गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

*भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल* ” "WHAT YOU THINK , YOU BECOME”.

सतत बातम्या बघु नका

        काळजी घ्या

*भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही   व्हाल* ”  "WHAT YOU THINK , YOU BECOME”.


*करोनाला आकर्षित करू नका*
मित्रांनो मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंर्तमन.बाह्यमन दहा टक्के पॉवरफुल असते तर अंर्तमन ९० टक्के पॉवरफुल असते.
     *बाह्यमनाने अंर्तमनाला दिलेली सुचना किवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी अंर्तमन प्रयत्नांची  पराकाष्ठा करते*. *व जगातील सर्व प्राण्यांची अंर्तमन हि एकमेकांशी (कनेक्टेड) जोडलेली असतात*. म्हणून "या हृदयीचे त्या हृदयी" असे म्हणतात . थोड अधिक विस्ताराने समजून  घेण्यासाठी बाह्यमनाला आपण तात्पुरते राम म्हणूया व अंर्तमनाला  हनुमान. रामाने हनुमानाला जे सांगितले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हनुमान पूर्णतः ताकद वापरतो.व आपल्या सगळ्यांचे हनुमान म्हणजेच (अंर्तमन) एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणून संपूर्ण विश्वात हनुमान – वानरसेना गुगल नेटवर्क आहे.
     *जो विचार तुम्ही अंर्तमनाला देताल तशी स्थिती, व्यक्ती, ते तुमच्या आयुष्यात आणते. याला  LAW OF ATTRACTION आकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतात*.
    भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल. *भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही   व्हाल* ”  "WHAT YOU THINK , YOU BECOME”.
 म्हणून म्हणतात “ *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ” विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल*.
    आपण जसा विचार करतो त्या प्रकारची तरंग आपण आपल्या आयुष्यात खेचत असतो. सगळ्या प्रकारची तरंग वातावरणात आहेत. तुम्ही ज्या चॅनलचे बटन दाबता तोच ट्यूनअप  होऊन प्रक्षेपित होतो. रेडिओची सुई जेथे मॅच होईल तीच धुन चालू होईल. *म्हणून तुम्ही जो अँटेना  लावताल त्याच प्रकारची तरंग तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करताल*.
    *तुम्ही जसा विचार कराल त्याच प्रकारची तरंग अर्थात स्थिती, व्यक्ती, संधी आकर्षित  कराल. WORD IS WORLD, THOUGHT IS WORLD.शब्द व विचार हे जग आहे*. म्हणून सकारात्मक विचार  करा.एकाच वेळेला अनेक जणांनी प्रार्थना केल्यावर भले ते दूर असोत  “क्वांटम फिजिक्स ” चं सिद्धांतानुसार ती फलदायी होते.
    *म्हणतात ना "किसी चीज को अगर दिलसे चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुड जाती है" I म्हणून निर्भय होऊन करोना व्हायरस पंचतत्वात विलीन होऊन नष्ट झाला आहे. आम्ही सर्व जन सुखी , निरोगी, आनंदी आहोत. सारे प्राणी सुखी  आहेत. सर्वांच कल्याण होत आहे. अशी प्रार्थना वारंवार करा*. डोळे बंद करून सर्व जग सुखी आहे. तुम्ही व तुमचे कुटुंब आनंदी व सुखी आहे असे भावना सहित चलचित्र (Visualisation) पुन्हा पुन्हा बघा. व सर्वांना संकटमुक्त केल्याबद्दल त्या वैश्विक शक्तीचे वारंवार आभार माना. याला *कृतज्ञतेची* साधना म्हणतात. मित्रानो संकटातून बाहेर पडण्याच्या आज हा उत्तम मार्ग आहे.
बाकी *काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही* .













by- unkown..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल