शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

*जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.*

 *जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.*

------------------

*1) जमीन खरेदी विक्री व्यवहार रजिस्टर ऑफिसला नोंदणी करा.*
*2) किमान 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात शेत जमीन खरेदी करू नका.*
*3) बिगरशेती आदेश प्राप्त जमीन 20 गुंठ्या पेक्ष्या कमी असेल तरी खरेदी करता येते.*
*4) शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेती खरेदी करता येत नाही.*
*5) आदिवासी व्यक्तीची शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस खरेदी करता येत नाही.*
*6) वर्ग 2 म्हणजे इनाम वतन देवस्थान इत्यादी जमीन सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेता परस्पर विकत येत नाही.*
*7) नोटरी किंवा 100 च्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन वर्ग 2 ची जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवणे याला कोणताही कायदेशीर आधार नाही.*
*8) जमिनीवर कोणत्याही संस्थेचा बोजा कमी नकरता जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार कायदेशीर नाही.*
*9) सहहिस्सेदार यांची सहमती न घेता परस्पर जमीन विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.*
*10) देवस्थान व महार वतन जमीन परस्पर विक्री करता येत नाही याला महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागते.*
*11) कायद्याने बहीण व बहिणीच्या पश्चात तिची मुले यांची नावे 7/12 पत्रकाच्या कब्जेदार सदरी लावावी लागतात.*
*12) हक्क निर्माण झालेल्या व्यक्ती कडूनच नोंदणीकृत हक्कसोडपत्र करता येते.7/12 पत्रकावर नावाची नोंद करण्यापूर्वी हक्कसोड पत्रक करू नये.*
*13) एक लाख रुपया पेक्ष्या जास्त रक्कमेचा वितसंस्थेचा बोजा नोंद करण्यासाठी गहाण खत करणे आवश्यक आहे.एक लाख रूपया वरील बोजा कमी करण्यासाठी नोंदणीकृत ऋणमोचक दस्त करणे आवश्यक आहे.*
*14) एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करताना सदर नोंद झालेली डायरी च्या आधारे त्या परिवारातील सर्व कायदेशीर वारसांची नावे कब्जेदार सदरी येणे कायद्याने आवश्यक आहे.दिशाभूल करणारा एकत्र कुटुंब प्रमुख चुकीच्या कृती बद्दल कायदेशीर कारवाईस पात्र आहे.*
*15) अज्ञान व्यक्तीच्या पालकास अज्ञान व्यक्तीची शेत जमीन किंवा मिळकत विकण्याचा कोणताही अधिकार नसतो तेव्हा अशा व्यक्ती कडून कोणतीही मिळकत विकत घेऊ नये.*
*16) मयत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे लावणे आवश्यक आहे. तथापि एकादे नाव जाणीवपूर्वक न लावल्यास ती व्यक्ती आपले नाव आवश्यक पुरावे सादर करून लावून घेऊ शकते त्याचा कायदेशीर हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही पण सदरची कृती वेळेत करणे हिताचे असते.*
*17) शेतजमीन अथवा मिळकत यांचा कायदेशीर व्यवहार करण्यासाठी 7/12 पत्रकावरील मयत व्यक्तीचे नाव कमी करावे लागते.*
*18) एकाद्या वारसाचे नाव वगळून कायदेशीर वाटणीपत्र करता येत नाही.*
*19) शेत जमिनीचे तुकड्यात म्हणजे 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात वाटणीपत्र करता येत नाही.*
*20) वारसा हक्काने प्राप्त जमीन बक्षीस देता येत नाही.स्वकष्टार्जित मिळकत बक्षीस देता येते.*
*21) सामाईक मालकीची जमीन सर्वांच्या मालकीची असते एकाध्या हिस्सेदाराने केलेला व्यवहार कायदेशीर दृष्ट्या अवैध असतो.*
*22) शेतजमीन तुकड्यात बक्षीस देता येत नाही.*
*23) कमी जास्त पत्रका आधारे शेतजमीन व प्लॉटचे  पोट हिस्से पाडता येतात.*
*24) अंतिम रेखांकना मध्ये ओपन स्पेस,विशिष्ट सोय निर्माण करण्यासाठी आरक्षित ठेवलेली जागा विकासकाला विक्री करता येत नाही.*
*25) मिळकतधारक बेपत्ता झाला असेल तर 7 वर्षा नंतर मा दिवाणी न्यायालयात अर्ज करून त्याचे वारस सदर व्यक्ती मृत घोषित करून घेऊ शकतात व आपली नावे मिळकतीस लावू शकतात.*
*28) एकाद्या व्यक्तीला सरळ वारस म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी नसेल तसेच त्याने मृत्यूपत्र केले नसेल तर त्याचे नजीकचे वारस दिवाणी न्यायालयात अर्ज करून वारसा सिद्ध करून वारसा प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन आपली नावे वारसाने लावू शकतात.*
*29) 7/12 किंवा मिळकतीचा पूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी त्या 7/12 अथवा मिळकती मधील सर्व फेरफार किंवा डायरी काढून तपासणी करावी यालाच सर्च रिपोर्ट म्हणतात.हे अभिलेख अभिलेख कक्षात मिळू शकतात.*
*30) सातबारा संगणकीकरण प्रक्रियेत शेती कसणाऱ्या व्यक्तीचे नाव हा कॉलम रद्द करण्यात आला आहे अशा वेळी जमीन कसणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक जमीन कसणाऱ्या व्यक्तीने प्रतीवर्षी तहसील कार्यालयास अर्ज करून जमीन कसत असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे त्यांच्या कायदेशीर हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे.*
*31) शेत जमीन,रहिवाशी बिगरशेती,वाणिज्यविषयक बिगरशेती,औद्योगिक बिगरशेती हे जमिनीचे वापरनिहाय प्रकार आहेत.*
*32) ब्ल्यू झोन,ग्रीन झोन,रेड झोन,यलो झोन हे जमिनीचे  भौगोलिक प्रकार म्हणता येईल,ब्ल्यू झोन पाणी नदी क्षेत्र,रेड झोन पुराचे पाणी येणारे क्षेत्र,ग्रीन झोन शेती क्षेत्र,यलो झोन रहिवासी क्षेत्र.*
*33) लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत सातबारा पत्रकावर पती बरोबर पत्नीचे नाव लावून सातबारा पतिपत्नी यांच्या सयूंक्त मालकीचे करता येते.*
*34) मृत्यूपत्र नोंदणीकृत व विना नोंदणीकृत दोन्हीची कायदेशीर वैधता समान असते.*
*35) सहकार कायद्या अंतर्गत वसुलीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या वसुली अधिकारी यांच्या बोजा नोंद करण्याच्या प्रक्रियेत हरकत घेण्यास कायदेशीर आधार शिल्लक राहत नाही.*
*37) शासनाने वाटप केलेली जमीन ज्या उद्देशाने दिली आहे त्या शिवाय विना परवानगी त्याचा वापर दुसऱ्या कारणासाठी सदर जमीन वापरली जाऊ लागली तर शासन सदर जमीन परत घेऊ शकते.*
*38) वारसाने जुन्या काळात बहिणीची नावे इतर हक्कात नमूद असतील तर अर्ज इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेता येतात.*
*39) 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतर अज्ञान व्यक्ती सज्ञान होते व ती सातबारावरील आपले अपाक शेरा कमी करून स्वतःचे नाव लावू शकते.*
*40) सातबारा संगणकीकरण प्रक्रियेत वर्ग दोनची जमीनीचे गट ऑन line ब्लॉक केले आहेत तेव्हा सदर वर्ग 2 वरील कोणतेही व्यवहार नोंद करण्यासाठी सदरचा गट खुला करण्यासाठी तहसील कार्यालयास अर्ज करावा लागतो व गट खुला झाल्या नंतरच तलाठी यांना नोंद करता येते.*
----------------







by - ?

*हल्ला*! ...

 


*हल्ला*! 

*१) पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* 
*लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणंच आली नाही तर कशाला जनता उठाव करतेय? म्हणून पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं. 

*२) दुसरा हल्ला रोजगारावर असतो, कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल तिकडे धावतो. मग भले ते काम स्वतःच्या विचारांविरुद्ध असो कि अनैतिक असो.*

*३) तिसरा हल्ला हा इतिहासावर असतो. इतिहासातील स्वतःला अनुरूप बदल हे जनतेला खोट्या अभिमानाच्या गुंगीत ठेवण्यास उपयोगी पडतात.*

*४) चौथा हल्ला हा मानवी मेंदूवर असतो. खोट्या कथा पेरणे, त्याचे स्तोम माजवणे, उदात्तीकरण करणे. खोट्या कथांना आधार म्हणून जनतेच्या मनातील प्रतीकांचा (उदा. जात, धर्म, राष्ट्र, सैनिक, दैवत, क्रांतिकारक इ.) वापर आणि हे सर्व करत असताना आपली प्रतिमा डागाळू नये म्हणून वरून प्रामाणिक, भोळेपणा किंवा सात्त्विकतेचा आव.* 

*५) पाचवा हल्ला हा विरोधकांवर असतो. कारण त्यांच्यात भविष्याचा वेध घेण्याची उपजत शक्ती असल्याने हे लोक काय करतात तर पुढे त्रास होईल अशा व्यक्तीची बदनामी ते आजपासून सुरु करतात. ज्या व्यक्तीची बदनामी करायची आहे त्याच्या बदनामीसाठी एखादा क्षुल्लक किंवा खोटा आरोप शोधून काढतात (तो प्रत्येकातच सापडतो) त्या व्यक्तीच्या बाकी अनेक कार्याकडे दुर्लक्ष केले जाते, आरोपाला योग्य ठरतील असे आणखी दहा खोटे आरोप जोडले जातात आणि बदनामी सतत सुरुच राहते. आपापल्या कामात मग्न असलेली भोळी जनता तेच खरे मानून बसते. सत्य समजून घ्यायला त्यांना कुठे वेळ आहे?*

*हे सगळे हल्ले अपयशी ठरले की मग शेवटचा हल्ला म्हणजे माघार घेऊन आम्ही तुमचेच, आम्ही किती भोळे हा जप ते सुरु ठेवतात तो पुन्हा योग्य वेळ येईपर्यंत.*

*तेव्हा मित्रांनो, हे मेंदू नासवण्याचे कपट कारस्थान वेळीच ओळखा अन्यथा आपला देश पुन्हा एकदा मध्ययुगात लोटला जाईल. शिक्षण घेऊन विचारी व्हा... वैज्ञानिक व खरा दृष्टिकोन स्वीकारून खोटा राष्ट्रवाद, देवाधर्माच्या नावाखाली, इतिहासाच्या नावाने खोटं बोलणाऱ्यांना थारा देऊ नका..*

माझ्याबद्दल