सोमवार, १ जानेवारी, २०१८

भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे निर्माण झाले ?

नवी दिल्ली - 1857 ते 1947 पर्यंत अखंड भारत सात देशांत विभागला गेला. वर्ष 1947 मध्‍ये झालेली भारत पाकिस्‍तान फाळणी ही मागील 2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती. दरम्‍यान, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एक दिवस नक्की एकत्र येतील. ही एकजूट युद्धातून नव्हे तर चांगुलपणाच्या भावनेतून घडून येईल, असे भाकीत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी व्‍यक्‍त केले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे एका देशाचे अनेक देश असे झाली याचा इतिहास...


इतिहासात हा उल्‍लेखच नाही
ज्‍या राजांनी, शक्‍तींनी मागील 2500 हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्‍यांनी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्‍याचा उल्‍लेख इतिहासातील कुठल्‍याच ग्रंथात नाही. त्‍यामुळे हे देश म्‍हणून अखंड भारत असावे याला पुष्‍टी मिळते. पाकिस्‍तान आणि बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही.




अशी होती अखंड भारताची सीमा

उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे हिंद महासागर या भारताच्‍या सीमा होत्‍या, असा  उल्‍लेख प्राचीन इतिहासात  आहे. परंतु, पूर्व आणि पश्चिमेच्‍या सीमेची काहीही माहिती नाही.  कैलास मानसरोवरवरून पूर्वेकडे गेले की, आताचा इंडोनेशिया आणि पश्चिमेकडे गेले की इराण हा आर्यान प्रदेश हिमालयाच्‍या  अंतिम टोकाला आहे. अॅटलस यांच्‍या मतानुसार, जेव्‍हा आपण पूर्व व पश्चिमेकडून श्रीलंका किंवा कन्याकुमारीला पाहू तेव्‍हा लक्षात येईल की, हिंद महासागर हा इंडोनेशिया व आर्यान (इराण) पर्यंतच आहे. या संगमानंतर महासागराचे नाव बदलते. या प्रकारे हिमालय, हिंद महासागर, आर्यान (इराण) आणि इंडोनेशियाच्‍या मधातील संपूर्ण भू- भागाला हा आर्यावर्त किंवा  भारतवर्ष असे म्‍हटले जात असे.




आतापर्यंत  24 विभाजन

राइट विंग इतिहासकारांनुसार, वर्ष 1947 मध्‍ये भारत-पाक फाळणी झाली. मागील 2500 वर्षांत हे भारताचे 24 वे विभाजन होते. इंग्रजांच्‍या उल्‍लेखानुसार 1857 ते 1947 पर्यंत भारताची ही सातवी फाळणी आहे. 1857 मध्‍ये भारताचे क्षेत्रफळ 83 लाख वर्ग किमी होते. आताचे क्षेत्रफळ 33 लाख वर्ग किमी आहे. भारताच्‍या शेजारील राष्‍ट्रांचे क्षेत्रफळ 50 लाख वर्ग किमी आहे.





काय आहे अखंड भारत

आज भारताच्‍या चारही बाजूने असलेले देशांत  1800 वर्षांपूर्वी  बोली, संस्‍कृती, नृत्‍य, पूजापाठ, पंथ, वेशभूषा, संगीत सर्वच भारतासाखरे होते. परंतु, परराष्‍ट्राचा संपर्क आल्‍याने त्‍यांची संस्‍कृती बदलली.





2500 वर्षांत भारतावर झालेले हल्‍ले

मागील 2500 वर्षांत भारतावर अनेक अक्रमणे झाली. यामध्‍ये यूनानी, यवन, हूण, शक, कुषाण, र्तगाली, फ्रेंच, डच आणि इंग्रेजांचा समावेश आहे. या सर्वांत इतिसाहात उल्‍लेख आहे. परंतु, या काळात  अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिब्बेट, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण झाल्‍याचा उल्‍लेख नाही.




रशिया आणि इंग्रजांनी बनवला अफगानिस्तान

 26 मे 1876 रोजी रशिया आणि ब्रिटिश शासनामध्‍ये  'गंडामक संधी' नावाचा करार झाला. त्‍या आधारे  अफगानिस्तान नावाचा नवा देश स्‍थापन झाला. पूर्वी हा देश भारताचाच भाग होता. या करारामुळे तो भारतापासून वेगळा झाला. या प्रदेशात राहणारे प्राचीन काळात  शैव पंथीय होते. नंतर त्‍यांनी बुद्ध धम्‍म स्‍वीकारला. पुढे ते मुस्‍लीम झाले.  सम्राट शाहजहान, शेरशाह सुरी आणि महाराजा रणजित सिंह यांच्‍या शासनकाळात कंधार (गंधार) चा स्पष्ट उल्‍लेख आहे.



1904 मध्‍ये दिला स्‍वतंत्र  देशाचा दर्जा

पृथ्वी नारायण शाह यांनी मध्‍य हिमालयाच्‍या परिरातील लहान लहान 46 राज्‍यांना एकत्र करून नेपाळ नावाचे राज्‍य तयार केले होते. इंग्रजांनी वर्ष  1904 मध्‍ये या डोंगरवस्‍तीतील राजांसोबत करार करून नेपाळला स्‍वतंत्र देशाचा दर्जा प्रदान केला. या प्रकारे नेपाळचे भारतापासून विभागाजन झाले.  





इंग्रजांच्‍या खेळीमुळे भूटान भारतापासून वेगळे

1906 मध्‍ये इंग्राजांनी भारताच्‍या ज्‍या भागाला भारतापासून तोडले. तोच आज भूटान.  इसवी सन सहाव्‍या शतकापासून या देशाने बौद्ध धर्माचा अंगीकार केला.



कसा तयार झाला तिबेट

वर्ष 1914 मध्‍ये तिबेटला केवळ एक पक्ष मानत भारतातील  ब्रिटिश सरकार आणि चीनमध्‍ये एक करार झाला.  त्‍या अंतर्गत तिबेटला एक बफर राज्य म्‍हणून मान्‍यता देताना  हिमालयला विभाजित करण्‍यासाठी मॅकमोहन रेषा निर्माण करण्‍याचा निर्णय झाला. यामध्‍ये हिमालयाची वाटणी करण्‍याचाही डाव रचण्‍यात आला. पुढे चीनच्‍या  साम्रज्यवादी भूमिकेमुळे हा भाग चीनच्‍या ताब्‍यात गेला.







इंग्रजांनी दिली मान्‍यता

आपल्‍या नौसेनेला बळ देण्‍यासाठी इंग्रजांनी  श्रीलंका आणि नंतर मॅनमारला वेगळा देश म्‍हणून मान्‍यता दिली. ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिकदृष्‍ट्या हे दोन्‍ही देश भारताचा भाग होते.




भाषिक अस्मितेमुळे बंगलादेश

धर्माच्‍या आधारे 1947 मध्‍ये पाकिस्‍तानची निर्मिती झाली. मात्र, पुढे भाषिक अस्मितेमुळे बंगाल भाषिकांनी  16 डिसेंबर 1971 ला पाकिस्‍तानपासून तुटून बांगलादेशाच्‍या नावाखाली वेगळा देश निर्माण केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल