्या शिवाय ते कामच होउ शकत नाही.मग तिथ परप्रांतीय option म्हणून तयार होतो.दूसर म्हणजे जी जीभ दिलीय ना आपल्याला त्या वर गोड चव जिथ समजते ना तोच भाग नेमका कड़ू करुण ठेवालाय,नाही तेथे आपला बाणा जागृत होतो व गरज असते तेव्हाच शेपुट टाकून बसतो.धंदा टाकला तर त्याला २०० sq ft दुकान साफ सफाई करायला हि एक माणूस लागतो , खूप लवकर तो शेठ बनतो.हाता खाली २-३ मानस लागतात.overhead इतके वाढवून ठेवतो कि वर्ष दोन वर्षात धंदा बंद करून पुन्हा नोकरी करावी लागते.
आपला काय असत ना आधी आपण विचार करतो कधी 1 BHK होईल , नंतर २ BHK कसा होईल , पण मारवाडी/ गुजराथी विचार करतो आधी दुकान कस होईल, नंतर त्यातून धंदा कसा वाढेल.
कोण म्हणत धंद्यासाठी खुप भांडवल लागत , AC च हव ऑफिस, फर्नीचर पण चांगलेच हवे,खुप काही धंदे असे आहेत ज्यात तुम्हाला फ़क्त त्यातल ज्ञान लागत,आणि marketing planning.
मी तर असे ही नग बघितले आहेत की ते लाजता त्याना काय येत ते सांगायला, कधी स्वताहुन सांगणारच नाहीत की त्याना काय येत ,त्यांचा व्यवसाय काय ,त्यांच्या नातेवाइकांना पण माहीत नसत ते काय करतात, तर सर्वात आधी आपल्या मित्रांना ,नातेवाइकाला माहीत हव की आपण काय करतो.आपण फ़क्त एकच व्यवसाय नातेवाइकाना सांगत असतो , तो म्हणजे MLM .व आयुष्य भर शिव्या खातो.
यावर तुम्ही म्हणाल की आपण खेकड़ा वृत्तिचे आहोत, तर आधी स्व:ता मधली ती वृत्ति संपवा मग बघा कसे सर्व मदत करतील.आपण स्व:ताहून मदत करा, माणस जोडा, शेवटी कांदे / बटाटे हो अथवा satellite विका शेवटी माणूसच विकत घेणार आहे ना , मग माणस का तोडता ?
आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो तो काय म्हणेल ,जग काय बोलल की हां हे काम करतो,आपण चहा च्या टपरी वर 7 रु. देतो व ओरडतो ये चायवाला पण तोच चायवाला राजस्थान हून येऊन , जितका आपला महिन्याचा पगार आहे तितका तो एका दिवसाला counter उचलतो.हे झाल एक उदाहरण,कोणताही व्यवसाय छोटा नाही मोठा नाही,सुरवात तर करा.
आज जर आपण काही चालु केल तरच आपली पुढची पिढ़ी काही तरी भव्य दिव्य करू शकते, नाही तर करा १० ते ६ काम , रिटायर्ड व्हा , गावी जा आणि गप्पा मारा ," मराठी माणूस का मागे ? "
सर्वात आधी तर एकच सांगतो की काम काम असत, छोट मोठ काही नसत,कोणत्याही एका क्षेत्रात परिपूर्ण माहिती घ्या ,आणि एकच जास्तीत जास्त किती नुकसान होउ शकत तेच विचारात घ्या, आपल् नेमके उलट असत आपण फायदा किती जास्त होईल तेच स्वप्न बघत असतो, मनाशी पक्का इरादा हवा की होऊंन होऊंन काय होईल ,इतकेच नुकसान होईल त्या पेक्षा जास्त नाही , फ़ायदा तर तुमच्या हातात असतो.
शक्यतो व्यवसाय निवडताना तोच निवडा ज्यात तुम्ही दिवसाचे 8-9 तास काम करताय म्हणजे जी नोकरी करतात त्याच्याशीच संबधित extra काम करू शकतात,सुरवातीला एक visiting card पुरेस आहे तुम्हाला निदान प्रयत्न करायला, उगाच डोक्यात आधी पासून भरून नाही ठेवायच की हे चालु करायला लाखो रु. लागतात.Training हां ही एक चांगला पर्याय आहे , आणि यात आपण खुप चांगले आहोत.शिक्षण घेताना course करा पण , करताना नोकरीचा विचार न करता व्यवसायाच्या दृष्टीने शिका, त्यातले बारकावे शिका.
चालू करण्या आधी त्या व्यवसायाची पूर्ण माहिती घ्या, सरकारी अनुदानाचा फायदा घ्या, भरपूर उपक्रम चालतात , त्याची माहिती घ्या.
पण सर्वात आधी मानसिकता बदला " I CAN DO AND ONE DAY I WILL BE SUCCESSFUL 










by -http://businessofmarathi.blogspot.in/ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल