बुधवार, १५ जून, २०१६

पैसा ... पैसा ....

श्रीमंतीची गुरूकिल्ली पैसा हे एक साधन आहे. एखादे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असेल तर , विविध साधने उपयोगी पडतात. त्यात पैसा या साधनाला आज अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. पैसा असेल तरच अनेक गरजा पूर्ण होतात. पैसा नसेल तर आपल्या अत्यावश्यक गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाही. पैसा हा देव तर नाही , पण देवा इतकेचं महत्व पैश्याला प्राप्त झाले आहे. म्हणूनच म्हणतात कि, देव गरीबाचा नाही. म्हणजे जो श्रीमंत असेल तो अनेक तीर्थक्षेत्राला जावू शकतो.असो. श्रीमंत व्हावे ही तसी साधू संत सोडले तर सर्वांची इच्छा असते. तसे काही संतांजवळ कोटीने रुपये आढळतात हा अपवाद वेगळा. पण सामान्य माणसाला पैश्याची नितांत गरज असते. पैसा प्रचंड प्रमाणात मिळावा ही सर्वांची इच्छा असते. परंतु कृती इच्छेला धरून केली जात नाही. आज जास्त प्रमाणात पैसे मिळू शकतील असे व्यवसाय म्हणजे , जमिनीचे व्यवहार होय., सोने खरेदी , दामदुप्पट ठेव योजना , बचत , शेअरबाजार गुंतवणूक . वैगरे पर्याय सांगितले जातात. यात जमीन खरेदीसाठी एकाचं वेळेला खूप मोठी रक्कम लागते. तेव्हाच जमीन खरेदी होऊ शकते. म्हणजेच पैसा जास्त असेल तरच पैसा मिळतो. आणि एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि, कमी पैश्याने जास्त पैसे मिळवता येत नाही. सोने खरेदीतही बऱ्यापैकी परतावा मिळू शकतो. परंतु ही खरेदी बँके कडून असावी कि, ज्या मुळे मोड, घटीचा प्रश्न येत नाही. किवा पेपर गोल्ड चा पर्याय स्वीकारावा. आणि यानंतर विषय येतो तो दामदुप्पट योजनेचा. जो कोणी आठ , नऊ वर्षाने पैसे दुप्पट देतो तो त्याचं पैशाचे चारपट केल्याशिवाय राहत नाही.आणि बँक दरवर्ष १०% ,११% प्रमाणे व्याज देते.पण इकडे महागाई वाढीचा दर ११.६०% आहे. मग बँकेत पैसे ९ वर्षानंतर दुप्पट होवून महागाई वाढल्याने फायदा होत नाही.आज एक लाखाला एक गुंठा मिळतो.पण ९ वर्षाने बँकेत २ लाख झाले पण त्यावेळी एका गुंठ्याला ५ लाख लागतील.याचाही विचार आवश्यक ज्याला आपला पैसा कामाला लावता येत नाही असे लोक दुपटीच्या योजनेत पैसे गुंतवतात. “ कामाला ” हा शब्द यासाठी वापरला कि ,मनुष्य अगोदर पैसे मिळवण्यासाठी स्वता काम करतो. काही लोक आयुष्यभर कामच करतात. काही थोडे लोक मिळवलेल्या पैश्यालाच कामाला लावतात. पैशानेच मोठे व्यापार करतात. नंतरचा विषय येतो तो सामन्यांची बचत . असी बचत दरमहा थोडी थोडी केली जाते. या अशा बचतीतून त्यांच्या भविष्यातील गरजा अल्पप्रमाणात पूर्ण होतीलही पण अशा बचतीतून खूप पैसा निर्माण झाला असे होत नाही. आणि शेअर मार्केटचा पर्याय पैसा वाढविण्यासाठी सांगितला जातो. याही पर्यायाचा आपण विचार करू. शेअर मार्केट विषयी सामान्य लोकांमध्ये काही गैर समाजही असतात. भारतात तर बहुसंख्य लोक यापासून अलिप्त आहे . “ हा विषय आपला नाहीच ” इथपर्यंत त्यांची मानसीकता तयार झाली आहे. शेअर मार्केटमध्ये अनेक लोक संपले, डूबले ,काहींनी आत्महत्या केल्या. असे बोलले जाते. असे होतेही . पण त्याची कारणे अभ्यासली का ? मार्केट मध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतात. आपल्या पैशाच्या चारपट मार्जीन् देतात. फिव्हचर ऑप्शन वापरतात. याच ठिकाणी लोक लालची पडतात. व संपतात. काही लोक असा पैसा मार्केट मध्ये टाकतात कि, ज्या पैशाची दोन चार महिन्यांनी लग्नासाठी , शिक्षणासाठी गरज आहे आणि मार्केट खाली आलेच तर त्यांना लॉस घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. ज्या पैशाची आपल्याला पाच ,दहा वर्ष गरजच नाही . असा पैसा गुंतवला तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कधीकधी मार्केट खाली आल्यावर लोक घाबरतात. अशा वेळी गुंतवणुकीची संधी प्राप्त होते हे लक्ष्यात घेतले पाहिजे. पैसा गुंतवताना कंपन्यांची पूर्ण माहिती घेवूनच त्यात पैसा अडकवला पाहिजे. या ठिकाणी नशीब उपयोगाचे नाही. त्याला अभ्यासाची गरज असते. बाजाराला जुगार समजू नये. तो एक बिजनेस आहे. हे समजूनच गुंतवणूक करावी. आणि आपली गुंतवणूक किती ? एका वर्षात किती परतावा हवा ? हे अगोदर ठरवून घ्यावे. विनाकारण लालचेत पडू नये. आणि लोक नेहमी LIC, सारख्यांनच्या खरेदीकडे लक्ष्य ठेवून आपली खरेदी करतात. परंतु हे प्रत्येकाला शक्य नाही. त्यांच्या जवळ पंचवीस वर्ष पैसा अडकवण्याची तयारी असते. इतके भांडवल त्यांच्या जवळ असते. आपल्याजवळ भांडवल किती ? किती दिवस आपण पोजिशन सांभाळू शकतो ? याचा विचार हवा. मार्केट मध्ये दरमहा थोडीफार गुंतवणूक करत गेल्यास दहा पाच वर्षात नक्कीच फायदा मिळेल. जसे आपण पॉलिसीत पंधरा वीस वर्ष पैसे काढू शकत नाही तसे यात सतत शेअर्स खरेदी करत गेले तर वीस वर्षात नक्कीच पैसे पंचवीस पट झालेले असतील. घोडा का अडला ?, पाने का सडली ? ,भाकरी का करपली ?, या तीन प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे न फिरवल्यामुळे . तसे शेअर्स देखील एकदा घेऊन त्याकडे लक्ष्याच दिले नाही तर जास्त फायदा मिळू शकत नाही. त्यासाठी नफ्यात असलेले शेअर्स विकावे व कमी किमतीचे शेअर्स घ्यावे . असा सतत बदल केल्यास नक्कीच फायद्याचे प्रमाण वाढेल. या पद्धतीने थोड्याच कालावधीत आपल्याजवळ चांगला पैसा उभा राहू शकतो. मार्केट मध्ये कमोडिटी व एग्रो कमोडिटी हा ही एक नफा कमविण्याचा चांगला पर्याय आहे. परंतु यात जोखीम आहे. पण गुजराथीत म्हण आहे. “ हिम्मतणी किम्मत ” आता थोडी हिंमत असल्याशिवाय फायदा मिळू शकत नाही. योग्य अभ्यास , सराव, यातून ह्या गोष्ठी सहज शक्य होतात. NCDEX मध्ये गव्हू ,सोयाबीन सारखा शेतीमाल विकत घेवू शकतो. आपण ग्रामीण भागात राहत असल्याने व शेती करत असल्याने शेतीमालाच्या भावाचे चढ उतरीचे ज्ञान आपल्याला असते. त्या ज्ञानाचा फायदा आपण घेवू शकतो.
 
 
 
 
 
by-fb

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल