सोमवार, १४ जानेवारी, २०१९

चामडा बाजार, धारावी


बाजारगप्पा : कातडीपासून पर्सपर्यंत..
अशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली.












भूलभुलैय्याशीच तुलना करता येईल अशा धारावीच्या छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये आज लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबंच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच गल्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात. यातलाच एक म्हणजे चामडा बाजार.

मध्य रेल्वेच्या शीव स्थानकापासून उजव्या दिशेला साधारण एक किलोमीटर अंतरावर आशियातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीला सुरुवात होते. स्थानकाच्या एक क्रमांकाच्या फलाटापासून उजव्या हाताने दगडी पुलाच्या चिंचोळ्या बोगद्यातून पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा मासळी बाजार लागतो. पुढे गेल्यावर चामडय़ाचे कमरेचे पट्टे, बॅगा, जॅकेट्स, वॉलेट्स यांची छोटय़ामोठय़ा दुकानांची दुतर्फा रांग नजरेला पडते. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक गल्ल्या दिसतात. या गल्ल्या म्हणजे भूलभुलैय्याच! एका गल्लीत शिरलात की पुन्हा त्याच गल्लीतून बाहेर पडाल याची शाश्वती नाही. गल्लीच्या दुतर्फा दोन-तीन मजल्यांची घरे दिसतात. प्रत्येक घरासमोर एक लोखंडी शिडी. चढताना पडू नये म्हणून आधाराला लटकणारी दोरी हमखास दिसते. प्रत्येक घरासमोर छोटे-छोटे नाले. कुठे तर नाला तुंबल्यामुळे पाणी साचून राहिलेले असते. त्यावर शेकडो माशा आणि डास घोंगावत असतात. अशा या धारावीच्या गल्ल्यांमध्ये लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबेच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच गल्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात.



धारावीच्या उद्यमशीलतेला मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळात, म्हणजे १८८२ साली विविध वस्तूंच्या उत्पादनांच्या निमित्ताने धारावी वसू लागली. ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधासाठी आलेल्या स्थलांतरितांनीच ती वसवली. मोकळी जागा मिळेल तिथे घरे बांधली गेली. गरजेप्रमाणे वाढविली गेली. अशी ही धारावी आज सुमारे सात लाख चौरस फुटापर्यंत पसरली आहे. येथे मराठी, हिंदी, दाक्षिणात्य, बंगाली, गुजराती, राजस्थानी, मुस्लीम अशा विविध जाती-धर्माचे लोक पाहावयास मिळतात. धारावीतील कारखान्यांमध्ये काम करणारे बहुतांश कारागीरही स्थलांतरित आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, दिल्ली या भागातून पैसे कमविण्यासाठी हे लोक धारावीत येतात. धारावीच्या एकेका गल्लीत किमान दहा कारखाने वसले आहेत. तेथे सतराशे साठ वस्तूंचे उत्पादन आणि विक्री होते. त्यापैकी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे चामडय़ाची.

देवनार कत्तलखान्याबरोबरच मुंबईभरातून आलेल्या बकऱ्या, मेंढय़ा, बैल आणि म्हशी यांच्यापासून कातडे कमावण्याचा मोठा व्यवसाय इथे चालतो. याला ‘चामडा बाजार’ म्हणतात. कातडय़ापासून पुढे बॅगा, पट्टे, जॅकेट्स तयार करण्याचा व्यवयास पुन्हा इथल्याच चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये वसला आहे. पशूंच्या कातडीचा उग्र दर्प नाकात घुसू लागला की चामडा बाजार आल्याचे आपोआप कळते. अशा वातावरणात सामान्य माणूस फार काळ राहू शकत नाही. परंतु येथील कामगार हा उग्र वास सहन करत कारखान्यांमध्ये तासनतास काम करीत असतात. नव्हे इथेच ते राहतात. त्यांचे जेवणखाण, झोप येथेच असते. धारावीतील प्रत्येक कारखान्यात हीच परिस्थिती आहे.

एका लहानशा खोलीत पशूंचे चामडे जाड मीठ लावून ठेवले जाते. बकरी आणि मेंढय़ाचे चामडे ५० ते ८० रुपयांपर्यंत खरेदी केले जाते. तर म्हैस किंवा बैल यांचे चामडे दीड ते दोन हजारापर्यंत खरेदी केले जाते. चामडे खराब होऊ नये यासाठी २४ तासांच्या आत त्यावर मीठ चोळतात. हे मीठ वापरातले नसते. मीठ लावल्यानंतर चामडे सात ते आठ फूट उंचीच्या रोलरमध्ये पाणी आणि काळ्या रंगाच्या पावडरचे रसायन टाकून धुतले जाते. १५ ते १७ तास हे चामडे धुतले जाते. तितका वेळ हे यंत्र सुरू असते. धुतलेले चामडे एकावर एक रचून ठेवतात. पाणी गळून गेल्यावर ते मऊ होण्याकरिता मोठय़ा यंत्राच्या साहाय्याने त्यावर इस्त्री फिरवली जाते. त्यानंतरही चामडे कडक वाटले तर कारखान्याबाहेरील दगडावर आपटून ते मऊ केले जाते. पुन्हा त्यावर इस्त्री फिरवून काही वेळ वाळवून हे चामडे रंगकाम करण्यासाठी पाठविले जाते.

ही एक वेगळीच खोली असते. खोलीभर दोरी बांधलेल्या असतात. चामडय़ावर रंगकाम करून वाळवण्यासाठी ते येथे टांगले जाते. त्यानंतर चामडे बॅगा, बेल्ट, शूज बनविणाऱ्या कारखान्यात पाठविले जाते. हा तयार माल शीव स्थानकाजवळील दुकानांमध्ये विक्रीकरिता येतो. महिलांसाठीच्या चामडय़ाच्या बॅगेची किंमत येथे २ हजारांपासून सुरू होते. तर चामडय़ाचे जॅकेट्स ३ हजारापासून पुढे १० हजारापर्यंत विकली जातात. यापुढे वांद्रे, अंधेरी, बोरिवली, मुलुंडच्या बडय़ा दुकांनांमधून ती कोणत्याही किमतीला विकली जाऊ शकतात. त्याशिवाय छोटय़ा पर्सेस आणि प्रवासाकरिता लागणाऱ्या मोठय़ा बॅगा ही देखील या बाजाराची खासियत. इथे बनलेल्या चामडय़ाच्या वस्तू गेली कित्येक वर्षे अनेक नामांकित ब्रँडने विकल्या जात आहेत. अशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली. कारण धारावीकरांच्या आयुष्याबद्दल भारतीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षण असते. आज धारावी एका वेगळ्या प्रकारच्या पर्यटनाचा आनंद लुटू पाहणाऱ्या पर्यटकांकरिता ‘पिकनिक स्पॉट’ बनली आहे. कातडय़ांच्या या बाजारात अशी ‘गोरी’ कातडी फिरताना अनेकदा दिसते. पण धारावीच्या चामडा बाजाराला त्याचे अप्रूप राहिलेले नाही.



गोवंश हत्याबंदीचा रोजगारावर परिणाम

‘लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार धारावीत कातडी वस्तू उत्पादनाचे १५ हजार लघुउद्योग आहेत. येथे चामडय़ाच्या बाजारात काम करणाऱ्या कामगारांना महिन्याला ८ ते १० हजार इतका रोजगार मिळतो. मात्र गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर देवनार कत्तलखान्यातून येणाऱ्या कातडीच्या प्रमाणात घट झाल्यामुळे येथील कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.

अस्सल ‘लेदर’ कसे ओळखाल?

लेदरच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बॅगा किंवा वस्तू या नेहमीच चामडय़ापासून बनलेल्या असतीलच असे नाही. बऱ्याचदा चामडय़ासारख्या दिसणाऱ्या बॅग फोम कापडापासून तयार केल्या जातात. मात्र चांगल्या दर्जाच्या लेदरला पशूंच्या कातडीचा उग्र वास येतो. तर लेदरला जाळले असता ते जळत नाही. या दोन पद्धतीतून खऱ्या लेदरची शहानिशा केली जाते. तर बकरी आणि मेंढीची कातडी पातळ असल्याने यांपासून तयार केलेल्या वस्तू पातळ असतात. तर म्हैस किंवा बैलांची कातडी जाड असल्याने हे लेदर टिकाऊ असते. त्यामुळे हे कातडे महागही असते.

















धारावीच्या उद्योगाला डिजिटल ओळख!

अशा प्रकारचा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आल्याचे प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी सांगितले.  

‘आयडीसी’च्या विद्यार्थ्यांने तयार केलेले उपकरण. 

‘आयडीसी’तील विद्यार्थ्यांचा अभिनव प्रकल्प
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली मुंबईच्या कुशीत वसलेल्या धारावी या महाकाय झोपडपट्टीत अब्जावधींची उलाढाल करणारे उद्योगही सुरू आहेत. एका विशिष्ट पठडीत उद्योग करणारी ही मंडळी आता आपल्या उद्योगाला वेगळय़ा वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर महिन्यात देशाच्या चलनातील पाचशे व एक हजार रुपयांची नोट रद्द केल्यानंतर या उद्योगांनी मोबाइल पाकिटांची मदत घेत डिजिटलकडे पहिले पाऊल टाकले. पण आता त्यांचे विपणन करण्यासाठीही डिजिटल माध्यमाचा वापर केला जाणार आहे. ही संकल्पना आयआयटी मुंबईतील अभिकल्प संस्थे (आयडीसी)तील चिन्मय परब या विद्यार्थ्यांने मांडली आणि ती यशस्वीही करून दाखविली.
गुगलने २०१५मध्ये बीकॉन उपकरण बाजारात आणले. या उपकरणाने काय करता येईल असे एक आव्हानही त्यांनी जगातील तमाम विद्यार्थ्यांपुढे ठेवले. यासाठी १०० उपकरणे ‘आयडीसी’मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. हे उपकरण इंटरनेटवर आधारित असून इंटरनेटशी जोडणारी कोणतीही यंत्रणा याद्वारे काम करू शकणार आहे. मग या उपकरणाचा काय वापर करता येईल, यावर ‘आयडीसी’मध्ये विचार सुरू झला. यात संस्थेत ‘इंटरअ‍ॅक्शन डिझाइन’ या अभ्यासक्रमात शिकत असलेल्या चिन्मय परब या विद्यार्थ्यांने उद्योगांसाठी या उपकरणाचा वापर करता येईल अशी संकल्पना मांडली. त्याच्या या संकल्पनेला आयडीसीतील प्रा. अनिरुद्ध जोशी आणि ब्रिटनमधील स्व्ॉनसी विद्यापीठातील प्रा. मॅट जॉन यांनी मार्गदर्शन केले व ती संकल्पना प्रत्यक्षात आणली.
अशा प्रकारचा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आल्याचे प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी सांगितले. सध्या हे उपकरण अकरा दुकानांमध्ये बसविण्यात आले असून येत्या काळात १०० दुकानांमध्ये बसविण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच आज हे उपकरण परदेशातून मागवावे लागते.
यामुळे त्याची किंमत ८०० रुपयांपर्यंत जाते पण जर भविष्यात या उपकरणाची निर्मिती आपल्या देशात झाली तर त्याचा खर्च ५०० ते ६०० रुपये इतकाच होणार असल्याचेही चिन्मयने नमूद केले.
ग्राहकांनाही फायदा
जेणेकरून धारावीत विशिष्ट गोष्टींची खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला या यंत्रणेचा फायदा होईल. तसेच दुकानदाराला त्याला पाहिजे तो ग्राहक मिळू शकतो, असा विश्वास चिन्मयने व्यक्त केला.
संकल्पना काय?
हा प्रकल्प धारावीत उभारत असताना चिन्मयने एक ‘अँड्रॉइड टूल’ विकसित केले. या टूलच्या माध्यमातून अवघ्या चार क्लिकवर धारावीतील दुकानदाराचे संकेतस्थळ विकसित होते. हे संकेतस्थळ विकसित झाल्यावर त्यात दुकानातील उत्पादनांची माहिती दिली जाते. दुकानात बीकॉन उपकरण ठेवलेले असते.या उपकरणाला जोडण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या स्मार्टफोन किंवा इंटरनेट जोडणी असलेल्या फोनमधले ब्लू-टूथ सुरू असणे आवश्यक आहे.  या उपकरणामुळे दुकानाच्या आसपासच्या परिसरात ब्लू-टूथ सुरू असलेल्या फोनवर क्रोम ब्राऊझरच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन जाते. या नोटिफिकेशनमध्ये दुकानाची थोडक्यात माहिती व एक लिंक दिलेली असते. ती लिंक सुरू केली की आपल्याला त्या दुकानात नेमकी कोणती उत्पादने आहेत व ती किती रुपयांना उपलब्ध आहेत याचा तपशील मिळतो.
धारावीची आजपर्यंतची ओळख ही एक झोपडपट्टी म्हणूनच होती. मात्र तेथे अनेक उद्योगही सुरू आहेत. यातील अनेक उद्योगांना भेटी देण्यासाठी तसेच धारावी नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी अनेक पर्यटकही तेथे येत असतात. या पर्यटकांना आपल्या दुकानाकडे आकर्षित करून घेण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल.’
– चिन्मय परब, ‘आयडीसीचा विद्यार्थी

















by - Loksatta नीरज पंडित |

बुधवार, २ जानेवारी, २०१९

कादर खान : 30 रोचक जानकारियां..


कादर खान : 30 रोचक जानकारियां








1) 1973 में अपने फिल्मी करियर की शुरुआत करने के बाद से, कादर खान 300 से अधिक फिल्मों में काम कर चुके हैं। उनकी पहचान अभिनेता और लेखक के रूप में है।


2) अपनी पहली फिल्म दाग में कादर खान ने, अभियोजन पक्ष के वकील की भूमिका निभाई थी।


3) कादर खान बॉम्बे युनिवर्सिटी के इस्माइल युसुफ कॉलेज से इंजीनियरिंग ग्रेज्यूएट हैं।


4) फिल्मों में करियर बनाने के पहले, कादर खान एमएच सैबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में सिविल इंजीनियरिंग के प्रोफेसर थे।


5) उनके पिता अब्दुल रेहमान खान कंधार के थे तो माता इकबाल बेगर पिशिन (अंग्रेजों के समय भारत का हिस्सा) से थीं।





6) कादर खान द्वारा कॉलेज में किए गए ड्रामा काम करने के बाद, दिलीप कुमार इतने प्रभावित हुए कि उन्होंने कादर खान को अपनी दो फिल्मों सगीना और बैराग के लिए साइन कर लिया।


7) कादर खान के तीन बेटे हैं। उनके एक बेटा कनाडा में रहता है और ऐसा कहा जाता है कि कादर खान के पास कनाडा की भी नागरिकता है।


8) कादर खान ने 250 से ज्यादा फिल्मों के संवाद लिखे हैं।


9) फिल्म 'रोटी' के लिए मनमोहन देसाई ने कादर खान को संवाद लिखने के लिए 1,20,000 रुपये जैसी बड़ी रकम अदा की थी।


10) कादर खान टेलीविजन पर एक कॉमेडी शो 'हंसना मत' प्रसारित कर चुके हैं। जिसे उन्होंने खुद बनाया था।



11) अमिताभ बच्चन के अलावा, कादर खान ऐसे कलाकार थे जिन्होंने प्रकाश मेहरा और मनमोहन देसाई के आपस में प्रतिस्पर्धी कैंपों में काम किया।



12) अमिताभ की कई सफल फिल्मों के अलावा, कादर खान ने हिम्मतवाला, कुली नं वन, मैं खिलाडी तू अनाड़ी, खून भरी मांग, कर्मा, सरफरोश और धर्मवीर जैसी सुपर हिट फिल्मों के संवाद लिखे हैं।


13) 2013 में, कादर खान को उनके फिल्मों में योगदान के लिए साहित्य शिरोमनी अवार्ड से नवाजा गया।


14) कादर खान 1982 और 1993 में बेस्ट डायलॉग के लिए फिल्म फेयर जीत चुके हैं।


15) कादर खान को 1991 को बेस्ट कॉमेडियन का और 2004 में बेस्ट सपोर्टिंग रोल का फिल्म फेयर मिल चुका है।

16) कादर खान 9 बार बेस्ट कॉमेडियन के तौर पर फिल्म फेयर में नामांकित किए जा चुके हैं।


17) अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम फ्रॉम इंडिया (AFMI) कादर खान को उनकी सफलताओं और भारतीय मुस्लिम कम्युनिटी की भलाई में उनके कामों के लिए सराह चुकी है।


18) फिल्म 'रोटी' के अशरफ खान, अपने एक नाटक के लिए एक युवा लड़के की तलाश में थे तब उन्हें लोगों ने बताया कि एक लड़का रात में कब्रों के बीच बैठकर डायलॉग चिल्लाता है। यह कादर खान थे।


19) कुछ समय पहले सोशल मीडिया पर फैलाई गई उनकी मौत की खबर से, कादर खान बहुत आहत हुए थे और उन्होंने कहा इससे उनके परिवार को खासा दुख पहुंचा है।


20) अपने बचपन के दिनों में कादर खान बहुत गरीब थे। गंदी बस्ती की झोपड़ी में रहने वाले कादर की मां उन्हें मस्जिद प्रार्थना के लिए भेजती थीं जहां से वे कब्रिस्तान चले जाते थे।

21) कादर खान के पास बचपन में चप्पल तक नहीं हुआ करते थे। उनकी मां उनके गंदे पैर देखकर समझ जाती थीं कि वह मस्जिद नहीं गए।


22) कादर खान की उनके पहले ही ड्रामे में एक्टिंग देखकर एक बुजुर्ग ने उन्हें सौ रूपए का नोट दिया था। कुछ साल अपने पास रखने के बाद, गरीबी के कारण कादर खान ने इस नोट को खर्च कर दिया जिसे वह एक ट्राफी समझते थे।

23) कादर खान के जन्म के पहले काबुल में रहने वाले उनके परिवार में उनके तीन बड़े भाई थे जो आठ वर्ष के होते-होते मर गए। इससे घबराकर कादर खान के जन्म के बाद, उनकी मां उन्हें लेकर मुंबई आ गईं।


24) कादर खान मानते हैं कि अच्छा लेखक बनने के लिए जिंदगी में बहुत दुख से गुजरना जरूरी है।


25) कादर खान कभी भी फिल्मों का हिस्सा नहीं बनना चाहते थे क्योंकि उसके समय फिल्मों को निचले दर्जे की चीज समझी जाती थी।


26) कादर खान एक लेखक के तौर पर बहुत ही जल्दी सफल हुए क्योंकि वह बोलचाल की भाषा में संवाद लिखते थे वहीं दूसरी ओर पहले से जमे हुए लेखक कठिन मुहावरों से भरी भाषा लिखने के आदी थे।

27) कादर खान गालिब की गजलों को समझाती किताबें लिख चुके हैं। जिनमें 100 से भी अधिक गजलों के मतलब लिखे हुए हैं।


28) एक दौर ऐसा भी था जब कादर खान कई हीरो से ज्यादा लोकप्रिय थे और दर्शक पोस्टर पर उनका चेहरा देख टिकट खरीदते थे।


29) अश्लील और द्विअर्थी संवाद लिखने के कारण कादर खान कई बार आलोचकों के निशाने पर रहे।


30) बीमार होने के बाद कादर खान इस बात से हताश हो गए कि लोगों ने उनसे दूरी बना ली और काम देना बंद कर दिया।























by-http://hindi.webdunia.com/bollywood-focus/kader-khan-30-interesting-facts-115102100037_1.html









माझ्याबद्दल