रविवार, ३० एप्रिल, २०२३

*🌹वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व मित्रांसाठी समर्पित.....*🌹🙏

 

*🌹वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व मित्रांसाठी  समर्पित.....*🌹🙏

*१) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात.*

*२) सर्वात जीवघेणा क्षण कोणता?*
*खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी.*

*३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो.* 

*४) प्रेम म्हणजे काय?*
*दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे.*

*५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो.*

*६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो.*

*७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते.*

*८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा.*

*९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही.*

*१०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे.*

*११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो.*

*१२) खर्च केल्याचे दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो.*

*१३) सर्वात जवळ असणाऱ्या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही.*

*१४) नातवंडं झाल्यावर म्हाताऱ्याचा विरोध बोथट होतो म्हणतात.*

*१५) माणसाने समोर बघायचे का मागे यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असते.*

*१६) मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं एका वेळेला एकच साधता येते.*
*स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचा मन.*

*१७) लोक खरं  मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात.*

*१८) आपल्याला वाटतं तितकं आपण स्वतंत्र नसतो.* 

*१९) समजूत घालायला कोणी नसले की स्वतःलाच बळ आणावं लागतं.* 

*२०) अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. नाही का?*

*२१) जो गेल्यानंतरच कळतो त्याला "तोल" म्हणतात.*
 *✍🏻 वसंत पुरुषोत्तम काळे.*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*

 *🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल