शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

*कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा.....?*...

 

*कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा.....?*

*आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये "पादाभ्यंग" सांगितलेले आहे* त्यात कास्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी
◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी
◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी
◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी
◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी
◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆पायावरची सूज कमी करण्यासाठी
◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी
◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त
◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी
◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी

*भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे "कांस्यम बुद्धीवर्धकम"*
आपल्या मराठीत एक म्हण आहे *" तळपायाची आग मस्तकात जाणे"* आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला कास्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते
वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे, युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात.
संस्कृतमध्ये 1 श्लोक आहे ज्यात म्हटलं आहे
जो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग असे दूर राहतात जसे गरूडपासून साप
*आपल्या शरीरात 72000 नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळाव्यात होतो त्यामुळे तळव्याचा मसाज हा अनेक दुखण्यावरचा एक गुणकारी व कमी खर्चाचा उपाय आहे*

ऐतिहासिक वारसा

कांस्य हा धातू आपल्याला फक्त सुवर्ण आणि रोप्य पदकांसोबत कांस्य पदक देतात म्हणून माहिती आहे. भारतात बहुतेक प्रांतामध्ये लग्नामध्ये मुलीला कास्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते पण तिचा उपयोग मात्र कमीच केला जातो. कासे हा तांबे आणि जस्त यांचा संमिश्र धातू असून *आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणून 5000 वर्षांपूर्वीपासून सांगितलेला आहे*.
गुजरातमध्ये जेवणासाठी कास्याच्या थाळ्याच वापरतात, पूजेसाठी कास्याचे तबक वापरले जाते, मंजुळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटासाठीही कासेच वापरले जाते, तसेच काठिण्य व ऑक्सिडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बनविण्यासाठी हा धातू वापरला जात असे, पूर्वी रशियामध्ये चर्चघंटा, तर स्पेन आणि पुर्तुगालमध्ये तोफा या धातूच्या बनवीत असत.

*वातव्यधीहरम कफप्रशनम कांतीप्रसादावहम त्वगवेवर्ण्य विनाशनम रुचिकरमम सर्वांग दाढर्याप्रदम आग्नेरदीप्तीकर्मम बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्याम मर्दनमुदिशनती मूनया: श्रेष्ठम सदा प्राणायाम*

म्हणजे ऋषि मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे
सुवर्णासमान कांती प्रदान करणारे, त्वचेचा वर्ण गौर करणारे, अग्नी प्रदीप्त करणारे, बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे,आणि रुचिकारक आहे.

*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी कायद्यानचे, नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. स्वार्थी व खोट्या राजकारणी लोकांच्या भुलथापाना बळी पडु नका, खोट्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःच व परिवाराच्या जीवांचे रक्षण करा, जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹






by - internet

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

*नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर शहादा तालुख्यातील घटना*

 


*नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर शहादा तालुख्यातील घटना*

अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.

*शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी, बोअर मृत. पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते. असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.

मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी, बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.

तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. 

जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.

डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले, ट्रॅक्टर, लाकडी नांगर, लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला.

गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले. अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले.

सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.

तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना *वॉटर मॅन ऑफ शहादा* असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? 

या विषयी सांगताना तात्या बोलले , " दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. "

खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.

आपल्या मित्रांना बाकीचे मेसेज पाठविण्यापेक्षा हा मेसेज फॅारवर्ड करून पाणी चळवळ जागृत करा.






















by- internet

माझ्याबद्दल