शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

भारतीय.. ८ वी नापास.. वय २१.. असा हा २००० कोटींचा मालक.!!

 

भारतीय.. ८ वी नापास.. वय २१.. असा हा २००० कोटींचा मालक.!!

वयाच्या विशीत, साधारणतः तरुणाई आपले शिक्षण पूर्ण करत असते , आणि बहुतांशी तरुण आपल्या भविष्याबाबाबत साशंक असतात. याला अपवाद म्हणजे लुधियाना स्थित आंतरराष्ट्रीय पातळीवर Ethical Hacker म्हणुन नावाजलेला त्रिश्नीत अरोरा. व्यवसायाची व computer क्षेत्राची कोणतीही कौंटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्रिश्नीत चा मध्यमवर्गीय तरुण ते यशस्वी उद्योजक हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्रिश्नीत चा जन्म ०२ नोव्हेंबर १९९३ मध्ये झाला. त्रिश्नीत चे वडील एक खाजगी कंपनीतील वरिष्ठ अकाउंट्स अधिकारी आहेत आणि आई गृहिणी आहे.

वयाच्या ११ व्या वर्षी त्याला computer ची तोंड ओळख झाली. कालांतराने त्याला computer hardware मध्ये आवड निर्माण झाली. या computer च्या आकर्षणामुळे त्रिश्नीत च्या शालेय अभ्यासावर परिणाम झाला व तो ८ व्या इयत्तेत नापास झाला त्यामुळे नंतर त्याला दहावीची परीक्षा बाहेरून दयावी लागली.

२०१२ मध्ये त्रिश्नीत ने TAC Security Solutions ची  स्थापना केली. व्यवसायाने कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय स्वतःचा व्यवसाय स्थापन करणे हे एक अतिशय आव्हानात्मक काम होते. परंतु काही वेगळं करण्याची आणि आयटी सुरक्षेच्या वाढत्या समस्यांच्या संख्येने उत्स्फूर्तपणे त्रिश्नीत ला स्वतःचा व्यवसाय स्थापित करण्यास प्रेरित केले.  त्रिश्नीत च्या मते कोणत्याही कार्यात उत्कटता सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे आणि मी काही वेगळं करण्याच्या उत्कटतेमुळे, आयटी सुरक्षा क्षेत्रात मी एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वतःला सिध्द करू शकलो.


TAC Security Solutions ही एक सायबर सुरक्षा कंपनी जी नेटवर्कच्या अभेद्यता आणि डेटा चोरीविरुद्ध कंपन्यांसाठी संरक्षण पुरवते. सध्या कंपनीचा टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात आहे. त्यांचे काही ग्राहक रिलायन्स उद्योग, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, पंजाब पोलिस (भारत) आणि गुजरात पोलिस आहेत. त्यांनी सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पंजाब आणि गुजरात पोलिसांना मदत केली आहे.

त्रिश्नीत अरोरा ने सायबर सुरक्षा, नैतिक हॅकिंग आणि वेब संरक्षण याविषयी पुस्तके लिहिली आहेत.
Hacking TALK with Trishneet Arora
The Hacking Era
Hacking With Smart Phones


त्रिश्नीत ला त्याच्या कार्याबद्दल विविध पुरसकरांनी गौरवण्यात आले आहे. 
२०१३ मध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
२०१४ मध्ये, पंजाबचे मुख्यमंत्री, प्रकाशसिंग बादल यांनी राज्य पुरस्कार देऊन गौरविले. तसेच पंजाब पोलिस अकादमीचा आयटी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले.
२०१५ मध्ये पंजाबी आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
२०१७- मॅन'स मॅगझीन तर्फे न्यूज मेकर अवॉर्ड


त्रिश्नीत च्या मते तुमच्या पॅशनपुढे शिक्षण महत्त्वाचे नाही.
अपयशाची पुढील पायरी यश आहे. त्यामुळे अपयशाने कधीही निराश होऊ नका. पॅशनवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्लाही त्रिश्नीत ने दिला आहे.

- सौजन्य : दिव्यमराठी 


Thanks - Atul Rajoli Sir

देवी दुर्गा आणि उद्योजकीय नेतृत्व !...

 

देवी दुर्गा आणि उद्योजकीय नेतृत्व !


देवी दुर्गा  आणि उद्योजकीय नेतृत्व !

नमस्कार मित्रांनो,
नवरात्रौत्सवहा आपला सर्वात उत्साही सण आहेदेवी दुर्गा ही आपल्या देशाला एकसंध बांधणारा महत्वाचा दुवा आहे असे आपण म्हणू शकतो कारण नवरात्रोत्सव भारतभर मोठ्या उत्साहात साजराकेला जातोजसेउत्तरेला व्रतउपवास  जागरण केले जातेपश्चिमेकडे गरबा आणि दांडियादक्षिणेला वैविध्यपूर्ण आरास तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात हा सणसाजरा केला जातोदेवी आपल्यामध्ये भक्ती रूपाने चैतन्य निर्माण करतेदेवीची आभाप्रतिमापौराणिक कथा आपल्याला दैनंदिन जीवनात प्रेरित करतात.

देवी दुर्गेचा सर्व शक्तिमान अवतार आपल्याला प्रामुख्याने व्यवस्थपनाचे  धडे देतो.

निडरपणा आणि आंतरिक सामर्थ्य -
दुर्गामूळ शब्द दुर्गमनिर्भयता दर्शवतोसमस्या लहान असो  मोठीप्रतिकूल परिस्थितींमध्ये आपल्याला अतुलनीय आंतरिक शक्ती प्रदान करतेजितके आपण अंतःकरणापासून स्थिर असू तितकेचआपल्याला बाह्यरूपाने खंबीरपणे संकटाना सामोरे जाणे शक्य होतेदेवी दुर्गा वाघावर आरूढ आहेजे निडरतेचे रूपक दर्शवितेम्हणजेच निडर व्यक्ती वाघाप्रमाणे भयंकर समस्यांचा सामना करूशकते  त्यांच्यावर मात करू शकतेव्यवसायात देखील प्रगती साधण्यासाठी आपल्याला अनेक समस्यांना कणखरपणे तोंड द्यावे लागते.




अखंड अष्टावधान -
दुर्गा मातेचे आठ हात हे अष्टावधानतेचे प्रतीक आहेउद्योजकलाही व्यवसायात एकाच वेळी अनेक मे करावी लागतातव्यवसायात अखंड सावधान असल्यामुळे उद्योजक मानसिकरीत्या सक्रियराहतोजेणेकरून वेळ  साधनांचा इष्टतम वापर होऊन उदयोजक स्वावलंबी  स्वयंपूर्ण बनतो.






दृष्टी आणि समता -
दुर्गा देवीची कोणतीही मूर्ती पहाआपले लक्ष वेधून घेणारे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देवीचे सुंदरशांत आणि दक्ष डोळेदेवीचे हे डोळे दुरद्रुष्टी चे प्रतिक आहेकेवळ आपले ध्येय निश्चित असूनभागत नाहीतर आपल्याला ध्येयपूर्तीच्या संपूर्ण प्रवासात सदैव सतर्क असणे आवश्यक आहेत्याचप्रमाणे देवीचे शांतचित्त आपल्याला जीवनात समतोल साधण्याचे कसब शिकवतोज्याप्रमाणे भव्य ध्येयसाधण्यासाठी अतिउत्साही नेतृत्वापेक्षा एक रचनात्मक  सर्वांना सोबत घेऊन जाणारे संयत नेतृत्व अधिक श्रेयस्कर ठरते.

अनुकूलता -
नवरात्रीच्या  दिवसांत देवी दुर्गा  वेगवेगळे अवतार धारण करतेत्याचप्रमाणे व्यवसायात शाश्वत यश मिळवण्यासाठी उद्योजकाला परिस्थितीनुरूप आपला स्वभावशैलीआचरण  वर्तन यांत सुयोग्यबदल घडवून सिध्द व्हावे लागते.


स्वत:चा मजबूत दुवा बना -
ज्याप्रमाणे दुर्गा देवीची उपासना  विश्वास लाखोंना एकत्र आणतोत्याचप्रमाणे उद्योजकाचे वर्तन गोंद प्रमाणे असावे जोसर्वांना एकसंध ठेवण्याचे काम करतोकारण गमावणे हे कमावण्यापेक्षा खूपचसुलभ असते.

नेतृत्व हे स्वतंत्र आहे
     कोणाची मक्तेदारी नव्हे -
 सर्वात महत्वाचे म्हणजेलक्षात ठेवा - जेव्हा इतर सर्व शक्तिशाली देव महिषासुराला रोखण्यास असमर्थ ठरले तेव्हा सर्वोच्च शक्तीला विजय मिळविण्यासाठी देवी दुर्गाचा अवतार धारण करण्याची गरजभासलीत्याचप्रमाणे आज २१ व्या शतकात व्यावसायिक नेतृत्व ही पुरुषांची वा विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी राहिली नसूनप्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार नेतृत्व सिध्द करण्याच्या समान संधी उपलब्धआहेतहे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण आहे.

नवरात्रोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा ! जय दुर्गा माता !

(अनुवादीत )
मधुकर कुमार,
सौजन्य - इकॉनॉमिक टाइम्स

Thanks - Atul Rajoli Sir 

उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे....

 

उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे


उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे

उद्योजकाचे जीवन ही एक अडथळ्यांची शर्यत आहेपुढे जाण्यासाठी आपल्याला सतत तयारअसणे आवश्यक असतेएक चुकीची हालचाल आपल्याला पडण्यासाठी पुरेशी असू शकतेआपणसुपरहिरो नाहीतम्हणून आपण अनेकदा चुका करतो किंवा चुकीचे वळण घेतो ज्यामुळेआपल्याला अपयशाला सामोरे जावे लागतेपरंतु अपयश खरोखरच आपल्या स्वप्नांपासुनआपल्याला परावृत्त करते काजर याचे उत्तर होकारार्थी असेल तरआपण चुकीचे आहोत.
उद्योजकाच्या जीवनात यशाइतकेच अपयश देखील तितकेच महत्वाचे आहे हे आपण ०७कारणांद्वारे जाणून घेऊया.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
अपयश हे आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे " - ओप्रा विनफ्रे
अपयश प्राप्त होणे ही घटना सुखद नसतेतरीसुद्धा आपण यशाच्या आणखी एक चरण जवळजात असतोकारण अपयशानंतर आपण अधिक जोमाने प्रयत्न करू लागतोआपण अयशस्वीहोतो याचा अर्थ आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी नक्कीच काहीतरी हालचाल करतोया छोट्यागोष्टीही आपल्या उद्योजकीय अनुभवाला अंतर्बाह्य समृद्ध करत असतातआणि सरतेशेवटीआपल्याला साहाय्यभूत ठरतातज्याप्रमाणे आपण  धडपडता सायकल शिकू शकत नाहीत्याचप्रमाणे आपण  अडखळता यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही  ठामपणे उभे राहूशकत नाहीम्हणून भव्य यशप्राप्तीसाठी अपयशाची पायरी ओलांडणे महत्वाचे आहे

जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण काहीतरी शिकतो.

यश साजरे करणे चांगले आहेपरंतु अपयशाच्या धड्याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे." - बिल गेट्स
अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जातेकदाचित पहिल्या प्रयत्नात आपल्याला अपेक्षितपरिणाम मिळणार नाहीतदुसऱ्या प्रयत्नात देखील आपले उद्दिष्ट सध्या होणार नाहीपरंतु जेव्हाआपण अयशस्वी होतो तेव्हा नक्कीच आपण त्यातून काहीतरी धडा घेतोजीवनात अपयशामुळेआपण सहजपणे निराश होतोबर्याचदा आपण अपयशातून काय शिकलो यापेक्षा काय गमावलेयावर लक्ष केंद्रित करून स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलतोत्यापेक्षा आपण "मी अयशस्वी काझालो? " या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला निश्चितपणे काही ठोस उत्तरे मिळतीलज्यामुळे आपल्याला पुढील वेळी अधिक तयारी करता येईलम्हणजेच,अपयश ही काहीतरीनवीन शिकण्याची दुसरी संधी आहे.

अपयश आपल्याला निडर बनविते.

"फक्त एकच गोष्ट आहे जी आपले स्वप्न साध्य करणे अशक्य करते ती म्हणजे अयशस्वीहोण्याची भीती." पाउलो कोएलो
यश मिळवण्याची सर्वात मोठी अडचण ही अपयशाची भीती आहेआपण कृती करण्याआधी बराचविचार करतो आणि अपयशाच्या भितीने कृती करण्याचे टाळतोपरंतुअपयश खरोखरआपल्याला  निडर बनवू शकतेआपल्याला वाटेल हे कसे शक्य आहेआपण बऱ्याच गोष्टींमध्येऐकतो कि आपण नेहमी सकारात्मक विचार करावाउद्योजक म्हणून आपण आपल्या ध्येयाचाविचार करावा नकारात्मक विचार करू नयेतजगप्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रान्सन यांना देखीलत्यांच्या जीवनात सात वेळा अपयशाला सामोरे जावे लागलेपण ते आपल्या उद्योजकीयध्येयापासून बधले नाहीतत्याऐवजी त्यांनी आपल्या कौशल्यांचे पुनर्वालोकन केले आणि"Where did I miss the X factor? असा विचार करून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्यायोजना अंमलात आणल्याएकदा आपण अपयशाची कडू चव चाखल्यावर भिती  बाळगता कृतीकरण्यावर भर दिला पाहिजे.

अपयश आपल्या अनुभवात मोलाची भर घालतात.

"अपयश अशी गोष्टच अस्तित्वात नाही - ते आहे फक्त अनुभव आणि त्यांचे प्रतिसाद." - टॉमक्रूझ
जेव्हा आपण प्रयत्न करताना अयशस्वी होतो तेव्हा आपण बऱ्याच कटू-गोड अनुभवातून जातोउद्योजक म्हणूनआपण अपयशाच्या सकारात्मक बाजूकडे दुर्लक्ष करतोजेव्हा आपणअयशस्वी होतोतेव्हा नेमके काय घडले हे कमीतकमी जाणून घेणे आवश्यक आहेहाआपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्यावहारिक अनुभव असतोजो आपण एखाद्या उच्चबिझिनेस स्कुलमधून देखील मिळवू शकत नाहीआपण अयशस्वी होण्याचा अनुभव ही एकमौल्यवान संपत्ती आहे जी भविष्यात आपल्या उद्योजकीय जीवनात मदत करेलकारणअयशस्वी झाल्यानंतरनव्याने सुरूवात करताना आपण नेहमीच दुसऱ्या दृष्टिकोनातून विचारकरण्याचा प्रयत्न करतोशिवायप्रत्येक समस्येचे निराकरण कसे करावे हे आपण शिकतोअडथळे आपण संधींच्या दृष्टीकोनातून पाहू लागतोम्हणून जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हानिराश होऊ नका त्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या व्यवसायाच्या योजनेचाचांगली आखणी कराया मार्गांनीआपण आपल्या अपयशांना अनुभवाच्या संसाधन स्त्रोतामध्येबदलू शकतो.

अपयश आपल्या उद्योजकीय गुणवैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करते.

आपण आपल्या जीवनात प्रत्येक अपयशानंतर अनुभवसमृद्ध होऊन एक चांगला उद्योजकबनतोआपण अधिकतम उत्पादनक्षमता मिळविण्यासाठी आपल्याकडील उपलब्ध साधनांचेप्रभावीपणे व्यवस्थापन करतोआपण वेळ आणि पैसा यांची ध्येयानुरूप योजनाबद्धरीत्याआखणी करतोआपण व्यवसायासाठी स्मार्ट मार्गांबद्दल विचार करतोअशा प्रकारे आपणआपल्या उद्योजकीय मानसिकतेचा  क्षमतांचा विकास करतो आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावरआपला प्रवास अव्याहतपणे सुरु राहतो.

जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण अधिक द्रुढनिश्चयी होतो.


"प्रयत्न केलातअयशस्वी झालातकाही फरक पडत नाहीपुन्हा प्रयत्न करापुन्हा आणखीचांगल्या प्रकारे अपयशी व्हा."- सॅम्युएल बेकेट
व्यवसायात अयशस्वी होणे दुःखद आहेपरंतु प्रत्येक वेळी जेव्हा आपलयाला अपयश येते तेव्हाआपण आपल्या व्यावसायिक उद्दिष्टांबद्दल अधिक उत्साही होतोकारण आपल्याला व्यवसायातअपयश देणाऱ्या विविध बाबींचा वा घटकांचा आपण विचार करून पुढच्या वेळी अधिक जोमानेसज्ज होतोतुम्हांला माहित आहे काबिल गेट्स यांनी खूप आधी ट्रॅफ--डेटा नावाची एककंपनी सुरू केली जी दुर्दैवी ठरलीपण त्यातून शिकून त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केलीआणिसंगणक क्षेत्रात इतिहास घडवलाम्हणून जेव्हा अपयश येते तेव्हा काळजी करू नकाफक्त कृतीकरत रहाकारण कोण जाणेआपण आपल्या स्वप्नापासून केवळ एकच चरण दूर असू शकतो.

अपयश आपल्या यशाचा आनंद द्विगुणीत करते.

मी तुम्हांला एक गोष्ट सांगतो ज्यामध्ये कडू अपयश हे भव्य यशाची नांदी ठरले१९८५ मध्येउच्चस्तरीय व्यवस्थापन समस्यांमुळे स्टीव्ह जॉब्स यांना आपणच स्थापन केलेल्या कंपनीचाराजीनामा द्यावा लागलाआपणच स्थापन केलेल्या कंपनीपासून दूर राहणे हा त्यांच्यासाठीकठीण निर्णय होताया कालखंडात त्यांनी बरेच संघर्ष केले आणि Next Computers कंपनीचीस्थापना केलीजी अत्यंत यशस्वी झाली१९९६ साली Next Computers विकत घेतल्यानंतरस्टीव्ह जॉब्स Apple मध्ये परतलेस्टीव्ह जॉब्स जेव्हा पुन्हा रुजू झाले तेव्हा Apple ची वाटचालदिवाळखोरीच्या दिशेने सुरु होतीपरंतु त्यांनी Apple ला त्यांच्या नाविन्यपूर्ण निर्णयांसहपुनरुज्जीवित केले आणि जगातील सर्वात फायदेशीर कंपनीमध्ये रूपांतरित केलेकधी काळीApple साठी नावडते ठरलेले स्टीव्ह जॉब्स तारणहार ठरलेस्टीव्ह जॉब्स यांचा प्रवास प्रेरणादायीआहे कारण त्यांनी अपयशाचा सामना केला.म्हणूनच यश मिळवण्याच्या आवडीचा आनंदघेण्यासाठी तुम्ही प्रथम कडू अपयशाचा सामना जरूर करावा.

  • सुहैल
अनुवादित )


- Thanks Atul Rajoli Sir 

माझ्याबद्दल