मंगळवार, २९ मार्च, २०२२

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा,

 Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) सांगितलेले मोलाचे सल्ले अनेक जण आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करत असतात. आचार्य चाणक्यांच्या या सल्ल्यांचा अनेकांना खूप उपयोग होतो आणि त्यांना आयुष्य जगणं सोपे जाते. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नाती सांभाळावी, एकमेकांचा आदर करावा, लोकांना जोडावे असे सांगितले जाते. पण बऱ्याचदा काही लोकांकडून फसवणूक (Cheating) होते त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुमची सुद्धा सतत फसवणूक होत असेल किंवा तुम्हाला चांगला माणूस ओळखता येत नसेल तर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आचार्य चाणक्यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा अबलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तर कधीही तुमची फसवणूक होणार नाही.Also Read - Chankya Niti: 'या' 5 गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

– आचार्य चाणक्यांच्या मते, बऱ्याचदा आपण एखाद्याबद्दल खूप लवकर मत तयार करतो. पण समोरच्या व्यक्तीचे गुण-दोष समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करा. ती व्यक्ती इतर लोकांशी कशी वागतो हे सुद्धा पाहा. ती व्यक्ती इतरांशी कशी वागते त्यावरुन त्याचा खरा स्वभाव तुमच्यासमोर येईल. 

– त्यागाची भावना माणसामध्ये किती आहे हे पाहणेही खूप महत्त्वाचे असते असे आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे. ज्या लोकांमध्ये ही भावना असेल तेच इतरांचे दु:ख समजून घेणारे आणि मदत करणारे आहेत. ज्यांना त्याग कसा करावा हे माहित नाही त्या व्यक्ती स्वार्थी आहेत आणि त्यांचा अर्थ प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात. 

– एखादी व्यक्ती ज्या कामाशी निगडीत आहे त्यावरूनही त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येऊ शकतो. जर एखाद्याने व्याज घेतले तर धूर्तपणा त्याच्या स्वभावात निश्चित आहे. तुम्ही त्याव्यक्तीकडून दयाळूपणा आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करु नका, असे आचार्य चाणक्य सांगतात.

– एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक वैशिष्ट्ये पाहिली पाहिजेत. त्याची मूल्ये माणसाबद्द्ल बरच काही सांगून जातात. जो माणूस सुसंस्कृत असतो, त्याच्या आयुष्यात काही तत्त्वे नक्कीच असतात. तो कोणावरही अन्याय करणार नाही, असे चाणक्य सांगतात.

दरम्यान, आचार्य चाणक्यांचा चाणक्य नीती हा ग्रंथ (Chanakya Niti) मानवी जीवनासाठी कोणत्याही मार्गापेक्षा कमी नाही. आचार्य चाणक्य हे कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जातात. तसंच, आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) नाव जरी घेतले तर एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्य चाणक्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याला (Chandragupta Maurya) राजा बनवले. चाणक्य नेहमी इतरांच्या कल्याणाविषयी बोलत होते. त्यामुळे चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंब करु शकता.






by - https://www.india.com/

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही फसवणूक होणार नाही!...

 

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या या  गोष्टी कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही फसवणूक होणार नाही!

Chanakya Niti: जर तुमची सुद्धा सतत फसवणूक होत असेल किंवा तुम्हाला चांगला माणूस ओळखता येत नसेल तर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आचार्य चाणक्यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा अबलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तर कधीही तुमची फसवणूक होणार नाही.




वाईट काळातही संयम आणि आत्मविश्वास गमावू नये. हे दोन गुण कठीण परिस्थितीत तुमचे खरे मित्र ठरतात आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतात.


पुराणांच्या मते पहिले सुख आणि निरोगी शरीर. आचार्य चाणक्यांच्या मते तुमच्या शरीराची सर्वात जास्त काळजी घ्या, यामुळे तुम्ही कोणतेही काम करू शकता. जर याचा काही उपयोग झाला नाही तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहा.


आयुष्यातील तुमची सर्वात मोठी रहस्ये कधीही कोणाला सांगू नका कारण तुमचा आज जो मित्र आहे तो उद्या तुमचा मित्र होईल की नाही हे तुम्हाला माहीत नाही. अशा व्यक्तीशी तुमचे वैर असेल तर तो समाजात तुमची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.



दुष्ट माणसाची प्रवृत्ती धूर्त असते, त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका. त्यांनी कोणाची सेवा केली तरी त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. ते कधीही कोणाचे नातेवाईक असू शकत नाहीत.


तुम्ही जे काही ध्येय ठेवले आहे, ते कोणाला सांगू नका. ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि पूर्ण झोकून देऊन काम करा. त्याची माहिती मिळवा, पण तुमचा हेतू उघड करू नका. तुमचे यश स्वतःच लोकांना तुमच्या ध्येयाबद्दल माहिती देईल. पण जर तुम्ही ते एखाद्यासोबत शेअर केलेत तर तो तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो किंवा तुमची थट्टा करू शकतो.

by - www.tv9marathi.com

law of attraction | आचार्य चाणक्यांच्या मते, मनातील विचारांचे काहूर बंद करा, जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल!

 

law of attraction | आचार्य चाणक्यांच्या मते, मनातील विचारांचे काहूर बंद करा, जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल!

आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते.



मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. चाणक्य यांनी अगदी लहान वयातच वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. चाणक्य यांनी आपल्या मुत्सद्दीपणा आणि रणनीतिने आपल्या सर्वात मोठ्या शत्रू पद्मानंदचा पराभव केला आणि सामान्य चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवले. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले. आचार्य चाणक्यांच्या (Acharya Chanakya) नीती पुस्तकात जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूचा उल्लेख केलेला आहे. चाणक्याने सुचवलेल्या गोष्टींचा अवलंब आपण आज केला तर आपल्याला आपले आयुष्य सुरळीतपणे जगण्यसाठी मदत होते. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी स्वतः त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या प्रत्येकाने आपल्या जीवनात (Life) आणल्या पाहिजेत. तुमच्या मनातील विचारांचे काहुर बंद करा आणि जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल असे आचार्यांनी सांगितले होते. पण स्वत:चा विचार करण्यासाठी पुढील गोष्टींचा अवलंब करा.

आत्मकेंद्रित
अनेक वेळा यश मिळाल्यावर माणूस स्वतःला सर्वोत्कृष्ट समजू लागतो. आचार्य यांच्या मते, अशा व्यक्तीला एका वेळी पराभवाला सामोरे जावे लागते. नाहीतर तो एकाकी पडतो. ते म्हणतात की अहंकार आणि स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजणे ही मोठी चूक आहे. माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याने जमिनीशी जोडलेले राहिले पाहिजे.

नकारात्मक लोक
अनेकदा असे दिसून येते की लोक समस्यांमुळे नकारात्मक वागणूक स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिकच नव्हे तर शारीरिक समस्याही निर्माण होऊ लागतात. चाणक्य म्हणतो की नकारात्मक न होता कठीण प्रसंगांना सामोरे जावे.

वेळेचे महत्त्व
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते आणि त्यांना नेहमी पराभवाचा सामना करावा लागतो. वास्तविक, एकदा गेलेली वेळ परत येत नाही.त्यामुळे वेळेचा आदर केला पाहीजे

राग
आचार्य सांगतात की जो माणूस रागावर वर्चस्व गाजवू देतो त्याला एकवेळ मोठे नुकसान सहन करावे लागते. हा पराभव केवळ एक प्रकारचा पराभव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर अपयशही अशा लोकांना त्रास देते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)


*बदक की गरुड ?*

 *बदक की गरुड ?* 

*निर्णय तुमचा आहे.*

 एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की 
*बदक की गरुड*
*तुमचे तुम्हीच ठरवा.*
दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई.
ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. आणि बोलला, 
" माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर."
त्या कार्ड वर लिहिले होते,
*जॉन चे मिशन*
*माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित* *आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी* *पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि* *मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.*

मी भारावून गेलो होतो.
गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती. 
जॉन ने मला विचारले. 
"आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?"
मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. "नाही, मला ज्यूस हवा आहे."
तात्काळ जॉन उत्तरला... 
"काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे."
तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत. 
जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता. 
मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण 
पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण स्वरात विचारले. "सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?" त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ? 
न राहवून मी त्याला विचारले. 
" तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?" 
त्यावर तो उत्तरला. "नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे. आणि असमाधानी राहत असे. पण एकदा एका डॉक्टर कडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले. 
त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते. " तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो" ज्यात पुढे लिहिले होते. जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत तर खरेच तसेच होईल. तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.
*बदक बनू नका*
*गरुड बना*
बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.
आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे. 
म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले. 

मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.

मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो. 
आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे. 
तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालक द्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो. 
जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लुमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे. जॉन ने बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे. आणि गरुडासारखी भरारी मारायला सूरूवात केली आहे.
*तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.*
 
*तुम्ही काय ठरवले आहे ?* 
*बदकासारखे सतत आवाज करत(रडत) तक्रार* *करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर* *उडण्याचे ?*
*लक्षात ठेवा....*
*निर्णय तुमचा आहे*
*हे कुलूप फक्त आतून उघडते....*

माझ्याबद्दल