रविवार, १० जानेवारी, २०२१

'१०८ मण्यांची'च का असते जपमाळ ?..

 

'१०८ मण्यांची'च का असते जपमाळ ?

mantra
वेबदुनिया|
माळ रुद्राक्षाची असो, तुळशीमाळ असो, स्फटिकाची असो किंवा मोत्यांची असो... माळेतील मण्यांची संख्या १०८च असते. काय आहे यामागचं कारण?
रुद्राक्ष माळा सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण ती शिवशंकरांचं प्रतिक मानली जाते. जप किंवा देवाचं करताना एक ठराविक संख्या मनात धरून नामस्मरण केलं जावं, असं शास्त्रांत नमुद केलं आहे. संख्याहीन जप नामस्मरणाचं पूर्ण फळ देत नाही. जपमाळेने नामस्मरण करणाऱ्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. >दिवसाच्या बारा तासांमध्ये मनुष्य १०८०० वेळा श्वासोच्छ्वास करत असतो. प्रत्येक श्वासासोबत त्याने नामस्मरण करावं, अशी कल्पना असते. मात्र एवढं शक्य नसल्यामुळे १०८०० पैकी १०८ वेळा नामस्मरण करावं. १०८ हा अंक पार केला की जपमाळेमध्ये एक मेरूमणी असतो. तो १०८ अंक पूर्ण झाल्याची सूचना हाताला देतो. त्यामुळे नेहमी १०८ वेळा जप करण्याची प्रथा आहे.

कुंडलीवरून करिअर ओळखता येते?...

 

कुंडलीवरून करिअर ओळखता येते?

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष विशारद आणि वास्तू विशारद)

पाटीवर "श्री" काढून,सरस्वती आणि गणेशाचे स्मरण करून आपल्या शिक्षणाची सुरवात होते.आणि त्यानंतर "ग म भ न" ची सुरवात होते बालवाडीत. आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षण म्हणजे नुसतेच पुस्तकी ज्ञान नसून तर तुमच्यावर झालेले संस्कार, तुमचे व्यवहारज्ञान, तुमची बोलण्याची पद्धत. ह्या सर्व गोष्टींवरून माणूस किती सुसंस्कृत आहे हे समजून येते. आपल्या भारतीय परंपरेनुसार मनुष्य आयुष्यभर विद्यार्थीदशेतच असतो. कारण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडून आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून आयुष्यभर त्याला काही ना काही शिकायला मिळत असते.

संस्कार आणि पुस्तकी शिक्षण ह्यांत खूप अंतर आहे आणि मधल्या काळात पुस्तकी शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जात होते. परंतु आमिरच्या "तारे जमींन परं" आणि "थ्री इडीयट्स" ह्या फिल्मसमुळे पालकांच्या मानसिकतेमध्ये फरक आलेला दिसून येत आहे. पालकांच्या आपल्या मुलांकडून आधीच्या काळात असलेल्या अपेक्षा आणि विशिष्ट शिक्षणासाठी असलेल्या आग्रहात फरक पडत आहे. आधी मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हावे ह्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या दिसून येतात. दुसऱ्याही क्षेत्रातही प्रगती साधता येते हे पालकांना समजून येत आहे. आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलाचा कल कुठले शिक्षण घेण्याकडे आहे ह्याबाबत पालक सजग होत आहेत. हल्ली दहावीच्या परीक्षेनंतर किंवा किंबहुना आधीच "Aptitude Test" घेतली जाते. मग मुलाचा कल, त्या टेस्टचा रिझल्ट आणि दहावीचा रिझल्ट ह्या गोष्टींचा एकत्रित विचार करून पुढच्या शिक्षणासाठी निर्णय घेतला जातो. हल्ली अजून एक पद्धत आली आहे - मुलाच्या अंगठ्यावर असलेल्या रेषेंवरून शास्त्रीय पद्धतीने मुलाचा कल आणि त्याची कुठल्या प्रकारच्या करिअरमध्ये प्रगती साधू शकले ह्या बाबतीत मार्गदर्शन केले जाते. आणि मग सुरू होते एका जीवाची ह्या जगात स्वतःचे अस्तित्त्व सिद्ध करण्याची घौडदौड.

ह्या सगळ्यामध्ये सजग झालेले पालक मुलांच्या पत्रिका घेऊन "करिअर मार्गदर्शनासाठी" ज्योतिषाकडे येतात. पत्रिकेवरून काय कळणार मुलांच्या करिअरच्या बाबतीत?? असा जर प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असेल तर त्यांच्यासाठी:-

१) तुमची जन्मकुंडली म्हणजे तुमचा आरसा. तुमच्याबद्दलची सर्व माहिती सांगण्याची क्षमता कुंडलीमध्ये आहे.

२) जन्मकुंडलीत एकूण १२ स्थाने असतात. प्रत्येक स्थान तुमच्याबद्दल काही ना काही माहिती देत असते. लग्न स्थान किंवा प्रथम स्थानावरून तुमच्या स्वभावाची,तुमच्या "Physical Structure"ची कल्पना येते. द्वितिय स्थानावरून तुमच्या कुटुंबीयांची,सांपत्तिक स्थितीची कल्पना येते. चतुर्थ स्थान म्हणजे जन्मभूमी आणि जन्मदात्री आई. तुमच्या माते बद्दलची माहिती तर कळतेच परंतु तुमच्या स्थावर इस्टेट,रहाते घर कुठल्या प्रकारचे असू शकते,घराच्या आसपास काय असू शकेल ह्याबद्दलची माहिती देते. सप्तम स्थान जोडीदार,व्यवसायिक भागीदाराबद्दल माहिती देते.

३) ह्या सगळ्या स्थानांबरोबर कुंडलीमध्ये काही स्थाने असतात ज्यावरून तुम्ही कुठल्या प्रकारचे उत्पन्न घेणार हे लक्षात येते. ही स्थाने म्हणजे -द्वितीय,षष्ठ आणि दशम स्थान. दशम स्थान म्हणजेच "कर्म स्थान" तुमच्या करिअरची माहिती देते. ह्याला जोड असते षष्ठ स्थान,द्वितिय स्थान,लाभ म्हणजेच एकादश स्थानाची. तुम्ही कुठल्या स्वरूपाचे कर्म करणार आहात हे कर्म स्थानावरून समजून येते. षष्ठ स्थान तुम्ही नोकरीच करणार की व्यवसाय ह्याची हमी देते.

म्हणजे समजा तुमच्या कुंडलीत मंगळ हा अष्टम स्थानाशी संबंधित असेल तर व्यक्ती "Technical Education " घेणार हे नक्की असते. षष्ठ स्थानाचा सप्तम किंवा दशमाशी संबंध आल्यास व्यक्ती व्यवसाय करणार त्यामुळे शैक्षणिक गोष्टींबरोबरच त्याला व्यवसायात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टींबद्दलची माहिती आणि प्रशिक्षण घेणे जरुरी आहे हे लक्षात येते. त्यामुळे अशा कुंडलीला कुठल्या शाखेचे शिक्षण घ्यावे हे सांगता येते.

रवि ह्या ग्रहाचा व्यय आणि अष्टमाशी संबंधित असेल आणि दशा -अंतर्दशा पोषक असल्यास तर व्यक्तीचा कल "Medical"चे शिक्षण घेण्याकडे असतो. कारण व्यय स्थान म्हणजे हॉस्पिटल. अष्टम स्थान हे ऑपरेशनचे स्थान आहे. रविचा संबंध दशमाशी असला म्हणजे सरकारी नोकरी, राजकारणांत असलेला व्यक्तीचा कल आणि करिअर दर्शवते. रवि -मंगळाचा योग्य पोलीस क्षेत्रातील करिअर दर्शवते.

चंद्र हा मनाचा आणि जलतत्त्वाचा कारक आहे. त्यामुळे चंद्र प्रधान व्यक्ती मुळातच दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची क्षमता ठेवते. होमिओपॅथ डॉक्टर,मानशास्र्ज्ञ, नेव्ही इ. क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंच्या पत्रिकेत चंद्राची स्थिती आणि येणाऱ्या दशा पूरक असतील तर व्यक्ती ह्या क्षेत्रांमध्ये प्रगती साधतील.

बुधाचा दशम,द्वितीय स्थानाशी संबंध म्हणजे व्यक्ती "Jack of all but Master of none" ह्या उक्तीप्रमाणे असते. ह्या व्यक्तीकडे सगळ्या प्रकारची माहिती असते आणि ती माहिती कधी,कुठे,कशी वापरून आपला फायदा साधता येईल ह्याचा 'Common Sense'असतो. अशी व्यक्ती कमिशन बेस्ड व्यवसायाकडे आकृष्ट होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे असणारी वस्तू,इस्टेट विकून,एखादी अनमोल वस्तू दुसऱ्या गरजू व्यक्तीला विकून त्यातून मिळणारे कमिशन हेच त्यांचे उत्पन्न असते.

शुक्र म्हणजे साक्षात सौंदर्य. निसर्गातील सर्व सुंदर गोष्टी ओळखण्याचे कौशल्य हे शुक्रप्रधान व्यक्तींमध्ये असते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने,परफ्यूम्स, ब्युटी -पालर्स, रेस्टोरंट, हॉटेल मॅनेजमेंट,मोठाले रिसॉर्ट्स,सगळ्या प्रकारचे आर्टिस्ट जसे -गायक, नृत्य करणारे,फोटोग्राफर्स,शिल्पकार,पेंटर,चित्र रेखाटणारे,भल्या मोठ्या रांगोळ्या काढणारे शुक्राच्या अधिपत्याखाली येतात.त्यामुळे तुमच्या मुलांचा जर शुक्र कुंडलीत अत्यंत चांगल्या स्वरूपात असेल तर ह्या सर्व क्षेत्राचा विचार व्हावा.

गुरु म्हणजे ज्ञान. त्यामुळे गुरुचे पाठबळ करिअरच्या संदर्भात मिळते तिथे व्यक्ती जात्यातच दुसऱ्यांना "Counselling" देण्यात व्यस्त असतो. अशा व्यक्ती शिक्षण क्षेत्रात किंवा लोकांना प्रशिक्षण देण्यात मग्न असतात. अध्ययन आणि अध्यापन हा त्यांच्या जीवनाचा मंत्र असतो. त्यामुळे गुरु बलवान आणि दशा अंतर्दशांचा ह्यांची जोड असल्यास मुलाला तशाच गोष्टींच्या शिक्षणात रस असतो कारण ही व्यक्ती पुढे " Counsellor" होणार असते. गुरुचा संबंध फायनान्सशी (वित्त संस्था ) आहे. त्यामुळे गुरु आणि बुध ह्यांचा पत्रिकेतील होणारा योग आणि अर्थात दशेची जोड म्हणजे व्यक्ती "बँक" किंवा तत्सम वित्त संस्थेत कार्य करणार.

राहुचा संबंध दशमाशी,षष्ठाशी,द्वितीय स्थानाशी असणे म्हणजे व्यक्तीचा कल सिक्रेट्स ठेवण्याकडे असतो त्यामुळे शिक्षणही तशाच प्रकारचे देणे महत्त्वपूर्ण ठरते. राहू म्हणजे जे नाही ते दर्शविण्याचा प्रयत्न. आपल्याकडे टी.व्ही. वर प्रसारित होणाऱ्या सर्व मालिका आपण पहातो परंतु आपल्याला हे माहित असतं कि हे सर्व खोटे आहे फक्त आपल्या "Entertainment" साठी ह्या सर्व गोष्टी प्रसारित होत असतात. राहुशी संबंधित दुसरे क्षेत्र म्हणजे सगळ्या सिक्रेट यंत्रणा. डिटेक्टिव्ह असणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीत राहुचा संबंध दिसून येतो. अर्थात त्याला दशा-अंतर्दशेची जोड असावी. व्यक्तीला "Occult Science" मध्ये रस असू शकतो.

शनि हा मुळातच मंद गतीचा ग्रह. परंतु शनि सातत्य दाखवतो. शनिचा संबंध षष्ठ स्थानाशी असेल आणि बाकी गोष्टी पूरक असतील तर व्यक्ती "म्युनिसिपल" ऑफिसमध्ये काम करण्याची क्षमता ठेवते. शनि,सातत्य दर्शवत असल्याने व्यक्ती "Research" मध्ये जास्त रमते. शनिचा संबंध जमिनीतून मिळणारी खनिजे,सोने, तेल -पेट्रोल ह्याच्याशी आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या कुंडलीत शनि संबंध करीअरशी येत असेल तर तुमचे मुलं ह्या क्षेत्रात करिअर करू शकते.

वरील सर्व ग्रह आणि मुलांचे शिक्षण/करिअरबद्दल मी थोडक्यात माहिती दिली आहे. त्याबरोबरीनेच दशा-अंतर्दशा यांचाही अभ्यास करून मुलाबद्दल अचूक भविष्य सांगता येऊ शकते. प्रत्येक मुलं हे वेगळे आहे. त्यामुळे प्रत्येक कुंडलीही वेगळी आहे. त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करून करिअरबद्दल मार्गदर्शन करता येते.

बऱ्याचदा असे दिसून आले आहे की मुलाची/मुलीची क्षमता नसतांना,त्यांचा त्या क्षेत्रात रस नसून सुद्धा पालक स्वतःच्या हट्टासाठी मुलांना डॉक्टर, इंजिनिअर, सी. ए., करण्यास भाग पडतात आणि त्याचा परिणाम म्हणजे मुले ते शिक्षण आत्मसात करू शकत नाहीतच परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्यांचा आत्मविश्वासही गमावून बसतात. ह्यामुळे मुळात उपजत असलेले गुणही ते गमावतात.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे म्हण आहे. मुलाचा पिंड काय आहे ? मुलाचा कल कुठे आहे हे मुलांच्या लहानपणीच लक्षात येते. परंतु हा कल पुढच्या आयुष्यासाठी फक्त आवड (Passion) म्हणून राहणार आहे ? की त्याची परिणीती करिअर मध्ये होणार आहे हे वेळीच समजून घ्या. त्यासाठी आजच्या करिअरच्या मागे धावणाऱ्या पालकांना गरज आहे तुमच्या मुलांना ओळखण्यासाठी वेळ देण्याची. तुमच्या मुलाचे उपजत गुण नुसते ओळखून फायदा नाही त्यांना तसे पूरक शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ह्यावरून "थ्री इडियट्स" मधील आमिरचा सवांद आठवतो - "काबील बनो. Success झक मारके पीछे आएगी " हा सवांद फक्त लक्षात न ठेवता तुमच्या मुलांच्याबाबतीत अंमलात आणा. कदाचित त्यामुळे तुमच्या मुलातल्या एक उत्तम व्यावसायिकाला,एक उत्तम कलाकाराला,एक उत्तम खेळाडूला त्याचे आयुष्य संपूर्णपणे जगण्याचा वाव देऊ शकाल. मगअशा व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.




by - dailyhunt

विवाह टिकवण्यासाठी!...

 

विवाह टिकवण्यासाठी!

केवळ गुणमेलन करून झालेले विवाह यशस्वी ठरतातच असे नाही. कारण एकूण कुंडलीमेलनामधील गुणमेलन हा एक भाग आहे.

आपल्या करिअरकडे लक्ष देणाऱ्या या पिढय़ांनी वैवाहिक जीवनाला त्यामानाने दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्राधान्यक्रमावर टाकले.

भविष्य विशेष
डॉ. धुंडिराज पाठक – response.lokprabha@expressindia.com

केवळ गुणमेलन करून झालेले विवाह यशस्वी ठरतातच असे नाही. कारण एकूण कुंडलीमेलनामधील गुणमेलन हा एक भाग आहे. शिवाय ३६ गुणांपकी ‘न जमलेल्या गुणांची तडजोड कशी करावी’ हे सांगणे हे खऱ्या समाजाभिमुख ज्योतिषाचे कर्तव्य आहे.

साधारण १९६०-७० च्या दशकात किंवा त्याअगोदर जन्माला आलेली पिढी बऱ्याच प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेली आहे. नंतरच्या पिढय़ांना मात्र कमी माणसांसोबत राहायला मिळाले. विभक्त कुटुंबाच्या संकल्पनेमध्ये दोन अपत्य तर पुढे जाऊन एकच अपत्य अशी संकल्पना आली. या ८० नंतरच्या दशकात जन्माला आलेल्या पिढय़ांचे वेगळे प्रश्न सुरू झाले.

घरात एक किंवा फार तर दोघे जण असल्यामुळे वाट्टेल त्या गोष्टी, वाट्टेल त्या वेळेला आपोआप मिळत गेल्या. ‘आमच्या आयुष्यात आम्हाला या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या निदान आमच्या मुलांना तरी देऊ’ या पालकांच्या दृष्टिकोनामुळे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय करावे लागते याची जाण त्यामानाने या नंतरच्या पिढीला कमी राहिली. अर्थातच तडजोडीच्या शक्यता खूपच कमी होत गेल्या आणि त्याचा परिणाम म्हणून वैवाहिक जीवनातही जी तडजोड करावी लागते ती तडजोड या नंतरच्या पिढय़ांना कमी प्रमाणात माहिती झाली. यामुळेही अलीकडे घटस्फोटांचे प्रमाण भलतेच वाढलेले आहे.

आपल्या करिअरकडे लक्ष देणाऱ्या या पिढय़ांनी वैवाहिक जीवनाला त्यामानाने दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्राधान्यक्रमावर टाकले. अर्थातच स्वतचे शिक्षण, करियर, पसा, प्रतिष्ठा, प्रॉपर्टी या गोष्टींना महत्त्व दिले. ही गोष्ट चांगली असली तरी कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी किशोरवयीन अवस्थेत जे संस्कार व्हायला हवे असतात ते कुठेतरी कमी पडले, याची जाणीव आमच्यासारख्या अगोदरच्या पिढीला निश्चितच होते. एकदा का चांगले शिक्षण व पदवी हाती पडली, चांगला पगार मिळवू लागली की मुलं मी वाट्टेल ते करू शकतो, मला कोणाची गरज नाही या मानसिकतेकडे वळू लागतात. त्यामुळे दुसऱ्याला कमी लेखणे, त्याच्या मताला किंमत न देणे व दुसऱ्याच्या भावनांची कदर न करणे या गोष्टी वाढत जाऊन शेवटी अरेरावी सुरू होते.

कुंडलीवरून व्यक्तीची मानसिकता बघता येते. कोणत्या प्रसंगात ही व्यक्ती कसे निर्णय घेईल किंवा तिची प्रतिक्रिया कशी असेल याचा बऱ्यापकी अंदाज पत्रिकेवरून अभ्यासू ज्योतिषाला घेता येतो. कुंडलीवरून सर्वसाधारण आढावा घ्यायचा झाल्यास प्रत्येक राशीचे गुणधर्म आज-काल आंतरजालावरून किंवा अनेक पुस्तकांवरून आपणास अभ्यासता येतात. लग्न राशी, चंद्र राशी व कुंडलीतील महत्त्वाचे ग्रहयोग यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येतो. त्यावरून त्याच्याकडे असलेल्या दोषांवर कशी मात करता येईल व गुणांमध्ये वृद्धी कशी करता येईल, तसेच जोडीदाराला समजून घेताना कुठे कमीपणा घ्यावा आणि कुठे स्वतचे मत पुढे न्यावे याचा योग्य सल्ला तज्ज्ञ ज्योतिषाला नक्की देता येतो.

केवळ गुणमेलन करून झालेले विवाह यशस्वी ठरतातच असे नाही. कारण एकूण कुंडलीमेलनामधील गुणमेलन हा एक भाग आहे, तो सर्वस्वी नाही. शिवाय ३६ गुणांपकी ‘न जमलेल्या गुणांची तडजोड कशी करावी’ हे सांगणे हे खऱ्या समाजाभिमुख ज्योतिषाचे कर्तव्य असते. ज्या गोष्टींमध्ये सूर जुळणार आहेत त्या गोष्टी तर ठीकच आहेत, त्यातून त्यांचे चांगले होईलच. पण जेथे न जुळणारे गुण असतात त्यातली तडजोड शिकवणे महत्त्वाचे ठरते.

सर्वसामान्यांना आपली राशी कोणती हे माहीत असते. त्यावरून त्यांना एकूणच आयुष्यात व विशेषत वैवाहिक जीवनात कोणती तडजोड करणे गरजेचे असते याची ढोबळ माहिती पुढे देत आहे.

मेष, सिंह, धनू या अग्नी राशी म्हणून ज्योतिष शास्त्रात मान्यताप्राप्त आहेत. या राशींना सर्वसाधारणपणे दुसऱ्या कोणाचे ऐकून घेणे आणि मान्य करणे सहसा आवडत नाही. त्यांना स्वतचा अधिकार गाजवायला मुळातच नेहमी आवडते. त्यामुळे या राशी गटांनी आपल्यापेक्षा चांगले बुद्धिमान लोक असतात यावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. बाहेरच्या व्यवहारी जगात किंवा करिअरमध्ये असा अधिकार गाजवणे हा गुण ठरतो, पण वैवाहिक व कौटुंबिक जीवनात मात्र तसे होत नसते. घरामध्ये प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीबरोबरच आपली भूमिका बदलते, याची जाण ठेवणे आवश्यक असते. आईसमोर ते मूल असते, भावासमोर बहीण असते, बायकोसमोर नवरा असतो किंवा नातवासमोर आजी-आजोबा म्हणून असतो. त्यामुळे या प्रत्येकाशी संवाद साधताना वेगवेगळ्या भूमिकेत जावे लागते. बाहेर आपण भले मोठय़ा अधिकाराच्या पदावर असला तरी बाहेरचा मानसन्मान, अधिकार, पद ही सगळी झुले घरात येण्यापूर्वी बाहेर ठेवावी लागतात. तरच घराला घरपण येते. अहंकाराचा फटका या राशींना जास्त बसत असतो. त्यामुळे कुठे अहंकार गाजवायचा अन् कुठे थांबायचे हे कळायला हवे. तरच निखळ आनंद घेऊ शकतात.

वृषभ, कन्या आणि मकर या राशींना व्यवहारी राशी म्हणून संबोधले जाते. खाओ, पिओ, मजा करो. प्रत्येक ठिकाणी हिशेब ठेवणे, जेवढय़ास तेवढे राहणे आणि कोणतीही गोष्ट पशात मोजणे हा यांचा स्वभाव असतो. भौतिक सुखाकडे जास्त लक्ष असते. नाचेंगे, गायेंगे, खायेंगे, पियेंगे ऐश करेंगे और क्या? हे यांचे तत्त्वज्ञान असते. पण वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबात व्यवहारापेक्षा भावनेला स्थान असते. तिथे कोणत्याही व्यवहार आणून चालत नसतो. अन्य सदस्यांच्या भावना जपणे हे यांच्यासाठी आवश्यक असते, ते शिकावे लागते.

मिथुन, तूळ आणि कुंभ राशी गटांना बौद्धिक राशी संबोधले जाते. कोणत्याही गोष्टीचा नीट विचार केल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत. प्रत्येक निर्णयापूर्वी त्याच्या चांगले-वाईट परिणामांची व्यवस्थित नोंद घेणार. आणि त्यातूनच योग्य असे पावले टाकणार. या बाबी व्यवहारात जास्त उपयोगात येतात, तसेच वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही उपयुक्त ठरतात. सारासार विवेक चांगला असल्याने यांना फारसे प्रश्न येत नाहीत. मात्र कोणत्याही गोष्टीची अतिचिकित्सा केल्यास त्यातून संशयाचे वातावरण निर्माण होते. आणि ‘धड ना समोरच्याला आनंद न आपल्याला आनंद’ अशी स्थिती निर्माण होते. कुठे थांबायचे हे कळले तर या राशींनाही आनंदाच्या अनेक पायऱ्या ओलांडता येतात.

कर्क, वृश्चिक, मीन या जलराशी समजल्या जातात. तसंच या भावनाप्रधान राशीही म्हटल्या जातात. संसार करण्यास, प्रपंच करण्यास या राशींना अतिशय चांगले जमते. मात्र यांच्याकडून भावनांचा अतिरेकही बऱ्याचदा होतो. अति काळजी, अतिप्रेम हे घातकच असते ना. शिवाय सगळीकडे भावनांचे दोर बांधून चालत नसते, हे यांना सांगावे लागते. नातेसंबंधात भावनांची गरज असली तरी व्यवहार मात्र भावनांवर चालत नाहीत. त्यामुळे नको तिथेसुद्धा भावना गुंतवल्यास प्रश्न निर्माण होतात. त्यातल्या त्यात मीन राशीला केवळ दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडते. या राशींच्या लोकांना स्वार्थ शिकवावा लागतो.

ढोबळ मानाने प्रत्येक राशींचा गुण-अवगुण वरीलप्रमाणे नोंदवता येतो.

पत्रिकेमध्ये काही ठळक ग्रहयोग असतात. त्यांचा परिणाम हा अनेक बाबतीत होत असतो. शनी-मंगळ युतीत किंवा एकमेकांच्या दृष्टी योगात असतील तर अशा लोकांना आयुष्यात कोणतीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. या लोकांनी चुकूनही लॉटरीचे तिकीट घेऊ नये. सट्टा, लॉटरी, जुगार या वाटेला जाऊ नये. आपल्याला अनेक बाबतीत भोगच भोगायचे आहेत ही जाणीव ठेवावी. किंबहुना हे आयुष्य आपल्याला गत जन्मातील पाप कमी करण्यासाठी, संपवण्यासाठी म्हणजेच शुद्धीकरणाच्या प्रक्रियेकरता मिळाले आहे यावर विश्वास ठेवावा. अर्थात या शनी, मंगळाचा परिणाम वैवाहिक जीवनातही होत असतो. सतत असंतुष्टता ही गोष्ट प्रकर्षांने दिसून येत असते. त्यामुळे कोणत्याही मोठय़ा प्रयत्नात कधी थांबायचे हे आधीच ठरवणे हितकारक असते. आपल्या मर्यादा वेळीच ओळखणे बरेच नुकसान थांबवता येते.

रवी, चंद्र, बुध, मंगळ, गुरू व शुक्र यांपकी कोणता एक किंवा अनेक ग्रह राहूबरोबर असतील तर हा त्या दृष्टीने शापित योग समजला जातो. त्या ग्रहाच्या दृष्टीने मिळणाऱ्या फळांमध्ये वैगुण्य येत असते. शुक्र राहू योग असेल तर वैवाहिक जीवनात असमाधान राहणार हे गृहीत धरावे लागते. मंगळ राहू योगात वास्तुदोष स्वीकारावे लागतात. चंद्र राहू योगात मानसिक नराश्य येऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. बुधगुरू योगात एखादा त्वचेचा विकार किंवा मानसिक विकार येऊ शकतो. गुरू राहू योगात सार्वजनिक जीवनात कधी ना कधी मोठा लोकापवाद येतो. मन शांत राहत नाही. तर रवी राहू योगामध्ये सरकारी अधिकाऱ्यांशी कधीही वितुष्ट न घेणे हितकारक ठरते.

कुंडलीवरून वैवाहिक सौख्याचा विचार हा अतिशय विस्तृत व तांत्रिक स्वरूपाचा आहे. त्यातील सर्वसामान्यांसाठी समजेल असे काही मुद्दे वर दिले आहेत. त्यावरून लगेचच आपल्या पत्रिकेत तसे आहे असे समजणे ही टोकाचे ठरू शकते.

आपला मानव जन्मच मुळात तडजोडीचा आहे. आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टींबाबत तडजोड करावीच लागते. शक्य असेल आणि मिळेल त्याच्याकडून मदत घेणे गरजेचे असते. अशा तडजोडीतूनच आयुष्य घडत असते. त्यातही वैवाहिक जीवन हे तर तडजोडच असते. विशेषत मुलगी आपले २०-२५ वर्षांचे आईवडिलांकडचे आयुष्य पूर्णत सोडून नवऱ्याच्या घरी, म्हणजे पूर्णत नवीन लोकांच्या सोबत, नवीन घरात राहायला येते. ही तिच्या दृष्टीने असलेली सगळ्यात मोठी तडजोड असते. ही गोष्ट नवऱ्याने लक्षात घेणे गरजेचे असते. तरीही विवाहसंबंधात दोघांकडूनही योग्य मानसिक आदानप्रदान आणि हितसंबंधांची जाण ठेवून वैवाहिक जीवन व्यतीत करायचे असते.

आपले जीवन हे आपले एकटय़ाचे नसते. तर ते स्वतबरोबरच संपूर्ण कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी सुद्धा असते. ही जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असते.

आजकाल वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या तीव्र प्रश्नांची कारणे अनेक आहेत.

सगळ्यात मोठे कारण म्हणजे संवाद हरपलेला आहे. आजकाल आम्ही पूर्वीच्या मानाने खूप बोलतो आहोत, नाही असे नाही. पण घरातल्यांशी न बोलता आपल्या हातात असलेल्या मोबाइलवरून आपण बाहेरच्यांशी बोलत आहोत. त्यामुळे घरांमध्ये सुसंवाद तर सोडाच, पण साधा संवादही घडत नाही. एकमेकांना समजून घेणे होत नाही. एकमेकांच्या सुखदुखामध्ये आपले योगदान दिले जात नाही. त्यातून दरी निर्माण होते. आपले दुख ऐकून घेणारा आता ‘आपला’ असा कोणीच नाही, हे दुख जास्त सतावत असते. त्यातून अशा ‘आपल्या’ वाटू शकणाऱ्या माणसांचा शोध बाहेर घेतला जातो आणि या नातेसंबंधांचे तीनतेरा वाजायला सुरुवात होते.

त्यागमय जीवन हे आजकाल दुरपास्त होत चालले आहे, हेही वैवाहिक जीवनातील विसंवादासाठी एक कारण आहे. २०-३० वर्षांचा संसार होऊनही आम्हाला पती-पत्नी म्हणजे काय, हेच माहीत नसते. पत्त्युर्न यज्ञ संयोगे स पत्नी। अशी पतीपत्नीची व्याख्या आपल्याकडे आहे. पती-पत्नीमध्ये फक्त एका नकाराचा फरक आहे. हा नकार यज्ञरूपी आहे. यज्ञ म्हणजे त्याग. ‘तुझ्या आवडीसाठी मी माझ्या काही गोष्टी सोडून देणार’ असे दोघांनी एकमेकांना म्हणणे. वैवाहिक जीवन हे सहजीवन असते. ‘दोघांचे मिळून’ असते. एकमेकांप्रती असलेले प्रेम, निष्ठा, आदर हे जास्त महत्त्वाचे ठरतात. एकमेकांचे अस्तित्व स्वतंत्र आहे. तरीही एकमेकांशी पूरक आहे. या गोष्टींचा अभ्यास आजकाल वाढणे गरजेचे आहे.

वास्तुशास्त्रातूनही या गोष्टींसाठी काही उपाय करता येतात. शयनगृहात गुलाबी रंगाचा वापर वाढवणे. शयनगृहातील टीव्ही, अभ्यासिका, पेपरवाचन, पुस्तकवाचन इत्यादी गोष्टी वैवाहिक जीवनाला पूरक नसतात त्यामुळे जोडप्यांच्या शयनगृहात आम्ही या गोष्टी टाळायला सांगतो. एकमेकांसाठी वेळ देण्याची ती जागा असते.

घरात सतत सकारात्मक बोलणे आणि एकमेकांविषयी मनामध्येही सद्भाव ठेवणे यातूनही हा विसंवाद कमी होऊ शकतो. घटस्फोटांच्या प्रश्नावर समाजातील सगळ्यांनी मिळून आता फार मोठे काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण मूल होण्यापूर्वीच घटस्फोट झाला तर गोष्ट वेगळी असते. परंतु मूल झाल्यानंतर घटस्फोट झाला तर ते मूल एकाच पालकाच्या घरी वाढत असते. या एकपालकत्वाखाली वाढणाऱ्या मुलांना भावना कशाशी खातात हेही कळेनासे झाले आहे. कोणतीही गोष्ट मिळणे हा ते अधिकार समजत आहेत. त्यातून त्यांची वृत्ती िहसक होत चालली आहे. त्यातही त्यांच्या हातातले खेळ म्हणजे ताशी ४००-५००च्या वेगाने पळणाऱ्या त्या मोबाइलमधल्या गाडय़ा किंवा हातात हजार गोळ्या असलेली स्टेनगन आणि समोर येईल त्याला गोळ्या मारत सुटलेले त्या खेळातले ते ‘शूरवीर’. अशाच गोष्टी व्यवहारात आहेत असा त्यांचा त्या नकळत्या वयात समज होत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना प्रेम, भावना, दुसऱ्याची जाणीव या गोष्टी शिकवाव्या लागत आहेत. हे असेच चालू राहिले तर मला पुढे एक भयंकर दृश्य दिसतेय. समजा तुमच्या सोसायटीमध्ये ५० कुटुंबे आहेत आणि त्यातील निम्म्या कुटुंबांमध्ये असे एकपालकत्वाखाली वाढणारी मुले आहेत. भले तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्याल. प्रेम, आदर शिकवाल. पण ही सगळी मुले जेव्हा खाली मदानात खेळत असतील तेव्हा न जाणो कदाचित कधी रागाच्या भरात हा एकपालकत्वाखाली वाढलेला मुलगा तुमच्या मुलाशी हमरीतुमरीवर येईल हे सांगता येणार नाही.

मुलांवर सगळे संस्कार नीट होण्यासाठी त्यांना आई आणि बापाच्या एकत्र प्रेमाची गरज असते. त्यासाठी नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे




by - loksatta

शैक्षणिक अभ्यास आणि वास्तुशास्त्र...

 

शैक्षणिक अभ्यास आणि वास्तुशास्त्र

मूल अभ्यास करत असेल तर अभ्यास कमी आणि खोडय़ा जास्त. लहान भावाची पेन्सिलच घेईल अन् त्याला रडायला लावेल.

आपल्या पाल्याला घराच्या चारही कोपऱ्यांत म्हणजेच १५ दिवस ईशान्येत, १५ दिवस आग्नेयेत, १५ दिवस नैर्ऋ त्येत आणि १५ दिवस वायव्येत अभ्यासाला बसवा आणि त्याच्या वागणुकीत, अभ्यासात, समज आणि स्मरणशक्तीत पडणारा फरक पाहा.

‘‘आम्ही आमचे घर बरेचसे वास्तुशास्त्राप्रमाणेच बनविले आहे सर. आम्ही ज्या आर्किटेक्टला इंटेरिअर करायला दिले होते त्यानेच तसे सांगितले. पण आमचे प्रश्न काही सुटत नाहीत.’’
मुंबईतला लोखंडवाला कॉम्प्लेक्समधला एक फ्लॅट. मी वास्तुपरीक्षणाला गेलेलो आणि हे महाशय सांगताहेत की घर वास्तुशास्त्राप्रमाणेच बनविले आहे. अशा वेळी ‘मग मला बोलाविण्याची वेळ का आली?’ असे प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये हा माझा माझ्यासाठीचा नियम म्हणून ते बचावले.
माझ्या परीक्षणातून सुटेल की काय या भीतीने ते प्रत्येक खोली, त्यातील मांडणी व केलेल्या सर्व सोयीसुविधा याबाबत विस्तृतपणे सांगत होते.
त्यांच्या बेडरूमपाशी आल्यावर –
‘‘ही आमची मास्टरबेड. शास्त्राप्रमणे नैर्ऋ त्येला..’’
बाकी त्या रूमबद्दल बरेच सांगून झाल्यावर शेवटी म्हणाले, ‘‘इथेच माझ्यासाठी त्याने एक स्टडी टेबल दिले आहे. तिथे दोन हाफ पॉइंटही लॅपटॉप, प्रिंटर यासाठी दिले आहेत..’’
मी त्यांना मध्येच थांबवत म्हणालो, ‘‘पण इथे अभ्यासच होत नसेल. सोय असून काय करायचे?’’
लगेचच त्यांनी दुजोरा दिला, ‘‘होय सर. इथे कधी माझा अभ्यास होतच नाही. कंटाळाच येतो.’’
केवळ ईशान्येस देवघर, आग्नेयेला स्वयंपाकघर आणि
नैर्ऋ त्येत मास्टर बेड- एवढे केले की झाले वास्तुशास्त्र! हा यांचा मोठ्ठा गैरसमज. वास्तुशास्त्रात ज्ञात असे सुमारे ४००-५०० ग्रंथ आहेत हे यांना माहीत नाही. त्यामुळे सांगणार तरी काय?
वास्तुऊर्जाचा नीट अभ्यास केला तर कोणत्याही प्रकारचा अभ्यास हा आपल्या वास्तूतील कोणत्या दिशेने बसून करावा याचे दिग्दर्शन मिळते. मी जाहीर व्याख्यानांतून सर्वाना एक आवाहन करीत असतो.
आपण आपल्या पाल्याला घराच्या चारही कोपऱ्यांत १५-१५ दिवस अभ्यासाला बसवा आणि त्याच्या वागणुकीत, अभ्यासात, समज आणि स्मरणशक्तीत काय काय फरक पडतो ते पाहा. १५ दिवस ईशान्येत, १५ दिवस अग्नेयेत, १५ दिवस नैर्ऋ त्येत आणि १५ दिवस वायव्येत असा प्रयोग करून पाहा. त्यातले त्यात सहावी-सातवीपर्यंतची मुले असतील तर फरक लक्षात घेण्यासारखा असेल. वय तेच, मूल तेच, शाळा तीच, टीचर तेच, घर, आई पुस्तके, वह्य…बाकीचे सगळे तसेच असताना घरातील केवळ कोपरा बदलल्याने पडणारा हा फरक आपण अनुभवू शकाल. परीक्षेच्या तोंडावर मात्र हे प्रयोग नको.
आग्नेयेत जर मूल अभ्यास करत असेल तर अभ्यास कमी आणि खोडय़ा जास्त. लहान भावाची पेन्सिलच घेईल अन् त्याला रडायला लावेल. बहिणीला वाकुल्या दाखवून मार खाईल. पण अभ्यास? बेताचाच.
नैर्ऋ त्येत अभ्यास करीत असेल तर आईला ते बाळ तासभरसुद्धा जागेवर बसलेले दिसेल. छानपैकी पुस्तकही डोळ्यासमोर धरलेले असेल. पण खूप वेळानंतर आईच्या लक्षात येईल की आपले बाळ अभ्यास करता करता ‘थकून’ झोपी गेले आहे. पण जसजशा काही सत्रपरीक्षा होतील तसे तसे तिला कळेल की ‘आपलं बाळ’ इतका वेळ अभ्यास करीत असूनसुद्धा मार्कस्च्या शर्यतीत मागे पडते आहे. त्याचे कारण तो जिथे अभ्यास करतो आहे ती खरी विश्रांतीची जागा. तिथे आळस येणे, पेंगणे हे सहजच घडत असते. त्यामुळे जास्त वेळ अभ्यास (केल्यासारखा) करूनही समजणे व लक्षात राहणे या गोष्टी तिथे होत नाहीत.
म्हणूनच जिथे जिथे नैर्ऋ त्येत शयनकक्ष असेल तर तिथेच अभ्यासाची सोय उपयुक्त ठरत नसते. त्याचा उपयोग होत नसतो. फर्निचर बनून जाते. पण अभ्यासाला बसण्यासाठी तिथे मन तयार होत नसते. आणि कालांतराने तिथला कॉम्प्युटर, पुस्तके, वह्य यावर भरपूर धूळ साठत असते.
ते मूल वायव्येत अभ्यास करीत असेल तर दर दोन मिनिटांनी ते महाशय दहा मिनिटांसाठी बाहेर खेळायला जात असेल. म्हणजे काय तर जरा दहा मिनिटेसुद्धा सलग अभ्यास करणार नाही. लहान मुल मुळात चंचल असतेच, इथे ते जास्त चंचल होते. परिणाम काय तर अभ्यास कमी.
या सगळ्यांपेक्षा ईशान्य दिशेत होणारा अभ्यास हा तो वेळ सत्कारणी लावणारा असतो. ईशान्य दिशा ही दोन शुभदशांचा संगम असलेली दिशा होय. तिथे देवघराची रचना याच कारणासाठी आहे. ही दिशा एरव्हीसुद्धा स्वच्छ, शुद्ध, पवित्र, मोकळी व आल्हाददायक वातावरण निर्माण करील अशी असावी. या ठिकाणी अभ्यास भले थोडा वेळ होईल, पण इथे मनाची एकाग्रता वाढते. बुद्धीची तल्लखता वाढते. अभ्यासातली समज वाढते. स्मरणशक्ती वाढते. लक्षात राहणारा अभ्यास हा हवा तेव्हा पुन्हा कागदावर उतरवता येतो.
संपूर्ण घराच्या ईशान्य भागात अभ्यासाला बसणे उत्तम असते. त्या भागात एखादी खिडकी असेल तर त्या खिडकीकडे तोंड करून बसावे. ईशान्येत अभ्यासाला बसल्यावर त्याने आपले तोंड कुणीकडे करावे हा प्रश्न त्या मानाने गौण ठरतो. या प्रभागात कोणत्याही दिशेकडे तोंड केले तरी चालते. त्यातल्या त्यात शक्य असेल तर, पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करणे जास्त हितावह असते.
हे जसे लहान मुलांबाबत सांगितले तसे माध्यमिक, महाविद्यालयीन किंवा मोठेपणीही आपण काही काही कोर्सेस करीत असतो तर त्यांच्याबाबत काय? असा प्रश्न आपणास पडेल. या सर्वानीसुद्धा वरील विवेचन लक्षात घ्यावे. लहान मुलांत पडणारा फरक लगेच लक्षात येतो म्हणून तसे लिहिले. बाकी अभ्यासखोलीसाठी सगळ्यांसाठी विवेचन तेच.
अजूनही यावर खूप सखोल विचार करता येईल. त्यासाठी वास्तुशास्त्रातले – मूळ ग्रंथातले- वास्तुपुरुष मंडल व त्यातील सर्व देवतांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. तो काहीसा तांत्रिक भाग व केवळ अभ्यासकांना समजणारा असल्याने येथे देणे योग्य ठरणार नाही.
मात्र भारतीय वास्तुशास्त्रातले मूळ व प्रमाण ग्रंथांचा अभ्यास असेल तर आयुष्यातील प्रत्येक वळणावर, अनेक बाबतीत त्याची मदत होते व आयुष्यात प्रगती, शांतता व समाधान मिळविता येते.




डॉ. धुंडिराज पाठक – response.lokprabha@expressindia.com






by - loksatta


माझ्याबद्दल