शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

जाहिरातींचा जमाना ! ...



आजचा जमाना स्पर्धात्मक जाहिरातींचा मानण्यात येतो. जाहिरात कोणासाठी, कश्यासाठी, त्याचे स्थळ, काळ, वेळ या सर्वांवर अवलंबून आहे. कंपनीने/उत्पादकाने बाजारात एखादी नवीन वस्तू/माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्याअगोदर वस्तू/मालाचे वेगळेपण बाजारात असलेल्या अश्याच उत्पादनांपेक्षा कसे वेगळे, चांगले, स्वस्त, मस्त आणि भिन्न आहे हे सांगण्याचे उत्तम माध्यम म्हणजे त्या वस्तूची जाहिरात. मग ती जाहिरातीच्या कोणत्याही माध्यमातून झालेली असो !

यासाठी आपण आत्तापर्यंतच्या जाहिरातीची वाटचाल कशी होत गेली हे थोडक्यात जाणून घेऊ.
१५व्या शतकात मुद्रण कलेचा शोध लागला आणि छापखाने सुरु झाले. याचा परिणामस्वरूप जाहिरातीची कला झपाटय़ाने वाढू लागली. १६२५ मध्ये वर्तमानपत्रातून पहिली जाहिरात लोकांसमोर आली. अठराव्या शतकात हस्तपत्रके जास्त प्रमाणात प्रचलित झाली आणि त्यांतून जाहिरातीच्या मजकुराबरोबर चित्रांना जाहिरातींत वाव मिळाला. १७०४ मध्ये अमेरिकेत वर्तमानपत्रातील जाहिरातींना सुरवात झाली आणि १८१२मध्ये पहिली जाहिरात वितरण संस्था इंग्लंड मध्ये सुरु झाली. प्राचीन काळी इजिप्शियन लोकांनी भूर्जपत्राचा उपयोग जाहिरातींचा मजकूर लिहिण्यासाठी न् भिंतीवर लावण्यासाठी केला होता. प्राचीन ग्रीस, रोम मध्येसुद्धा त्या काळानुरूप अशा पद्धतीच्या जाहिराती केल्या जात होत्या. जून १८३६ मध्ये ‘ला प्रेस’ या फ्रेंच वृत्तपत्रानं प्रथम ‘पेड’ जाहिरात छापली.
मुद्रणकला जोर धरत असतानाच फ्रान्स मध्ये १८७५च्या दरम्यान भित्तीपत्रके (पोस्टर्स) तयार होऊ लागली. अनेक नामवंत चित्रकारांच्या चित्रांचा त्यात वापर होऊ लागला. या सर्व गोष्टीमुळे जाहिरात जास्त ठसठशीत आणि आकर्षक होऊ लागली. तेव्हापासून या जाहिरातीत चित्रांच्या वापराची प्रथाच पडली आणि पर्यायाने चित्रकारांना एका नव्या दुनियेत संधी प्राप्त झाली. या सगळ्याचा विचार करता भारतात १७९० पासून वर्तमानपत्रात जाहिरात येण्यास सुरवात झाली आणि १९०७ मध्ये मुंबईत पहिली जाहिरात वितरण संस्था सुरु झाली.
रेडियो वरील जाहिरातींना परदेशात १९२०साली सुरवात झाली. दुसर्या महायुद्धानंतर विज्ञान-तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल आणि शोध लागल्याने टीव्ही वर जाहिराती झळकू लागल्या. दुसर्या महायुद्धानंतर सिनेमा गृहात मोजक्याच उत्पादनांच्या जाहिराती दाखवण्यात येऊ लागल्या. भारतात आकाशवाणी (रेडीओ) वरून १९६७ साली जाहिरातींना सुरुवात झाली तर १ जानेवारी, १९७६ पासून दूरदर्शनच्या माध्यमातून जाहिराती दाखविण्यास सुरुवात झाली.
आज सोशल मिड्यावरून विविध उत्पादनांच्या जाहिराती दाखविल्या/ऐकविल्या जातात. काही जाहिरातींबद्दल सर्वसामान्यांच्या मनात गैरसमज निर्माण होतात. सर्वच जाहिराती वाईट असतात असे नाही. तरीही जाहिरातीत दाखविल्या प्रमाणे वस्तू/माल त्या दर्जाचा असेल असे त्याच्या रंग, रूप, आणि आकर्षक पॅकींग यावरून कळणार नाही त्यासाठी ती वस्तू/माल स्वत: वापरून बघावा लागेल. तसेच काही जाहिरातींचा सततच्या भडीमारामुळे विशेषत: लहान मुलांवर कसा विपरीत परिणाम होतो हे सर्वश्रुतच आहे.
नागरिकांच्या आणि देशहिताच्या कल्पक जाहिरातीमुळे सरकारला त्यांच्या योजना योग्यरीत्या मांडता येतात. जनजागृतीसाठीही त्यांचा उपयोग होतो. एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या साथीमध्ये नागरिकांनी योग्यती दक्षता कशी घ्यावी याची माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडियातून होते. यामुळे साथ आटोक्यात ठेवण्यास मदत होते. एखाद्या आपद्कालीन समयाची पूर्व सूचना नागरिकापर्यंत मिळण्यासाठी आणि दक्षता घेण्यासाठी जाहिरातीची मदत होते. असे अनेक फायदे आहे.
१८ वर्षांखालची शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होईल, अशी कामं करणारी मुलं म्हणजेच बालमजूर. बाल कामगार कायदा १९८६ नुसार १४ वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणार्‍या व्यक्तीवर कारवाई होते. बाल न्याय अधिनियमनानुसार १८ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणं हा गुन्हा आहे. नाटक, सिनेमा, मलिका आणि जाहिराती अश्या क्षेत्रात बाल कलाकार काम करतना दिसतात त्यांना हा कायदा लागू होतो? का नाही मला माहित नाही, असे जरी गृहीत धरले तरी काही वेळा त्या बालकाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी, हौसेसाठी, भविष्यातील करिअर डोळ्यासमोर ठेऊन कदाचित त्याला या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली जात असावी. कदाचित वरील कायद्यात तशी काही तरतूद असल्यास माहित नाही. कोणाचा यावर आक्षेप असण्याचे कारण नसावे. परंतू स्वत:च्या हौसेसाठी, करिअर करण्याच्या नादात आणि वेळेचे बंधन नसलेल्या शिफ्टमध्ये काम करण्याने अभ्यासतील लक्ष उडायला किंवा कमी होण्यात होऊ नये एवढेच. अर्थात याचा त्यांच्या पालकांनी विचार केलेलाच असेल. असो.
इथे हा मुद्दा मांडण्याचे कारण की प्रिंट मीडियातील जाहिराती बनविण्यापेक्षा, इलेक्ट्रोनिक मिडियातील जाहिराती बनविण्याची हातोटी, कसब, मांडणी, कुशलता, स्क्रिप्ट, त्यातील संवाद, छायाचित्रण, आशय, गुणवत्ता, त्यासाठी घेतलेले परीश्रम, गुंतवलेला पैसा, काळ, वेळ आणि मुख्य म्हणजे त्यातील व्यक्तींचा सहभाग फार महत्वाचा असतो. याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला एक साधे “हग्गी” या लहान मुलांच्या डायपरच्या जाहिरातीच्या उदाहरणावरून लक्षात येईल.
सध्या सर्व दृक्श्राव्य वाहिन्यांवरून या उत्पादनाची जाहिरात केली जाते आहे. जाहिरातीत एक बालक (बहुतेक मुलगीच) आणि श्रेष्ठ स्त्री कलाकार काजोलला घेऊन ही जाहिरात केली आहे. काजोलला काम समजून देणे किंवा करून घेणे त्यामानाने सोपे आहे परंतु त्या एक-दीड वर्षाच्या निरागस बालकाकडून त्या सर्व एक्सप्रेशन (हावभाव), बॉडीलँगवेज त्या उत्पादनाच्या प्रमोशनसाठी करवून घेणे किती कठीण आहे हे ती जाहिरात बघताना जाणवते. जाहिरातीच्या सुरवातीपासून ते जाहिरात संपेपर्यंत उत्पादन लक्षात राहतेच पण ज्यांनी ही जाहिरात केली आहे त्याची कल्पकता, जाहिरातीसाठी आवश्यक असलेलं ग्राहकांच आणि कलाकारांच्या मानसशास्त्राचा चांगला उपयोग करून घेतला आहे. अगदी सहज ते डायपर बद्दलचे गाणं म्हणत त्या बालकाच खाली वाकून बघणं, तसाच काजोलचा प्रतिसाद, मग दोघांनी एकमेकांचे हात धरून नाचण, काय त्या दोघांच्या चेहेर्यावरील नैसर्गिक हावभाव. एकदम मस्त. काजोल आणि त्या बालकाचे बॉन्डींग इतके सुंदर आहे की एखाद्या आईने आपल्या मुलाला/मुलीला ते डायपर त्याच्या गळी उतरविण्यासाठी काय गमती/जमती केल्या असतील याची कल्पना येते. या दोन भिन्न वयाच्या, एक सरायीत आणि दुसरी या विश्वाची कल्पना नसलेल्या बालकाला घेऊन सत्यात उतरविल्या आहे यात वाद नाही. जाहिरातीच्या शेवटी ते बालक दोन हात वरकरून आनंदाने असेकाही नाचले आहे आणि उतस्पूर्त साद, संवाद, आणि अक्टिंग केली आहे, त्यात दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद, हास्य कुठेही न लपविता दिलखुलास आणि नैसर्गिक वाटतात आणि यातच जाहिरातीच्या यशस्वीतेचे गुपित दडले आहे. वा, क्या बात है | खूप कठीण आहे कारण बालकाच्या वेळा आणि त्याचा मूड बघून करणे सोप्पी गोष्ट नाहीऐ. जाहिरात डायरेक्टरच्या पसंतीस उतरेपर्यंत बालकाचे सर्व मूडस आणि वेळेचे भान सांभाळून बालकाकडून पुन्हा, पुन्हा एकच गोष्ट करून घेणे खूपच कठीण आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मर्फी रेडीओसाठी एका मुलाचा ‘मर्फी बॉय’ फोटो खूपच गाजला होता. निर्मा, अमूल बटर अशी काही चांगल्या जाहिरातींची उदाहरणे देता येतील.




जगदीश पटवर्धन

बिल गेट्स बद्दल - हे वाचा झोप लागणार नाही...!! .



बिल गेट्स हा प्रत्येक सेकंदाला यु.एस.$ २५० कमावतोम्हणजेच दिवसाला यु.एस.$ २० मिलियनआणी यु.एस.$ 7.8 बिलीयन दर वर्षी…!
) बरं जर समजा याच्या हातुन जर हजार डॉलर हरवले तर हा माहाभाग तेशोधण्याचाही प्रयत्न करणार नाही,कारण येत्या चार सेकंदांनी हा ते कमाउन बसलेला असेल…!
) याने जर १५ डॉलर जगातल्या प्रत्येक व्यक्तीस देउन दिले, तरीही याच्या खिशात यु.एस.$ मिलियन इतकी रक्कम उरलेली असेल.
) अमेरिकेत मायकाल जॉर्डन हा सर्वात जास्त पैसे कमावणारा खेळाडु आहे. जर याने आयुष्यभर काही खाता-पीता आपले वार्षीक उत्पन्न वाचवले जे की ३० मिलीयन डॉलर इतके आहे, तरिही त्याला बिल गेट्स इतके श्रीमंत होण्यासाठी, २७७ वर्षे वाट पाहवी लागेल.
) समजा बिल गेट्स हा जर एखादा देशअसता, तर जगातला ३७ वा श्रीमंत देश होण्याचा मान याने पटकावला असता.
) विचार करा जर बिल गेट्स ने आपलापैसा डॉलर च्या नोटांमधे रुपांतरीत केला, तर तो चंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनउ शकतो. तेही एक रस्ता नाही, असे २८ रस्ते तो बनउ शकतो. पण हा रस्ताबनवायला १४०० वर्ष लागतील, आणी तेही जवळपास ८००, बोइंग ७४७ विमानांचा वापर करावा लागेल पैसा पोहचवण्यासाठी.
) बिल गेट्स आता जवळपास ५४ वर्षांचा झाला आहे, ग्रुहीत धरा तो आणखी ३५ आणखी जग़ेल, जर पुर्ण संपत्ती खर्च करायची असल्यास, वेळात त्याला दर दीवशी जवळपास मिलियन डॉलर खर्च करवे लागतील.
आता शेवट:
) मायक्रोसॉफ्ट ही प्रणाली वापरणार्या जगातल्या प्रत्येक माणसाने, जेव्हाही त्यांचा संगणककाम करायचा थांबल्यास(म्हणज ेच हॅंग झाल्यास) जर फक्त डॉलर इतका दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनिवर केला, तर फक्त दिवसांच्या कालावधीत बिल गेट्स चे दिवाळे नीघेल.



Ref : कुठेतरी छानसे वाचलेले...

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

समोसे की दुकान...


एक बडी कंपनी के गेट के सामने एक प्रसिद्ध समोसे की दुकान थी.
लंच टाइम मे अक्सर कंपनी के कर्मचारी वहा आकर समोसे खाया करते थे.
एक दिन कंपनी के एक मॅनेजर समोसे खाते खाते समोसेवाले से मजाक के मूड मे आ गये.
मॅनेजर साहब ने समोसेवाले से कहा, "यार गोपाल, तुम्हारी दुकान तुमने बहुत अच्छेसे मेंटेन की है. लेकीन क्या तुम्हे नही लगता के तुम अपना समय और टॅलेंट समोसे बेचकर बर्बाद कर रहे हो.? सोचो अगर तुम मेरी तरह इस कंपनी मे काम कर रहे होते तो आज कहा होते.. हो सकता है शायद तुम भी आज मॅनेजर होते मेरी तरह.."
इस बात पर समोसेवाले गोपाल ने बडा सोचा. और बोला, " सर ये मेरा काम अापके काम से कही बेहतर है. 10 साल पहले जब मै टोकरी मे समोसे बेचता था तभी आपकी जाॅब लगी थी. तब मै महीना हजार रुपये कमाता था और आपकी पगार थी १० हजार.
इन 10 सालो मे हम दोनो ने खूब मेहनत की..
आप सुपरवाइजर से मॅनेजर बन गये.
और मै टोकरी से इस प्रसिद्ध दुकान तक पहुच गया.
आज आप महीना ५०,००० कमाते है
 और मै महीना २,००,०००
 लेकीन इस बात के लिए मै मेरे काम को आपके काम से बेहतर नही कह रहा हूँ.
ये तो मै बच्चो के कारण कह रहा हूँ.
जरा सोचिए सर मैने तो बहुत कम कमाइ पर धंदा शुरू किया था. मगर मेरे बेटे को यह सब नही झेलना पडेगा.
मेरी दुकान मेरे बेटे को मिलेगी. मैने जिंदगी मे जो मेहनत की है, वो उसका लाभ मेरे बच्चे उठाएंगे.
जबकी आपकी जिंदगी भर की मेहनत का लाभ आपके मालिक के बच्चे उठाएंगे..
अब आपके बेटे को आप डिरेक्टली अपनी पोस्ट पर तो नही बिठा सकते ना..
उसे भी आपकी ही तरह झीरो से शुरूआत करनी पडेगी.. और अपने कार्यकाल के अंत मे वही पहुच जाएगा जहा अभी आप हो.
जबकी मेरा बेटा बिजनेस को यहा से और आगे ले जाएगा..
और अपने कार्यकाल मे हम सबसे बहुत आगे निकल जाएगा..
अब आप ही बताइये किसका समय और टॅलेंट बर्बाद हो रहा है? "
मॅनेजर साहब ने समोसेवाले को २ समोसे के २० रुपये दिये और बिना कुछ बोले वहा से खिसक लिये.






स्रोत : इंटरनेट 

कथा सॅमसंगची (Samsung)...


1) 1938 साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षीण केरियामध्ये 'सॅमसंग' या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.
2) 1940 साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून नूडल्स बनवण्याच्या व विक्रीच्या व्यवसायाला सुरवात केली
3) 1950 साली सॅमसंगने नूडल्सचे उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन करायला सुरवात केली.
4) 1954 साली सॅमसंगने साखरेचे उत्पादन बंद केले व गरम कपडे बनवण्यासाठी वूलन मिल सुरू केली
5) 1956 साली सॅमसंगने वूलन मिल बंद करून इन्शुरन्स व सिक्युरिटिज विकायच्या व्यवसायाला सुरवात केली.
6) 1960 साली सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात प्रवेश केला व 'बलॅक ऍन्ड व्हाईट' टेलिव्हीजन सेट्स बनवायला सुरवात केली.
7) 1980 साली सॅमसंगने टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश केला व व टेलिफोन स्विच बोर्ड बनवायला सुरवात केली.
8) 1987 साली सॅमसंग कंपनीचा संस्थापक ली याचा मृत्यु झाला. त्यामूळे कंपनीचे विभाजन चार वेगवेगळ्या व स्वतंत्र कंपन्यांमध्ये झाले. डिपार्टमेन्टल स्टोअर्स, केमिकल्स व लॉजिस्टिक्स, पेपर व टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक्स असे विभाजन झाले.
9) त्याच साली सॅमसंगने जागतीक स्तरावर सेमिकंडक्टर प्लॅन्ट्समध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली.
10) 1990 साली सॅमसंगने जागतीक स्तरावरची गुंतवणूक बंद करून रिअल इस्टेच्या क्षेत्रात प्रवेश केला. मेशियामधले पेट्रॉनास टॉवर्स तसेच तैवानमधील तैपेई 101 या जगातील सर्वात उंच इमारतींचे बांधकाम सॅमसंगने केले.
11) 1993 साली मोठी मंदी आली. एशीयन मार्केटमध्ये मोठी मंदी होती. सॅमसंगला पण याचा मोठा फटका बचला. त्यावेळी लीच्या मुलाने कंपनीचा सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याने कंपनीचे डाऊनसायझींग करायला, कंपनीच्या उप कंपन्या म्हणजेच सबसिडिअरीज विकायला व उरलेल्या कंपन्यांचे एकत्रीकरण करायला सुरवात केली.
12) इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग व केमिकल डिव्हीजन्सचे एकत्रीकरण केल्यामूळे सॅमसंग ही जगातील मेमरी चिप्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली.
13) 1995 साली सॅमसंगने 'लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले' च्या क्षेत्रात प्रवेश केला व केवळ 10 वर्षातच 'फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन' बनवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली.
14) 2010 साली लिक्विड क्रिस्टल डिसप्लेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने सॅमसंग कंपनीने पुढील 10 वर्षांच्या वाटचालीचे धोरण ठरवले व स्मार्टफोनच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले.
15) 2016 सालामध्ये सॅमसंग ही मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री आय फोनच्या विक्रीच्या दुपटीहून अधीक आहे.
आज सॅमसनंगची विक्री 250 बिलियन डॉलर्सपेक्षा अधीक आहे व दक्षीण कोरियाच्या एकूण एक्सपोर्टमध्ये सॅमसंगचा वाटा एक पंचमांश ईतका आहे.
किराणा मालाचे दुकान - नूडल्सचे उप्पादन - साखरेचे उत्पादन- वूलन मिल - इन्शुरन्स व सिक्युरिटिजची विक्री - टेलिव्हीजन सेट्सचे उत्पादन - टेलिफोन स्विच बोर्डचे उत्पादन - सेमिकंडक्टर प्लॅन्टमध्ये जागतीक स्तरावर गुंतवणूक - रिअल इस्टेट - मेमरी चिप्स - फ्लॅट स्क्रीन टेलिव्हीजन - मोबाइल फोन व स्मार्ट फोन असा सॅमसंगचा प्रवास आहे.
एक वाण्याचे दुकान ते जगातील सर्वात बलाढ्य कंपन्यांपैकी एक असा सॅमसंगचा प्रवास थक्क करणारा आहे.
तात्पर्यः-
बदल हा जसा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तसाच तो बिझनेस, इंडस्ट्री व उद्योग व्यवसायाचा पण अविभाज्य भाग आहे. त्यामूळे बदल करायला घाबरू नका. तुम्ही जर बदल स्विकारला नाही तर तुम्ही नगण्य व्हाल! त्याच त्याच गोष्टी परत परत करण्याच्या मानसिकतेमध्ये अडकून पडू नका. त्यामूळे बोअर व्हाल. अयशस्वी होत असताना सुद्धा काही बिझनेस चालतच असतात ते एकप्रकारच्या अंतरीक उर्जेमूळे. या अपयशातूनच या कंपन्या प्रगती साधत असतात ते कशामूळे? कारण बिझनेसमधले अपयश हे तुम्ही प्रयत्न करता आहात याचे प्रतीक असते. ते नव्या पद्धतीने कंपन्यांची पुन्हा रचना करत असतात. नवी क्षेत्रे शोधून काढून त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत असतात. नवीन पाण्यात शिरायचा प्रयत्न करीत असतात.
आता सॅमसंगचेच पहा. त्यांनी कित्येक असे बिझनेस केले की त्यांचा परस्पराशी काही संबंध नाही. पण परिस्थितीनूसार ते बदलत गेले. नवीन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रवेश करत गेले व नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करत गेले. स्वतःच्या कंपन्यांचा नव्याने शोध घेत नवीन कल्चर आत्मसात करत गेले.
बदल हाच आयुष्यातील एकमेव 'कॉन्सन्ट' आहे हे लक्षात ठेवा.
यशाचा कोणताही परफेक्ट फॉर्म्युला नाही. त्यामूळे सतत प्रयत्न करत रहा. योग्य वेळी बदल करत रहा. केव्हा ना केव्हातरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल याची खात्री बाळगा. आपला बिझनेस किंवा उद्योग व्यवसाय यशस्वी करा! आयुष्यात यश मिळवा!
अर्था आपण आयुष्यात व बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचे की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?




स्रोत : माहित नाही ; पण जे असतील त्यांना धन्यवाद !... 

..आणि जॅकी श्रॉफ भावूक झाले


'सांगा मी काय कमवले, काय गमवले..?'


मुंबईतील एका चाळीपासून ते चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होण्यापर्यंतचा प्रवास अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी स्वत:च्या शब्दांत उलगडला.

‘मी चित्रपटांत येण्यापूर्वी वाळकेश्वर येथील एका चाळीत राहात होतो. तेव्हा मी, माझा भाऊ आणि माझे आई-वडिल सगळे एकाच खेलीत रहायचो. रात्री झोपेत कधी मला खोकला आला तर आई उठून बसे. आईला खोकला आला तर मी उठून बसायचो. चित्रपटात काम मिळाल्यानंतर पैसा आला, श्रीमंती आली, एका खोलीचा फ्लॅट झाला, खोल्या वाढल्या आणि भिंती मध्ये आल्या. एकाच फ्लॅटमध्ये त्या पलिकडच्या भिंतीआड झोपलेली ‘आई’ हृदयविकाराने गेली. पण, या भिंतीआड असणाऱ्या मला हे कळलेही नाही’, अशी आठवण सांगत ‘सांगा मी काय कमवले, काय गमवले…?’ असे जॅकी श्रॉफ म्हणाले


by - loksatta 

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

पैसा वापरण्याचे शिक्षण मिळण्याची गरज - अनिल बोकील



'पैसा विनिमयाच्या माध्यमाऐवजी साठवणुकीची वस्तू झाल्याने सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. माध्यमाचा वापर करायचा असतो, तर वस्तूंची साठवणूक केली जाते. माध्यम स्वत:जवळ ठेवून घेता येत नाही. पैसा वापरण्याचे शिक्षण मिळण्याऐवजी पैसा मिळविण्याचे शिक्षण दिले जाते. हे आजच्या शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैव आहे" - अर्थतज्ज्ञ अनिल बोकील .

ज्या देशाची अर्थव्यवस्था नैसर्गिक स्रोतावर अवलंबून असते, तो देश कधीही आर्थिक मंदीने ग्रस्त होत नाही,  ५० रुपयांपुढील सर्व नोटा बंद झाल्यास खोटय़ा नोटा बाजारात येणार नाहीत. कारण कोणत्याही नोटेला बनविण्याचा खर्च ३५ ते ४० रुपये येत असतो. रोखीचे व्यवहार बंद करून बँकेमार्फत सर्व व्यवहार झाल्यास काळा पैसा आपोआप बाहेर पडू शकतो...





- by - मराठा विद्या प्रसारक समाजाच्या येथील समाजकार्य महाविद्यालयात ‘अर्थक्रांती’ या विषयावर बोकील यांचे व्याख्यान 


ब्रॅण्ड पुणे : इथे सदैव रांगा लागतात !...


या घराण्याच्या चवीचं व्याकरण निर्माण केलं भास्कर गणेश चितळे यांनी १९२०मध्ये.

मुंबईकर, नागपूरकर आणि पुणेकरांच्या वादविवादात ‘हमारे पास चितळें की बाकरवडी हैं’ म्हटलं की अन्य दोन आपोआप निरुत्तर होतात, ही पुणेकरांच्या दृष्टीनं खरंच अभिमानाची गोष्ट!
शास्त्रीय संगीतात जशी गाण्यात घराणी असतात, तशी खाण्याची घराणी असती तर त्यातलं ठळक नाव असतं ‘चितळे’ घराणं. चितळे म्हणजे विशिष्ट शैली. चितळय़ांच्या घराण्यानं पदार्थाना खास चव, दर्जा दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तीनचार पिढय़ांनंतरही टिकवून ठेवला.
या घराण्याच्या चवीचं व्याकरण निर्माण केलं भास्कर गणेश चितळे यांनी १९२०मध्ये. सातारा जिल्हय़ातल्या  या छोटय़ाशा गावात सुरू झालेल्या आणि १९३९ मध्ये सांगली जिल्हय़ातल्या ‘भिलवडी’त स्थलांतरित झालेल्या दुधाच्या घरगुती व्यवसायाचं बघता बघता प्रचंड मोठय़ा उद्योगात रूपांतर झालं. आज पुण्यात तब्बल तीन लाख लीटर म्हशीच्या दुधाच्या आणि एक लाख लीटर गायीच्या दुधाच्या पिशव्या विकल्या जातात. पाच हजार लीटर सुटं दूधही विकलं जातं.
प्रतितास तीनशे किलो या हिशोबानं दररोज साडेचार टन बाकरवडी तयार होते. दसरा-पाडवा वा कुठलाही सण, पुणेकरांना चितळेंच्या दुकानात जायला जणू पर्याय नसावा असं चित्र. आजही सणाच्या आदल्या दिवशी चक्का घ्यायला रांग असणारच. दहावी-बारावीचे निकाल म्हणजे चितळेंकडचे पेढे हवेत. बरं, पुणेकर चोखंदळपणासाठी प्रसिद्ध. ते का उगाच रांगा लावणार?
भास्करराव चितळे यांनी भिलवडीला दुधाचा व्यापार सुरू केला तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होत होतं. मुंबई बंदर हे ब्रिटिश सन्याचं मुख्य केंद्र असणार आणि सन्याला मोठय़ा प्रमाणावर दुधाची आवश्यकता भासेल हे ओळखून भास्कररावांनी ‘तांबे अँड सन्स’शी भागीदारी करार करून मुंबईत तळ रोवला. युद्ध संपलं, करार संपला. त्यांचा थोरला मुलगा रघुनाथ, जो सांगली-मुंबई चकरा करायचा, त्यानं दूध विक्रीसाठी पुण्याची निवड केली. दरम्यान, भिलवडीमध्ये शिल्लक दुधाचा खवा, चक्का बनवणं सुरू झालं होतं. भास्कररावांच्या पत्नी जानकीबाई रात्र रात्र जागून स्वत: खवा आटवत असत.
१९४७ मध्ये पुण्यात कुंटे चौकात जागा घेऊन व्यवसायाचा श्रीगणेशा केला. दुधाचा घरपोच रतीब आणि खवा, चक्का दुकानात विक्रीसाठी ठेवला जाऊ लागला. दर्जा इतका उत्तम की तो हातोहात खपू लागला. मुंबईत राहून रघुनाथरावांना हे लक्षात आलं होतं, की आपल्याकडून खवा विकत घेऊन, त्याची मिठाई बनवून इतर व्यापारी चिक्कार नफा मिळवतात. मग आपणच मिठाई का तयार करू नये? या विचारानं उचल खाल्ली. पण त्यासाठी मोठी जागा हवी. १९५४ मध्ये डेक्कन जिमखान्यावर आणि १९६४ मध्ये बाजीराव रस्त्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची भव्य दुकानं उभी राहिली. यातल्या ‘बंधू’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे, कारण गेली ६० र्वष हा सर्व व्यवसाय चितळे बंधू मिळून सांभाळत आहेत. भास्कररावांना पाच मुलं. पकी रघुनाथ आणि राजाभाऊ पुण्यातली दूधविक्री, मिठाई आणि बाकरवडीसह अन्य खारा माल यांचा व्यवसाय बघतात. परशुराम आणि दत्तात्रय हे दोघं भिलवडीच्या डेअरीचं व्यवस्थापन बघतात. मुकुंदराव हे सिव्हिल इंजिनिअर. त्यांनी चितळे उद्योगासाठीच्या इमारती बांधल्या. तसंच त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्यानं दूध आणि मिठाईच्या सर्व ट्रान्सपोर्टसाठी त्यांची वाहनं वापरली जातात. अशाप्रकारे सर्व भाऊ आणि आता त्यांची सर्व मुलं, नातू याच व्यवसायात कार्यरत आहेत.
चितळे म्हणजे बाकरवडी हे समीकरण जुळलं १९७०-७१ मध्ये. लोकांना दुकानाशी बांधून ठेवायचं तर पारंपरिक पदार्थाच्या बरोबर काही नवं सुद्धा द्यायला हवं, हे लक्षात आल्यानं नव्या पदार्थाचा शोध सतत सुरू असे. राजस्थानी-पंजाबी असे विविध पदार्थ खाऊन त्यात कुठले बदल केल्यास ते मराठी चवीला आवडतील यावर कुटुंबात चर्चा होत. अशीच एकदा राजाभाऊंनी नागपूरहून पुडाची वडी आणली. पुडाची वडी आणि गुजराथी बाकरवडी या दोन्हीपेक्षा वेगळी, खास चवीची बाकरवडी त्यांनी बनवली आणि अक्षरश: इतिहास घडला. लोकांनी जो काही अफाट प्रतिसाद दिला की मागणी पूर्ण करणं अशक्यच होऊन बसलं. पुढचा टप्पा होता यांत्रिकीकरणाचा. बाकरवडी आणि यंत्रावर? हा अशक्य वाटणारा विचार चितळय़ांनी शक्य करून दाखवला. भास्कररावांनी मुलांना आधुनिकीकरणाचा आणि यांत्रिकीकरणाचा वसा दिलेलाच होता, त्यांनी १९४७ मध्येच भिलवडीत दुधाचं पाश्चरायझेशन सुरू केलं होतं. खवा-चक्का बनवणारी यंत्र आली होती. यांत्रिकीकरणामुळे कमी वेळात जास्त उत्पादन आणि दर्जा नियंत्रण साधता येतं, हा त्यामागचा विचार. त्यामुळेच जुन्या आणि नव्या पिढीत संघर्षांची वेळ आलीच नाही. नव्या पिढीला नव्याची ओढ असते आणि जुनी मात्र ‘जुनं ते सोनं’ला कवटाळून बसते. इथे सगळय़ांनाच नवं आत्मसात करायचं आहे. मग ते भिलवडीच्या डेअरीत संगणकाच्या मदतीनं गायी-म्हशींची मशागत असो वा पदार्थ बनवण्याच्या पद्धती, ताजेपणा टिकवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं पॅकिंग, कचऱ्याचा पुनर्वापर वा बििलगसाठी वापरली जाणारी मेमरी की सिस्टीम.
सुरुवातीला चार-पाच पदार्थ विक्रीसाठी ठेवणाऱ्या चितळे बंधूमध्ये आता जवळपास दीडशे पदार्थ विक्रीसाठी असतात. मिठाईच्या दुकानाचं उद्योगात रूपांतर झालं तेव्हा मिठाई बनवण्यासाठी इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये कारखाने सुरू झाले. एक गोड पदार्थाचा आणि एक खाऱ्या.
पुण्याचा चारी बाजूंनी जसा विस्तार होत गेला, त्या त्या भागातून वाढणाऱ्या मागणीचा विचार करून फ्रँचाईजी नेमण्याचा निर्णय घेतला गेला. ‘आमची अन्यत्र शाखा नाही’ अशा पाटय़ा लावण्यात धन्यता मानणाऱ्या पुणेरी दुकानदारांपेक्षा चितळे असे वेगळे असल्यानं ते नुसते मिठाईवाले राहिले नाहीत, तर एक ब्रँड होऊन बसले. अमेरिकेसह अनेक देशांत बाकरवडी आणि अन्य खारा माल निर्यात होतो.
सतत काळाच्या पुढे बघणारे चितळे बंधू ‘खोटं बोलू नका, वजन मारू नका, भेसळ करू नका’ हा पूर्वजांनी दिलेला मंत्र मात्र मागे बघत आजही निष्ठेनं पाळत आहेत.




नीलिमा बोरवणकर - दै. लोकसत्ता 

माझ्याबद्दल