रविवार, ३० एप्रिल, २०२३

*🙏यशोमंत्र... शांत रहा, शांतता राखा...*🌹🙏

 *🙏यशोमंत्र... शांत रहा, शांतता राखा...*🌹🙏


*समाजात माणसे असे म्हणतात की, राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात.*

 *हृदयातून पण अर्थ काढले जातात, ते डोक्यातून या प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कित्येकदा किंवा मी तर म्हणेण की, प्रत्येक दिवसातून एकदातरी आपण इतरांच्यावर रागवत असतो. परंतु थोडा वेळ गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीवर उगाचच रागावल्याची खंत आपल्या मनामध्ये जागी होते. नंतर तुम्ही पश्चाताप करून घेता अशी वेळ जर तुमच्या वर येऊ द्यायची नसेल तर शांत रहा आणि शांतता राखा तुमच्या ब-याच समस्या आपोआप सुटल्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल.*

*एकदा कर्ण, कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते. अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला, हे सगळे सोने गावक-यांमध्ये वाटून टाक. अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस. लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावक-याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.*

*दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडी देखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जून अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास, आता यापुढे मी काम करू शकत नाही.*

*मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या. लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावक-यांना बोलवले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही, या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.*

*कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला, अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने शांत पद्धतीने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय. हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे... देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा न ठेवून शांत राहून केलेल्या कर्माने माणूस यशस्वी होतो.*

*डोक शांत असेल तर, निर्णय चुकत नाहीत, भाषा गोड असेल तर, माणसं तुटतं नाहीत....*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*

 *🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹



























by- internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल