बुधवार, १३ एप्रिल, २०१६

देवस्थानांची संपत्ती !...

दगडूशेट किंवा लालबागचं गणपती मंडळ,
साईसंस्थान किंवा तिरुपती बालाजी संस्थान
यांच्या सारख्या कोट्याधीश, अब्जाधीश देवसंस्थानांना
त्यांच्या उत्पन्न आणि संपत्तीचा बहुसंख्य हिस्सा
हा नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी देणं हे बंधनकारक केलं पाहिजे....
तसंही हे उत्पन्न आणि संपत्ती जमली असते
ती तिथे जाणाऱ्या भाविकांच्या देणग्या-दक्षिणांमधून
आणि त्या देणग्या दक्षिणा भाविकांनी दिल्या असतात
त्या आपल्यावर कोणतीही आपत्ती कोसळू नये
या निस्सीम प्रार्थनेपोटी....
मग दुष्काळ, पूर, रोगराईसारखी आपत्ती कोसळते
तेंव्हा त्याच्या निराकरणासाठी
देवस्थानांकडे जमलेल्या
याच सामाजिक संपत्तीचा वापर करायला हवा ना?
अन ही संस्थानं तो स्वतःहून करत नसतील
तर तसा कायदा तरी करायला हवा...
आणि तसंही...
आपली लेकरं तहानेनं तडफडत असताना
कोणत्या देवाला सोन्या-हिऱ्यांची आभुषणं नेसून
निवांतपणे AC मध्ये बसून दक्षिणा घेत रहायला आवडेल?
नाही ना?
मग देवस्थानांची संपत्ती ही आपत्ती निराकरणासाठी वापरायलाच हवी ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल