गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

आनंद दिघे यांचा इतिहास ...

 

आनंद दिघे यांचा इतिहास Anand dighe history in Marathi

दिघे ठाण्यातील एक शक्तिशाली स्नायूवाला मानले जात होते. शिवसेना पक्षाचे सदस्य श्रीधर खोपकर यांच्या हत्येचा त्यांच्यावर आरोप होता, ज्यांनी 1989 मध्ये काँग्रेसला कथितपणे मतदान केले होते. दिघे यांना टाडा अंतर्गत अटक करण्यात आली होती आणि ते जामिनावर बाहेर होते.

Anand dighe history in Marathi

आनंद दिघे यांचा इतिहास – Anand dighe history in Marathi

आनंद दिघे यांचा इतिहास

  • आम्ही पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणतो. पण ठाणे वेगळे आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमची माफी मागावी, “हे वाक्य विजयपत सिंघानिया यांचे होते.
  • सिंघानिया हे ठाण्यातील सुनीती देवी सिंघानिया रुग्णालयाचे मालक आहेत. 2001 मध्ये एका शिवसैनिकावर त्याच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
  • उपचारादरम्यान शिवसैनिकाचा मृत्यू झाला आणि ही बातमी ठाण्यात जंगलाच्या आगीसारखी पसरली. त्यानंतर या शिवसैनिकांच्या 1500 चाहत्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली.
  • ‘दिघे यांचे पुतणे असूनही शिवसेनेने माझ्यावर अन्याय केला’
  • दिघे यांच्या मृत्यूबाबत निलेश राणे यांनी बाळासाहेबांवर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का?
  • सोनू निगम आणि ठाकरे कधी आणि कसे संपर्कात आले?
  • रुग्णालयातील रुग्णवाहिका, 200 खाटांना घेराव घातला गेला. सिंघानिया यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची निराश होऊन माफी मागितली होती.

कोण होता हा शिवसैनिक?

  • एका शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर झालेल्या उद्रेकाचे नाव आनंद चिंतामणी दिघे असे होते.
  • दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952 रोजी झाला. त्यांचे घर ठाण्यातील टेंभी नाका परिसरात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा या भागात झाल्या पाहिजेत. तरुण आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना हजर असायचे.
  • “बाळासाहेबांच्या वक्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वाने मी मोहित झालो. बाळासाहेब त्यांच्यावर मोहित झाले. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि 70 च्या दशकात शिवसेना कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे काम इतके वेगवान होते की त्यांनी केले लग्नसुद्धा करू नका, ”असे या वृत्तपत्राचे संपादक ठाणे मिलिंद बल्लाळ म्हणाले.
  • ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात शिवसेनेला आनंद दिघे यांच्या रूपाने पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला होता. दिघे यांची मेहनत पाहून शिवसेनेने ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली.
  • “दिघे यांचे घरी आई, भाऊ आणि बहीण यांचे कुटुंब होते. पण जेव्हा ते जिल्हाप्रमुख झाले तेव्हा त्यांनी घर आणि सर्व काही काढून टाकले. ते जिथे कार्यालय होते तिथेच राहायचे, तिथे झोपायचे. कार्यकर्ते त्याच्यासाठी एक बॉक्स आणत असत, “दिघे सांगणारे ठाणे पत्रकार सोपान बोंगाणे म्हणाले.

जिल्हा प्रमुख धर्मवीर

दरम्यान, दिघे यांनी टेंभी नाका परिसरात ‘आनंद आश्रम’ स्थापन केला. या आश्रमात दररोज सकाळी जनता दरबार होत असे. परिसरातील लोक दिघे यांना त्यांच्या समस्यांबद्दल सांगायचे आणि ते त्वरित सोडवायचे.

“समस्या असलेले लोक सकाळी 6 वाजल्यापासून आनंद आश्रमात जमले. ते लोकांच्या तक्रारी ऐकत असत. त्यांची काळजी घेण्याची त्यांची प्रथा नव्हती, मग ते ते करायचे. आणि प्रशासनाने सर्वांमध्ये भीती निर्माण केली. हे, “स्वतंत्र पत्रकार रवींद्र पोखरकर म्हणतात.

“दिघे देव-धर्माबाबत अत्यंत कडक धोरण अवलंबत असत. टेंभी नाका येथे नवरात्रोत्सव सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी पहिली दहीहंडी सुरू केली. या सर्व धार्मिक कार्यातून त्यांना ‘धर्मवीर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी स्टॉल लावले स्वयंरोजगारासाठी. म्हणून त्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य करण्यास सुरवात केली, “रवींद्र पोखरकर म्हणतात.




by 

ठाण्याचे ‘धर्मवीर’ आनंद दिघे कोण होते? ...

 

विश्लेषण : ठाण्याचे ‘धर्मवीर’ आनंद दिघे कोण होते? 

संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यु आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा चित्तथरारक घटनाक्रम

anand dighe dharmveer Movie
‘धर्मवीर’ अशी ओळख मिळालेला तो शिवसैनिक म्हणजे आनंद चिंतामणी दिघे

– जयेश सामंत

‘आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणतो. पण ठाणे त्याहून वेगळे आहे का?’ ज्येष्ठ उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांच्या या प्रश्नाने दोन दशकांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमची माफी मागावी’ ही त्यांची पुढील मागणी. सिंघानिया हे ठाण्यातील सुनीतादेवी सिंघानिया रुग्णालयाचे मालक. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका शिवसैनिकाच्या मृत्यूमुळे बिथरलेले  हजारो शिवसैनिक या रुग्णालयावर चालून गेले आणि त्यांनी रुग्णालय पेटवून दिले. कारण हा शिवसैनिक साधासुधा नव्हता. ‘धर्मवीर’ अशी ओळख मिळालेला तो शिवसैनिक म्हणजे आनंद चिंतामणी दिघे. ही घटना राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती.

शिवसैनिक ते धर्मवीर…

उण्यापुऱ्या ४९ वर्षाच्या आयुष्यात शिवसैनिक ते धर्मवीर असा झंझावाती प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यु आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा चित्तथरारक घटनाक्रम ‘दिघे साहेब’ या नावात असलेल्या ताकदीची साक्ष देणारा. दिघेंचा जन्म २७ जानेवारी १९५२ चा. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात त्यांचे घर आणि पुढे वर्षानुवर्षे वास्तव्य राहिले. असे म्हटले जाते, की शिवसेनेचे स्वरूप दोन प्रकारचे राहिले आहे. एक मुंबईची शिवसेना, जेथे या पक्षाचा जन्म झाला आणि दुसरी ठाण्याची शिवसेना जेथे हा पक्ष वाढला. ठाण्याच्या शिवसेनेचे ‘बाळासाहेब’ अर्थातच आनंद दिघे. मुंबईच्या शिवसेनेसाठी शिवसेना भवन, ‘मातोश्री’ हे नेहमीच आदरस्थान राहिले. ठाण्यात शिवसेनेचे ‘मातोश्री – शिवसेना भवन’ म्हणजे टेंभी नाका आणि त्यातही आनंदाश्रम. 

दिघे यांची कार्यपद्धती कशी होती?

याच परिसरात दिघे यांचा रात्रंदिवस राबता असायचा. आनंदाश्रमात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक आपल्या तक्रारी घेऊन यायचे. तक्रार कोणतीही असो साहेबांच्या आश्रमात ‘करतो-बघतो’ अशा गोष्टींना थारा नसायचा. पीए फोन उचलेल मग साहेबांची वेळ मिळेल असाही प्रकार नसायचा. कोणतेही प्रश्न घेऊन टेंभी नाक्यावर ठराविक वेळेत पोहोचा नि काम झालेच म्हणून समजा, अशी पक्की खात्री त्यावेळी असायची. अनेकदा सांगून काम होत नाही म्हटल्यावर आश्रमातच अनेकांच्या डोळ्यादेखत बड्या-बड्या अधिकाऱ्यांना दिघेंचा ‘प्रसाद’ मिळाल्याचे किस्से आहेत. 

खोपकर प्रकरण काय होते?

महापौर निवडणुकीत एका नगरसेवकाचे मत फुटल्याने शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यानंतर ठाण्यात शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांचा दिवसाढवळ्या खून झाला. या खुनाला महापौर निवडणुकीतील दगाफटक्याची किनार होती असे त्यावेळी जाहीरपणे बोलले गेले. या प्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना ‘टाडा’ कायद्याअंतर्गत अटकही झाली. खोपकर यांच्या हत्येनंतर शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात दिघे यांच्या नावाचा दरारा वेगळ्या अर्थाने वाढला. ‘फुटाल तर खोपकर होईल’ अशी धमकीही त्यावेळी जाहीरपणे दिली जायची. कामाचा झंझावात, रात्रभर टेंभीनाक्यावर चालणारा जनता दरबार, पायाला भिंगरी लावून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उभारलेले शिवसेनेचे जाळे आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार हे दिघेंच्या राजकारणाचे वैशिष्टय ठरले. मुंब्रा परिसरातील मंदिरांच्या ‘संरक्षणासाठी’ रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन, दहिसर-मोरी भागात उभ्या राहात असलेल्या बड्या मशिदीचे बांधकाम थांबविण्यासाठी घेतलेली सक्रिय भूमिका, ठाण्यातील भव्य नवरात्र, दहीहंडी उत्सवांचे आयोजन यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख ते धर्मवीर हा दिघेंचा प्रवास नेहमीच चर्चेत राहिला. दिघेंच्या घरी आई, बहीण, भाऊ असा परिवार होता. परंतु जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आल्यावर आनंदाश्रम हे त्यांचे घर बनले. ते अविवाहित राहिले. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची ही बाजू त्यांना ‘धर्मवीर’ बनवण्यात महत्त्वाची ठरली.

गारूड आजही कायम…

दिघेंच्या मृत्यूला २० वर्षे लोटली तरी या नावाचे गारूड आजही कायम आहे. राज्याचे विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमागे शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. जानेवारी महिन्यात दिघे यांचा जयंती सोहळाही शिवसेनेने मोठ्या दणक्यात साजरा केला. दिघे यांनी वापरलेल्या वाहनाचे आधुनिकीकरण करत ते टेंभी नाक्यावर आणण्यात आले तेव्हा अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. यातही एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. ‘धर्मवीर’च्या निमित्ताने पुढील काही दिवस हा आनंदसोहळा ठाण्यात असाच रंगलेला पहायला मिळेल यात शंका नाही.





https://www.loksatta.com/explained/who-was-anand-dighe-his-journey-on-backdrop-of-movie-dharmaveer-mukkam-post-thane-print-exp-scsg-91-2901890/

"विश्वास" विक्री वाढवण्यासाठी हीच बाब सर्वात महत्वाची आहे......

 Put things BEYOND REASONABLE DOUBT




मनुष्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये एक फार मोठा फरक आहे आणि तो फरक असा की, 'इतर प्राणी काही गोष्टींवर सरळ विश्वास ठेवतात आणि माणूस हा त्याच्या सवयीप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर संशय घेतो'.

मनुष्याच्या गुणसुत्रीय संरचणेमध्येच ( Genes मध्येच म्हणलं तर समजेल ) शंका घेणे ; ही बाब फिट्ट केलेली आहे.

म्हणून ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपल्याला काही समजून सांगायचं असतं किंवा त्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा असतो,त्या वेळेला त्या व्यक्तीच्या शंका घेण्याच्या पलीकडे जाऊन ती गोष्ट सिद्ध करावे लागते, आणि यालाच "बियॉन्ड रिझनेबल डाउट" असं म्हटलं जातं


खरं बघायला गेलं तर ही व्याख्या न्यायालयाच्या कामकाजात वापरली जाते ,,,,येथे एखादा वकील न्यायाधीशांसमोर आपली बाजू बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करू शकला,तर त्या केसचा निकाल शंभर टक्के त्याच्या बाजूनेच लागतो.


आता तुम्ही म्हणाल सर मग या पद्धतीचा वापर आपल्या व्यवसायामध्ये ग्राहकांना जास्तीची विक्री करण्यासाठी कशी करता येईल?


*********************

हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी मी मी काल बघितलेला एक प्रसंग तुमच्या बरोबर शेअर करतोय, काल प्रवासादरम्यान एक चित्र असं दिसलं की, एक मासे विक्रेता खेड्याच्या चौकात मासेविक्री करत होता,साधारणपणे मासे विक्री करणारे लोक, मासे पकडतात त्यांना कॅरेटमध्ये किंवा टोपल्यांमध्ये भारतात आणि विक्रीच्या ठिकाणी येऊन एखाद्या कपड्यावर ते मासे पसरवून ठेवून बसतात.

परंतु मी बघितलेल्या मासे विक्रेत्याने नेहमीची पद्धत वापरली नाही,,त्याने मेलेले मासे न आणता ,पकडलेले मासे पाणी असलेल्या टोपल्यांमध्ये ठेवलेले ,होते आणि अगदी विक्रीच्या ठिकाणीसुद्धा ते मासे पूर्णपणे जिवंत होते.


आता हे दृश्य तुम्ही ही डोळ्यासमोर आणा .....एक विक्रेता मृत झालेले मासे विकतोय आणि दुसरा विक्रेता जिवंत मासे विकतोय,

साधारण ग्राहकाच्या डोक्यामध्ये एक शंका असते की हे मासे ताजे असतील का शिळे असतील? तर या उदाहरणात कोणत्या विक्रेत्याने ग्राहकाची ही शंका अगोदर दूर केलेली आहे?


गोष्ट अगदी साधी आहे ज्या विक्रेत्याने मार्केटमध्ये येत असतानाच जास्तीचे प्रयत्न करून जिवंत मासे आणले, आता या व्यक्तीच्या मालावर कोणीही शंका घेणार नाही ,कारण? त्याने शंकेच्या पलीकडे जाऊन आपण किती खरे आहोत? आपण किती सच्ची आहोत ?आपण किती प्रामाणिक आहोत? हे दाखवून दिलेलं आहे

यामुळे हा जिवंत मासे विकणारा विक्रेता जास्त यशस्वी होतो.


******************

यावरील उदाहरणावरून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे?: तर ते असं कि ग्राहक ज्या शंका वेळोवेळी उपस्थित करतोय, त्या शंकांचं निरसन आपण त्याने विचारण्याच्या अगोदरच केलं पाहिजे, त्याच्या मनात आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेस विषयी ऑब्जेक्शन तयार होत असतील ? तर त्याला दुर केलं पाहिजे.

 जेणेकरून आपला मुद्दा "बियॉन्ड रिझनेबल डाऊट" सिद्ध होतो,आपल्यावर ग्राहकाचा Trust वाढून तो पट्टकन खरेदी करेल.

 विक्री वाढवण्यासाठी हीच बाब सर्वात महत्वाची आहे...... "विश्वास"

So,
Put things beyond reasonable doubt.



©निलेश काळे.
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,
नळस्टॉप,पुणे.
9518950764.
Office : 9146101663.

माझ्याबद्दल