सोमवार, ३१ जुलै, २०१७

केवळ १२०० रुपयांपासून व्यवसाय सुरु करणारे अरविंद बलोनी आता ४०० कोटी रुपयाच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक आहेत

यशस्वी कथा लोकांना प्रेरणा देतात. या कथेतील मोठ्या घटना लोकांना प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करतात. यशाचा मंत्र सांगतात, मार्ग दाखवतात. या यश कथेमधून लोकांना अनेक गोष्टींचे धडे मिळतात. या कथा हेच सांगतात की मेहनत आणि संघर्ष याशिवाय यश मिळणार नाही. भारतात अशा अनेक प्रेरणादायी अद्भुत आणि अव्दितीय यशोगाथा आहेत ज्या सदैव लोकांना प्रेरणा देत राहतील. अशीच एक अनोखी कहाणी आहे धीरूभाई अंबानी यांची. धीरूभाई अंबानी हे भारतातील असेच एक उदाहरण आहे. धीरूभाई अंबानी असे मोठे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडून भारतात अनेकांनी प्रेरणा घेतली आणि अविश्वसनीय कामे केली आहेत. धीरूभाई यांनी आपल्या जीवनात अनेक अडचणी, समस्या आणि आव्हांनांचा सामना केला आणि आपल्या मेहनत, संघर्ष आणि विजयश्री मिळवण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे जगभरातील लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत झाले आहेत. धीरुभाई यांनी जेव्हा व्यवसायात पाऊल ठेवले होते त्यावेळी त्यांना कुणीच ओळखत नव्हते. शुन्यातून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. पण संघर्षाच्या बळावर त्यांनी व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले. धीरूभाईच्या असाधारण यशामागे भजी विकून उद्यमी होण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तीपासून जगभरातील सर्वोत्कृष्ठ उद्योगपती होण्याची कहाणी आहे. धीरुभाई यांच्या याच कहाणी ने उत्तराखंडातील एका साधारण युवकाला मोठ मोठी स्वप्ने पहायला आणि साकार करायला प्रोत्साहित केले. या सामान्य तरुणाने आपल्या परंपरा तोडून व्यवसायाच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि धीराने काम करत अडचणी दूर केल्या त्यांनतर मोठे यश मिळवले. एकेकाळचा हा साधारण तरूण आता चारशे कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे. त्याचे नाव आहे अरविंद बलोनी. टिडीएस समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या अरविंद बलोनी यांनी मेहनत आणि संघर्षातून यशाची नवीन कहाणी लिहिली आहे. त्यांच्या जीवनात अनेक रोचक पैलू आहेत. अनेक घटना आहेत ज्या संघर्षाची प्रेरणा देतात. त्यांनी अनेक अशी कामे केली आहेत जी त्याच्या कुटूंबातील पूर्वजांनी कधीच केली नव्हती. बहुतांश कुटूंबीयांनी पांडित्य केले तर काहीनी सरकारी नोकरी केली. अरविंद बलोनी कुटूंबातील मार्शल आर्ट शिकणारे पहिलेच व्यक्ति होते. कुटूंबात व्यवसाय करणारेही ते पहिलेच होते. मोठे होण्याचा संकल्प करून ऋषिकेश येथून आपल्या घरून निघालेल्या अरविंद यांनी चंदीगढ येथे केवळ १२०० रुपयात व्यवसाय सुरू केला आणि वाढत जाऊन चारशे कोटींचा केला. त्या मार्गात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे अनेक शत्रू झाले. त्यांच्याशी दोन हात करताना धमक्या दिल्या कारस्थाने केली, चोरीसुध्दा केली. परंतू अरविंद यांनी देखील दांडगाई शिकली होती ज्यातून त्यांना यश मिळण्यात मदत झाली. आपले स्वत:चे साम्राज्य तयार करणारे अरविंद आपल्या स्वत:च्या कथेला प्रभावी मानतात. त्यांना असे वाटते की त्यांच्या या प्रकारच्या कहाणीमुळेच ते काही लोकांसाठी धीरुभाई यांच्यासारखे सिध्द होतील. अशाप्रकारे जबर आत्मविश्वास असलेल्या अरविंद यांची रोचक कहाणी उत्तराखंड पासून सुरू होते. जेथे त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते.
 
अरविंद बलोनी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटूंबात झाला. वडील शिवदत्त बलोनी बांधकाम विभागाच्या भंडार विभागात प्रभारी होते. आई गृहिणी होती. त्याचा परिवार मोठा होता, त्यांचे अनेक नातेवाईक होते. त्यांचा नेहमी घरी राबता असे. नातेवाईकांचे घरी येणे जाणे सुरुच असे.
अरविंद यांच्या परिवाराचे मूळ गाव उत्तराखंडमधील टिहरी-गढवाल जिल्ह्यातील चाचकडा हे होते. वडिलांच्या  नोकरीमुळे कुटूंबाला ऋषीकेश येथे येऊन रहावे लागले तेथेच निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे बालपण गेले. डोंगरातून मार्ग काढत जमीनीवर येणारी गंगा नदी आजूबाजूचे लहान मोठे डोंगर, लहान मोठे आश्रम आणि त्यातील साधू संत यांच्या गर्दीची छाप त्याच्या मन-मष्तिष्कावर चांगलीच पडली होती. निसर्ग आणि अध्यात्माच्या सानिध्यातील ऋषीकेशवर त्याचे बेहद प्रेम होते. त्यांच्यावर आपल्या वडिलांचा मोठा प्रभाव होता. ते सांगतात, “ वडील खूपच धाडसी व्यक्तिमत्व होते. ते चांगले नेते होते. ते नेहमी म्हणत की माणसाला देणा-याच्या स्थितीत असले पाहिजे न की घेणा-याच्या. माणसाच्या हाताची मुठ इतरांच्या हाताच्या वर हवी, खाली नाही”
ऋषिकेशच्या भरत मंदीर इंटर महाविद्यालयातून अरविंद यांचे शिक्षण झाले. ते सामान्य विद्यार्थी होते. इतर मुलांप्रमाणेच त्याचे शिक्षण होते. कुठलीही खास योग्यता नव्हती. पण याच सामान्य विद्यार्थ्याच्या जीवनात अकरावी-बारावीत गेल्यावर मोठे बदल झाले. अकरावीत आल्यावर अरविंद खोडकर झाले. भोळेपणा आणि साधेपणा अचानक नाहीसा झाला. आणि त्याच दिवसांत महाविद्यालयात झालेल्या एका घटनेने अरविंद यांचे विचार आणि दृष्टी सोबत जीवनही बदलून गेले. असे झाले की काही कारणाने महाविद्यालयात भांडणे झाली त्यात एकाने बदमाशाने त्यांना थप्पड लगावली. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले, स्वत:ची लाज वाटू लागली. आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. मारणारा बलदंड होता त्याला अरविंद यांना प्रतिकारच करता आला नाही.त्याच्यात शक्ती नसल्याने गप्प बसावे लागले. पण मनात हीच गोष्ट खलत राहिली. त्यामुळे बदल्याची भावना इतकी तीव्र झाली की झोप उडाली होती. या अपमानाच बदला घेण्याचा त्यांनी निश्चय केला होता.
स्वत:ला मजबूत करण्याचे ठरवून त्यांनी मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. बदल्याच्या भावनेतून त्यांनी ज्युडो कराटे शिकण्यास सुरूवात केली. सहा महिन्यात प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वत:ला मजबूत केले. सहा महिन्यांनंतर जेंव्हा विश्वास आला की ते कुणालाही लोळवू शकतात तेंव्हा त्यांनी त्या बदमाशाला आव्हान दिले. त्याला यथेच्छ मार देऊन त्यांनी अपमानाचा बदला घेतला. त्यांना वाटले की मित्रांमध्ये त्यांची जी बदनामी झाली ती धुतली गेली आहे. अरविंद सांगतात की, “ त्या घटनेने माझे विचार बदलेले. मार्शल आर्टने मला ताकद दिली. मी ती शिकलो नसतो आणि बदला घेतला नसता तर कमजोर राहिलो असतो. मार्शल आर्टने माझा आत्मविश्वास वाढला आणि मला हार न मानण्याची हिंमत दिली.”
त्यानंतर आणखी एका घटनेने अरविंद यांच्या जीवनाला नवी दशा आणि दिशा दिली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असताना त्यांच्या घरात काही कारणाने भांडणे झाली. त्यातून त्यांच्या मनाला जोरदार धक्का बसला. ते इतके भावूक झाले की घर परिवार सोडून कुठेतरी दूर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दु:खी मनाने अरविंद यांनी चंदीगढला जाणारी बस पकडली. अरविंद सांगतात की, “ चंदिगढचा तो प्रवास मी कधीच विसरणार नाही. प्रवासात माझ्या डोळ्यात अश्रू होते. त्याचेवेळी मी निश्चय केला होता की काही करून मी मोठा होईन”.रोचक हे देखील होते की त्याचवेळी त्यांनी हा निर्णय घेतला  होता की ते बसमध्य़े पुन्हा कधीच बसणार नाहीत.आपल्या गावी परत जाताना स्वत:च्या कारमध्येच जातील. दु:खीत मनाने पण चंदीगढला पोहोचलेले अरविंद यांनी नोकरीचा शोध सुरू केला. त्यासाठी ते इतके उतावीळ होते की रेनबैक्सी कंपनीत सहायकाची नोकरी करायलाही तयार झाले. त्यांना जेंव्हा तेथे नोकरी आहे असे समजले तेंव्हा ते रांगेत जाऊन उभे राहिले. तेथे लोक दूरुन मोठ्या अपेक्षेने आले होते. त्या रांगेत मोठ्या प्रमाणात मजूर होते जे निरक्षर होते. खूप वेळाने जेव्हा त्यांचा क्रमांक आला तेंव्हा त्यांना पाहून व्यवस्थापक दंग झाला. त्यांचे वागणे बोलणे रंग रूप पाहून त्याला वाटले की ते झाडू-पोछा साफ सफाईची कामे करू शकत नाहीत. त्याला वाटले की कोण्या विवशतेने ते या नोकरीसाठी आले असावेत. त्यामुळे त्यांनी हेल्पर म्हणून नोकरी देण्यास साफ नकार दिला. अरविंद यांनी पडेल ते काम करण्याची तयारी दाखवली तरी त्याने मान्य केले नाही. रोचक बाब ही होती की याच नोकरीसाठी त्यांनी शिफारश देखील मिळवली होती. जेंव्हा शिफारस करणाऱ्याने व्यवस्थापकाला फोन केला तेंव्हा त्याला ते मान्य करावे लागले. त्याने अरविंद यांना त्यांचे प्रमाणपत्र आणून देण्यास आणि नोकरीवर येण्यास सांगितले. आनंदाने अरविंद प्रमाणपत्र आणण्यास निघून आले. परंतू त्या दरम्यान आणखी एक घटना झाली त्यामुळे व्यवसाय करण्याची अरविंद यांना प्रेरणा मिळाली.
त्या काळात चंदिगढमध्ये अनेक जॉब कन्सल्टन्सी सुरू झाल्या होत्या. वेगवेगळ्या कंपनीत नोक-या देऊन एजन्सीच कमीशन मिळवत असत. एक दिवस अरविंद यांनी पाहिले की काही बेरोजगार अश्याच एका कंपनीच्या दरवाज्यावर हंगामा करत होते. त्यांनी कारण जाणून घेतले. तेंव्हा त्यांना समजले की कंपनीने नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगारांची फसवणूक करत मोठी रक्कम हडपली होती. नोकरी न मिळाल्याने नाराज बेरोजगार पैसे परत करावे यासाठी हंगामा करत होते. त्यांची फसवणूक पाहून अरविंद यांना दया आली. ते स्वत: बेरोजगार होते आणि स्थिती समजत होते. त्याचवेळी त्यांनी बेरोजगारांना नोकरी देवून मदत करण्याचा निर्णय घेतला. आपली स्वत:ची जॉब कन्सल्टन्सी सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय एका प्रकारे मोठा आणि धाडसी होता. त्यांच्या घरात पूर्वजांनी कधी व्यवसाय केला नव्हता. त्याचे वडील नोकरी करत तर आजोबा ज्योतीषी होते. मात्र बेरोजगारांचे कष्ट पाहून त्यांचा निश्चय पक्का झाला होता की त्यांना नोकरी देण्यासाठी ते आपल्या जीवनाचे उद्दीष्ट ठेवतील. अरविंद सांगतात की, “ त्याकाळी सल्लागार कंपन्या नोकरी देण्यापूर्वीच मोठी रक्कम घेत असत. ती खूप जास्त होती. मी पाहिले की अनेक जण कर्ज काढून ही रक्कम देत असत. नोकरी मिळाली नाहीतर बेरोजगार ही रक्कम परत मागत होते. त्यावेळी कंपन्या त्यांना दाद देत नव्हत्या. त्यांच्या त्या विवशता पाहून मला खूप पिडा होत असे. मी ठरवले की मी माझी कंपनी सुरू करून बेरोजगारांना नोक-या देईन, मी ठरवले की मी कमी पैसे घेऊन त्यांना नोक-या देईन.” अरविंद यांचा प्रामाणिक विचार होता. विश्वास मोठा होता, मनात जोश होता. मात्र त्यांना भविष्यात येणा-या आव्हानांची जाणीव  नव्हती. अडचणी आणि आव्हाने त्यांना आलिंगने देत होती.
काम सुरू करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. त्यावेळी त्यांच्या हाती केवळ बाराशे रुपये होते. पण त्यांची इच्छा इतकी तीव्र होती की, त्या पैश्यातच त्यांनी काम सुरू केले. जे काही होते ते त्यांनी कामात लावले. मेहनत सुरू केली आणि काम सुरू केले त्याचवेळी नवी अडचण समोर आली. जेथे अरविंद यांनी कार्यालय सुरू केले होते तेथे इतरही काही कंपन्याची कार्यालये होती. त्या कंपन्याच्या मालकांनी पाहिले की अरविंद यांच्याजवळ अनेक बेरोजगार येत आहेत, आणि त्यांची लोकप्रियता वाढत आहे, त्यावेळी त्यांनी अरविंद यांना बोलायला आणि त्रास द्यायला सुरूवात केली. एका कंपनीच्या मालकाने अरविंद यांचा अपमान करण्यासाठी सांगितले की, “ अरे तू तर गढवाली आहेस तुला कुठल्या तरी हॉटेल मध्ये वेटरचे काम करायला पाहिजे होते किंवा सैन्यात भर्ती व्हायला हवे होते.” त्याकाळात गढवाली लोक अनेक हॉटेलात लहान मोठी कामे करत होते. हाच धागा पकडत अरविंद यांचा अवमान करण्यासाठी त्याने असे कुत्सीत उदगार काढले होते. पण अशा आणखी अनेक वाईट बोलण्याचा आणि गोष्टींचा अरविंद यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. ते निधड्या मनाने आपले काम करत राहिले. जेंव्हा अरविंद यांनी जोरदार प्रगती करण्यास सुरुवात केली तेंव्हा काही कंपन्याच्या मालकांनी त्यांना चंदीगढ सोडून जाण्यासाठी धमक्याही देण्यास सुरूवात केली. त्यांनी त्यांना हे सांगत धमकीदिली की- “ तू बाहेरचा आहेस इथे व्यवसाय करण्याचे थांबले नाहीस तर तुझी वाईट अवस्था करू मग तुझे काहीच राहणार नाही” या धमक्यांचाही अरविंद यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ते कामात प्रामाणिक होते, त्यांचा विचार पक्का होता. मनापासून बेरोजगारांची मदत करत होते. त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नव्हते मार्शल आर्टच्या शिक्षणाचा इथेही फायदा होता. त्यामुळे ते शरीराने आणि मनाने इतके मजबूत झाले होते की, त्यांना कशाची भीती वाटत नव्हती. बदमाशांच्या धमक्या त्यांनी हवेतच उडवुन दिल्या होत्या. त्यांच्या या बेडरपणामुळे प्रतिस्पर्धकांनाही भीती वाटू लागली होती.
अरविंद यांचे शत्रू बनणे स्वाभाविक होते ते पर-राज्यातून आले होते. त्यांची काम करण्याची पध्दत वेगळी होती. बेरोजगारांचा विश्वास त्यांनी मिळवला होता त्यामुळे त्याचे काम वाढत होते आणि इतरांचे कमी होत होते. हीच गोष्ट प्रतिस्पर्धेत असलेल्यांना सलत होती. एक व्यावसायिक तर इतका नाराज झाला की त्याने अरविंद यांच्या एका माणसाला आपला खबरी बनविला होता. इतकेच नाहीतर अरविंद यांना बरबाद करण्यासाठी त्याने त्यांच्या कार्यालयातील प्रमाणपत्र आणि कागदपत्र आपल्या हस्तकांकरवी गहाळ केले होते. अरविंद यांना जेंव्हा हे समजले तेंव्हा त्याचे भान हरपले, प्रमाणपत्रे चोरली जाणे म्हणजे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागण्यासारखे होते. इतकेच नाही तर त्यांच्यावर विश्वास असलेल्या बेरोजगाराचे नुकसान होणार होते. संकटाच्या या क्षणी अरविंद यांनी समजूतीने काम केले. ते सरळ पोलिस ठाण्यात गेले आणि प्रमाणपत्रे मिळाली नाहीतर काहीही करु शकतो असे त्यांनी सांगितले. एका प्रकारे ही धमकीच होती. अरविंद यांना राग येणे स्वाभाविक होते. त्यांनी पोलिस ठाणे अंमलदाराला सांगितले की, ‘प्रमाणपत्रे मिळाली नाहीतर मी स्वत: मरेन नाहीतर कुणाचाही जीव घेईन’ ते पाहून ठाणेदारही घाबरला. त्याने अरविंद यांना विश्वास दिला की प्रमाणपत्रे परत मिळतील. त्यानंतर अरविंद आपल्या कार्यालयात परत आले तेंव्हा त्यांना दिसले की सारी प्रमाणपत्रे जागेवर होती. ती आठवण सांगताना ते म्हणतात की, ‘ मी स्वत:ला सांभाळू शकत नव्हतो, ठाण्यातून येताना माझ्या डोळ्यात पाणी होते. मी पोलीसांला धमकी दिली नसती तर माझे काम बंद झाले असते”
अरविंद यांनी असाच धाडसीपणा केला आणि अनेक वेळा आपली प्रगती साध्य केली. धीरुभाई अंबानी यांची कंपनी रिलायन्स मध्ये अशाच धाडसने त्यांना मोठे व्यावसायिक बनविले. झाले असे होते की रिलायंस कंपनीने पंजाबमध्ये टेलीकॉम क्षेत्रात काम सुरू केले होते. हे अरविंद यांना समजले तेंव्हा त्यांनी विचार केला की, रिलायंसचे काम मिळाले तर त्यांचा फायदा होऊन व्यवसाय वाढणार होता. त्यांना रिलायंस कडून मोठी अपेक्षा होती. त्यांना वाटत होते की कंपनीला योग्य उमेदवार तेच देऊ शकतात आणि हे काम केल्याने ते स्वत:ही मोठे व्यावसायिक बनतील. मोठ्या अपेक्षेने ते रिलायंसच्या कार्यालयात गेले. पण त्यांचा प्रस्ताव नामंजूर झाला. त्यांना धक्का बसला. पण स्वत:ला सावरत त्यांनी त्यामागची कारणे जाणून घेतली. त्यांना समजले की त्यांची कंपनी नवी आणि लहान असल्याने आधी मोठ्या कंपन्यांसोबत काम न केल्याने त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. जसे त्यांना ही कारणे समजली ते तडक स्थानिक प्रभारी यांच्या दालनात घुसले. त्याने त्या अधिका-याला ही जाणिव दिली की रिलायंसचे प्रमुख धीरुभाई अंबानी देखील लहान व्यावसायिक होते. आणि त्यावेळी त्यांना मोठ्या लोकांनी कामे दिली नसती तर रिलायंस कदाचित आज इतकी मोठी झाली नसती. त्यांनी ही हमी दिली की त्यांची कंपनी लहान असली तरी मोठे काम करण्याचा आवाका ठेवते. मोठ्या आवेशाने आपले म्हणणे सांगून अरविंद आपल्या कार्यालयात परत आले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना समजले की त्यांचा व्यावसायिक प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. पुन्हा एकदा धाडसीपणाचा अरविंद यांना फायदा झाला होता. त्यांचा जोशपूर्ण पवित्रा रिलायंसलाही भावला होता. हे काम मिळणे त्यांच्याकरीता मोठे सुयश होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा मोठे यश मिळवले. अरविंद बलोनी म्हणतात की, “ सुरुवातीपासून धीरूभाई अंबानी माझे आदर्श होते. त्याच्या कहाणीतून मला अनेकदा प्रेरणा मिळाली” कदाचित याच प्रेरणेचा परिणाम म्हणून त्यांनी रोजगार संस्थेचा विस्तार करत इतर अनेक क्षेत्रात विस्तार केला. अरविंद यांनी रिटेल व्यवसाय, रिअल इस्टेट, हॉस्पीटॅलिटी (आदर आतिथ्य )आणि शिक्षणासारख्या क्षेत्रातही काम सुरू केले. त्यातून खूप पैसा, प्रसिध्दी मिळवली. अनेक क्षेत्रात त्यांच्या कंपन्या टिडिएस समुहाचा व्यवसाय सुरू आहे.
अरविंद यांनी आपल्या आजी आजोबांच्या नावे कंपनीचे नामकरण केले आहे. त्यांचे आजोबा तारा दत्ता आणि आजी सरस्वती यांच्या नावे टिडीएस समूह तयार केला आणि वाढविला. जेंव्हा आजी आजोबांच्या गोष्टी सुरू होत्या त्यांनी एक किस्सा सांगितला, “ माझे आजोबा मोठे ज्योतिषी होते, माझ्या नामकरणाचे जेवण झाल्यावर त्यांनी म्हटले होते की- मला माझ्या या नातवाचे नामकरण करताना अभिमान वाटतो, हे माझे भाग्य आहे की याचे नामकरण मी करतो आहे हा पुढे जावून केवळ आई बापाचे नाहीतर गावाचे नाव मोठे करेल हा मोठा माणूस बनेल” किस्सा सांगताना अरविंद भावूक झाले होते. आपल्या आजी आजोबांच्या नावेच त्यांनी कंपन्या स्थापन केल्या आणि खूप नाव आणि पैसा मिळवला. केवळ बाराशे रुपयात सुरुवात करून ते आज चारशे कोटीच्या टिडीएस समूहाचे मालक आहेत. टिडीएस समूह मोठ मोठ्या कंपन्यात मनुष्यबळ पुरवठा करते. कंपन्यांना लागणा-या मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. टिडिएस समूह वेगाने किरकोळ व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, आदर आतिथ्य हॉटेल व्यवसायात प्रगती करत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेच्या कामातही समुहाने जबाबदारी निभावली आहे. टिडिएस समुहाचा कारभार देशभर पसरला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात समूहाची कामगिरी सुरू आहे. सुमारे पंचविस हजार कर्मचारी समूहात विविध राज्यात काम करत आहेत. या समुहाची सेवा मिळवणा-या लोकांची संख्या सतत वाढत आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासपूर्ण आवाजात अरविंद सांगतात की, “ टिडीएस समूह लवकरच चारशे कोटी वरून हजार कोटी रुपयांचा समूह होणार आहे.” त्यांच्या या विश्वासाचा आधार त्यांचे कर्मचारी  आहे. ते म्हणाले की, “ माझे कर्मचारी फारच छान आहे. त्यात चांगले प्रामाणिक, मेहनती लोक आहेत. जे स्वप्न मी पाहतो ते सत्यात आणण्यासाठी माझी माणसं शक्ती  लावतात. ” हे स्वाभाविक आहे की जो माणूस रिलायंस, एअरटेल, डिश टिव्ही, गोदरेज, व्हिडिओकोन, विप्रो, टाटा, हिरो समूह, आदित्य बिर्ला समूह, फिलिप्स सारख्या मोठमोठ्या कंपन्याना चांगले सक्षम प्रतिभाशाली, मेहनती कर्मचारी देऊ शकतो तो आपल्या जवळ चांगलीच  माणसे ठेवणार!
अरविंद बलोनी यांच्या जीवनात अनेक असे पैलू आहेत जे रोचक आहेत. अरविंद यांनी तो संकल्प देखील पूर्ण केला जो त्यांनी चंदीगढला बसमध्ये येताना केला होता. चंदीगढला केंद्र बनवून जेंव्हा त्यांनी खूप पैसा मिळवला तेंव्हा ते गावी गेले. त्यावेळी ते स्वत:च्या कारने आपल्या गावी गेले तेही अश्या तश्या कारने नाही तर मर्सिडिज कारने. गावात अशी कार पहिल्यांदा आली होती. आजोबांची भविष्यवाणीसुध्दा खरी झाली होती की त्यांचा नातू घर-परिवारासोबत गावाचे नावही मोठे करून आला होता. हे देखील पहाण्यासारखे आहे की अरविंद यांनी त्या पहिल्या बस प्रवासानंतर पुन्हा कधीच बसने प्रवास केला नव्हता. रोचक गोष्ट ही सुध्दा आहे की अरविंद यांनी घरच्यांपासून ही गोष्ट दोन वर्षे लपवून ठेवली होती की ते व्यवसाय करत आहेत. त्यांना वाटले की घरची माणसे हे ऐकुन घाबरतील की ते व्यवसाय करत आहेत. त्यांच्या घरात कुणीव व्यवसाय केला नाही आणि त्यांचा समज असा होता की त्यात खूपच जोखीम असते. नुकसान झाले तर सारे आयुष्य उध्वस्त होऊन जाते. अरविंद यांना या गोष्टीची देखील भिती होती की घरचे त्याना निरुत्साही करतील आणि व्यवसाय करण्यापासून परावृत्त करतील. व्यवसायात जम बसविल्यानंतरच अरविंद यांनी घरच्यांना त्याबाबत सांगितले की त्यातच ते त्यांचे जीवन व्यतीत करणार आहेत.
अरविंद यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हांनाचा सामना केला. पण त्यांचे वैशिष्ट्य हे आहे की ते इतरांचे प्रश्नही आपलेच समजून सोडवून देतात, अरविंद यांचे परिचित कोलकाता मध्ये टीव्ही सेट तयार करून देत असत. काही राजकीय कारणांनी स्थिती अशी झाली की कारखान्यातील मजूरांनी संप केला. कारखान्याचे काम थांबले. अरविंद यांना जेंव्हा हे समजले तेंव्हा मदत करण्यासाठी ते स्वत:च सरसावले. कारखाना मालकाने जेंव्हा त्यांना पाहिले तेंव्हा त्यांना विश्वास बसला नाही की एक तरूण पुन्हा कारखाना सुरु करू शकेल. मात्र त्यांच्या समोर काहीच पर्याय नव्हता. त्यांनी अरविंद यांना कारखान्यात पुन्हा एकदा टिव्ही संच तयार करण्याचे काम सोपविण्याचे ठरविले. अरविंद यांच्या एकाच आवाहनात अनेक जण त्यांच्यासोबत कोलकाता येथे येण्यास तयार झाले. जितकी गरज होती त्यापेक्षा जास्त कामगार आले. सारे अरविंद यांच्या सोबत येण्यास हटले होते. लोकांना येऊ नका असे सांगण्यात अरविंद यांचा खूप वेळ गेला. आपल्या मजूरांसोबत अरविंद जेंव्हा कोलकाता येथे पोहोचले तेंव्हा दिसले की स्थिती खूपच खराब आहे. कारखान्यात काम सुरू करण्याचा अर्थ होता की जीव धोक्यात घालणे. त्यांच्या सोबत आलेल्या मजूरांनाही हे समजले होते की काम सुरू करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे होते. पण अरविंद यांनी हिंमत केली. त्यांनी सा-या मजूरांना जोश भरण्यासाठी एक भाषण केले. त्याच्या भाषणात इतका जोश होता की सा-या मजूरांच्या मनात तो संचारला आणि पूर्ण शक्तीने ते निर्भयपणाने कामाला लागले. अरविंद यांच्या धाडसा समोर कोलकाता येथील मोठे संघटनाचे नेते देखील हारले. स्थानिक मजूर संघटनाचे नेता इतके चरफडलेकी त्यांनी अरविंद यांना ‘ पंजाब मधून आला दहशतवादी’ असे हिणवण्यास सुरूवात केली. मात्र अरविंद यांनी नेहमीप्रमाणे त्यावर लक्ष दिले नाही आणि आपल्या कामावर ध्यान केंद्रीत केले. अरविंद सांगतात की, “ जेंव्हा कुणी मला सांगते की काम अशक्य आहे, तेंव्हा माझी हिंमत जास्तच वाढते, आणि अशक्य कामाचे आव्हान मला ते करून पूर्ण करे पर्यंत शांत बसू देत नाही.” अरविंद बलोनी मजबूत मनाचे व्यक्ती तर आहेतच पण त्यांच्यात अनेक गुणही आहेत. ते चांगले वक्ता आहेत आणि लोकांना चांगली मोठी कामे करण्यासाठी प्रेरीत करतात. ते असे धाडसी उद्योजक आहेत जे धाडसाने कामाला सोपे करून टाकतात. ते डॉ अब्दुल कलाम यांच्या या गोष्टीने बेहद प्रभावित आहेत की, ‘ स्वप्न ती नसतात जी झोपेत पाहिली जातात, तर स्वप्न ती असतात, जी माणसाला झोपू देत नाहीत’ मोठी स्वप्ने पहायची आणि पूर्ण करण्यासाठी सारी ताकद पणाला लावायची ही आता अरविंद यांची सवय झाली आहे.धीरूभाई अंबानी यांच्यापासून प्रेरणा घेऊन कोट्यावधीचा व्यवसाय उभा करणा-या या सामान्य माणसाने यश मिळवून दाखवले आहे. ते हे सांगतानाही कचरत नाहीत की, ‘धीरुभाई यांची प्रेरणा घेऊन अनेकजण यशस्वी झाले आहेत, जर मी काही लोकांसाठी धीरूभाईंसारखा प्रेरक बनलो तर मला खूप आनंद होईल’
आपल्या मोठ्या आणि अनोख्या यशाचे श्रेय आपल्या कुटूंबियाना देण्यासही ते चूकत नाहीत. ते म्हणतात की, माझी पत्नी अंजली माझी प्रेरणा आहे, ती मला प्रगतीसाठी नेहमी प्रोत्साहीत करते. जेंव्हा कधी मला व्यावसायिक चिंता असतात ती मला प्रेरीत करते, ती माझी मोठी शक्ती आहे”. अरविंद आणि अंजली यांना दोन लहान सुंदर मुले आहेत. मोठा मुलगा आर्यन दहा वर्षांचा आणि मुलगी आदिती पाच वर्षांची आहे. आपल्या कुटूंबासोबत वेळ घालविताना अरविंद यांना आनंद मिळतो त्यातून त्यांचा उत्साह अधिकच वाढतो.







By - marathi.yourstory.com

धंदा करतोय ..... ये येड़ा झाला का ?

कॉलेज ला असताना एक वाक्य एकल होत " In business or life if you wans to become successful , then keep a cube of ice on head and a little bit sugar in mouth "
आणि दुसर एक , "जंहा ना पौहुचे बैल गाडी , वँहा पौहुचे मारवाड़ी ".
" अरे आपल् काम नाही हे धंदा वैगरे ,गुजराथी मारवाड़ी च करू शकतात, आपण काय मस्त नोकरी करायची, आपल्याला काही कोण उभ नाही करणार."अशी वाक्य मला रोजच एकावी लागायची अथवा रोजच एकतो आपण,का तर आपल्या बाप जाद्याने कधी व्यवसाय नाही केला म्हणूनच ना.
आजची परिस्थिती अशी आहे की जिथे जिथे अती महत्वाची जागा आहे तेथे आपलेच माणस आहेत कामाला,जस की purchase officer, service head का तर मालकांना माहीत आहे की हे घरुन पैसे टाकतील पण गैर व्यवहार नाही करणार आणि वयाची 58 वर्ष हे नोकरीच करतील, हे काही दूसरा व्यवसाय नाही टाकनार ,जरी सोडून गेलेत तरी इमानदारींने इकडचि माहीती गुप्त ठेवतील.
आपण trading मधे,भांडवालात कमी पडू शकतो ,पण service industry ही आपली जहाँगीर बनु शकते.कारण मराठी माणूस जितका लवकर शिकतो तितका दूसरा क्वचित शिकतो व सहसा अतिशय इमानदारीत आपले काम करतो,चोरी चपाटी करत नाही, वेळेवर सर्विस देतो.
फक्त एकच समस्या आहे ती म्हणजे लवकर आळशी बनतो, अथवा त्याला वाटु लागत की तोच कर्ता धरता कार्य करता आहे, त्याच्या शिवाय ते कामच होउ शकत नाही.मग तिथ परप्रांतीय option म्हणून तयार होतो.दूसर म्हणजे जी जीभ दिलीय ना आपल्याला त्या वर गोड चव जिथ समजते ना तोच भाग नेमका कड़ू करुण ठेवालाय,नाही तेथे आपला बाणा जागृत होतो व गरज असते तेव्हाच शेपुट टाकून बसतो.धंदा टाकला तर त्याला २०० sq ft दुकान साफ सफाई करायला हि एक माणूस लागतो , खूप लवकर तो शेठ बनतो.हाता खाली २-३ मानस लागतात.overhead इतके वाढवून ठेवतो कि वर्ष दोन वर्षात धंदा बंद करून पुन्हा नोकरी करावी लागते.
आपला काय असत ना आधी आपण विचार करतो कधी 1 BHK होईल , नंतर २ BHK कसा होईल , पण मारवाडी/ गुजराथी विचार करतो आधी दुकान कस होईल, नंतर त्यातून धंदा कसा वाढेल.
कोण म्हणत धंद्यासाठी खुप भांडवल लागत , AC च हव ऑफिस, फर्नीचर पण चांगलेच हवे,खुप काही धंदे असे आहेत ज्यात तुम्हाला फ़क्त त्यातल ज्ञान लागत,आणि marketing planning.
मी तर असे ही नग बघितले आहेत की ते लाजता त्याना काय येत ते सांगायला, कधी स्वताहुन सांगणारच नाहीत की त्याना काय येत ,त्यांचा व्यवसाय काय ,त्यांच्या नातेवाइकांना पण माहीत नसत ते काय करतात, तर सर्वात आधी आपल्या मित्रांना ,नातेवाइकाला माहीत हव की आपण काय करतो.आपण फ़क्त एकच व्यवसाय नातेवाइकाना सांगत असतो , तो म्हणजे MLM .व आयुष्य भर शिव्या खातो.
यावर तुम्ही म्हणाल की आपण खेकड़ा वृत्तिचे आहोत, तर आधी स्व:ता मधली ती वृत्ति संपवा मग बघा कसे सर्व मदत करतील.आपण स्व:ताहून मदत करा, माणस जोडा, शेवटी कांदे / बटाटे हो अथवा satellite विका शेवटी माणूसच विकत घेणार आहे ना , मग माणस का तोडता ?
आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो तो काय म्हणेल ,जग काय बोलल की हां हे काम करतो,आपण चहा च्या टपरी वर 7 रु. देतो व ओरडतो ये चायवाला पण तोच चायवाला राजस्थान हून येऊन , जितका आपला महिन्याचा पगार आहे तितका तो एका दिवसाला counter उचलतो.हे झाल एक उदाहरण,कोणताही व्यवसाय छोटा नाही मोठा नाही,सुरवात तर करा.
आज जर आपण काही चालु केल तरच आपली पुढची पिढ़ी काही तरी भव्य दिव्य करू शकते, नाही तर करा १० ते ६ काम , रिटायर्ड व्हा , गावी जा आणि गप्पा मारा ," मराठी माणूस का मागे ? "
सर्वात आधी तर एकच सांगतो की काम काम असत, छोट मोठ काही नसत,कोणत्याही एका क्षेत्रात परिपूर्ण माहिती घ्या ,आणि एकच जास्तीत जास्त किती नुकसान होउ शकत तेच विचारात घ्या, आपल् नेमके उलट असत आपण फायदा किती जास्त होईल तेच स्वप्न बघत असतो, मनाशी पक्का इरादा हवा की होऊंन होऊंन काय होईल ,इतकेच नुकसान होईल त्या पेक्षा जास्त नाही , फ़ायदा तर तुमच्या हातात असतो.
शक्यतो व्यवसाय निवडताना तोच निवडा ज्यात तुम्ही दिवसाचे 8-9 तास काम करताय म्हणजे जी नोकरी करतात त्याच्याशीच संबधित extra काम करू शकतात,सुरवातीला एक visiting card पुरेस आहे तुम्हाला निदान प्रयत्न करायला, उगाच डोक्यात आधी पासून भरून नाही ठेवायच की हे चालु करायला लाखो रु. लागतात.Training हां ही एक चांगला पर्याय आहे , आणि यात आपण खुप चांगले आहोत.शिक्षण घेताना course करा पण , करताना नोकरीचा विचार न करता व्यवसायाच्या दृष्टीने शिका, त्यातले बारकावे शिका.
चालू करण्या आधी त्या व्यवसायाची पूर्ण माहिती घ्या, सरकारी अनुदानाचा फायदा घ्या, भरपूर उपक्रम चालतात , त्याची माहिती घ्या.
पण सर्वात आधी मानसिकता बदला " I CAN DO AND ONE DAY I WILL BE SUCCESSFUL 










by -http://businessofmarathi.blogspot.in/ 

मुंबई आणि मराठी माणुस…



हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत.
कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं वाटलं. सगळ्या पाट्या ’मराठी’  मधे लिहिलेल्या होत्या. माझा ’मराठी प्रेमी”  उर अभिमानाने भरून आला. जय हो!  सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठी मधे- अजून काय पाहीजे? चक्क एका झटक्यात एक धमकी दिली तर सगळ्या पाट्या मराठी मधे केल्या बघा सगळ्या .
पण हा आनंद फारच कमी काळ टिकला.   सगळ्या दुकानांच्या वरची नावं जरी देवनागरी मधे होती, तरी दुकानांचे मालक मात्र सगळे  हिंदी आणि गुजराथी वगैरे   आहेत हे प्रकर्षाने जाणवले . औषधालाही   पण एकही   दुकान मराठी माणसाचे  दिसले नाही जवळपास अर्धा  किमी च्या मुख्य रस्त्यावर .
एक पाटी   लावलेली पाहिली ’कला केंद्र मालाड ’मधे,- लिहिलं होतं, “दो शर्ट पे लेपटोप बेग फ्री”, तसेच दुसऱ्या  एका दुकानावर वाचले की  इथे ’पेंट पीस मिळेल’, तसेच एका बाजूला बोर्ड लागलेला दिसला, की “होल बाजूमे आहे.” -मला वाटतं हॉल बाजुला आहे लिहायचं असावं.
तर या अशा पाट्या वाचणे म्हणजे  निव्वळ मनोरंजन जरी होत असलं तरीही हे सगळं पाहिल्यावर  खूप वाईट झाले.  मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय?? मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय अपेक्षित असतं? हे सगळं पाहिलं की  मला प्रश्न पडतो, खरंच आपण काय मिळवलं हो मराठी पाट्या लावून? कसली मराठी अस्मिता जपली आपण??  जर सगळ्या दुकानांचे मालक मराठेतर असतील तर ह्या देवनागरी मध्ये लावलेल्या पाट्यांना काय अर्थ आहे?? हा  प्रश्न मेंदू कुरतडतोय , आणि मी  उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय कालपासून.
मुंबईतल्या इतर भागात मराठी पाट्या जरी असल्या , तरीही   माटुंगा भागात  मात्र दुकानांची नावं तामीळ मधे लिहिलेली दिसतात. जैन ज्वेलर्सचे पण नांव तामीळ मधे वाचून मला आश्चर्यच वाटले.  एका रांगेतल्या सगळ्याच दुकानांची नावं तामीळ मधे आहेत.  दक्षिण भारतात पाट्या पण त्यांच्या मातृभाषेत आणि दुकानांचे मालक पण स्थानिक दक्षिण भारतीय भाषिकच आहेत पण  आपल्याकडे तसे  का नाही  याचा विचार व्हायला हवा. असो.

मराठी लोकांची मुंबई असं आपण म्हणतो.पण खरंच  तसं आहे का? मुंबई मराठी लोकांची  आहे?

कदाचित वाचून वाईट वाटेल पण मुंबई मराठी माणसांची राहिलेली नाही. पूर्वीचे दिवस आठवतात का? साधारण जेंव्हा शिवसेना तयार झाली ते दिवस? ‘१९५५’ चं साल असेल .. तेंव्हा मराठी माणसांची टक्केवारी मुंबई मधे ६० टक्क्यांच्या वर होती  ( ज्या ६० टक्क्यांच्या जोरावर मुंबई सहीत संयुक्त महाराष्ट्र झाला )ती आज दुर्दैवाने १५ टक्यावर घसरलेली आहे .
ह्या ६० टक्क्यांमधे कोण होतं? माथाडी कामगार, मिल मजूर आणि इतर दुकानदार .. मुंबई पोर्ट ट्रस्ट वर हजारो गोदी कामगार काम करायचे . परदेशातून येणाऱ्या जहाजांची वर्दळ खूप जास्त होती. माथाडी कामगार म्हणजे गरीब कोंकणी मराठी माणूस मर मर काम करून दोन वेळची भाताची सोय करायचा.
रहाण्यासाठी  जागा, अर्थातच जवळपासच्या चाळींमध्ये! एका खोलीत  आपला संसार थाटायचा. लाल बाग, परळ सुतळी बाजार, लोहार चाळ भागातही अशा अनेक   चाळी होत्या.    नंतर कोणाचं डॊकं चाललं ते माहीत नाही, पण मुंबई पोर्ट   पोर्ट उरणला    (जवाहरल पोर्ट) नेणे हे मराठी माणसाच्या  पोटावर पाय देणारे ठरले. सगळा माथाडी कामगार वर्ग  मुंबईतून  उरणला तडीपार  झाला. मराठी माणसाचा टक्का घसरणे सुरु झाले मुंबईतले. “मला तर वाटतं की ही एक सोची समझी साजीश होती मराठी लोकांचे मुंबईतले वर्चस्व कमी  करण्यासाठी ? ”
सगळ्या कापड गिरण्या पण चांगल्या  जोरात सुरु होत्या. मुंबईचे दमट हवामान कापड उद्योगास पोषक म्हणून इथे चांगल्या क्वालीटीचे सुती कापड तयार केले जायचे. कोहिनूर, सेंच्युरी, डॉन वगैरे असंख्य मिल्स इथे सुरु होत्या . काही मिल मालकांनी तर कामगारांसाठी चाळी पण बांधल्या होत्या .  तेंव्हा  हा सगळा  कामगार वर्ग  लाल बाग, परळ , दादर, या भागात चाळींमध्ये रहात होता.. कुठल्याही जागी  पहा, तरी मराठी नावं  दिसायची – राणे, पवार, पाटील , ओक, जोशी ,भालेराव,  चितळे, परब, चव्हाण, केळकर,   प्रत्येक घराच्या पाटीवर.
कापड मील मालकांना पण भरपूर नफा मिळायचा . कित्येक मालक करोड पती झाले केवळ याच धंद्यावर. वर्षातून कमीत कमी एकदा तरी कामगारांना बोनस मिळायचा- आणि जास्तीत जास्त तीन वेळा.  या मिल मधे काम करणारा कामगार वर्ग परळ, लालबाग, प्रभादेवी , वरळी या भागात चाळीं मधे रहायचा. बऱ्याच मील मालकांनी तर मिलच्या आवारात पण चाळी बांधल्या होत्या कामगारांसाठी. नंतर तो ऐतिहासिक संप झाला, आणि     या सगळ्या  फायद्यातील मिल्स  लवकरच  एका पाठोपाठ  सगळ्या   बंद पडल्या- (की जमिनींचे सोन्या सारखे वाढलेले भाव बघून मालकांनी  कामगार नेत्यांच्या संगनमताने बंद पाडल्या  ?हा  प्रश्न अजूनही मला छळतो.)  मिल कामगार,   जे मुंबईला  चाळीत रहात होते, त्यांनी चाळीतली घरं विकून लवकरच सबर्ब मधे घरं घेणं सुरु केले,  तर काही लोकांनी  चाळीतली  घरं विकून गावाकडे परत जाणे पसंत केले.
काही  चाळी तर  रिडेव्हलेपमेंटच्या नावाखाली बिल्डर्स लॉबी ने ताब्यात  घेतल्या, आणि मग त्या चाळीत रहाणारा मराठी माणूस विरार, डोंबीवली , कल्याण , ठाणे या भागात स्थलांतरीत झाला. थोडक्यात सांगायचे तर या सगळ्यांचा परिणाम म्हणजे  मुंबईतला ’मराठी टक्का’ कमी होणे हाच झाला. त्यांची चाळीतली घरं कवडीमोलाने व्यापारी वर्गाने विकत घेतली,  बऱ्याच घरात तर गोडाउन्स उघडले गेले. सुतळी बाजार, नागदेवी क्रॉस लेन, धोबी तलाव, इत्यादी भागातल्या घरांमधे ऑफिसेस, दुकानं उघडली गेली . हार प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसून येतो.
बंद पडलेल्या मिलच्या जागांवर सुरु झालेले शॉपिंग मॉल्स, किंवा बॉलींग ऍलीज वगैरे सुरु झालेल्या आहेत.  काही ठिकाणी हाय एंड हाउसींग प्रोजेक्ट्स सुरु करण्यात आलेले आहेत – ज्या मधे फ्लॅट्सच्या   किमती करोडॊंच्या घरात आहेत.  नुकताच एका जुन्या चाळींच्या जागेवर बांधलेल्या  अशा एका मोठ्या कॉम्प्लेक्स मधे जावे लागले एका माणसाला भेटण्यासाठी . मोठी १९ मजली टॉवर,    तिथे खाली लॉबी मधे  त्या बिल्डींग मधे रहात  असलेल्या लोकांच्या नावाची पाटी वाचली, तेंव्हा लक्षात आलं, की त्यामधे एकही मराठी नाव नाही! कुठे गेला मराठी माणूस  मुंबईतला??  मला तर कोणीच सापडत नाही, तुम्हाला जर कोणी  सापडला तर मला जरूर कळवा.
जर मला अजून पंधरा वीस  वर्षानी  पुण्यावर लेख लिहायची वेळ आली तर तो पण साधारण याच प्रकारचा असेल असे वाटते. पुण्यातली परिस्थिती पण काही फार वेगळी नाही-  तेंव्हा आत्ताच सावध हो  पुणेकरा….





By - Internet Posted on 

एयरटेल चे मालक सुनील भारती मित्तल यांची यशोगाथा – जरूर वाचा

एयरटेल चे मालक सुनील भारती मित्तल यांची यशोगाथा – जरूर वाचा

अप्रतिम लेख आहे नक्की वाचा:-
हल्लीची तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात ” एअरटेल ” नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं.
कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला.
आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले. भारतात तेव्हा काळ्या रंगाचे अतिशय जड आणि अनाकर्षक फोन अस्तित्वात होते. सुनीलला ते इतके आवडले की , त्याने ते आपल्या देशात नेऊन विकायचा निर्णय घेतला. परंतु असे फोन आयात करण्यावर बंदी होती. त्यावर त्याने नामी शक्कल लढवली. त्या फोनचे सुटे भाग त्याने तिकडून मागवले अन इथे त्याची जोडणी करून विक्रीला आणले. त्यांच्या फोनची देशात तडाखेबंद विक्री झाली. सिमेन्सच्या सहकार्याने त्याने पुशबटन टेलिफोनचा कारखाना सुरु केला. आज भारती एन्टरप्राइझेस या नावाने ही कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी गणली जाते.
१९९४ मध्ये देशातील सर्वात पहिली मोबाइल सेवा सुनील मित्तलने एअरटेल नावाने दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये सुरु केली आणि देशात क्रांती घडली. त्यानंतर टाटा, बिर्ला, अंबानी, वोडाफोन असे रथी महारथी मोबाइल क्षेत्रात उतरले. पण सुनील मित्तलची एअरटेल त्या सर्वाना पुरून उरली. आज एअरटेलची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी तर निव्वळ नफा पाच हजार कोटी आहे. त्याशिवाय भारती एंटरप्राइज हा ग्रुप इन्शुरन्स, औषध क्षेत्रातही कार्यरत आहे. २००७ मध्ये सरकारने त्यांना पद्म भूषण किताब देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
मित्रांनो, खोल समुद्रापेक्षा जहाजं बंदरात अधिक सुरक्षित असतात, म्हणून काही ती बंदरात उभी करायला बनवली जात नाहीत. १८ वर्षाच्या सुनील मित्तलला हे कॉलेजमध्ये असतानाच कळल होतं. मराठी तरुणांना हे कधी कळणार ?
कालच देशात ३०० कोटी किंवा त्याहूनही जास्त संपत्ती असलेले ७ ० हजार लोक असल्याचे सरकारने जाहीर केलय. त्यांच्यामुळे आज अर्धा देश आपला उदरनिर्वाह करतोय. त्या श्रीमंतामध्ये मराठी माणूस एक टक्काही नसेल हे सांगायला नकोच.
मग हा मराठी माणूस करतो तरी काय ? बंदरातील सुरक्षित जहाजांप्रमाणे तो सुरक्षित नोकरी करतो. आणि फावल्या वेळात तो तासंतास टीवीवर क्रिकेटचे सामने तरी पाहतो किंवा प्रवासात किंवा नाक्यावर उभा राहून तासंतास राजकारणावर किंवा पुन्हा क्रिकेटवर निरर्थक चर्चा करत बसतो. गेल्या दोन पिढ्या त्याने कधी सुनील गावस्करसाठी तर कधी सचिन तेंडूलकरसाठी आपल्या आयुष्याची मोलाची वेळ खर्ची घातली. त्यामुळे धीरुभाई अंबानींचा आदर्श समोर ठेवायला त्याला वेळच मिळाला नाही. बाप मुलाला वयाच्या ५ व्या वर्षीच क्रिकेटचे सामने बघायला टीवी समोर बसतो. मुलगा मग त्याचाच कित्ता गिरवत बसतो. तुम्हीही तेच करणार आहात. मग त्या ७० हजारचे जरी ७ लाख झाले तरी आपली टक्केवारी एक टक्काही नसेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.
तरीही आपण म्हणायचं,



‘जय हिंद ! जय महाराष्ट् !’



by - Internet

व्यापार शुरू करने की सही उम्र क्या है?...

क्या सफल व्यापारी या उद्यमी इस योग्यता के साथ पैदा होते हैं या उन्हें तैयार किया जा सकता है?
ऐसा व्यक्ति जिसने कभी व्यापार न किया हो, क्या वह सफल कारोबारी बन सकता है?
व्यापार शुरू करने की सही उम्र क्या है? और क्या नौकरी का अनुभव कारोबार में फ़ायदा दे सकता है?
हाल ही में शुरू की गई एक वेंचर कैपिटिलिस्ट कंपनी ने इन सवालों के जवाब दिए हैं. उसने करीब 10.5 लाख लोगों में से 350 को छांटकर उन्हें अपना व्यवसाय शुरू करने का मौका दिया.

पढ़ें इयान रोज की विस्तृत रिपोर्ट

कारोबारी सॉफ्टवेयर बनाने वाली एक कंपनी के लिए काम करने वाली 38 साल की रशेल कुल्लर को मार्च में एक ईमेल मिला.
यह कुछ यूं शुरू हुआ था, "तकनीकी क्षेत्र में से आपको कंपनी शुरू करने की प्रबल संभावनाओं से लैस व्यक्ति के रूप में चुना गया है."
रशेल अचरज में पड़ गईं क्योंकि उन्होंने न तो कभी कोई कारोबार किया था और न ही भविष्य में ऐसी कोई योजना थी.

रचेल खुल्लर, 40 से अधिक उम्र की सफल कारोबारीइमेज कॉपीरइटRACHEL KULLER

यह ईमेल भेजा था ब्लूमबर्ग बीटा कंपनी की टीम ने. 750 लाख डॉलर की पूंजी वाले इस फर्म को हाल ही में मीडिया और सूचना समूह ब्लूमबर्ग ने शुरू किया है.
ब्लूमबर्ग बीटा ने ऐसा ईमेल करीब 350 लोगों को भेजा है.
किस व्यक्ति में कारोबार करने की क्षमता है और कौन इसमें सफल होगा, ऐसे 350 लोगों की सूची तैयार करने के लिए बीटा ने एक अनोखा तरीका अपनाया.
ब्लूमबर्ग बीटा के रॉय बहट बताते हैं कि संभावनाशील कारोबारियों को चुनने के लिए विश्लेषणात्मक आंकड़े जुटाए गए. इसमें उनकी मदद की मैटरमार्क कंपनी ने.

आदर्श कारोबारी कौन है?

मैटरमार्क कंपनी की सह-संस्थापिका डेनियल मोरिल बताती हैं, "हमने सबसे पहले उन लोगों के समूह को खंगाला जिन्होंने खुद अपना कारोबार शुरू किया था."
वे बताती हैं, "उन्होंने क्या काम किया, किस तरह का काम किया, उनकी उम्र क्या थी और सभी दूसरी जानकारियां इकट्ठी कीं."

मार्क जकरबर्गइमेज कॉपीरइटAFP

उन्होंने बीबीसी को बताया, "कारोबार शुरू करने वालों के पैटर्न पर आधारित ये सबसे बड़ा अध्ययन है."
संभावनाशील कारोबारियों को चुनने के लिए तीन मापदंड तय किए गए. पहला, वे किसी फर्म में काम कर चुके हों, दूसरा वे शीर्ष विश्वविद्यालयों में अध्ययन कर चुके हों और तीसरा, उन्हें तकनीक या व्यापार प्रबंधन का अनुभव हो.
इसके अतिरिक्त वैसे लोग जो सैनफ्रांसिस्को या न्यूयॉर्क के खाड़ी क्षेत्र से बाहर के न हों.

सोशल साइट्स

मैटरमार्क ने तकनीकी उद्यम से किसी न किसी रूप में जुड़े 10.5 लाख पेशेवरों के बारे में जानकारी जुटानी शुरू की.
इसके लिए उन्होंने फ़ेसबुक, ट्विटर, लिंक्डइन जैसी सोशल मीडिया साइटों पर उपलब्ध सार्वजनिक जानकारियों को खंगाला.
शुरुआती पड़ताल में करीब ऐसे 350 लोग सामने आए.
जांच में कई दिलचस्प जानकारियां सामने आईं. ये पाया गया कि इनमें से अधिकांश की उम्र 30 से ज्यादा थी और लगभग चार संस्थापकों में से एक की उम्र 40 साल से अधिक थी.

रेयान हूवर , 40 से अधिक उम्र के सफल कारोबारीइमेज कॉपीरइट
Image captionरेयान हूवर सोच रहे थे कि अपने कारोबार को जारी रखें या नहीं?

उन्हें ये भी पता चला कि जिन्होंने लंबे समय तक नौकरी की है उनकी अपना कारोबार शुरू करने की संभावना मजबूत रही.

स्पैम या अवसर?

जब एक बार 350 संभावित उद्यमियों की पहचान कर ली गई तो उन्हें ईमेल भेजा गया. उस ईमेल में ये बताया गया कि ब्लूमबर्ग बीटा क्यों उनसे संपर्क करना और डिनर पर बुलाना चाहता है.
शुरू-शुरू में तो ज्यादातर लोगों ने उस ईमेल को स्पैम समझा. कुछ ही लोगों ने आगे जानने की जहमत उठाई.
रशेल कुल्लर बताती हैं, "मैंने इससे पहले कंपनी शुरू करने के बारे में कभी नहीं सोचा था. ईमेल ने मुझे गंभीरता से सोचने पर विवश किया."
रेयान हूवर ने भी अपने ईमेल को गंभीरता से लिया. 27 साल के रेयान पहले से ही दो फर्मों के लिए काम कर रहे थे.
उनकी कंपनी प्रोडक्ट हंट ने हाल ही में फंडिंग के दो राउंड पूरे किए हैं और फिलहाल उसकी कारोबारी पूंजी 70 लाख डॉलर है.

विजेताओं को भोज


फेसबुकइमेज कॉपीरइट

रेयान और रशेल दोनों मानते हैं कि ब्लूमबर्ग बीटा के मिलन भोज- जिसमें ईमेल पाने वाले सैकड़ों लोग के साथ वेंचर कैपिटिलिस्ट भी शामिल थे और उसके बाद की घटनाएं काफी काम की रहीं.
कहा जाता है कि अगर आप अपनी कंपनी शुरू करने जा रहे हों तो आपको अच्छे लोगों की जरूरत पड़ेगी.
यह प्रोजेक्ट, जिसमें प्रत्येक कुछ महीने बाद भविष्य के उद्यमी मिलते हैं, नेटवर्किंग और अपना प्रोजेक्ट संभालने वाले काबिल लोगों से मिलने का महत्वपूर्ण मौका उपलब्ध कराता है.
बहट कहते हैं, "हमारा लक्ष्य उन्हें कारोबार शुरू करने के लिए प्रोत्साहित करना नहीं था. बल्किन उन्हें जानना था और अगर वह चाहे तो हम उनके लिए काम के लोग हो सकते हैं, मदद कर सकते हैं."
उन्होंने बताया, "हम जानते हैं कि हम घास के ढेर में सूई ढूंढ़ रहे हैं, लेकिन हमारे नज़रिए में फ़र्क यह है कि घास का हर तिनका सोने से बना है."





(बीबीसी हिन्दी के एंड्रॉएड ऐप के लिए यहां क्लिक करें. आप हमें फ़ेसबुक और ट्विटर पर फ़ॉलो भी कर सकते हैं.)

मंगळवार, ११ जुलै, २०१७

जमिनीमध्ये असावेत पुरेसे सेंद्रिय घटक



हिरवळीची पिके पेरताना व नांगरून टाकताना फॉस्फेटयुक्त खते द्यावीत किंवा हिरवळीचे पीक गाडल्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या स्फुरदाची खतमात्रा हिरवळीच्या खतात द्यावी. कडधान्यवर्गीय गवत उदा. टाकळा, तरवड, बरबडा, फुलोऱ्यास सुरवात होत असताना शेतात गाडल्यास त्यापासूनही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. 
डॉ. अशोक कडलग, सौ. स्वाती वनारसे 

शेतजमिनीच्या संवर्धनात सेंद्रिय भागाचे विशिष्ट स्थान आहे. सेंद्रिय पदार्थ हे जमिनीतील महत्त्वाचा घटक आहेत. पिकांची मुळे, पालापाचोळा, भरखते वगैरे सडून त्यापासून सेंद्रिय पदार्थांची वाढ जमिनीत होते. हे सेंद्रिय पदार्थ जमिनीत तयार होत असताना सूक्ष्म कृमी-जंतूंचे कार्य फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे भरखतांचे किंवा सेंद्रिय घटकांचे विघटन होते. 

जमिनीतील सेंद्रिय भागाचे एकूण सेंद्रिय घटक आणि ह्यूमस असे दोन प्रकार आहेत. या घटकापैकी रापलेला भाग (ह्यूमस) हा तंतुमय पदार्थ, प्रथिने व तंतू यांच्या मिश्रणाचा बनलेला असून, त्यास एक प्रकारचा गडद रंग असतो. सेंद्रिय घटकांमुळेच जमिनीच्या प्राकृतिक व रासायनिक गुणधर्मावर परिणाम होतात. 
ह्यूमसचा परिणाम 
1) जमिनीस गडद रंगछटा प्राप्त होते. 
2) जमिनीची जलधारक व संग्राहक शक्ती वाढते. 
3) हलक्या जमिनीत मातीचे कण एकमेकांना जोडण्यास मदत होते, त्यामुळे जमिनीस चांगली घडण प्राप्त होते. 
4) भारी जमिनीत पोकळी वाढविली जाते. या सेंद्रिय भागामुळे जमिनी चांगल्या वाफश्यावर येतात. त्यामुळे निचऱ्यास मदत होते. 
5) मुक्त चुना असलेल्या जमिनीची घडण चांगली राहते व सेंद्रिय भागाचे विघटन जलद होत नाही. 
6) सेंद्रिय घटकांमुळे जमिनीत पोकळी तयार होते व त्यायोगे हवा, पाणी योग्य प्रमाणात राहते. 
7) जमिनीची सर्वसाधारण सुपीकता वाढते. 

जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण 
सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधातील कमी पावसाळी भागात सेंद्रिय भागाचे प्रमाण कमी असते. त्या अनुषंगाने ह्यूमसचेदेखील प्रमाण कमी असते. उष्ण हवामान सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण सुमारे एक टक्क्याच्या आसपास असते; परंतु जास्त पावसाळी भागात हे प्रमाण मात्र एक ते तीन टक्क्यांपर्यंत असते. सेंद्रिय भागाचे जमिनीतील प्रमाण मुख्यतः हवामान व नैसर्गिक वनस्पती यावर अवलंबून असते. उष्ण हवामानाच्या भागात सेंद्रिय घटकांच्या विघटनाची क्रिया प्रगत असते, त्यामुळे सेंद्रिय घटकांची नेहमी घट होत जाते. परंतु आर्द्र व मध्यम- उष्ण भागात मात्र अशी घट होत नाही. उलट काही प्रमाणात वाढच होते. आपली अधिकतर शेती उष्ण कटिबंधात व कमी पावसाळी भागात असल्याने आपल्या जमिनीवर भरखते देण्याची अत्यंत जरुरी आहे. नाही तर जमिनीची उत्पादनक्षमता कमी होईल.

...अशी करा जमिनीतील सेंद्रिय घटकांची वाढ 
उष्ण हवेमुळे व कमी पावसामुळे अधिक तर क्षेत्रातील सेंद्रिय भागाचे भस्मीकरण जलदगतीने होते. सेंद्रिय भागाचे विघटन व भस्मीकरण होणे ही बाब महत्त्वाची आहे. पण उष्ण हवेत ही प्रक्रिया फार जलद होते. त्यामुळे सेंद्रिय घटकांचे तयार होण्याच्या क्रियेत व भस्मीकरणाच्या क्रियेत समतोलपणाच राहत नाही. हा समतोलपणा आणण्यासाठी सेंद्रिय खते किंवा भरखते अधिक प्रमाणात जमिनीस पुरविली पाहिजेत. ही भरखते एकदाच पुष्कळ प्रमाणात दिली तर काम भागेल असे नाही. तर ती नियमितपणे प्रत्येक पिकास देणे योग्य ठरेल. सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढविता येणे तरी फार अवघड आहे. कारण हवामान बदलणे आपल्या हातातील गोष्ट नाही; परंतु त्याचा समतोल राखणे आपल्या हातची गोष्ट आहे. त्यासाठी कंपोस्ट खत, शेणखत, पालापाचोळा वगैरेंचा वापर करावा. तसेच धैंचा, ताग, शेवरी, बरबडा तसेच पार्थेनियम (फुलोऱ्यापूर्वी) वगैरे हिरवळीच्या खतांची पिके घेऊन ती फुलावर येताच जमिनीत गाडावीत. हिरवळीची पिके पेरताना व नांगरून टाकताना फॉस्फेटयुक्त खते द्यावीत किंवा हिरवळीचे पीक गाडल्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या स्फुरदाची खतमात्रा हिरवळीच्या खतात द्यावी. कडधान्यवर्गीय गवते उदा. टाकळा, तरवड, बरबडा, फुलोऱ्यास सुरवात होत असताना अथवा पार्थेनियम फुलोऱ्यापूर्वी शेतात गाडल्यास त्यापासूनही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. 

सेंद्रिय आच्छादन फायदेशीर 
सुबाभूळ अथवा गिरिपुष्प यासारखी झाडेसुद्धा बांधावर लावावीत. या झाडांची एक मीटरवर वारंवार छाटणी करून त्यांच्या कोवळ्या फांद्या शेतात नुसत्या पसरल्या तरीही त्यांचा फायदा होतो. पहिला फायदा जमिनीवर आच्छादन करता येते. त्यामुळे पावसाच्या थेंबाने होणारी मातीची धूप थांबविता येते, तसेच जमिनीत जास्त पाणी मुरविता येते. बाष्पीभवनाद्वारे उडून जाणाऱ्या पाण्याचे संवर्धन करता येते. तसेच या फांद्यांचे कर्ब ः नत्र गुणोत्तर कमी असल्यामुळे त्याचे दीड ते दोन महिन्यांत भस्मीकरण होऊन पुढील पिकास अन्नद्रव्यांचा चांगला पुरवठा होतो. रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. भस्मीकरणाची क्रिया सावकाश करण्यासाठी जमिनीस पालापाचोळ्याचा थोडा जास्त थर राहू द्यावा, यालाच सेंद्रिय आच्छादन असे म्हणतात. 
एकंदरीत जमिनीतील सेंद्रिय घटक हे पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे व त्याची घट वरचेवर भरून काढणे अत्यावश्यक आहे. ज्या शेतीमध्ये जमिनीतील सेंद्रिय भागाचे प्रमाण कमी होत जाते ती शेती किफायतशीर तर नाहीच, परंतु ती अशास्त्रीय शेती होय. 

सेंद्रिय दुय्यम/अपशिष्ट अन्नघटकांचे प्रमाण 
प्रत्येक सेंद्रिय व अपशिष्ट पदार्थांचे रासायनिक विश्लेषण वेगवेगळे असते. त्यामुळे पदार्थांची निवड करताना त्यातील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाला महत्त्व येते. ज्या पदार्थांत जास्त अन्नद्रव्ये असतात तो पदार्थ जमिनीस दिल्यावर व तो कुजल्यानंतर पिकांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाणही जास्त असते. निरनिराळ्या सेंद्रिय पदार्थांतील पिकांचे भागातील व त्यापासून तयार होणाऱ्या संख्येत खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण काय असते याची विस्तृत माहिती तक्ता क्रमांक 1 मध्ये दिली आहे. 

निरनिराळी सेंद्रिय भरखते व जोर खतातील सरासरी अन्नघटकांचे शेकडा प्रमाण 
क्र. +सेंद्रिय खताचे नाव +नत्र +स्फुरद +पालाश 
1. +शेणखत +0.56 +0.35 +0.78 
2. +गावखत +0.77 +0.44 +0.38 
3. +शहरी कंपोस्ट +1.19 +0.49 +0.92 
4. +भुईमूग पेंड +6.96 +1.22 +0.94 
5. +करडई पेंड +5.01 + 1.63 +0.63 
6. एरंडीची पेंड +4.55 +1.72 +0.70 
7. +खोबऱ्याची पेंड +3.00 +2.00 +1.50 
8. +सरकीची पेंड +7.00 +3.00 +2.00 
9. +करंज पेंड +4.00 +1.00 +1.00 
10. +जवस पेंड +5.50 +1.50 +1.20 
11. +नीम पेंड +5.00 +1.00 +1.50 
12. +तीळ पेंड +6.00 +2.00 +1.20 
13. +मोहाची पेंड +2.50 +0.80 +1.80 
14. +रक्ताचे खत +11.14 +0.86 +0.54 
15. +मासळीचे खत +6.00 +5.20 +1.36 
16. +हाडांचे खत +3.88 +21.56 +-- 
17. +जनावरांचे मांसाचे खत +8.50 +7.80 +-- 
18. +चामड्याचे खत +9.30 +7.50 +-- 
19. +मांसाचे खत +5 ते 6 +11 ते 13. +-- 
20. +शिंगांचे खत +10 ते 15 +1.0 +-- 
21 +प्रेसमड +1 ते 1.5 +4.5 +2 ते 7 

भविष्यकाळात शेतीकरिता उपलब्ध होणारे सेंद्रिय स्रोत 
अ.नं. +स्रोत +वर्ष 
+ 2000 +2010 +2025 
अ +उत्पन्न करणारे घटक 
1 +लोकसंख्या (दशलक्ष) +1000 +1110 +1300 
2 +जनावरांची संख्या (दशलक्ष) +498 +537 +596 
ब +अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी उपयोगात येऊ शकणारे स्रोत 
1 +मानवी सुके मलमूत्र (दशलक्ष टन/वर्ष) +13 +15 +17 
2 +जनावरांचे सुके शेणखत (दशलक्ष टन) +113 +119 +128 
3 +पिकांचे अवशेष (दशलक्ष टन/वर्ष) +99 +112 +162 
क +प्रभावीपणे अन्नांश पुरविणारे स्रोत नत्र, स्फुरद व पालाश (N %& P2O5 %& K2O) (दशलक्ष टन/वर्ष) 
1 +मानवी विष्ठा +2 +2.24 +2.60 
2 +जनावरांचे शेण +6.64 +7.00 +7.54 
3 +पिकांचे अवशेष +6.21 +7.10 +20.27 

प्रभावीपणे अन्नांश पुरविणारे टाकाऊ जैविक पदार्थ 
अ.नं. +टाकाऊ जैविक पदार्थ +उपलब्धता (दशलक्ष टन प्रति वर्षे) +एकूण नत्र %% स्फुरद %% पालाश (दशलक्ष टन प्रति वर्षे) 
1. +शेणखत +279.8 +6.88 
2. +पिकांचे अवशेष +273.3 +7.15 
3. +जंगलातील पालापाचोळा +18.7 +0.24 
4. +ग्रामीण कंपोस्ट +285.0 +3.71 
5. +शहरी टाकाऊ पदार्थ +14.0 +0.29 
6. +मळी +3.2 +0.17 

सेंद्रिय घटकांचे फायदे 
सेंद्रिय पदार्थांच्या वापरामुळे जमिनीच्या गुणधर्मात होणारी सुधारणा व त्यामुळे होणारी उत्पादनातील वाढ 
सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्याने जमिनीच्या गुणधर्मात होणारी सुधारणा ही जमिनीचा प्रकार व सेंद्रिय पदार्थांचे स्वरूप यावर अवलंबून असते. पण सेंद्रिय पदार्थ वापरामुळे जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक सुधारणे, पाण्याचा निचरा वाढणे, जलधारणा शक्ती वाढणे, आकार घनता कमी होणे, सच्छिद्रता व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढणे, जमिनीचा सामू संतुलित राहणे, जमिनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढणे असे किती तरी फायदे होतात. 
1) जमिनीतील मातीचे कण एकमेकांना चिकटून राहतात. त्यामुळे जमिनीची संरचना सुधारते, ठिसूळ जमिनीत चिकटपणा निर्माण होतो. जमिनीची जलधारणा आणि अन्नद्रव्य संग्राहकशक्ती वाढते. 
2) भारी जमिनीत हवेची पोकळी वाढते. सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनी चांगल्या वाफश्यावर येतात. त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होण्यास मदत होते. 
3) सेंद्रिय भाग चिकणमातीच्या क्रियाशील कणासारखा असतो. त्यामुळे त्यास आम्ल किंवा अल्क घट्ट चिकटतात. म्हणूनच हा भाग पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगी पडतो. 
4) जमिनीतील जिवाणूंना सेंद्रिय पदार्थांतून अन्नाचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थ हळूहळू कुजतात. त्यामुळे पिकांना हळूहळू अन्न मिळत जाते. 
5) सेंद्रिय पदार्थांमुळे वनस्पतींना पोषणद्रव्ये विद्राव्य स्थितीत उपलब्ध होतात. उदाहरणार्थ, हवेतील नत्र वनस्पती घेऊ शकत नाही. वनस्पतींच्या मुळांवरील गाठींतील जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीमध्ये सोडून देतात आणि मग वनस्पतींची मुळे ते शोषून घेतात व पिकांची वाढ होते. 
6) गंधकाची उपलब्धता पिकास जिवाणूच्या प्रक्रियेमुळे वाढते. 

















संपर्क - डॉ. कडलग : 9422227493
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

by - Agrowon

माझ्याबद्दल