गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

घड्याळ आणि वास्तुशास्त्र...

 

  घड्याळ आणि वास्तुशास्त्र...

आपल्या घरात असणाऱ्या अत्यंत महत्वाच्या वस्तू म्हणजे आपल्या घरातील देवघर, आपल्या घरात असणार घड्याळ, कॅलेंडर, या काही अत्यंत महत्वाच्या वस्तू आहेत. मित्रांनो आज आपण घड्याळाच वास्तू शास्त्र पाहणार आहोत.घड्याळ ही वस्तू वेळ दर्शविते. आपलं जीवन सुद्धा निश्चित वेळेमध्ये बांधलेले आहे. आणि आपली जी वेळ आहे ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाशी खूप मोठ्या प्रमाणात जोडलेली असते.

जर हे घड्याळ तुम्ही चुकीच्या दिशेला लावले असेल, तर निश्चितच नकारात्मक परिणाम त्यापासून प्राप्त होतात. अनेक जणांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्या


ला दिसून येत. कोणतही काम करू द्या त्या कामा मध्ये अपयश मिळत. कितीही मेहनत करूद्या पैसा येत नाही. यालाच आपण दुर्भाग्य अस म्हणतो. मित्रांनो कदाचीत तुमचे हे दुर्भाग्य तुमच्या घड्याळाशी जोडलं असावं.

काहींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात, कुटुंबामध्ये भांडणे लागतात, घरातील लोक एकमेकांशी वाईट वागतात. मित्रांनो याचा सुद्धा संबंध तुमच्या घरातील घड्याळाशी जोडलेला असावा. चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कुठे लावावं आणि घड्याळाशी निगडित अत्यंत महत्वाचे नियम आपण कसे पाळावेत.

मित्रांनो सुरुवात करूयात दक्षिण दिशेपासून…खरं तर दक्षिण दिशा ही मृत्यु ची दिशा समजली जाते.दक्षिण दिशा ही मृत्यूचा देवता यमराज यांची दिशा आहे.आणि म्हणून आपण चुकूनही या दिशेला आपलं घड्याळ लावू नका.या मूळे आपल्या घरात यमदेवाचा प्रभाव वाढू लागतो.घरातमध्ये आकस्मित मृत्यू सुद्धा येऊ शकतात.कारण ही मृत्यू ची दिशा आहे.

दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थिरत्व दिशा आहे. म्हणजे आपली जी वाटचाल आहे ती अचानक थांबते. आपली प्रगती थांबते. आपल्या वाटचालीमध्ये अनेक अडथळे येतात, अनेक समस्या येतात. तुम्ही पाहिलं असेल की चालू काम कधीकधी थांबून जात. कामामध्ये खूप सारे प्रोब्लेम्स येतात. आणि मग अपयश येत. जर आपण दक्षिण भिंतीवरती घड्याळ लावलं असेल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते. आपली वाटचाल थांबते.

मुख्य म्हणजे आपल्या घरातील कर्ता असतो मग तो पुरूष असो किंव्हा स्त्री असो तर या कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेलं घड्याळ हे अत्यंत हानीकारक ठरत. या कर्त्या व्यक्तीच आरोग्य बिघडू लागत. आणि म्हणून चुकूनही आपण दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर घड्याळ लावू नका. दक्षिणेप्रमाने दुसरी जी दिशा आहे ती आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील घड्याळ लावू नका. पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे. पश्चिम दिशा ही सूर्य मावळण्याची दिशा. सूर्य मावळतो म्हणजे सूर्य बुडतो अगदी त्याच प्रमाणे जर आपण पश्चिम दिशेला घड्याळ लावले असेल तर त्या मुळे आपला काळ आपली वेळ सुद्धा बुडू शकते.

वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात जर आपण पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर घड्याळ लावले तर..पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून या दिशेला आपण चुकूनही घड्याळ लावू नका. काही जणांच्या घरातील घड्याळ ही बंद पडलेली असतात. एकापेक्षा ज्यास्त घड्याळ असतात.मात्र ही घड्याळ चालू स्थितीत असावीत. ती बंद पडलेली नसावीत. घरामध्ये जितकी घड्याळ आहेत ही सर्वांच्या सर्व घड्याळ एकसारखी वेळ दर्शवणारी असावी. एक घड्याळ पुढे आणि एक घड्याळ जर मागे असेल तर मित्रांनो कुटुंबामध्ये ट्रेस वाढतो. ताणतणाव वाढतो. आणि म्हणून सर्व घड्याळ समान वेळ दर्शवणारी असावीत. जी घड्याळ खराब झालेली आहेत ती तात्काळ दुरुस्त करावीत.आणि जर ती दुरुस्त होत नसतील तर ती बाहेर फेकावीत.

पुढची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये.हा दरवाजा वारंवार उघडला जातो बंद केला जातो.आणि जी वस्तू वारंवार बंद किंव्हा चालू होते अश्या वस्तू च्या मागे घड्याळ लावल्याने आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होतात.परिणामी घरातील लोकांची मानसिकता खराब होते.आणि म्हणून मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आपण घड्याळ लावू नये. घड्याळाच्या आकाराबद्धल सुद्धा अनेक जणांच्या मनात शंका असते. अनेक वास्तू तज्ञ अस म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावं. गोलाकार घड्याळ अत्यंत शुभ मानलं जातं. किंव्हा जे अंडाकार घड्याळ आहे ते सुद्धा चालू शकत. मात्र चौकोनी आकाराचं घड्याळ घरामध्ये आपण चुकूनही लावू नये.

रंगांच्या बाबतीत वास्तू शास्त्र अस म्हणत की घड्याळाचा जो रंग आहे तो कधीही काळ्या रंगाची नसावी. काळा रंग हा मुळता अशुभ मानला जातो. घड्याळाच्या बाबतीत हा घड्याळ कधीही वापरू नये. जे शुभ रंग आहेत त्या मध्ये सोनेरी रंग हा शुभ मानला जातो. त्यानंतर पिवळा रंग, पांढरा रंग, आणि लाल रंग हे चार रंग घड्याळासाठी अत्यंत शुभ मानले जातात. आणि त्यातल्या त्यात सोनेरी रंग अत्यंत शुभ मानला जातो. घड्याळाचे जे काटे आहेत ते अत्यंत टोकदार नसावेत. ते सौम्य असतात तर खूप चांगले.

आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ते घड्याळ कुठे लावावं. मित्रांनो शुभ परिणाम घडून आणण्यासाठी आपण घड्याळ लावताना तीन दिशा आम्ही आपल्याला सांगत आहे. कोणत्याही दिशेला आपण घड्याळ लावू शकता. पहिली जी शुभ दिशा आहे ती आहे पूर्व दिशा. पूर्व दिशेचा वेशिष्ट म्हणजे की पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशेला असणाऱ्या भिंतीवर जर आपण घड्याळ लावलं तर त्यामुळे वातावरण शुभ ठरत.

आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी शुभ घडू लागतात. घरातील लोकांमध्ये प्रेमाचं, आपुलकीच वातावरण निर्माण होत. वैवाहिक जीवनात प्रेम वाढीस लागत. आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारी दिशा आहे. दुसरी जी दिशा आहे ती आहे उत्तर दिशा ज्यांना व्यवसायात, नोकरीत प्रचंड प्रगती करायची आहे. ज्यांना भरपूर धनसंपत्ती हवी आहे त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावावं. कारण उत्तर दिशेला लावलेलं घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे वेगवेगळे मार्ग निर्माण करतात.आपल्याला अनेक संधी चालून येतील.

तिसरी जी दिशा आहे ती आहे ईशान्य दिशा..इशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधील दिशा..तर या दिशेवर आपण घड्याळ लावलं तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो विनाकारण खर्च होत नाही. पैसा घरामध्ये टिकून राहील. लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि कंमेंट करा…



टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

*रतन टाटा यांची खूपच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट* 🚀


*रतन टाटा यांची खूपच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट* 🚀

एका सुप्रसिद्ध उद्योगपतीची ही कहाणी अाहे. एक दिवस हा उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाला होता. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला.
 *"आज कसं येणं झालं ?"* उद्योगपतीने त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात तो विसरून गेला होता की, समोर त्याचा घरमालक उभा आहे.घरमालक विनम्रपणे म्हणाला, "मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहन गेलेलं दिसतं." उद्योगपती वरमला. म्हणाला, "हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल
क्षमा करा." एवढे बोलून उद्योगपतीने खिशात हात घालून पैसे काढले व
घरमालकाला दिले.घरमालक   उद्योगपतीला म्हणाला, 

 *तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता याचे मला आश्चर्य वाटते.*"
 उद्योगपती हसला व
म्हणाला, "मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या
काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो." घरमालक काही समजला नाही.तो भाडे घेऊन निघून गेला.
हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या  ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले, तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले, 
*"सर, तुम्ही रांगेत का उभे आहात?*
 आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा तम्ही एवढे मोठे उद्योगपती, रांगेत उभे राहन आम्हाला लाजवू नका.
उद्योगपती म्हणाले, "आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. उद्योगपती है माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. 
*मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे?*
 हे अधिक महत्त्वाचे आहे. एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. तिकीट काढून उद्योगपतीअपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळतआपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.
ज्या दिवशी उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले, त्या दिवशी आणखीन एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले.त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला.ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, "तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'"
हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, "माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.
उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा,व्हिस्की
सांड, उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.
असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले व ऐकले. त्याची उत्सुकता चाळविली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, 

*"साहेब, तुम्हाला इतके साधे राहणेव वागणे कसे काय जमते ?* 

आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??.
उद्योगपती म्हणाले, "अरे, मी पण लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक गव्हर्नेस होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते,

 *"तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण तू कसा आहेस हे फार महत्त्वाचे आहे."*

 आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा.
तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की,
खरोखरच आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसतेच. आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधे होते.'या *उत्तुंग *उद्योगपतीचे नाव रतन टाटा होते.* खरंच, जगात जेवढी उत्तुंग
माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी कुठलीही गुंतागुंत नसलेली अशी असतात. खरेतर साधे राहणे, हेच कठीण असते. व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.

 

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

द्धिमान लोकांच्या संपर्कात राहीलो तर आपणही निश्चितच बुद्धिमान होवु शकतो

 *प्रख्यात विद्वान आइनस्टाइन च्या ड्रायव्हरने एकदा आइनस्टाइन यांना म्हटले की--"सर मी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक सभेत बसुन आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत"*


*हे ऐकुन आइनस्टाइन हैराण!!*

*ते म्हणाले ठीक आहे, आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत तेथील आयोजक मला ओळखत नाहीत, तेथे माझ्या ऐवजी तु बोल मी तुझा ड्राइव्हर म्हणुन बसतो*

*झाले सभेमध्ये ड्राइव्हर स्टेजवर गेला आणि त्याने भाषणाला सुरवात केली*
*उपस्थित सर्वांनी खुप टाळ्या वाजवुन त्याला प्रतिसाद दिला*

*पण त्याच वेळेस तेथे उपस्थित एका प्रोफेसरने त्याला विचारले की-सर आपण आत्ता सापेक्षता ची जी परिभाषा सांगितली ती परत एकदा व्यवस्थित समजुन सांगता का ?*

*खाली ड्राइव्हर म्हणुन जे खरे आइनस्टाइन बसले होते त्यांना वाटले आता चोरी पकडली जाणार...*


*परंतु स्टेजवरील ड्राइव्हरचे उत्तर ऐकुन ते हैराण झाले..*

*ड्राइव्हरने त्या प्रोफेसरला उत्तर दिले की-इतकी सोपी गोष्ट आपल्याला कळाली नाही!!!*

*काही हरकत नाही ही गोष्ट तुम्ही माझ्या ड्राइव्हरला विचारा तो पण तुम्हाला समजुन सांगेल*

*नोट:-जर आपण नेहमी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात राहीलो तर आपणही निश्चितच बुद्धिमान होवु शकतो ,पण आपली उठबस जर मुर्ख लोकांसोबत असेल तर आपली बुद्धी सुद्धा त्यांच्यासारखी होवु शकते....*

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

1. बूस्टर डोस


 

बूस्टर डोस...





 

एक प्रेरणास्रोत : राधाकृष्ण दमानी...

 एक प्रेरणास्रोत

एकीकडे कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतानाच, तिकडे एका संस्थेने सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली. पहिल्या क्रमांकावर कोण असेल ? याची कल्पना आपल्याला असेलच. पण, मि. व्हाईट नावाने प्रसिद्ध व्यक्ती दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आणि सर्वच चकित झाले. कोण हा मि. व्हाईट ? काय त्याचा संघर्ष जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.

1954 साली राजस्थान मधील बिकानेर येथे एका सर्वसामान्य मारवाडी कुटुंबात मि. व्हाईट चा जन्म झाला. मारवाडी कुटुंबात जन्माला आलेला असल्यामुळेच लहानपणापासूनच त्याच्यावर व्यवसायच करण्याबाबतचे संस्कार झाले. त्यामुळे शिक्षणात तो जेमतेमच राहिला. बारावी पास होऊन पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अचानक एकेदिवशी वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

अगदी कमी वयातच त्याने आपल्या भावाबरोबर काम करायला सुरुवात केली . काही दिवसांत त्याने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला. पण, तो तोट्यात जावू लागला. त्यामुळे लवकरच तो व्यवसाय बंद करावा लागला. त्यावेळी तो 32 वर्षांचा होता.

याच कालावधीत त्याने पुन्हा आपल्या भावासोबत कामाला सुरुवात केली. आता तो शेयर मार्केट मध्ये ट्रेडिंग करू लागला. हे काम करतानाच तो स्वतः देखील शेयर खरेदी करू लागला. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेवून शेयर बाजारात पैसे गुंतवू लागला. मोठ्या संयमाने छोटी-छोटी गुंतवणूक, मोठ्मोठ्या कालावधीसाठी करू लागला. असे करता करता 1999 सालं उजाडलं. तोपर्यंत तो करोडपती बनला होता. आता त्याने एका नवीन व्यवसायात पदार्पण करायचे ठरविले.

त्याने 2002 साली मुंबई जवळील पवई या ठिकाणी, ग्राहकाच्या मनातील प्रत्येक वस्तू एकदम माफक दरात उपलब्ध करून देणारं एक रिटेल स्टोअर सुरू केलं. हळू हळू एका चे दोन, दोनाचे चार अशी संख्या वाढू लागली. प्रत्येक मोठ्या शहरात स्वतःचे रिटेल स्टोअर केवळ सुरूच केले नाही तर ते उत्तम प्रकारे चालविले देखील. 2017 साली त्यांनी आपल्या या कंपनीचे IPO शेयर बाजारात आणले आणि या दोनच दिवसांत त्याची संपत्ती 100 पटीने वाढली.
'फोर्ब्स रियल टाइम बिलिनियरीज इंडेक्स' ने फेब्रुवारी 2020 मध्ये जाहीर केलेल्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत त्याला दुसरे स्थान देण्यात आले. तो मि. व्हाईट म्हणजे राधाकृष्ण दमानी आणि ते रिटेल स्टोअर म्हणजे डी मार्ट होय.

आपला पहिला व्यवसाय डबघाईला आला म्हणून मि. दमाणी यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. खरंतर "पुन्हा एकदा प्रयत्न करणं. हेच यशाचे गमक आहे." मि. दमाणी यांनी दुसऱ्या 'आणखी एकदा प्रयत्न करण्याच्या' मार्गाने वाटचाल केली. "आपल्या यशाच्या शेयर बाजाराने आयुष्यभरात ला उचांक गाठावा. असे वाटत असेल. तर, आजपासून नव्हे तर आतापासूनच कष्टाची गुंतवणूक करा." नेमका हाच संदेश मि. दमानी यांच्या जीवन प्रवासातून मिळतो.



मि. दमानी भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.














- by Internet



बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*

 

*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*


*रशियात डेनिस डिडरोट* नावाचा एक अभ्यासू वाचक होता. *इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष* होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. *त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय* होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी *रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या* गरीबीबद्दल कळले. तिने *डिडरोटला* त्याच्याकडील *लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला* देऊ केले. *डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले*.


*डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला*. त्याने त्या पैशातून लगेच *'स्कार्लेट रॉब'*;  म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच *मानस शास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect)* म्हणतात. 


*भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?


समजा आपण *महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी.... इ. घेणार*. 

घरात *मोठा टी.व्ही*. आणला की *चांगला टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार*. घराला *नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार*.


समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी  आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात *'डिडरोट इफेक्ट'* 

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.


*सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने वापर करतात. 
एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. *कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत* माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.


*आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी*. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच *'spiraling consumption'* म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो *'डिडरोट इफेक्ट'* (Diderot Effect) होय. ही सामान्य *मानवी प्रवृत्ती* (human tendency) आहे.


या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण *नकळतपणे अनावश्यक खर्च* करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात. 


माणसाला *खर्च करताना भीती वाटत नाही*; पण नंतर *हिशोब लागत नाही*; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; *या वस्तूची मला कितपत गरज आहे?* असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं *उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा*. असा निर्णय घेतल्यावर त्या *वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां*? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा. 


दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो. 


संदर्भ :

*'डिडरोट इफेक्ट'* 

(Diderot Effect)

*Understanding the 'Diderot Effect' and how to overcome it?*

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

काय आहेत नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या 9 रंगाचे ...





काय आहेत नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या 9 रंगाचे महत्त्व (Importance Of Navratri Colors)


Dipali Naphade | ऑगस्ट 13, 2020


दिवस पहिला - रंग नारिंगीदुसरा दिवस - रंग पांढरातिसरा दिवस - रंग लालचौथा दिवस - रंग गडद निळादिवस पाचवा - रंग पिवळादिवस सहावा - रंग हिरवादिवस सातवा - रंग करडादिवस आठवा - रंग जांभळादिवस नववा - रंग मोरपिशी



नवरात्र म्हटलं की उत्साह. आजूबाजूला नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस आपल्याला प्रत्येकालाच अनुभवायला मिळतात. मुळात नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते. आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते. पण नवरात्रीच्या वेळी हे वेगवेगळे 9 रंग नक्की का घातले जातात? त्यांचे काय महत्त्व आहे याची तुम्हाला माहिती आहे का? दुर्गाची नऊ वेगवेगळी रूपं आणि त्याप्रमाणे त्याचे रंग या दिवशी घालायची प्रथा आहे. भारतामध्ये दुर्गा अर्थात देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक आख्यायिकादेखील आहेत. नवरात्रीच्या या उत्सवात नवरात्रीचे नऊ रंग आणि रंगांची उधळण कशाप्रकारे असते आणि कोणते रंग वापरण्यात येतात, त्याचे काय महत्त्व आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. जाणून घेऊया कोणत्या देवीसाठी कोणता रंग महत्त्वाचा आहे आणि त्याचे माणासच्या आयुष्यात काय स्थान आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. उदाहरणार्थ पहिला दिवस शनिवार आला तर यादिवशी ग्रे अर्थात करड्या रंगाची निवड केली जाते. पण मूळ रंग आणि त्याचे महत्त्व हे देवीच्या आवडीनुसार असल्याचे म्हटले जाते. गेल्या दशकापासून ही प्रथा जास्त प्रचलित झाली आहे. एकाच रंगाची वस्त्र परिधान केल्याने एकोपाचा संदेश देण्यात येतो अशी यामागची भावना आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!
दिवस तारीख देवी रंग
पहिला 17 ऑक्टोबर 2020 शैलपुत्री नारिंगी
दुसरा 18 ऑक्टोबर 2020 ब्रम्हचारिणी पांढरा
तिसरा 19 ऑक्टोबर 2020 चंद्रघंटा लाल
चौथा 20 ऑक्टोबर 2020 कुष्मांडा गडद निळा
पाचवा 21 ऑक्टोबर 2020 स्कंदमाता पिवळा
सहावा 22 ऑक्टोबर 2020 कात्यायिनी हिरवा
आठवा 23 ऑक्टोबर 2020 काळरात्री करडा
नववा 24 ऑक्टोबर 2020 सिद्धीत्री मोरपिशी


TABLE OF CONTENTS
दिवस पहिला - रंग नारिंगी अर्थात भगवा
दुसरा दिवस - रंग पांढरा अर्थात सफेद
तिसरा दिवस - रंग लाल
चौथा दिवस - रंग रॉयल ब्लू अर्थात गडद निळा
दिवस पाचवा - रंग पिवळा
दिवस सहावा - रंग हिरवा
दिवस सातवा - रंग करडा
दिवस आठवा - रंग जांभळा अथवा वांगी कलर
दिवस नववा - रंग मोरपिशी
दिवस पहिला - रंग नारिंगी अर्थात भगवाInstagram



नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. शैलपुत्री देवी दुर्गाचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची उपासना करण्यात येते. या देवीचा आवडता रंग नारिंगी असून तिला जास्वंदीचे फूल प्रिय असल्याचे समजण्यात येते. त्यामुळे या दिवशी नारिंगी रंगाच्या कपड्यांचे परिधान करण्यात येते. या दिवशी भगव्या रंगाचे परिधान केल्यास, शैलपुत्री प्रसन्न होते असा समज आहे. शैलपुत्री देवी भाग्य उजळवते असं म्हटलं जातं. त्यामुळे या पहिल्या दिवशी तिची पूजाअर्चा करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.
दुसरा दिवस - रंग पांढरा अर्थात सफेदInstagram



नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी देवीची भक्ती आणि उपासना करण्यात येते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करावी लागते. या देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते असे सांगण्यात येते. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते असं म्हटलं जातं. तप, त्याग, संयम यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. त्यामुळे या देवीची उपासना करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे. तसंच ही ज्ञानदेवता असल्याचेही समजण्यात येते.
तिसरा दिवस - रंग लालInstagram



दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तींचं नाव आहे चंद्रघंटा आणि तिसऱ्या दिवशी या देवीच्या पूजेला अत्याधिक महत्त्व आहे. या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते. मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होण्यासाठी भक्त या देवीची आराधना करतात. देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौलिक शक्तीचे दर्शन मिळते, तसेच दिव्यदृष्टींचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते. या देवीची पूजाअर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळेच या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते.
चौथा दिवस - रंग रॉयल ब्लू अर्थात गडद निळाInstagram



दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. या देवीला गडद निळा रंग जवळचा आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र परिधान करावीत. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनेच ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहेत. त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ति रूप मानण्यात येते. सूर्यमंडळात या देवीचे वास्तव्य असून आठ हात असल्याने ही देवी अष्टभुजा नावानेही प्रचलित आहे. कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा अशी आयुध प्रत्येक हातात असून एका हाताने आशिर्वाद देणारी ही देवी सिद्धी प्राप्त करण्यास प्रोत्साहन देते असा समज आहे. त्यामुळेच सुखकारक गडद निळा रंग या देवीचा आवडता रंग असल्याचेही सांगण्यात येते. यामुळेच या दिवशी गडद निळ्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. चांगले आरोग्य, संपत्ती आणि बळकटी येण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते.

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी
दिवस पाचवा - रंग पिवळाInstagram



पिवळा रंग हा दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीचा सर्वात आवडता रंग आहे. भक्ताच्या समस्त बाह्यक्रिया लोप पावून चैतन्य आणण्याचे काम ही देवी करते असे समजण्यात येते. पिवळा रंग हा अग्रेसर असून उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा हा आवडता रंग असून याला पाचव्या दिवशी परिधान करण्याचे महत्त्व आहे. लौकिक, सांसारिक बंधनातून मुक्त होऊन उपासना करण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते. या देवीच्या पूजेसाठीदेखील पिवळ्या फुलांचा वापर करण्यात येतो. पंचमी पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. घरात सुखशांती, समाधान आणि धनलाभ व्हावा यासाठी या देवीची आराधना आणि पूजा केली जाते. सतत प्रसन्न वाटण्यासाठी या पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी प्राप्त झाले आहे. स्कंद अर्थात कुमार कार्तिकेय यांचं दुसरं नाव आहे. प्रसिद्ध देवासुर युद्धात देवांचे सेनापती म्हणून कार्तिकेय यांनी काम पाहिले होते. पुराणात सांगितल्यानुसार कुमार आणि शक्ती अशी यांची महिमा आहे. या स्कंदाची आई म्हणून दुर्गेचे पाचवे स्वरूप स्कंदमाता म्हटले जाते अशी आख्यायिका सांगण्यात येते.
दिवस सहावा - रंग हिरवाInstagram



परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो.

जाणून घ्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांचे महत्व आणि आख्यायिका
दिवस सातवा - रंग करडाInstagram



नवरात्रीतील सप्तमीच्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते. याची पूजाअर्चा पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी करण्यात येते. सातव्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो. या दिवशीचा रंग करडा आहे. या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते. म्हणूनच यासंबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे काळरात्रीची पूजा ही सप्तमीला करण्यात येते.
दिवस आठवा - रंग जांभळा अथवा वांगी कलरInstagram



महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप असून तिचा आवडता रंग जांभळा अथवा वांगी कलर समजण्यात येतो. आयुष्यात सुंदर आणि अधिक चांगले होण्यासाठी या रंगाची निवड करण्यात येते. शांती आणि समाधानाचा हा रंग प्रतीक समजण्यात येतो. पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. महागौरीने भगवान शिव पती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती. या तपस्येने पार्वतीचे रूप हे सावळे होते मात्र त्यानंतर भगवान शिव पार्वतीला वरदान देऊन तिला गौर वर्ण देतात अशी आख्यायिका आहे म्हणूनच तिला महागौरी असंही नाव देण्यात आलं आहे. आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात. तसंच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येतात. त्यामुळेच प्रसन्न वातावरणासाठी हा जांभळा रंग निवडण्यात आला आहे.

बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट
दिवस नववा - रंग मोरपिशीInstagram



नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व तर आपण जाणून घेतले. मात्र गेल्या काही वर्षात हा एक ट्रेंड सुरू झाला असून याआधी कुठेही त्याचा उल्लेख नाही असं जाणकार खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. मात्र या देवींचे आवडते रंग आणि उल्लेख हे पुराणात देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या नवरात्रीलाही तुम्ही हे रंग निवडा आणि तुमची नवरात्र करा खास. या देवींच्या आराधनेसाठी हे रंग वापरण्यात येतात आणि त्याचे महत्त्व अशाप्रकारे आहे. मात्र हल्लीच्या ट्रेंडनुसार हे रंग बदलत असतात. त्यामुळे तुम्ही ट्रेंडनुसार फॉलो करायचं की देवीच्या रंगांनुसार महत्त्व द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण तरीही या नवरात्रीतही तुम्ही मस्तपैकी नवरात्रीचे नऊ रंग उधळण करत नवरात्र साजरी करा.




























https://marathi.popxo.com/2020/08/importance-of-navratri-colors-in-marathi/

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा...

 

वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा

 

आधुनिक काळात प्रसार माध्यमांचा समाज जिवनावर अतिशय खोलवर प्रभाव पडत आहे. अशा या नवमाध्यम युगात वृत्तपत्र तसेच इतर छापिल माध्यमे देखिल आपली महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. वृत्तपत्रस्वातंत्र्य ही जरी एक व्यापक संकल्पना असली तरी या माध्यमातून काहीही छापण्याचा अधिकार या माध्यमांना नाही. म्हणून वृत्तपत्रांना देखिल कायद्याच्या चौकटीचे पालन करून आपली माध्यमांची भुमिका बजावणे भाग पडत आहे.

११. प्रेस रजिस्ट्रार व सरकार यांना अंक पाठविले नाही तर ५० रू.दंड होतो.

१२. प्रेस रजिस्ट्रारला चुकीची माहिती दिल्यास ५०० रू. दंड होतो.

१३. मुद्रक
प्रकाशक किंवा संपादक यांच्यामध्ये बदल करावयाचा असेल तर मॅजिस्ट्रेटला याची माहिती देणे आवश्यक असते
   वृत्तपत्र आणि कायदा या दोघांचाही अतिशय जवळचा संबंध आहे. अशा या वृत्तपत्राशी संपादक, पत्रकार, व्यवस्थापक इ.चा संबंध येतो. या सर्वांना कायद्याच्या चौकटीचे पालन करूनच आपले कर्तव्य पार पाडावे लागते. काही कायदे वृत्तपत्रांना व इतर तत्सम माध्यमांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लागू होतात. त्यापैकीच एक प्रत्यक्ष लागू होणारा कायदा म्हणजे वृत्तपत्र व पुस्तकनोंदणी कायदा  म्हणजेच (The Press & Regestration of Books Act)
   वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा हा अतिशय जुना कायदा आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळात १८६७ मध्ये हा कायदा बनवला गेला. देशातुन निघणा-या वृत्तपत्रांची व पुस्तकांची नोंद एकत्रितपणे सरकार दफ्तरी रहावी या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला. या कायद्याने पुस्तकावर मुद्रकाचे नावं, मुद्रण स्थळ त्याचप्रमाणे प्रकाशकाचे नावं व प्रकाशन स्थळ सुस्पष्टपणे छापणे आवश्यक आहे. पुस्तकावर वरील तपशील देण्यामागे त्यातील लेखन किंवा इतर बाबी जर कायद्याचा भंग करणारे असेल तर अशा बेकायदेशीर व दंडनीय लेखनाची जबाबदारी कोणाकोणाची आहे हे समजावे अशा हेतूने या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय लोकशाहीच्या लिखीत राज्यघटनेमधिल तत्वांना अनुसरून किंवा त्यांची आंमलबजावणी करण्याकरीता हा कायदा निर्मित करण्यात आला आहे. वेळोवेळी या कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत.

    कायद्यात नमूद करण्यात आलेल्या बाबी/बदल पुढील प्रमाणे  :
१. प्रकाशीत होणा-या प्रत्येक वृत्तपत्रावर त्याचा मुद्रक,प्रकाशक व जेथुन प्रकशीत होते त्या ठिकाणाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
२. वृत्तपत्र प्रकाशीत करावयाचे असल्यास जिल्हा दंडाधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या अधिका-याकडे आवश्यक तपशीलाची नोंद असणे आवश्यक आहे.
३. वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर आवश्यक तपशीलाची नोंदणी असणे आवश्यक आहे.
४. वृत्तपत्राची भाषाप्रसिध्दीकाळसंपादकप्रकाशकनाव, इ.मध्ये बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित अधिका-यास देऊन नवे नोंदणी पत्र घेणे आवश्यक आहे. 

५. अंकाचे मुद्रक
, प्रकाशक यांना वृत्तपत्राची भाषाप्रसिध्दीकाळ यांची माहिती देऊन  मालकाच्या अधिकारपत्रासह घोषणापत्रावर  जिल्हा दंडाधिका-यासमक्षस्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

६. नोंदणीपत्र मिळाल्यापासुन सहा आठवडे
साप्ताहीकाच्या बाबतीत तीन महिने अंक प्रकाशीत होऊ न शकल्यास नोंदणीपत्र रद्द होते.

७. संपूर्ण वर्षभर वृत्तपत्र निघु शकले नाही तर नोंदणीपत्र रद्द होते
८. एखाद्या वृत्तपत्राचे नाव चुकीचे छापले गेले असल्यास किंवासंपादकाचे नाव चुकीचे छापले गेले असेल व तो त्या वृत्तपत्राचा संपादक नसेल तर जिल्हा दंडाधिका-यापुढे त्याने ती गोष्ट नजरेस आणुन त्याच्याकडून तसे प्रमाण पत्र मिळवणे  आवश्यक असते.

९. एखादे दैनिक
साप्ताहिकअर्धसाप्ताहिक आपल्या ठरलेल्या संख्येपेक्षा कमी निघाल्यास नोंदणीपत्र रद्द किंवा अमान्य होते.
(साप्ताहिकाला वर्षाला ५२ अंक प्रकाशीत करण्याची अनुमती असते. यामध्ये २६ पेक्षा कमी अंक प्रकाशीत झाल्यास साप्ताहिकाची नोंदणी रद्द होते)

१०. प्रेस रजिस्ट्रारला दरवर्षी प्रकाशनासंबंधीचे विवरण पाठविणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ते वृत्तपत्रात छापणेही बंधनकारक असते.


कायद्याची आंमलबजावणी
   सर्वसाधारण वयोगटातील वाचक/प्रेक्षकांवर दुष्परिणाम घडवू शकेल अशा साहित्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ व २९३ प्रमाणे कारवाई होऊ शकते. बीभत्स, अश्लिलता, कामोद्दीपक किंवा कुकर्म करण्यास प्रवृत्त करेल असे कोणतेही पुस्तक, पत्रक, कागद, चित्र, आकृती, रेखाटन, छायाचित्र किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लेखन वा प्रकाशन करणे हा संहितेप्रमाणे गुन्हा ठरतो. अशा प्रकारे समाजातील कोणत्याही व्यक्तिने अशा लेखन वा प्रकाशनावर हरकत घेतल्यास त्या लिखाणाशी वा प्रकाशनाशी संबंधित व्यक्तिवर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.
   PRB Act  नुसार कोणतेही वृत्तपत्र व पुस्तक छापून झाल्यानंतर त्याच्या प्रति सरकार ठरवून देईल त्या अधिका-याकडे मुद्रकाने विनामुल्य पाठविणे आवश्यक असते. या प्रति पाठवण्यासाठी येणारा सर्व खर्च मुद्रकाने करावयाचा असतो. याशिवाय सरकारने ठरवुन दिलेल्या जास्तीतजास्त पाच वाचनालयांना या प्रति मुद्रकाने विनामुल्य व स्वखर्चाने पुस्तक तयार झाल्यापासुन एका महिन्याच्या आत पाठवाव्या लागतात.
    वरील प्रति मुदतीत पाठवीणे मुद्रकास सोयीस्कर व्हावे म्हणून प्रकाशकाने आवश्यक तेवढ्या प्रति मुद्रकास मुदतीच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक असते.

उदाहरण-
      ओरंगाबाद येथुन प्रकाशित होणार सा.विपलव टाईम्स याला नोंदणीपत्र मिळाले. परंतु वर्षभर त्याची छपाई न झाल्याने त्याचे नोंदणीपत्र रद्द झाले.



















by - unknown

माझ्याबद्दल