बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून औषधी वनस्पतींच्या लागवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे या औषधी वनस्पतींकडे काहीसे दुर्लक्ष झाले आणि त्यांचा वापर आयुर्वेदिक  औषधांपुरता मर्यादित राहिला. तेव्हा आज माहिती करुन घेऊया, अशाच काही घरगुती औषधी वनस्पतींची.

  गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची जशी आपण परंपरा पाळतो, तशीच कडुलिंबाची पाने खाण्याचीही. वर्षभर आरोग्य चांगले राहावे म्हणून ही पाने खाल्ली जाण्याची प्रथा आहे. आपल्या प्रत्येक सणवारात फळाफुलांबरोबर पानांनाही खूप महत्त्वाचे स्थान आहे. रोजची देवपूजा असोत की गणपतीची किंवा श्रावणातल्या मंगळागौरीची, पत्री या वाहिल्या जातातच. वर वर बघता ही सर्व अगदी साधारण, सर्वत्र आढळणार्‍या झाडांची पानं असतात. पण, जरा खोलात शिरलात की लक्षात येतं की, प्रत्येकाचे काही ना काही औषधी महत्त्व आहे. तुळस उपयोगी तर उष्णतेवर दुर्वा तर कृमी-विषमज्वरावर बेलाची पानं, म्हणूनच मंगळागौरीत वापरलेल्या पत्रीचा वापर दुसर्‍या दिवशी काढा करुन पिण्याची पद्धत होती.

  पूर्वी घरांना अंगण असायचं, लहानशी परसबाग असायची. स्त्रिया परसातून पत्री गोळा करत म्हणूनच अडीअडचणीला किरकोळ आजारांवर लागणारी औषधी पानं, गरज भासली की लगेच सापडायची. प्रत्यक्ष सेवन न करता काही वनस्पतींच्या सान्निध्यात राहिले तरी बरं वाटतं असे म्हणतात. तुळस दिवस-रात्र प्राणवायू देत असल्याने हवा शुद्ध राहते. ज्या गावात अडूळसा असेल, त्या गावात क्षयरोग होत नाही, असे म्हटले जायचे. आता मात्र आपण झाडांपासून लांब जात आहोत. लहान-सहान तक्रारींसाठी देखील घरगुती उपाय न करता सरळ आपण गोळ्या घेतो. कारण वरच्या मजल्यावर वास्तव्यास असल्यामुळे परसदार नाही, बाग नाही की झाडंही नाही. सुदैवाने आपण काही औषधी वनस्पती खिडकीतल्या बागेतही लावू शकतो. त्यांची सविस्तर माहिती करुन घेऊया…

 तुळस
घरोघरी तुळस असली तरी ती नीट वाढत नसल्याची बर्‍याच लोकांची तक्रार असते. टवटवीत पानांच्या, डेरेदार कृष्णतुळशीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. बेताचं पाणी आणि सतत मंजिर्‍या काढतं राहणंही तेवढच आवश्यक आहे. एक तुळस घरी असली की अनेक व्याधी घरा बाहेत जातात. सर्दी, पडसे, ताप यावर पानांचा रस गुणकारी ठरतो. तसेच  तुळशीच्या पानांबरोबरच इतर औषधी घालून चहा किंवा काढा केल्यास तो ही उपयोगी ठरतो. सारखी उचकी लागत असेल तर तुळशीच्या पानांचा रस मधात कालवून देतात. त्वचारोगांवर तुळशीची पाने चोळली तरी त्याचा फायदा होतो.


 गवती चहा
  गवती चहाच्या पातीमुळे चहाची लज्जत तर वाढतेच, शिवाय तरतरीही येते. घरच्या घरी केलेल्या सुप्सला गवती चहामुळे हॉटेलसारखी चवही प्राप्त होते. गवती चहा हा एक रामबाण उपाय आहे. तापावरही या काढ्याने भरपूर घाम येऊन उपाय होतो. गवती चहाचे रोप कुंडीत असले तर त्याच्या शेजारी तुळसही असावी. कधी दमून भागून आलात की त्यांचे मिश्रण करुन गरमा-गरम उत्साहवर्धक पेय तयार होते. गवती चहाचे रोप लावल्यानंतर ते पहिली दोन वर्ष चांगले वाढते. त्यानंतर मात्र त्याची मूळं घट्ट होतात आणि नवीन पाती येत नाहीत. अशावेळी संपूर्ण झाड उपटून त्याचे लहान-लहान भाग करुन दुसर्‍या कुंडीत नव्याने लावावेत.


  ब्राम्ही
अत्यंत देखणी, नाजूक गोल पानांची शोभेची वनस्पती. या वनस्पतीला ‘मंडूकपर्णी’ही म्हणतात. हँगिंग बास्केट्समध्ये ब्राम्हीची छान वाढ होते. पाणी साचलं तरीही ब्राम्हीच्या वाढीवर परिणाम होत नाही. पूरळ, फोड येत असल्यास ब्राम्हीचा रस गायीच्या तूपात मध घालून घेतात. केसांच्या वाढीसाठी, स्मरणशक्ती वाढवायला देखील ब्राम्हीचे सेवन करतात. ब्राम्हीचे तेल सगळ्यांच्या परिचयाचे असेलच.


 पुदिना
 अपचन, अजीर्णावर पुदिन्याची ताजी पान गुणकारी सिद्ध होतात. चांगल्या दर्जाच्या पुदिन्याच्या बाजारातून आणलेल्या जुडीतल्या पाच-सहा काड्या कुंडीत खोचल्या तरी त्यांना मूळं फुटतात. मात्र, भरपूर सूर्यप्रकाश असेल अशा जागेवर पुदिन्याची कुंडी ठेवावी. झाडाला भरपूर पाणी द्यावे. जेवढ्या फांद्या खुडाल, तेवढ्या त्याला शाखा फुटतात. अधून-मधून कुंडीत माती, खत घालत राहावे.


 कोरफड
बागकामाची आवड तर आहे, पण वेळ नाही, अशा हौशी लोकांसाठी हे सर्वगुण संपन्न झाड. एकदा कुंडीत लावलं, अधून-मधून पाणी घातलं की वर्षानुवर्ष काहीही काळजी न घेता कोरफड वाढते. कीड नाही की रोग नाही. कोरफडीचेही वेगवेगळे प्रकार असतात. तेव्हा जाणकार व्यक्तीला विचारुन कोरफडीची लागवड करावी. वापरायला सर्वात खालचं मांसलं पान घ्यावे. कोरफडीचे काटे धारदार चाकूने काढावेत. त्यानंतर सालं काढून गर वापरायला घ्यावा. जखम झाल्यास, हळदीत कोरफडीचा गर घालून त्याचा लेप लावावा. त्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठीही कोरफडीचा लेप फायदेकारक आहे. फेसपॅक म्हणूनही तो चेहर्‍यावर लावता येतो.केसांच्या अनेक समस्यांवरही कोरफडीचा लेप उपायकारक ठरतो. कोंडा, केसांचे गळणे, केसांची वाढ यासाठी कोरफडीचा गर मिक्सरमध्ये वाटून पातळ करुन लावल्यास उत्तम. खोकल्यावरही हा गर अत्यंत गुणकारी आहे. गर+सूंठ पूड आणि हळद मधात घालून चाटण दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम मिळतो. पोट साफ न होण्याची तक्रार असेल तरी कोरफडीचा गर कामी येतो.



  रुई
 मारुतीला रुईची पानं माळेच्या स्वरुपात वाहतात. शेतात काम करताना रुईच्या औषधी गुणधर्मांचा फायदा मी अनेकवेळा घेतला आहे. काटा रुतून मध्येच तुटला की तो काढणे अवघड जाते. अशा वेळी चिकाचा एक थेंब लावला की तिथं फोड येऊन काटा काढणे सोपं होते. लहान मुलांचं पोट दुखलं की पान गरम करुन शेकतात.


 पानफुटी
 आपण बर्‍याचदा शोभेसाठी पानफुटी कुंडीत लावतो. अगदी कमी पाण्यावर लागणारे, मांसल पानांच देखणं झाड. पण आहे खूपच औषधी. मूतखडा झाल्यावर बरीच लोकं याच्या पानाचा वापर करतात. याच्या पानांचा रस जंतांवरही गुणकारी असतो. लहान सहान जखमांवर पानफुटीचा रस लावल्यास जखमेतून रक्त वाहात असल्यास थांबते.  खोकल्यावरही पानफुटी गुणकारी आहे. पानफुटीचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे जाणकार व्यक्तींना औषधी प्रकार कोणता हे विचारुनच वापरावे.


  दुवार्
 बर्‍याच वेळा  निर्माल्य कुंडीत टाकले की आपोआप दुर्वा रुजतात. उष्णतेमुळे येणार्‍या तापावर दुर्वा अत्यंत गुणकारी मानल्या जातात. म्हणूनच गणपतीला त्या वाहिल्या जातात. उन्हाळ्यात घोणा फुटतो आणि नाकातून रक्त येते, अशा वेळी दुर्वांच्या रसाचे दोन थेंब नाकात घालावेत.


 आघाडा
गणपतीच्या पत्रीतली ही वनस्पती अगदी जंगली वाढताना आढळते. कुणीही ती कुंडीत लावण्याचा प्रयत्न करत नाही. पण ही वनस्पती इतकी गुणकारी आहे की ती अवश्य लावावी. मला प्रत्यक्ष त्याची प्रचिती अनेक वेळा आली आहे. कावीळ झाली की भूक लागत नाही, अशाने अशक्तपणा वाढतो. माझ्या लेकीला असे झाले असता आदिवासी सहकार्याने मूळ उगाळून तो कालवून घ्याचा सल्ला दिला. काही तासातच तिला भूक लागली. काटा गेला की यांच्या पानांना ठेचून बांधले की काटा बाहेर निघतो. दाढ दुखत असली की आघाड्याची पानं चावून खावीत.


 निर्गुंडी
 निर्गुंडी कुंपणाला लावले जाते, हीच वनस्पती कुंडीतही लावता येते. दमून-थकून आल्यावर गरम पाण्यात निर्गुंडीचा पाला घालून आंघोळ केल्यास दुखर्‍या अंगाला आराम मिळतो. गावी तर शेतावर कष्ट करुन आलेल्या बैलांना देखील अशीच शेकत-शेकत आंघोळ घालतात. कुठे सूज आली की पाला वाटून गरम करुन शेकतात.


  झेंडू
 नवरात्रीत झेंडूचे महत्त्व खूप असते. खरं तर प्रत्येक सणालाच झेंडूची फुले आवर्जून वापरली जातात. झेंडूचे गुणधर्म एवढे असतात की, FIRST AID  म्हणून एक तरी रोपटं कुंडीत असावं काही वेळा सुखंटला स्पर्श  झाल्यावर प्रचंड खाज सुटते. अशावेळी पाल्याचा रस लावावा. जखम झाल्यावरही पानंाचा रस लावता येतो.


  नागवेल
 जेवणानंतर कुरकुरीत ताजं पान खायचे असेल तर ते आपल्या बागेतलंच असावं. ज्या  ठिकाणी सूर्यप्रकाश तीव्र नसेल तिथे हा वेल फोफावतो. चकचकीत हिरव्या रंगाच्या पानांचा वेल मनीप्लांट सारखा  चढवता येतो. पण कुंडीत पाणी कधीच साचू नये, वरच्यावर शेणखत/गांडूळखत घालत राहावे म्हणजे पानांचा आकार लहान होत नाही.


  अडुळसा
 खोकल्यावर अत्यंत गुणकारी औषध म्हणून अडुळसा सुपरिचित आहे. याची नुसती फांदी रोवली तरी त्याला मूळं फुटून चांगली रोपं तयार करता येतात. पक्व पानांचा रस करता येतो. पानं जराशी तव्यावर गरम करून वाटून पिळली की रस काढता येतो. हा रस मध घालून घेतात किंवा खडीसाखरही वापरता येते. अंगावर सूज आली असल्यास पानं तव्यावर गरम करुन सुजेवर बांधल्यास आराम मिळतो. पूर्वी याच्या वाळलेल्या पानांच्या पुड्या कपड्यांमध्ये ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळे वस्त्रांना कसर लागत नाही. अडुळसाच्या पानांची बीडी करुन ओढताना मी लोकांना बघितले आहे. त्याने दमा कमी होतो असे म्हणतात.


 गुलाब
 सर्वांच्या परिचयाचे आवडते फूल गावठी गुलाब. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ‘‘गुलाब पंखूडी‘‘ मिठाईवर घालतात. रोज जरी एक-दोन फुलं लागली तरी त्याचे गुलकंद करता येते. खडीसाखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे थर करुन बर्णी उन्हात ठेवली की छान गुलकंद तयार होतो. पित्त, उष्णता, शौचास साफ होणे, डोळ्यांची जळजळ अनेक व्याधींवर उपयुक्त ठरते.


 जास्वंद
 जास्वंद अर्थात गणपतीचे लाडके फुल. गावात लहान मुलं जास्वंदाच्या पाकळ्या खाताना दिसतात. जास्वंदाची फुलं खाल्ली की कृमींचा नाश होतो असे म्हणतात. मेंदूची तरतरी वाढवण्यासाठी देखील जास्वंदाची फुले खडीसाखरे बरोबर खाल्ली की  फायदा होतो. पानांचा-फुलांचा वापर करुन तेल बनवता येते. त्याने केस काळेभोर, लांब सडक राहतात.


  औषधी वनस्पती लावताना हे लक्षात घ्यावे  या वनस्पतींचा वापर वैद्यांना विचारूनच करावा.


  कुंडी व्यवस्थित भरावी, पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली मोठं छिद्र असावं, माती आणि कुजलेलं शेणखत किंवा गांडूळखत २:१ प्रमाणात मिसळून भरावे औषधी वनस्पतींवर रोग किंवा कीड लागल्यास रासायनिक औषधांचा वापर करु नये.  उन्हात वाढलेल्या वनस्पतीमध्ये सावलीत वाढलेल्या वनस्पतींपेक्षा जास्त गुणधर्म असतात




सौजन्य : दै. मुंबई तरुण- भारत  
तुळस

ज्यांना जेनेटिक विकार आहेत म्हणजे ज्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक काही मुलभूत बदल होऊन विकार झाले आहेत त्यांना कपाळावर तुळशीच्या खोडाचे गंध लावल्याने फायदा होतो. तुळस अग्निदीपक आहे. भूक लागत नसल्यास चार चमचे तुळशीचा रस थोडी खडीसाखर घालून घेतल्यास भूक लागते. पोटात दुखत असल्यास तुळशीच्या रसात थोडा लिंबाचा रस घालून घेतल्यास पोटदुखी थांबते. [ दुसऱ्याच्या उत्कर्षाने पोटदुखी जाणवत असेल तर ती याने बरी होणार नाही.....हाहाहा] दमा, अस्थमा असल्यास तुळशीचा रस खडीसाखर घालून घेतल्यास उपयोग होतो. त्यात थोडी मिरी पावडर, लवंग पावडर आणि अडुळसा घातल्यास उत्तम. खडी साखरेऐवजी मधातून घेतल्यास कफ विकारात अतिशय चांगला उपयोग होतो. तुळशीची पाने वाळवून त्याची पावडर करून सर्दीने डोके दुखत असल्यास तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी थांबते.

वेंकटेश्वरा विद्यापीठ आणि इतर काही संशोधकांच्या अभ्यासानुसार तुलस हीच एक वनस्पति अशी आहे की जी "ओझोन" [O३] बाहेर टाकते. सध्या म्हंटल्या जाणार्या ग्रीन हाउस इफेक्ट नुसार पृथ्वीवर आलेल्या सूर्य प्रकाशातील थर्मल इन्फ्रारेड किरण वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात येथील भयानक प्रदूषणामुळे धरून ठेवले गेल्याने पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि त्यामुळे बर्फ़ाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून हे पाणी समुद्रात मिसळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि फ्रीज सारख्या उपकरणांमुळे अर्थात त्यात वापरल्या गेलेल्या CFC सारख्या रसायनांमुळे वातावरणाच्या वरील ओझोनचा थरही विरळ होत चालला आहे. आणि या निर्माण झालेल्या मोठ्या जागेतून सूर्य प्रकाश अजून तीव्रतेने पृथ्वीवर येतो आहे. आपण अंगावर जे Body स्प्रे मारतो त्यामुळे शरीराभोवतीचा ओझोन कमी होतो. या सर्वांवर बिन खर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे तुळस लावणे होय.

तुळशीला सकाळी माय भगिनी पाण्याचे अर्घ्य देऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करतात. त्यामुळे पाण्यातून परावर्तीत झालेल्या सूर्यप्रकाशातील ७ रंग त्या स्त्रीच्या शरीरावर पडून तिला त्याचा फायदा होतो. तसेच तुळशीच्या वासाने मन प्रफुल्लीत होते. हवा तुळशीने शुद्ध तर झालेलीच असते. त्याचाही लाभ होतो. प्र+ दक्षिणेचा सुद्धा लाभ होतो. प्र म्हणजे पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूने. सारे सौर मंडळ, ग्रह, तारे, आकाशगंगा, अणु, रेणू सारे सारे फिरत आहेत. त्यामुळे जगाची निर्मिती, स्थिती आणि पोषण चालू आहे. तर मग आपणही जर आपल्याला पूज्य असलेल्या देव, गुरु किंवा वनस्पती आणि प्रतीकाभोवती जर फिरलो म्हणजेच प्रदक्षिणा केली तर आपलेही जीवन सुलभ, आनंदी आणि सुखमय होईल. ग्रहणकाळामध्ये अन्न आणि पाणी दुषित होऊ नये म्हणून त्यावर तुळशीची पाने ठेवतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल आणि तुळस घालतात.....दोन्हीही जंतुघ्न असल्याने... तुळशीतून उडणारे यलो ओईल हे हवा शुद्धही करते आणि डासांना पळवून सुद्धा लावते.

इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की खूप पूर्वी माझ्या एक गोष्ट वाचनात आली होती ती म्हणजे पुण्याजवळील NCL Laboratory ला तुळशीच्या पानात "सोन्याचा" अंश आढळून आला होता. कदाचित त्यामुळेच रुक्मिणीने श्रीकृष्णाची सुवर्णतुला करताना तुळशीचे एक पान सोन्याच्या पारड्यात टाकले असावे.

तुळस ही कफ विकारावर अत्यंत उपयोगी आहे. शिवाय सौंदर्यवर्धक सुद्धा आहे....



(Article by Dr. Hemant Sahstrabuddhe alias Kaladas)
आले (Ginger)

    भूक वाढविते. जेवणास बसण्यापूर्वी आले खालल्यास तोंडाची रुची वाढून भूक वाढते
    आल्याच्या रसानी श्वास लागत असल्यास, छातीत दुखत असल्यास आराम मिळतो
    आले व लिंबाचा रस पोटात वायू झाला असल्यास किंवा ताण आल्यास गुणकारी आहे
    आले व मधाचे चाटण खोकल्या पासून आराम देते
    उलटी होत असल्यास आल्याचा रस व थोडी खाडी साखर घेतल्यावर उलटी थांबते
    थंडी पासून डोके जड झाले असेल तर आल्याचा रस डोक्यावर चोळावा, डोके दुखायचे राहते
    आल्याचा रस मीठ घालून चोळल्यास सांधे दुखी थांबते
    कानास ठणका लागला असता कोमात आल्याचा रस घलव. ठणका राहतो.
    रोजच्या भोजनात आले हे आवश्यक आहे


ओवा (Carom Seeds)

    पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे
    रोज रात्री झोपताना चिमुटभर ओवा खालल्यास पोट दुखी, पोट फुगणे, अजीर्ण होणे इत्यादी होणार नाही.
    'ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल', ही म्हण प्रचारात आहे.
    ओव्याने शौचास साफ होते
    ओव्याने पोटातील कृमी निघून जाते
    जेवण नंतर सम प्रमाणात ओवा, बदामाची बी व सुके खोबरे खालल्यास उरतील जळजळ होत नाही
    दुध पचत नसल्यास ओवा खावा. दुध पचते
    Bedwetting (झोपेत लाघवी) करणाऱ्या लहान मुलांना रोज रात्री अर्धा गरम ओवा खायला दिल्यास फरक पडतो
    अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो

खसखस (Poppy seeds)

    खसखस शक्ती साठी उत्तम आहे. खसखसच्या लापशी ने शक्ती येते
    खसखस सुका खोकल्यावर उपायकारक आहे


जायफळ आणि जायपत्री (जावंत्री) (Nutmeg and Mace)

    जायफळ आणि जायपत्री एकाच झाडाची फळे आणि पाने अहेत. जायपत्री उष्ण अस्ते.
    चोरट्या तापावर, कफ, खोकला असला तर जायपत्री विद्याच्या पानाबरोबर देतात
    जायपत्री पाण्यात उगाळून डोक्यास लावल्यास डोके दुखी थांबते
    भूक न लागणे, खाणे पचत नसणे, भूक मंद होणे, जायपत्री ह्यावर उत्तम उपाय आहे
    जायपत्री व खोबरेल तेल केसाला लावले तर केस गळणे थांबते व केस वाढतात
    सांधे दुखत असल्यास जायपत्रीचे तेल लावल्याने दुख ताबडतोब बरे होते


कांदा

    कांदा अजीर्णावर चांगले औषध आहे.
    भूक वाढवते व बळ देणारा आहे.
    परसाकडला साफ होते.
    कांदा व दह्याच्यी कोशिंबीर खालल्यास झोप छान लागते.
    कांदा भाजून गरम गरम बांधल्यास शरीरावर उठलेली गाठ फुटून जाते.
    कांदाच्या दर्पाने मृच्छा कमी होतो.
    मुळव्याधीवर कांदा उत्तम औषध आहे.



जिरे / शहाजिरे
    भूक लागत नसल्यास ओकारी येत असल्यास, जिरे द्यावे
    जिरे आणि वावडिंगाची पूड गुळाबरोबर दिल्यास लहान मुलांचे जंत मरतात
    पोट फुगले तर जिरे खावे
    सुन्ठीची व जीऱ्याची पूड मधातून घेतल्यास खोकला थांबतो
    जीऱ्याची पूड साखरे बरोबर दिल्यास जुलाब (आव) थांबतात. आंबट ढेकर व पित्त पडत असल्यास सुद्धा हे उपयोगी आहे



तीळ

    तीळामुळे भूक वाढते व शक्ती येते
    मुळव्याधीवर तीळ रोज खालल्यास परसाकड साफ होवून बरी होते
    तीळ वाटून गरम करून शेकल्यास सूज कमी होते
    तीळ आणि ओवा समप्रमाणात दोन वेळा घेतल्यास वारंवार लघवीस जाण्याचे प्रमाण कमी होते
    तिळाच्या पोतीसाने शेकल्यास वायुमुळे आलेली चमक निघून जाते
    तिळाचे तेल केसास लावल्याने केस चांगले राहतात व वाढतात



दालचिनी

    पोट फुगत असेल, वायू सरत नसेल, भूक बिलकुल लागत नसेल तर दालचिनी,
    सुंठ व वेलदोडे ह्यांचे (समभाग) चूर्ण जेवणापूर्वी मधा बरोबर घ्यावे.
    दालचिनीच्या गोळ्या सुका खोकला सुटण्यासाठी देतात.
    जीर्णज्वर, अग्निमांघ व साधारण कडकीवर सितोपलादी चूर्ण देतात त्यामध्ये दालचिनी असते.
    दालचिनी परसाकड थांबवणारी आहे.


धने

    धने लघवीस साफ करणारे आहेत.
    रुची वाढून भूक लागते.
    धने आणि साखर खाल्यास पित्त बसते.
    धने पाचक आहेत.
    धने कृमिनाशक आहेत. नुसते धने किंवा मधाबरोबर पूड घेतल्यास जंत कमी होतात.
    धने आणि जेष्ठमध यांचा काढा खोकल्यावर उत्तम औषध आहे.
    धने दृदयाला अत्यंत उपकारक आहेत. साखरेबरोबर धने घेतल्यास बेचैनी जाऊन आराम पडतो.


नागकेशर

    नागकेशर हे रक्तमूळव्याधीचे औषध आहे.
    नागकेशर लोण्यातून पायाला चोळले असता पायाचा दाह शांत होतो.


पुदिना

    पुदिन्याची चटणी तोंडास रुची देते व अन्न पचवते.



सुके खोबरे

    शौचास फार होत असल्यास सुके खोबरयाचा तुकडा खाल्यास शौचास जावेसे वाटणार नाही.
    सुके खोबरे वीर्यवर्धक आहे.
    लसूण खोबरयाची चटणीने वात जातो.



बडीशेप

    कोमट पाण्याबरोबर बडीशेप खाल्ल्यास वायुने फुगलेले पोट उतरते.
    बडीशेप बुद्धी वाढवणारी आहे. बडीशेपचे चूर्ण व मध सेवन केल्यास बुद्धी तरतरीत होते.
    अन्न पचविण्यास बडीशेप उपयुक्त आहे.
    पोटदुखी कमी करते.
    बडीशेपचा काढा साखर घालून दिल्यास ओकारी व अंगाचा दाह थांबतो.
    थोडया तुपात बडीशेप तळून, वाटून ते चूर्ण मस्तकावर बांधल्यास मस्तक दुखी थांबते.


मिरची

    ओली कोथिंबीर व हिरव्या मिरचीची चटणी तोंडास रुची आणते.
    लाल मिरच्यांची बारीक पूड व दुप्पट गुळ घालून केलेल्या गोळ्या खाल्ल्यास पोटदुखी थांबते.
    आमांश, हगवण, कोलरा, हयात मिरचीच्या गोळ्या
    कांद्याच्या रसात सम प्रमाणात मिरची व चुन्याच्या मिश्रणाची गोळी करतात)
    मिरचीचे तिखट दारू पिणारया माणसाना भूक लागत नसेल तेव्हा दारू सोडून खाल्यास भूक चांगली लागते.



मिरे

    भूक वाढविणारया सर्व औषधात मिरे उत्तम.
    मिरे पोटातील वात कमी करणारे आहे.
    मिरे कफ कमी करणारे आहे.
    चिमुटभर मिरयाचे चूर्ण पंचपात्रीभर कढत पाण्याबरोबर घ्यावे खोकला थांबतो.
    धाप लागली असल्यास चिमटीभर मिरयाचेचूर्ण,४ थेंब मध व चिंचोकाभर तुपाशी वरचेवर घेतले असता श्वास बसतो.
    मिरपूड आल्याच्या रसात घेतल्यास अन्न पचते.
    मिरे पोटशूळ थांबवते.
    ४ मिरयाचे दाणे सकाळ, संध्याकाळ चावून खालल्यास कृमी नाहीशी होते.
    कसल्याही हिवतापावर मिरयाचा काढा वस्ताद आहे.
    दात दुखत असल्यास मिरयाच्या पाण्याने वारंवार गुळण्या केल्यास दुखणे थांबते.



मीठ

    रुची आणणारया पदार्थात मीठ श्रेष्ठ आहे.
    मीठ कफघ्न आहे. मीठाच्या पाण्याने कफ पातळ होऊन भराभर सुटतो व त्रास कमी होतो.
    थोडे आले भाजून त्याला मीठ लावून खालल्यास पोट साफ होते.
    सुंठ भाजून मीठ लावून खाल्ली असता वायू सरून ढेकर बंद होतात व पोट साफ उतरते.
    मीठामुळे शौचास व लघवीस साफ होते.
    कफाने भरलेली छाती मीठाने शेकली असता हलकी होते.
    मीठ गुणकारी असले तरी जास्त खाण्याचा पदार्थ नव्हे हे लक्षात असू द्या. अपाय होण्याचा संभव असतो.
    ४ मिरयाचे दाणे सकाळ, संध्याकाळ चावून खालल्यास कृमी नाहीशी होते.
    गांधीलमाशी चावली असल्यास मीठ लावून हळूहळू चोळल्यास आग थांबते.
    मीठ कृमिहन आहे.



मेथ्या

    भूक वाढते, पोटात वायू होऊ देत नाही.
    मेथ्या कफघ्न आहे.
    सर्व अंग दुखत असल्यास, सांध्याला कळा लागल्या असल्यास,
    वातांना हैराण झाले असल्यास मेथ्यांचे लाडू करून खवे. कळा थांबतात . वात बरा होतो
    मेथ्यांचे लाडू वातावर व शक्तीसाठी उत्तम घरगुती औषध आहे



मोहरी

    कफाच्या तापावर मोहरीची पूड मधातून घेतल्यास ताप कमी होतो
    उचकी थांबविण्यास मोहरीची पूड, मध व तुपाचे चाटण द्यावे
    मोहरी पूड, साखर, तुपात चार दिवस घेतल्यास भूक वाढते
    पोटदुखी थांबवते
    मोहरी कफ़घ्न आहे. खोकल्यावर व कफावर मोहरी सारखे दुसरे उत्तम औषध नाही
    मोहरी कृमिघ्न आहे




लवंग

    कफ नाहीशी करणाऱ्या औषधांमध्ये लवंग अग्रस्थानी आहे
    खोकल्यावर, ढास लागली असेल तर लवंग चावून खालल्यास ठसका थांबतो, खोकला सुटतो
    भूक लागण्यास लवंगा उत्तम
    लवंगाचे पाणी पिल्याने तहान कमी होते
    ओकारीची भावना लवंगेने नाहीशी होते
    दात दुखत असल्यास दातात लवंग धरली असता दुखणे थांबते




लसुण

    लसुण पाचक व धातुवर्धक आहे
    अजीर्ण झाल्यास पोटफुगी असल्यास लसुण तुपात तळून खावा
    बुद्धी तरतरीत करते वध्विते. शाळकरी मुलांना तर ती अवश्य द्यावी
    लसाणामुळे आवाज खुलतो
    अंगात चमक निघत असल्यास लसुण खावा
    लसुण मोडलेले हाड सांधणारी आहे. लसुण खालले तर मोडलेले हाड लवकर बरे होते
    लसुण खालल्यास शौचास साफ होते
    छातीत दुखणे, छातीत जड वाटणे दमल्या सारखे वाटणे ह्यावर लसुण रामबाण उपाय आहे
    लहान मुलांची कृमी लसुण नाहीशी करते
    नित्य लसुण खालल्यास अंगावरील सूज जाते
    उचकी येत असल्यास लसुण खावा. उचकी थांबते
    लसुण खालल्याने श्वास कमी होतो



वेलदोडा

    वेलदोडा अत्यंत पाचक आहे
    अन्न पचविण्यास अपचनामुळे करपट ढेकारांवर वेलदोडा उत्तम उपाय आहे
    वेलदोडा कफघ्न आहे.
    वेलदोडयाचे व सुंठीचे वस्त्रगाळ चूर्ण मधातून चाटावयास दिल्यास कफ पडण्याचे थांबून खोकला कमी पडतो
    पोटफुगीवर वेलदोड्या सारखे जालीम औषध नाही
    वेलदोडा रुची उत्पन्न करणारा आहे


हळद

    हळदीचा उपयोग पोटातून व वरून रक्तशुद्धीसाठी करतात
    हळद, गुळाच्या लहान गोळ्या, वाव्दिन्गाच्या काढ्या बरोबर पिण्यास दिल्यावर जंत कमी होतात
    समप्रमाणात हळद आणि तीळ व दुप्पट गुल घालून दुवक़्त दोन घोट कोमट
    पाण्याबरोबर घेतल्यास कसल्याही प्रकारची जास्त झालेली लघवी थांबते
    सर्दी पडसे झाले असता हळद दुध घेतल्यास आराम पडतो
    हळकुंडाचा जाड लेप पडल्यावर, लागल्यावर लावण्याची प्रथा आहे
    हळद जंतुघ्न (disinfectant) आहे
    देवीचे व्रण कात व हळद लावल्यास लवकर भरून येतात
    डोळे आले असल्यास स्वच्छ कापडाचे फडके हळदीच्या काढ्यात भिजवून डोळ्यावर ठेवावे. आग खुपणे बंद होते



हिंग

    शुद्ध हिंगास अतिशय उग्र वास येतो. त्याची उग्रता कमी करण्यासाठी म्हणून प्रक्रियाकरून तो स्वयंपाकात वापरतात.
    त्याला बांधणी हिंग म्हणतात.
    गव्हाचे पीठ व डिंक शुद्ध हिंगाच्या पाण्यात मिसळून त्याची बांधणी हिंग तयार होते हिंग पाचक आहे.
    अर्धशिशीवर हिंगाचे पाणी नाकपुडयात थेंब थेंब सोडतात.
    हिंग अग्निदीपक, रुचीकर, पाचक व जंतुनाशक असल्याने दम, खोकला, कफ, इत्यादी विकारांवर उपयुक्त आहे.
    दाढदुखी, दंतकृमीसाठी भाजलेला हिंग दाढेखाली धरावा.
    सर्दीने कानात दडे बसल्यास उत्तम हिंग कापसात गुंडाळून कानात घालून ठेवावेत
    आहारामध्ये / मसाल्यांमध्ये प्रमाण पेक्षा जास्त हिंग असल्यास जळजळ जाणवू लागते.
    त्यामुळे चवीला जरी छान वाटत असले तरी योग्य प्रमाणातच हिंगाचा वापर करवा.

घरगुती वापरातील मसाल्यांच्या घटकांमध्ये बरेच औषधी गुण असतात.

प्रत्येक व्यक्तीचे वय, शारीरिक ठेवण, ठराविक अलर्जी इत्यादी गोष्टींसाठी नमूद केलेले उपाय अमलात आणायच्या अगोदर आपल्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.



सौजन्य - http://www.pallavisspices.com

तुमचे केस गळत आहेत...तर हे कराच !

कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस. कांदा हा केस गळती रोखतो. कारण कांद्यामध्ये सल्फर मात्रा अधिक असते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्त संचार चांगला होतो. त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्प इंफेक्शन नष्ट करतो. आणि त्याचबरोबर केसांना मजबूत बनण्यास मदत करतो. कसा उपयोग करणार - कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस्त केसांना लावावा. तीन मिनिट हा रस ठेवू द्यावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे. - कांद्याच्या रसाबरोबर मध लावलेली चांगली. एक चतुर्थ कप रसात थोडीशी मध मिसळायची. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे. त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल. - एक कांदा कापून रम भरलेल्या ग्लासात टाकावा. कांदा एक रात्र तसचा ठेवावा. दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी. त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील. या रमने केसांचा मसाज करावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करावा. केस गळायचे थांबतील. - एक चमच्या मद आणि एक चमच्या दालचिन पावडरमध्ये थोडे ऑलिव तेल घेऊन त्याची पेस्ट करावी. आंघोळ करण्यापूर्वी केस धुण्याआधी ही पेस्ट केसांना लावायची. १५ मिनिटानंतर गरम पाण्याने केस धुवावे. असं केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल. - आकाशवेल (अमरवेल) पाण्यात उकळवा. या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे थांबतात. केस गळण्यासाठी हे टाळा - तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफी घेण्याचे टाळा. तसेच नशायुक्त पदार्थांचे सेवन करू नका. धुम्रपान करण्याचे टाळा. त्यामुळे केस गळण्याचे तात्काळ बंद होईल. जास्तीत जास्त पाणी प्या. - मोहरीचे तेल मेहंदीच्या पानावर टाकून पाने गरम करावीत. ती थंड करून दररोज केसांना लावावीत. त्यामुळे केस गळण्याचे थांबतील. - मेथीचे बी पाण्यात रात्री भिजत टाका. सकाळी उंबळलेले बी वाटा आणि त्याचा लेप एक तास तरी केसांना लावून त्यानंतर केस धुवा. हे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल. तसेच नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल. - नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे अधिक चांगले. केस धुण्याआधी एक तास हे तेल केसांना लावणे आवश्यक आहे. त्यामुळे केस गळायचे थांबतात. • झी २४ तास यांच्या सौजन्याने

सोमवार, १६ जून, २०१४

हृदयविकार

हृदयविकार हा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकला असेल. हृदयविकार हे नाव फार ढोबळ आहे. कारण 'विकार' म्हणजे 'आजार'. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला 'झटका' असा शब्द पडला आहे. हृदयस्नायूचा जास्त भाग निकामी झाला तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या स्वत:च्या रक्तवाहिन्या (रोहिण्या) असतात. हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे 70 वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कोठल्याही स्नायूपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते. हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो. भारतात हृदयाच्या आजारांमध्ये झडपांच्या दोषाखालोखाल याच आजाराचा क्रम लागतो. सुधारलेल्या देशांत तर हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. आपल्या देशातील श्रीमंत समाजातही असेच चित्र दिसते. सर्वसाधारणपणे हा आजार चाळिशी - पन्नाशी- साठी या वयोगटांत जास्त प्रमाणात येतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी आहे. स्थूलता, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, तंबाखू व धूम्रपानाचे व्यसन असल्यास हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कारणे हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला, की थोडया श्रमाने देखील हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. जेव्हा हृदयाला जास्त कामाची गरज लागते त्या वेळी (उदा. व्यायाम, थंडीचे वातावरण, भीती भावना अनावर होणे, इ.) ही कमतरता जाणवू लागते. प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी बरेच दिवस रक्तवाहिन्यांमधील दोष सुरू झालेले असतात. हृदयाचा रक्त पुरवठा खंडित होण्यामागे कारणे असू शकतात. (अ) कॉरोनरी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यात चरबीचे थर जमून त्या आतून गंजतात व अरुंद होतात. रक्तामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे आणि धूम्रपान ही यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. (ब) अति रक्तदाबामुळे हृदयावर जादा लोड/दबाव येतो त्यासाठी लागणारा हृदयाचा रक्तप्रवाह कमी पडतो. (क) कधीकधी भावनिक ताण (राग, भीती) अचानक येऊन कमकुवत हृदय बंद पडते. (सिनेमात असे प्रसंग नेहमी असतात.) (ड) शक्यतेपेक्षा अधिक श्रम व जोर लावणे, काम/व्यायाम करणे. विशेष करून थंडीच्या वातावरणात असे केल्यामुळे रक्तपुरवठयाची वाढीव मागणी पूर्ण करता न आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (इ) रक्ताच्या बारीक गाठी हृदय-रक्तवाहिन्यात अडकून प्रवाह बंद पडणे. हृदयवेदना रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या'हृदयवेदनेची' विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते. या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते. रक्तपुरवठा कमी किंवा बंद अशा अवस्थेत जास्त वेळ गेला तर हृदयाच्या संबंधित स्नायूच्या पेशी मरतात. मग ही वेदना दोन तीन दिवस तशीच राहते. त्याचबरोबर दम लागणे, घाबरे होणे, छातीत धडधडणे, (किंवा नाडीचे ठोके कमी पडणे), खूप घाम, इत्यादी लक्षणे दिसतात. जर हृदयाच्या स्नायूंचा मोठा भाग निकामी झाला असेल तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. काही वेळा झोपेत किंवा विश्रांतीतही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रक्तपुरवठा बंद पडून मृत झालेल्या स्नायूंचे पाच-सहा आठवडयांत एका वेगळया प्रकारच्या चिवट पेशीमध्ये रुपांतर होते. तो भाग जोडपेशींनी भरून येतो. म्हणजे जखम भरून आल्यावर जो पांढरट सांधणारा भाग दिसतो तसा प्रकार होतो. ह्या भागाची स्नायूंप्रमाणे हालचाल होत नाही, पण हृदयात इतर उरलेल्या स्नायूभागांची वाढ होऊन काम चालू राहते. एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तो परत येण्याची शक्यता असते. रोगनिदान पहिल्यांदा हृदयविकाराचा हा त्रास होतो तेव्हा ओळखण्यासाठी हृदयवेदनेची जागा व स्वरूप महत्त्वाचे असते. - ही कळ छातीच्या मध्यभागापासून निघून डाव्या हाताच्या छातीलगतच्या बाजूला येते. याच्याबरोबर दम लागणे,घाम, इत्यादी त्रास असतो. - कधी कधी छातीत नुसतीच जळजळ किंवा खूप दम लागणे, पाठीकडे खूप दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. - काही जणांना काहीही लक्षण न जाणवताही हृदयविकाराचा झटका येतो (पण ते जाणवत नाही). निदान होण्यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक आहे. - हृदयाचा आलेख (इसीजी) यांच्या मदतीने निदान होते. इसीजी म्हणजे हृदयाच्या सततच्या सूक्ष्म विद्युतप्रवाहांचा आलेख असतो. या आलेखातील बदलांवरून इतरही काही निष्कर्ष काढता येतात (उदा. हृदयाचा आकार, निरनिराळया कप्प्यांचे परस्पर संबंध, इ.). - रक्ततपासणीमध्ये काही विशिष्ट द्रव्ये वाढलेली दिसतात. तपासण्याहृदयविकारामध्ये केल्या जाणा-या तपासण्या 1. ECG कार्डिओग्राम: ह्या तपासणीमध्ये रुग्णाच्या दोन हात (मनगटे), दोन पाय (घोटे) व छातीवर इलेक्ट्रोडस् जोडतात. हृदयाच्या क्रिया या हृदयात सौम्य स्वरुपात निर्माण होणा-या विद्युतप्रवाहाने चालतात. या क्रियेचा आलेख म्हणजेECG. हृदयविकाराचा झटका,हृदयाच्या तालबध्दतेत निर्माण झालेले दोष,हृदयाच्या कप्प्यांमध्ये निर्माण झालेले दोष, इ. माहिती या तपासणीत मिळते. 2. स्ट्रेस टेस्ट : यात रुग्णास इलेक्ट्रोडस् लावून एका फिरणा-या पट्टयावर चालवतात व एकीकडे त्याचा ECG घेत असतात. व्यायामामुळे हृदयावर कामाचा बोजा वाढल्यावर स्थिर अवस्थेत न सापडलेले दोष स्ट्रेस टेस्ट मध्ये सापडतात. 3. स्ट्रेस थॅलियम/परफ्यूजन टेस्ट : यात रेडिओऍक्टिव्ह पदार्थ इंजेक्शनद्वारे रक्तात देतात व हृदयामध्ये त्याचे चलनवलन बघतात. 4. ऍंजियोग्राफी : हृदयविकारामध्ये ही तपासणी करतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या सक्षमतेने काम करतात की नाही हे यात समजते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे एक किंवा अधिक रक्तवाहिन्या तुंबल्या असतील तर त्यानुसार ऍंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची जरुरी लागते. हृदयविकाराच्या झटक्यावरचा उपचार रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करावा लागतो. रुग्णालयातही असे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही बरेच असते. प्रथमोपचार हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेक रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये जरा चालल्यावर छातीत मध्यभागी दुखणे, छातीवर दाब आल्यासारखे, घुसमट झाल्यासारखे वाटणे, इ. अशा त्रासावर एक अत्यंत प्राथमिक उपयुक्त साधन म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या सैल व रुंद करून रक्तप्रवाह सुधारणारे एक औषध-नायट्रेटची गोळी. हृदयवेदना आल्याआल्या ही गोळी लगेच जिभेखाली धरावी. काही सेकंदात औषध विरघळून जिभेखालच्या केशवाहिन्यांत शिरून रक्तात पसरते. रक्तावाटे हृदयाच्या रक्तवाहिन्यांत औषध पोचून तिथला रक्तपुरवठा सुधारतो. याबरोबर वेदना कमी होते. यावरून वेदना हृदयविकाराची आहे हे निश्चित कळते. त्याबरोबरच पुढील नुकसान टळते व हृदयपेशी तग धरू शकतात. त्याचबरोबर वेदना सुरु झाल्यापासून रुग्णास झोपवून ठेवावे. कमीत कमी हालचाल करु द्यावी. पुढील सल्ल्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवावे. हृदयविकाराची शक्यता क्वचित असली तरी ही अत्यंत स्वस्त असलेली गोळी नेहमी जवळ ठेवावी. यामुळे वेळप्रसंगी कोणालाही अत्यंत मोठी मदत होऊ शकेल. हृदयविकाराच्या रुग्णांनीही ही गोळी सदैव जवळ बाळगण्याची गरज आहे. या गोळीने रुग्णास जीवदान मिळू शकेल. या गोळीबरोबरच ऍस्पिरिनची एक गोळी चूर्ण करून पाण्यात मिसळून लगेच द्यावी. यामुळे रक्त जास्त प्रवाही होते व नुकसान टळते. यासाठी ऍस्पिरिनच्या लहान गोळया मिळतात. उपचार एकदा हृदयविकार झाला, की त्याचे परिणाम व पुढचे सर्व उपचार अत्यंत अवघड असतात. कधी रक्तवाहिन्या इतक्या निकामी होतात, की रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून देणे किंवा आतली चरबी खरवडून काढणे हेच उपाय उरतात. याशिवाय परत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घेत राहावे लागते. प्रतिबंध हृदयविकाराचे प्रमाण श्रीमंत-प्रगत समाजात वाढत आहे. अतिरक्तदाब हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे म्हणजे मांसाहारी जेवणाचा अतिरेक, चरबीयुक्त पदार्थ खात राहणे, वनस्पती तूप, इत्यादींमुळे रक्तातले चरबीचे प्रमाण वाढत जाते. हे चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमत जातात. हे या आजाराचे मुख्य कारण आहे. आहारावर नियंत्रण, शारीरिक कष्ट-व्यायाम आणि मानसिक आरोग्य या मार्गांनीच हृदयविकार टाळता येतील. योग्य आहार-विहार, तंबाखू, धुम्रपान टाळावे. उचित व्यायाम आणि मानसिक संतुलन याद्वारे हृदयविकार टाळता येतात. तसेच असलेला आजार हळूहळू बरा करता येतो. याबद्दल अगदी थोडक्यात पाहू या. आहार आहारात चरबी/तेल कमीतकमी वापरणे, कमी खाणे हे महत्त्वाचे. प्राणिज चरबी (मांसाहार, अंडे, इ.) वनस्पती तूप, बरीच तेले ही हृदयास हानीकारक असतात. त्यांचा वापर मर्यादित करावा किंवा टाळावाच. सोबत चांगली, मध्यम, वाईट तेलांचा एक तक्ता दिला आहे. मांसाहार टाळावा हे चांगले. श्रमाच्या व कष्टाच्या मानाने खाणे योग्य असावे. सर्व जादा अन्न शरीरात चरबीच्या रुपात साठते. भाज्या, फळे यांत चोथा जास्त, ऊर्जा कमी असते. असा आहार जास्त चांगला ठरतो. व्यायाम व्यायामाची मूलतत्त्वे वेगळया प्रकरणात दिली आहेत. इथे एवढे सांगणे पुरेल की निदान रोज किमान अर्धा तास चालणे हे अशा रुग्णांना आरोग्यासाठी आवश्यक आहे. मानसिक आरोग्य आत्यंतिक राग, द्वेष, कुढणे, इ. भावना हृदयाला हानिकारक आहे. निरनिराळया मार्गांनी त्यावर मात करा. योग-आसनांचा आणि श्वसन, प्राणायाम, योगनिद्रा, इत्यादी उपायांचा फार चांगला उपयोग होतो. हृदयविकार होऊ नये म्हणून सर्वोत्तम तेलांचे मिश्रण किंवा प्रमाण असे : गोडेतेल/सूर्यफुल/करडई/शिरस हे पाच भाग आणि मोहरी किंवा सोयाबीन तेल यांचा एक भाग. ही तेले मिसळण्याची गरज नाही; आलटून पालटून वापरू शकतो. उदा. न्याहरीच्या वेळी मोहरी/करडई/ शिरस किंवा सोया; तर दुपारच्या व रात्रीच्या स्वयंपाकात गोडेतेल/सुर्यफुल/करडई, इत्यादी. ऍंजिओप्लास्टी हृदयाच्या रक्तवाहिन्यांची कॅथेटर (नळीतून) दुरुस्ती करण्याचे तंत्र विकसित झाल्यापासून या रुग्णांना मोठे वरदान मिळाले आहे. ही संपूर्ण शस्त्रक्रिया क्ष-किरण यंत्रावर सतत पाहिली जाते. या शस्त्रक्रियेसाठी मांडीच्या किंवा दंडाच्या शुध्द रक्तवाहिनीतून नळी घातली जाते. या नळीतून आणखी एक वायर/तार घातली जाते. नळीतून मधून मधून क्ष-किरण चित्रात दिसेल असा द्रवपदार्थ सोडला जातो. अडथळयांची जागा यामुळे स्पष्ट कळून येते. हा अडथळा काढण्याजोगा असेल तर तारेने खरडून साफ केला जातो. यानंतर त्या ठिकाणी स्टेंट म्हणजे धातूची स्प्रिंग ठेऊन रक्तवाहिनी खेळती ठेवली जाते. या स्प्रिंगमध्ये औषधयुक्त प्रकार उपलब्ध आहे. या औषधाने तिथे रक्ताची गाठ होणे टळते. ही शस्त्रक्रिया केल्यावर 2/3 दिवस रुग्णालयात राहावे लागते व रक्त पातळ ठेवण्याचे औषध घेत राहावे लागते. आजाराचे स्वरुप मर्यादित असेल तर ही ऍंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया चालते. हृदयाच्या तीनही रक्तवाहिन्या जागोजागी खराब झाल्या असतील तर या उपचारांचा उपयोग नसतो. (अशावेळी बायपास शस्त्रक्रिया करावी लागते.) या उपचारांचा एकूण खर्च स्टेंट धरून 60-70 हजारापर्यंत येतो. केवळ ऍंजिओग्राफी (म्हणजे अडथळा निदान) केल्यास आठ ते दहा हजार खर्च येतो. ऍंजिओग्राफीत अडथळा दिसून आल्यास त्याच वेळी दुरुस्तीची ही शस्त्रक्रिया पार पाडता येते. यामुळे त्रास, खर्च व वेळ वाचतो. मात्र यात काही प्रमाणात धोकाही असतो. बायपास शस्त्रक्रिया हृदयाची एखादी रक्तवाहिनी अनेक ठिकाणी खराब झाली असेल, किंवा तीनही रक्तवाहिन्या खराब झाल्या असतील तर बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. गर्दीच्या कोंदट रस्त्याला जसा बायपास (वळणरस्ता) काढला तसा हा बायपास असतो. यात मूळ रक्तवाहिनीला शरीरातली पायाची नीला किंवा छातीतली एक 'जादा' रक्तवाहिनीचा तुकडा जोडला जातो. यानंतर रक्तप्रवाह या जोडवाहिनीतून जातो. या शस्त्रक्रियेसाठी कृत्रिम हृदयपंपाची मदत लागू शकते. शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीच्या मधोमध छेद घेऊन हृदयापर्यंत जावे लागते. या शस्त्रक्रियेचे तंत्र आता चांगले विकसित झाले असून अनेक शहरांमध्ये सुसज्ज रुग्णालये सेवा देत आहेत. याचा खर्च अंदाजे दीड लाखाच्या आसपास जातो. यासाठी 10-12 बाटल्या रक्ताची गरज लागते. या शस्त्रक्रियेने रुग्णाचे आयुष्यमान वाढते आणि कार्यक्षमता टिकून राहते. मात्र ही रोगप्रक्रिया चालूच असल्याने जोडवाहिन्याही कालांतराने खराब होतात. अनेक रुग्णांना काही वर्षांनी दुसरी बायपास शस्त्रक्रिया लागू शकते. नवा लेख 7-12-2010 हृदयविकार आपण प्रत्येकाने हृदयविकाराच्या झटक्याबद्दल ऐकलेले असते. हृदयविकाराचे प्रमाण वाढतच आहे, आता तरुण वयातही हा आजार होऊ लागला आहे. हृदयविकाराचा झटका अचानक येतो. काही जण सुरुवातीसच दगावतात. आणि काही तर झोपेतच जातात. काही जणांना हॉस्पिटलमध्ये मृत्यू येऊ शकतो तर काही लोक जगतात पण बरेच खर्चिक उपाय करावे लागतात. खरं म्हणजे हृदयविकार टाळता येतो. झटका यायच्या आधी हृदयविकार ओळखतापण येतो. म्हणूनच ही माहिती लक्षात ठेवा आणि इतरांना सांगा. हृदयविकाराची कारणे हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होणे, अतिरक्तदाब ही हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य कारणे आहेत. कधीकधी हृदयाच्या रक्तवाहिन्यात गुठळ्या अडकून झटका येतो. •रक्तवाहिन्या चरबीच्या थरांनी खराब होतात. पाण्याचे नळ जसे गंजतात तसेच हे असते. यामुळे हृदयाला स्वत:लाच रक्तप्रवाह कमी पडतो. विश्रांतीत एकवेळ हे चालू शकते. पण अतिश्रम, अतिथंडी किंवा मानसिक ताणतणावात रक्तप्रवाहाची मागणी वाढते. अशा वेळी पुरवठा कमी पडून झटका येतो. •रक्तप्रवाह कमी पडल्याने हृदयाचा संबंधित स्नायूभाग मरतो. मरणारा स्नायूभाग जास्त असेल तर हृदय बंद पडते, अन्यथा चालू राहते. हृदयाला मुख्य तीन रक्तवाहिन्या असतात. यातील कोठली रक्तवाहिनी आणि किती अडलेली आहे यावर बरेच अवलंबून असते. •रक्तवाहिन्यांचा आजार आणि अतिरक्तदाब हे कायमचे आजार असतात.अतिखाणे, तेलतूप जास्त खाणे, मधुमेह, बैठे जीवन, धूम्रपान, ताणतणावाचे जीवन, लठ्ठपणा आणि काही प्रमाणात आनुवंशिकता ही त्याची कारणे आहेत.पूर्वी हा आजार चाळीशीत सुरू व्हायचा. तो आता विशी-तिशीतच सुरू होतो. लक्षणे •काही जणांना हृदयविकाराच्या झटक्याची वेदना जाणवते तर काही जणांना काहीच जाणवत नाही. कार्डिओग्राम काढताना काही जणांना जुना हार्ट ऍटॅक आलेला दिसून येतो. याउलट काही जण झोपेतच हृदयविकाराने मृत्यू पावतात.पहिल्या झटक्यातच काहीजण दगावू शकतात. •हृदयविकाराची वेदना छाती, खांदा, बेंबीच्या वरच्या भागात, पाठीत किंवा वर जबड्यापर्यंत कोठेही जाणवते. •रुग्णाला दम लागतो, घाम आणि धडधड जाणवते. नाडी वेगाने चालते किंवा कधीकधी संथ चालते. •रक्तदाब कमी झाल्याने कधीकधी घेरी येऊन माणूस पडतो. प्राथमिक उपचार आणि पाठवणी •रुग्णाला आडवे पडून राहायला सांगा, दोन्ही पायांखाली आधार देऊन पाय उंचवा. यामुळे रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे जास्त वळतो. •रुग्णाला शांत राहायला आणि संथ श्वसन करायला सांगा. •कपभर पाण्यात ऍस्पिरीनची गोळी विरघळून प्यायला द्या. •नायट्रोग्लिसरीनची गोळी जिभेखाली धरायला द्या. •प्राणवायूचे सिलींडर असेल तर मास्क लावून द्या. •नाडी आणि शुद्ध तपासा. नाडी लागत नसेल तर कृत्रिम हृदयक्रिया-श्वसन द्यावे लागेल. यासाठी कोणी मदतीला असल्यास बोलवा. •रुग्णवाहिकेतून रुग्णालयात न्या. काही शहरात हृदयविकारासाठी खास कार्डिऍक ऍम्ब्युलन्स असते. •संबंधित वैद्यकीय तज्ज्ञाला फोन करून कल्पना द्या. रुग्णाचे नाव पत्ता माहीत नसल्यास शोधा आणि नातेवाइक, मित्रांना कळवा. •वैद्यकीय विम्याबद्दलपण चौकशी करून घ्या. रुग्णालयातले तातडीक निदान •कार्डिओग्राममुळे अडलेली रक्तवाहिनी आणि बाधित स्नायूभागाचा अंदाज येतो. •रक्तातील काही एन्झाईम –म्हणजे किण्वे--यांची पातळी वाढलेली असते. •कॉरोनरी सिटीस्कॅन असेल तर अडलेली रक्तवाहीनी स्पष्ट समजू शकते. •एको कार्डिओग्रामने हृदयाच्या कप्प्यातील रक्तप्रवाह समजतो. तातडीक उपचार •उपचारांसाठी वय, रक्तप्रवाह किती अडला आहे, मधुमेह इ. घटकांचा विचार करावा लागतो. •रक्तवाहिनीतील गुठळी विरघळण्यासाठी औषध लागत असल्यास 2तासांत ते द्यावे लागते. हे औषध खर्चिक पण उपयुक्त आहे. •तातडीक एन्जिओग्राफीचा खर्च सुमारे 10 हजार पर्यंत येतो. •काही रुग्णांना एन्जिओप्लास्टीची गरज भासते. एन्जिओप्लास्टीचा खर्च स्टेंटवर अवलंबून असतो. •काही रुग्णांमध्ये बायपास शस्त्रक्रिया लागते. यात अडलेल्या रक्तवाहिनीला पर्यायी मार्ग म्हणून शरीरातील रक्तवाहिनीचा तुकडा लावला जातो. ही शस्त्रक्रिया अर्थातच खर्चिक आहे. शस्त्रक्रिया तातडीक की पूर्वनियोजित आहे यावर याचे कमीजास्त यश अवलंबून असते. प्रतिबंध •मधुमेह आणि अतिरक्तदाब या आजारांना दूर ठेवा. शरीरभार आणि कंबर-नितंब गुणोत्तर संतुलित राखा. •जीवनशैली निरोगी ठेवण्यासाठी आहार, ताणतणाव, शारीरिक श्रम, झोप हे महत्त्वाचे घटक आहेत. धूम्रपान अतिशय घातक आहे. •फळे, भाजीपाला, लिंबू, लसूण, हळद आणि योग्य तेलांचा वापर करा. •आठवड्यातून निदान चार दिवस दमसांस म्हणजे ऐरोबिक प्रकारचे व्यायाम करा. •योगासनेही चांगली असली तरी दमसास व्यायामांना पर्याय नाही. लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine) संदर्भ : आरोग्याविद्या

कीटकभक्षक वनस्पती ( Insectivorous plants)

वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या (क्लोरोफिल) साहाय्याने तयार करतात; परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि हे अन्न त्यांना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशी कीटकभक्षक वनस्पतींच्या सु. ६२५ जाती असून, त्यांपैकी ३०-३५ जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त ५-६ जातींच्या वनस्पती आढळतात. या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असेही म्हणतात. या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणार्‍या असतात; परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. अशा ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो. या वनस्पतींची वाढ विशिष्ट प्रकारे होते. (उदा., पानांचे सापळ्यात रूपांतर झालेले असते). यामुळे त्या वनस्पती कीटकांना मधुर रस वा भडक रंग यांद्वारे आकर्षून घेऊन पकडणे, मारणे आणि शेवटी त्यांचे पचन करणे अशा क्रिया करू शकतात. यातील पचनाची क्रिया ही प्राण्यांतील पचनक्रियेसारखी असते. पाचक रसाप्रमाणे त्यात प्रोटिएज आणि किटिनेज ही विकरे असतात. त्यांच्यामुळे कीटकाचे अपघटन होऊन त्यापासून अखेरीस नायट्रोजनाचे प्रमाण जास्त असलेली संयुगे किंवा क्षार बनतात. ती वनस्पतींकडून शोषली जातात. अशा तर्‍हेने वनस्पतीला प्राणिज प्रथिने मिळतात. ज्या वनस्पतीत असे पाचक रस स्रवत नाहीत, त्यांच्यात पकडलेले कीटक सहजीवी जीवाणूंच्या क्रियेने कुजतात व नंतर ते शोषले जातात. कठीण भाग टाकून दिले जातात किंवा कलशासारख्या सापळ्यात त्यांची रास साचते. नायट्रोजन विपुल असणार्‍या मृदेत वाढलेल्या वनस्पतींना मात्र कीटक पकडण्याची गरज पडत नाही. ड्रॉसेसा (सूर्यकण) महाराष्ट्रात सापडणार्‍या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन जाती उपलब्ध आहेत : ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानाय. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर इ. भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानाय ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते. या वनस्पतींच्या पानाच्या चमच्यासारख्या पात्यावर लाल व जाड टोकाचे केस असतात. या केसांवर चिकट द्रवाचे आवरण असते व केसाच्या टोकावर चिकट द्रवाचे बिंदू असतात. हे बिंदू उन्हात दवबिंदूप्रमाणे चकाकतात. म्हणून याला इंग्रजीत ‘सन ड्यू’ हे नाव पडले आहे. एखादा कीटक या वनस्पतीच्या पानावर बसला की, केस आतल्या बाजूस वळतात आणि कीटक पकडला जातो. वनस्पतीच्या ग्रंथीतील स्रावामुळे कीटकाचे अन्नद्रव्यात रूपांतर होऊन त्याचे वनस्पतींच्या पेशींकडून शोषण होते. दुसर्‍या सर्वत्र आढळणार्‍या कीटकभक्षक वनस्पतीचे नाव युट्रिक्युलॅरिया व्हलगॅरिस आहे. या वनस्पती पावसाळ्यात झाडाच्या बुंध्यावर, भिंतीवर तसेत पाणथळ भागात वाढतात. त्यांच्या छोट्याशा पानांवर सापळे तयार होतात. सापळ्याच्या टोकास झडप असते. तोंडावर असलेल्या केसांमुळे झडपेची उघडण्याची किंवा बंद होण्याची क्रिया होत असते. उघड्या दारातून कीटक आत आला की, झडप बंद होते आणि कीटक पकडला जातो. या कीटकांचे नंतर पचन होऊन आवश्यक पदार्थ ग्रंथींकडून वनस्पतीसाठी शोषले जातात. युट्रिक्युलॅरियाच्या सापळ्यामध्ये डासांच्या अळ्याही सापडतात. नेपेंथिस (कलशपर्णी) नेपेंथिस (कलशपर्णी) ही एक वनस्पतीची प्रजाती कीटकभक्षी आहे. तिच्या १२० जातींपैकी बहुतेक आग्नेय आशियातील बोर्निओ, सुमात्रा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत आढळतात. तिची एक जात खासिअस ही ईशान्य भारतातील आसामच्या डोंगराळ प्रदेशातील जंगलात सापडते. ही वनस्पती लहान झुडूप किंवा वेलीच्या स्वरूपात असून तिच्या पानांचे रूपांतर घटासारख्या कलशात झालेले असते. छोट्याशा पानांचे पाते गोलाकार असून त्याच्या कडांवर दाते असतात. कीटकांच्या स्पर्शाने दाते मिटतात आणि कीटक पकडले जातात. पाचक रसाने या कीटकांचे पचन होते. डायोनिया मसायपुला (व्हीनस फ्लाय ट्रॅप) ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅरोलायना राज्याच्या काही भागांत सापडते. हिच्या पानाचे पाते टोकांस जाड मध्यशिरेने दोन भागांत दुभंगलेले असते. पानाच्या बाहेरच्या कडांस लांब दाते असतात. पानावर कीटक आला की, पात्याचे भाग शिंपल्याप्रमाणे मिटतात. कीटक पकडला गेला की, ग्रंथीमधून पाचक स्राव सुरू होतो. त्यामुळे कीटकाचे पचन होऊन उपयुक्त भाग पानांकडून वनस्पतीच्या वाढीसाठी शोषला जातो. कीटकांचे पचन झाल्यावर सापळा परत उघडतो; असे दोन-तीन वेळा झाल्यावर तो काळा पडून सुकून जातो. याशिवाय ड्रॉसोफायलम, बिब्लिस, सेफॅलोटस, पिंग्विक्युला, बायोव्ह्युलॅरिया, सारासेनिया, डार्लिंग्टोनिया, हेलिअँफोरा, पॉलिपोंफोलिक्स, जेनेलिसिया इ. प्रजातींतील कीटकभक्षक वनस्पती जगाच्या निरनिराळ्या भागांत आढळून येतात. या वनस्पती विशिष्ट अवयवांच्या मदतीने कीटकांना पकडून त्यांचे भक्षण करतात. काही कवकेही प्राणिभक्षक असतात. माती किंवा कुजट भागांत या कवकांचे प्रकार वाढतात. त्यांतील काही कवके आपल्या सूक्ष्म धाग्यांच्या विशिष्ट वाढीने किंवा ग्रंथीतील चिकट स्रावाने भक्ष्य (कीटक वा अन्य छोटे प्राणी) पकडतात. भक्ष्य मेल्यावर त्याच्यापासून मिळणार्‍या अन्नद्रव्याचे शोषण होते www.vishwakosh.org.इन यांच्या सौजन्याने ...

कावीळ ( Jaundice )

रक्तातील पित्तारुण (बिलिरूबीन) या पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांच्या बुबुळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला कावीळ म्हणतात. रक्तातील तांबड्या (लोहित) पेशींचे आयुष्य ( सु. १२० दिवस) संपल्यानंतर त्यांचा नाश होतो. या पेशींचे विघटन होते. तांबड्या पेशीतील हिमोग्लोबीनच्या विघटनापासून पित्तारुणाची निर्मिती होत असते. रक्तद्रव्यातील पित्तारुण रक्तापासून वेगळे करणे आणि पित्तात विसर्जित करणे ही कामे यकृताद्वारे होतात. यकृतापासून पित्तारुणाचे उत्सर्जन होऊन ते पित्तनलिकेतून पित्ताचा घटक म्हणून आतड्यात पोहोचते. आतड्यातील जीवाणूंद्वारे पित्तारुणावर प्रक्रिया होऊन त्यांपैकी काही पित्तारुण शरीराबाहेर विष्ठेतून टाकले जाते. काही पित्तारुण आतड्यात शोषले जाऊन ते रक्ताद्वारे मूत्रपिंडाकडे जाते आणि मूत्रातून मूत्रपित्तारुणाच्या (युरोबिलिनच्या) स्वरूपात शरीराबाहेर टाकले जाते. कावीळ अनेक कारणांनी होऊ शकते सामान्य निरोगी व्यक्तीच्या रक्तद्रव्यातील पित्तारुणाचे प्रमाण दर शेकडा ०-५ मिग्रॅ. असते. हे प्रमाण शेकडा १.५ मिग्रॅ. पेक्षा अधिक वाढल्यास पिवळेपणा दिसू लागतो. काविळीचे मुख्य प्रकार तांबड्या पेशीची विघटनात्मक कावीळ : तांबड्या पेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश झाल्यास रक्तातील पित्तारुणाचे प्रमाण वाढते. पांडुरोगाच्या काही प्रकारांत वा रक्तात संसर्ग झाल्यास वा रक्ताधान करतेवेळी रक्तगट न जुळल्यासही अशा स्वरूपाची कावीळ होते. यकृतजन्य कावीळ : यकृताला हानी पोहोचल्यास यकृतजन्य कावीळ होते. विशेषतः हिपॅटायटीस रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यास, विषारी पदार्थ शरीरात गेल्यास वा यकृत सूत्रण रोगामुळे यकृताद्वारे पुरेसे पित्त स्रवले जात नसल्यास पित्तारुण साचून राहिल्याने यकृतजन्य कावीळ होते. अवरोधी कावीळ : काही कारणांनी पित्ताचे खडे झाल्यास पित्तनलिकेचा मार्ग बंद होतो. आणि या प्रकारची कावीळ होते. काविळीमध्ये त्वचेचा रंग पिवळट दिसणे, अन्नाचा तिटकारा व क्वचित उलट्या होणे ही सर्वसाधारण लक्षणे आढळतात. संसर्गजन्य काविळीत सुरुवातीस ज्वर व मूत्र गडद पिवळे किंवा लाल होणे ही लक्षणे असतात. अवरोधी काविळीत मलाचा रंग मातीसारखा असणे व त्वचेस खाज सुटणे ही लक्षणे आढळतात. नुकत्याच जन्मलेल्या काही अर्भकांमध्ये सौम्य प्रकारची कावीळ आढळते. कारण अशा अर्भकांच्यात पित्तारुण बाहेर टाकण्याची क्रिया विलंबाने सुरू होते. अशी कावीळ एका आठवड्यात नाहीशी होते. अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये या प्रकारच्या काविळीचे प्रमाण जास्त असते. काही नवजात अर्भकांच्यात एरिथ्रोब्लास्टोसीस फिटॅलीस हा काविळीचा एक गंभीर प्रकारही आढळतो. मातेचे रक्त व अर्भकाचे रक्त यांतील र्‍हीसस (Rh) घटक निरनिराळे असल्यास अर्भकाच्या रक्तात तांबड्या पेशी तयार करणार्‍या पेशींची बेसुमार वाढ होते. या रोगात प्रमाणापेक्षा जास्त होणार्‍या पित्तारुणाचे उत्सर्जन करण्यास अर्भकाचे यकृत असमर्थ असते. जन्मल्यानंतर चोवीस तासांच्या आत उद्भवणारी कावीळ हे या रोगाचे लक्षण समजून वैद्यकीय सल्ला ताबडतोब घेणे आवश्यक असते. पौगंडावस्थेत आणि तरुणांमध्ये यकृतावर विषाणुदाह झाल्यामुळे कावीळ होते. मध्यमवयीन प्रौढांमध्ये पित्ताच्या खड्यांमुळे होणारी अवरोधी कावीळ आढळते. वृद्धपणी होणारी काविळीची लक्षणे यकृताचा वा पित्तनलिकेचा कर्करोग दर्शवितात. तसेच मद्यपान करणार्‍या व्यक्तींमध्ये होणारी कावीळ यकृतात बिघाड झाल्याचे दर्शविते. काविळीवर इलाज करण्यासाठी तिच्या मूळाशी असलेले रोग शोधून काढतात. रुग्णाने संपूर्ण विश्रांती घेणे, तिखट व तेलकट आहार टाळणे आणि भरपूर फळे खाणे ही पथ्ये पाळावी लागतात. प्रतिजैविके आणि अ,ब,क तसेच के जीवनसत्त्वे इ. औषधांचा उपयोग केला जातो. www.vishwakosh.org.in यांच्या सौजन्याने...

शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

मिठाचे दुष्परिणाम

आहाराच्या सहा चवींपैकी मिठाची खारट चव ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. आहारामध्ये अजिबात खारट चव नसेल तर असा अळणी आहार खाल्ला जात नाही. मीठ हा तसा व्यवहारातही परवलीचा असा विषय आहे. ‘खाल्ल्या मिठाला जागावे’, गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह, सध्याचे लहान मुलांचे व इतरांचेही नमकीन खाणे या सर्व गोष्टींना मिठाचा संदर्भ आहे.  

आयुर्वेद या भारतीय शास्त्राने आहार शास्त्राचा एकूण विचार मांडतांना खारट चवीच्या शरीरावरील परिणामाविषयी विस्ताराने वर्णन केलेले आहे. खारट चवीचे पदार्थ प्रामुख्याने उष्ण गुणाचे असतात. त्याचप्रमाणे ते आपली पचन शक्तीही वाढवतात. या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे अन्नाला आणि तोंडालाही चव (रूची) आणणे. आपल्या एकूणच अन्नातून खारट पदार्थ काढून टाकले तर अन्न बेचव होते. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. खारट चवीचे पदार्थ उष्ण असल्याने ते शरीरात भेदन (फोडण्याची क्रिया) करतात, व्रण वाढतात. हे पदार्थ गुणाने तीक्ष्ण असतात. त्यामुळे रक्त आणि पित्त या दोहोंना ते फारसे हिताचे नसतात. खारट पदार्थ स्वेद जनक म्हणजेच शरीरात घाम निर्माण करणारे असतात. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती तसेच घाम जास्त येण्याचा जास्त त्रास येणार्‍या व्यक्तींनी खारट पदार्थ जपूनच घायला हवे.खारट चवीचे पदार्थ पचनशक्ती वाढवणारे आणि रूची वाढवणारे असले तरी त्याचे आहारातले प्रमाण अत्यंत र्मयादित ठेवावे लागते. र्मयादेपेक्षा जास्त प्रमाणात खारट पदार्थ पोटात गेले तर त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. रक्तदुष्टी आणि त्यामुळे होणारे त्वचेचे विविध आजार हे खारट पदार्थांच्या अतिसेवनामुळे प्रामुख्याने निर्माण होतात. त्याचप्रमाणे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे हे लक्षणदेखील निर्माण होते. हल्ली अनेक जणांना वयाच्या चाळिशीपूर्वीच त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. त्यावर उगाचच जाहिरातीच्या पगड्यामुळे सौंदर्यप्रसाधनाचा मारा केला जातो. पण अशा मंडळींनी आपल्या आहारामध्ये मीठ, लोणचे अशा खारट पदार्थांचे प्रमाण जास्त आहे का हे तपासून बघणे आवश्यक असते. अनेकजणांच्या त्वचेवर त्वचेखालील छोट्या रक्तवाहिन्या फुटून लाल, हिरवे, निळे असे डाग आलेले दिसतात. हेदेखील खारट पदार्थांच्या अतिसेवनानेच घडते

 वातरक्त नावाचा सांध्यांचा एक विकारही याच्या अतिसेवनाने वाढतो. यामध्ये पायाची बोटे तसेच पायाचा घोटा सुजतो. अनेकदा त्यामध्ये आग होते आणि त्याठिकाणी खूप वेदनाही होतात. याला आयुर्वेदाने वातरक्त असे म्हटले आहे रक्ताची तपासणी केल्यास या त्रासामध्ये बर्‍याचदा युरीक अँसिड वाढलेले दिसते. खारट पदार्थ जास्त खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. केस लवकर पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे खारट पदार्थांचे अतिसेवन होय. डोक्यावरचे केस अकाली गळणे, लवकर टक्कल पडणे, केसांची मुळे सैल होणेया तक्रारीही खारट पदार्थांच्या अतिखाण्यामुळे घडतात.  

हल्ली तरुण मंडळींमध्ये असे खारट जास्त खाणे वाढत चालले आहे. ही अतिशय चिंतेची बाब मानली पाहिजे. उच्च रक्त दाबाच्या रुग्णांमध्ये अपथ्य म्हणून मिठाचा संदर्भ दिला जातो. त्याचबरोबर मूत्रपिंडाच्या विकारातही मीठ कमी खाण्याचा किंवा अजिबात न खाण्याचा सल्ला दिला जातो. तो मिठामध्ये असलेल्या काही दुगरुणांमुळेच अशाप्रकारे शरीरावर परिणाम करणारा खारट रस आयुर्वेदाने औषधात योग्य प्रकारे उपयोगात आणला आहे. या शास्त्रात मिठाचे पाच प्रकार वर्णन केले आहे. त्यामधील सैंधव मिठ हे सर्वांत औषधी आहे. याला बोली भाषेत सैंधेलोण असे म्हणतात. हिंगावाष्टक चूर्ण या पाचक औषधामध्ये सैंधवाचा उपयोग केला जातो. सैंधव योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते केसांना आणि डोळ्यांनाही हिताचे ठरते. काळे मीठदेखील खारट चवीचे आणखी एक औषधी उदाहरण आहे. आपल्याला अपचन झाल्यास ओवा आणि काळे मीठ आपण खातो ते यामुळेच. भारतीय शास्त्राने सांगितलेल्या सैंधवासारख्या पदार्थाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात वाढवला तर ते आपल्या आरोग्याला नक्कीच हिताचे ठरेल यात शंका नाही



परप्रकाशित ...

खडे बोल

-- धीरूभाई अंबानी
पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *

-- विश्‍वनाथन आनंद
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे

-- जे. आर. डी. टाटा
फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.

- नारायण मूर्ती
यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.

-- रघू राय
चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*

- बिल गेट्‌स
मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *

- कल्पना चावला
कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*

-- आयझॅक न्यूटन
मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.

-- बराक ओबामा
माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
 

निसर्गोपचार - ‘आरोग्यम धनसंपदा’

 ‘आरोग्यम धनसंपदा’ असे म्हटले जाते आणि आरोग्य एकदा बिघडले की बेसुार धनसंपदा वाया जाते. इतर अनेक दुय्यम कारणांबरोबरच चुकीची आहार-विहार पद्धती हे आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण असते. बदलत्या काळात विषाणू- जिवाणूुंळे पसरणार्‍या व्याधीही असतात हे मान्य केले तरी मुळात तुमची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असेल तर बाहेरचे हल्ले यशस्वीपणे परतून लावता येतात.

रोगप्रतिकारक शक्ती सबल, सक्षम असण्यालाही आहार महत्त्वाचा ठरतो. व्याधी जडल्यानंतर कोणत्याही पॅथीचा उपचार घ्यायचे ठरवले तरी शेवटी आपण कोणते तरी घटकद्रव्यच पोटात घेणार. निसर्गोपचार ही एक अशी उपचारपद्धती आहे ज्यामध्ये आहारावर अधिकाधिक नियंत्रण ठेवून शरीरातील व्याधी किंवा विषद्रव्ये बाहेर टाकण्यावर भर दिला जातो. नैसर्गिक अन्नघटक नैसर्गिक अवस्थेत सेवन करण्यावर भर दिला जातो.

हल्लीच्या जीवनपद्धतीत किंवा आहार पद्धतीतील महत्त्वाचा दोष म्हणजे चमचमीत, चवदार पदार्थांवर ताव मारणे. निसर्गोपचारातील आहार पद्धतीत अधिकतर कच्चे अन्नघटक खाण्यावर भर दिला जातो. काकडी, कोबी, मोडाचे मुग असे अन्नघटक कच्चे आणि चावून चावून खावेत. मध, लिंबू-पाणी, फळांचे रस किंवा फळे खाण्यावर भर दिला जातो. आहारात वरुन मीठ घेण्यास मनाई असते. जे अन्न पदार्थ या उपचारपद्धतीत सेवन करायला सांगितले जातात त्यात निसर्गत:च शरीराला आवश्यक तेवढ्या क्षारांचे प्रमाण असते. त्यामुळे मीठ वेगळे खाण्याची गरज पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे एखादा आजार किंवा व्याधी उघडकीस आल्यास औषधांचा भडीमार न करता पचनसंस्थेत झालेल्या बिघाडांचा तो संकेत आहे, असे मानून लंघन करण्यावर भर दिला जातो. याखेरीज शरीरास वाफ  देणे (बाष्पस्नान), सूर्यस्नान, संपूर्ण शरिरास किंवा दुखर्‍या भागास मातीचा लेप देणे असे पूर्णत: नैसर्गिक उपचार केले जातात. त्याच्या उपायाने माणूस अधिक सुदृढ, सशक्त बनतो. हे उपचार शिशुपासून वृद्धांपर्यंत कोणालाही घेता येतात.




नवशक्ती यांच्या सौजन्याने ...

शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

माहितीचा अधिकार - शेतकरी बांधवांसाठी अधिकृत अहिंसक मार्ग

माहितीचा अधिकार

लोककल्याणकारी राज् संकल्पनेत लोककेंद्रीत प्रशासन महत्त्वाचे असते. माहितीचा अधिकार कायद्यामुळे पारदर्शकता, जबदारी आणि लोकसहभाग या तीन बाबींना महत्त् प्राप् झा...
ले असून लोकशाहीच्या सबलीकरणासाठी हा कायदा निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

'
माहितीचा अधिकार' हा अष्टाक्षरी मंत्र 12 आक्टोबर, 2005 रोजी भारतीय जनतेला मिळाला. या मंत्राचा वापर करुन प्रशासनातील दोष, उणिवा, गैरप्रकार उघड करण्यात आले. देशातील अनेक कायदे हे जनतेने पाळायचे आणि प्रशासनाने त्यावर लक्ष ठेवायचे असे आहेत, माहितीचा अधिकार हा एकमेव कायदा असा आहे की, लोकप्रशासनाने तो पाळावयाचा असून जनतेची त्यावर नजर असणार आहे. या कायद्यामुळे भ्रष्टाचार पूर्णपणे संपणार नसला तरी त्याचे प्रमाण निश्चितच कमी होणार आहे.
लोकप्रशासन केवळ वस्तुनिष् असून उपयोगाचे नाही तर ते आदर्शवादी असायला हवे. प्रशासनाचा जनतेशी संबंध येतो. जनकल्याणाची कामे करतांना प्रशासकीय यंत्रणा समाजाभिमुख असली तरच जनतेला हे प्रशासन आपले वाटेल. गेल्या काही वर्षात विविध नागरी संघटना, नागरिकांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सुप्रशासन निर्मितीचा प्रयत् केला.

शासकीय किंवा निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी, अधिकृत कागदपत्रे मिळावीत या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचा कायदा करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या संदर्भात वेळोवेळी दिलेला लढाही माहितीच्या अधिकारासाठी महत्वाचा ठरला आहे. आज विविध प्रसार माध्यमातून माहिती अधिकार कायद्याचा प्रचार झाला असला तरी ही माहिती नेमकी कोणाकडून आणि कशी मिळवावी, त्याबाबत सर्वसामान्य लोकांना अद्यापही नेमकी माहिती नाही.

माहितीच्या अधिकाराअंतर्गत कोणाकडून,कोणती आणि कशी माहिती मिळवायची, त्यासाठी अर्ज कुठे कसा करायचा तसेच राज्यातील मुख्य माहिती आयुक्तांसह सर्व विभागीय माहिती आयुक्तांच्या कार्यालयाचे पत्ते दूरध्वनीही येथे आहेत.

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५
न्यायालये, संसद, विधिमंडळ, महामंडळे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, आर्थिक लाभ घेणार्या सहकारी किंवा खाजगी सेवाभावी संस्था, मंत्रालयातील विविध विभाग अशा कार्यालयांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ लागू करण्यात आला आहे. विविध कार्यालयातील कामकाजाची माहिती, कागदपत्रे नागरिकांना मिळवता यावी म्हणून, अशा अधिकाराची व्यवहार्य पद्धत आखून देण्याकरिता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आला आहे. माहिती मिळविण्याची इच्छा असणार्या नागरिकांना ती पुरविण्याकरिता तरतूद म्हणून या कायद्याची अंमलबजावणी केली आहे.

माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. - न्यायालयातर्फे आवश्यक त्या निकालाची प्रत घेता येते. विधिमंडळाकडून मंत्रिपरिषदेच्या निर्णयाची प्रत घेता येते. शासकीय कार्यालयाकडून अहवाल, नमुने, प्रसिद्धी पत्रके आदी कागदपत्रांची झेरॉक्स घेता येते. सहकारी संस्थांकडून इतिवृत्त, निर्णयाच्या प्रती, आर्थिक व्यवहाराची माहिती घेता येते.

कोणाकडून घेऊ शकतो माहिती
माहिती देणारी कार्यालये, संस्था यांनी आपल्या कामकाजाची माहिती स्वत:हून प्रसिद्ध करुन सूचना फलकावर लिहायची आहे. अथवा अशा माहितीची संचिका प्रत कार्यालयाच्या बाहेर जनतेसाठी ठेवायची आहे. त्यात कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्यांची नावे इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने त्याची किंमत, कर्मचार्यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी. ही माहिती पुढील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थामधून घेता येते.

1)
न्यायालये (सर्व)2) संसद (लोकसभा राज्यसभा)3) विधिमंडळ (विधानसभा/विधान परिषद), विविध महामंडळे
4)
आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये,5) तहसील कार्यालये, जिल्हा परिषदा (अंतर्गत सर्व कार्यालये),
6)
पंचायत समिती (अंतर्गत सर्व विभाग), ग्रामपंचायती 7) महानगरपालिका, नगरपालिका
8)
गृह विभाग (पोलीस यंत्रणा)9) मंत्रालयीन विविध विभाग तथा सर्व शासकीय कार्यालये
10)
शासकीय अनुदानित सहकारी, खाजगी, सेवाभावी संस्था उदा :- साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संघ, सहकारी बँका.

अशी मिळवा माहिती
माहिती मिळविण्यासाठी अर्जदार हा कोर्या कागदावरसुद्धा जनमाहिती अधिकार्याकडे अर्ज करु शकतो. त्या अर्जावर १० रु. चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा रोख रक्कम/डिमांड ड्राफ्ट/बँकर्स चेक द्यावा. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागणार नाही.

असा अर्ज सादर करताना पुढील १२ बाबींची पूर्तता करावी
1)
कार्यालयाचे नाव 2) कार्यालयाचा पत्ता 3) अर्जदाराचे संपूर्ण नाव 4) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता 5) माहितीचा विषय
6)
कोणत्या कालावधीची माहिती हवी? 7) कोणत्या प्रकारची माहिती हवी? 8) माहिती, पोस्टाने की स्पीड पोस्टने हवी?
9)
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय? (असल्यास रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी)10) अर्ज केल्याची तारीख 11) अर्ज केल्याचे ठिकाण 12) अर्जदाराची सही वा अंगठा
संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर तो जनमाहिती अधिकार्याकडे सादर करावा. पोच घ्यावी. ३० दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

माहिती मिळण्याचा अपिलाचा कालावधी
जनमहिती अधिकार्याकडे अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती मिळते. जनमाहिती अधिकार्याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान झाल्यास अपील करण्याचा कालावधी ३० दिवसांचा आहे.

अपिलीय अधिकार्याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान झाल्यास ९० दिवसांत राज्य माहिती आयुक्ताकडे द्वितीय अपील करता येते.

माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च
दस्तऐवजाचे वर्णन खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु.
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.

अपील का, कसे करावे?
)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्याविरुद्ध अपिलीय अधिकार्यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो.

) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा. अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे. शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. अर्जाची पोच घ्यावी.

) अपिलीय अधिकार्याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

दुसरे अपील का, कसे करावे?
) अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्याकडूनही मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो.

) दुसरे अपील करताना पुन्हा पहिल्या अपिलाच्या अर्जाप्रमाणे कृती करावी. अर्जावर २० रुपयांचा मुद्रांक चिकटवून नांव, पत्ता अपिलीय अधिकार्याचा तपशील, प्रारंभीच्या जनमाहिती अधिकारी अपिलीय अधिकार्याकडून मिळालेली माहिती अर्जदाराला अपेक्षित असलेल्या माहितीचा तपशील स्पष्टपणे लिहावा.

) राज्य माहिती आयुक्त अशा अर्जाची तपासणी करतात. गरज वाटल्यास संबंधित कार्यालयाच्या अधिकार्यांना समक्ष बोलावतात किंवा गरज वाटल्यास अर्जदारालाही बोलावतात. त्यानंतर राज्य माहिती आयुक्त निर्णय देतात. त्यांनी दिलेला निर्णय मात्र संबंधितांवर बंधनकारक असतो.

माहिती नाकारल्यास दंड
) जनमाहिती अधिकार्याने वेळेत माहिती दिली नाही. जाणीवपूर्वक नाकारली, किंवा चुकीची, अपूर्ण, दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा माहितीच नष्ट केली तर, असे आयोगाचे मत झाल्यास, गुन्हा करणार्या माहिती अधिकार्यास २५० रु. दंड प्रत्येक दिवसाला केला जातो. मात्र एकूण दंडाची रक्कम २५ हजारांपेक्षा अधिक लादता येत नाही.

) राज्य माहिती आयोगामार्फत जेव्हा गुन्हा केलेल्या जन माहिती अधिकार्याला दंड केला जातो तत्पूर्वी त्याला आपले म्हणणे पुराव्यासह मांडण्याची संधी दिली जाते. अशावेळी आयोग दंडाबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतो.

माहिती आयुक्तांचे पत्ते

महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त -
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (मुंबई मुंबई उपनगर विभाग)
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (कोकण विभाग)
ला मजला, कोकणभवन, नवी मुंबई-४००६१४
दुरध्वनी क्रमांक-०२२-२७५७१३२४

राज्य माहिती आयुक्त (पुणे विभाग)
था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे-
दुरध्वनी क्रमांक- ०२०-२६०५०६३३/२६०५०५८०

राज्य माहिती आयुक्त (औरंगाबाद/नाशिक विभाग)
सुभेदारी गेस्ट हाऊस, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ,
औरंगाबाद-४३१ ००१
दूरध्वनी क्रमांक- ०२४०-२३५२५४४ फॉक्स क्र. २३५२१३३

राज्य माहिती आयुक्त (नागपूर/अमरावती विभाग)
रवीभवन, दालन क्र.१७, नागपूर.
दूरध्वनी क्रमांक-०७१२-२५६६८१६


(महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाने दिनांक 16 -1-2012 ला ह्या कायद्यामध्ये खालील अटीँचा समावेश केला. ह्या कायद्याखालील माहीती मागवण्यासाठीचा अर्ज 150 शब्दांमधेच मांडावा.याचा अर्थ हा की फक्त जाणकार किँवा वकिलांच्या माध्यमातूनच अर्ज करता यावा. सामान्य अल्पशिक्षीत माणसांची याहून कुचंबणा व्हावी यासाठीच.एका वेळी एका अर्जात एकाच विषया संबंधीत किँवा एकाच खात्याविषयक माहीती मागवता येईल.याचा अर्थ असा की ही प्रक्रीया अधीक किचकट बनवून अर्जदारास हे सव्यापसव्य त्रासदायक ठरावे. माहीतीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावर पेन्सिलीशीवाय काहीही लिहू नये.)
माहितीचा अधिकार अर्ज नमुना माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा झेरॉक्स दुकानात मिळेल.

सौजन्य - माहिती अधिकार कार्यकर्ते…

माझ्याबद्दल