रविवार, ३० एप्रिल, २०२३

*""😘चूगलीखोर""... चूगलीखोरांना ओळखणे शक्य नसते. आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून असते..*.😎😡🙏

 *""😘चूगलीखोर""... चूगलीखोरांना ओळखणे शक्य नसते. आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून असते..*.😎😡🙏

   
*माणसामधली चूगलखोर ही एक अमानवी जमात आहे. जगातील बहुतेक भांडणे ह्याच जमातीची देण आहे. चूगलखोरांना ओळखणे सोपे नसते. ही जमात वेळोवळी हवे तशी रुपं पालटणारी असते. आपली कारस्थाने अत्यंत गुप्तपणे यशस्वी करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. 'कान भरणे' ही म्हण याच लोकांमधून उदयास आली.*

*चूगलीखोरीचा धंदा नेहमी जोमात असतो. तो एखाद्याच्या घरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवता येतो. हा फार मोठा उद्योग आहे. अनेकांची पोटं यावर भरतात. यासाठी कुठलेही भाग भांडवल लागत नाही, फक्त अंगी नीचपणा हवा असतो. नीचपणातूनच चूगलखोरीचा जन्म होतो, चूगलखोरांनी अनेक चांगली माणसे व चांगल्या बाबी उध्दवस्त करुन दाखवल्या आहेत.*

*चूगलखोरांचा वावर सगळीकडे असतो. कुणाच्या तरी कानाजवळ ते निश्चित सापडतात. इकडचे तिकडे तेल मीठ लावून सांगता येणे हे कौशल्य त्यांच्याकडे असते. आपणास हवे तसे, हवे ते सांगण्याची कला त्यांच्याकडे उपजत असते.*

*या दूर्गुंणाच्या जोरावर अनेकांना देशोधडीला लावण्याचे पातक या लोकांनी केले आहे. ऐकणाऱ्याचे कान कच्चे असतील तर हा धंदा लवकर फोफावतो. ऐकणारा मूर्ख असेल तर धंद्याला बरकत येते. ऐकणारा अंहकारी असेल तर तो अंहकार कसा दुखवायचा याचे बाळकडू या लोकांकडे असते.*
 
*लोकांना नामोहरम करणे ह्यात यांचे सुख दडलेले असते. चूगलखोरी लिंगभेद करत नाही, जातीभेद मुळीच नाही. ही संपूर्ण जमात एकदिलाने चूगलवादी असतात. यांचे साम्राज्य फार मोठे असते. साम्राज्य निर्माण व नष्ट करण्याचे कसब त्यांच्याकडे असते.* 

*चूगलखोरांना ओळखणे शक्य नसते. आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून असते. जगातील सर्व कटकटी लावण्याचे काम हीच टोळी करत असते. यांचे वावरणे सर्वत्र असते. मानाचे स्थान ते मिळवतात. कित्येकांची मैत्री, प्रेम हे लोक तोडून दाखवतात. यांनी अनेक आपल्या देशातील  चांगले चांगले लोकनेते, कार्यकर्ते,  तसेच काही सुसंस्कृत लोकांना देशोधडीला लावले आहेत.*

*चूगलखोर हा न दिसणारा शत्रू आहे. त्याची फक्त लक्षणे आहेत. परिणाम आहे पण तो दिसत नाही. तो महामारी सारखा पसरत आहे. अनेक निरपराध,निरोगी लोकांचे तो बळी घेत आहे. अनेकांना वेगवेगळ्या कामात धोका देत असतात. विश्वास तोडतात. किमान त्यांच्यापासून सावध असले पाहिजे. ही लोकं बहुधा  गोड-गोड बोलनारी व विश्वास घातकी असतात.*

*गुळात विष घालून देणारी असतात. आम्हाला तुमची खूप काळजी आहे असे दाखवतात. आम्हीच तेवढे साजूक बाकी सगळे  बेअक्कल असं त्यांना वाटत. लावालावी करणारे कितीही असो, परंतु ऐकणारे कच्च्या कानाचे असू नयेत.*

*चुगल्या लावणाराचं वाटोळं हे निश्चित असतं पण तोपर्यंत दुसरा पूर्ण तळाला गेलेला असतो. म्हणून नुसतं कानाने ऐकून डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कोणताही गंभीर निर्णय घेऊ नये...*

*उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्या सभ्यतेचा विजय समजा....!*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही वाचवा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद  वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे ...!!!*

 *🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹






































by- WhatsApp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल