रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

जिवा महाले (Jiva Mahale History in Marathi)


जिवा महाले (Jiva Mahale History in Marathi)
जिवा महाले हा महाराजांचा अत्यंत विश्वासूमहाराजांचा अंगरक्षकजिवा महाले तालवार बाजीमध्ये अत्यंत पटाईत होतामहाराजांनी अफजलखानाच्या पोटात बिचवा सारलाखान दगा दगा म्हणून ओरडू लागलाते ऐकून खानाचा रक्षक सय्यद बंडा धावून आलातो महाराजांवर वार करणार तोच जिवा महालाने मोठ्या 
चपळाईने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवलाबंडाला त्याने ठार केलेआणि महाराज बचावलेहोता जिवा 
म्हणून वाचला शिवाअसे मोठ्या कौतुकाने महाराज त्याला म्हणालेमराठेशाहीची भिस्त जिवासारख्या 
विश्वासूनिधड्या छातीच्या वीरांवरच अवलंबून होतीशिवरायांनी मराठ्यांच्या मदतीने दक्षिणेत स्वतःचे 
राज्य उभे केलेरयतेने त्यांना राजा मानलेआपल्या राजाच्या शब्दासाठी प्राण पणाला लावून लढणारी माणसेही शिवरायांकडे होतीराजांनी आता अनेक गडकिल्लेही काबीज केले होतेकिल्लेमुलुख सर्वत्र भगवा झेंडा फडकतो आहेया बातम्यांनी विजापूरच्या दरबारातील प्रत्येकाचीच झोप उडाली होतीतमाम आदिलशाहीलाच 




आता या शिवरायाला कुठे अन कसे थांबवायचे हा गहण प्रश्न पडला होतादक्षिणेस जायचं आणि शिवाजीचा 
बंदोबस्त करायचाबोला हे काम कोण करेलहा पैजेचा विडा कोण उचलणार,दरबारातले सारे वातावरण गंभीर आणि चिंताग्रस्त झालेले असताना विजापूरच्या दरबारातील एक भव्य भव्यदिव्यतुफानी ताकदीचंपोलादी  मनगटाच व्यक्तिमत्व उठून उभ राहीलतो होता अफजलखानअफजलखानाने हे धाडस दाखवले.
त्याला आणखी एक कारण होतेत्याच्याकडे प्रचंड ताकद होतीअफाट सैन्य होतंदारुगोळा आणि शस्त्रास्त्रे होतीबारा वर्षे तो वाईचा सुभेदार होतात्यामुळेच त्याला सारा मराठी मुलुखमराठी माणसंत्यांचं सामर्थ्य 
आणि काही मंडळींच्या कमजोऱ्या माहित होत्याप्रचंड मोठया फौजेनिशी पैजेचा विडा उचलून अफजलखान 
जेव्हा महाराष्ट्राच्या मोहिमेवर आलात्यावेळी शिवराय राजगडावर होतेखान येतोय हि वार्ता मिळताच 
राजांनी मासाहेबांच्या परवानगीने राजगड सोडला आणि प्रतापगडावर प्रस्थान केले.

Jiva Mahale History in Marathi जिवा महाले यांची स्वराज्य सेवा 

अफजलखानाच्या भेटीला जाताना राजांनी माता जिजाऊ ह्यांना वंदन केलेभवानीमातेचे दर्शन घेतलेअंगात चिलखतवर जरीचा अंगरखाडोई जिरेटोपत्यावर मंदिल बांधलाडाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली
अस्तिनात बिचवा लपवलाआणि सर्व तयारी करून शामियान्याच्या दाराशी हजर झालेखान तर आधीच 
येऊन शामियान्यात बसला होतात्याच्या मनात माझ्या शक्तीला घाबरून शिवाजी फक्त शरणार्थीसारखा 
मला भेटायला येतोयहा जणू माझा विजयच आहेअशा थाटात आणि काहीसा रमलेल्या स्तिथीत तो होता.
त्यावेळी खानाजवळ सय्यद बंडा नावाचा हत्यारबंद गडी उभा होतामहाराजांच्या वकिलाने प्रथम सय्यद बंडासदूर करावे अशी विनंती केलीखानाने आपल्या दाढीवर हात फिरवत सय्यद बंडास दूर केलेआणि दुसऱ्याच 
क्षणी शिवरायांनी खानाच्या दिशेने  आपली पावले उचललीया राजे या भेटा आम्हाला .. असे म्हणून आपले 
दोन्ही बलदंड बाहू पसरून अफजल खान पुढे आलाखान उंच धिप्पाड होतातर शिवाजी महाराज वामनमूर्तीच.खानाने भेटीचे नाटक करून महाराजांना आपल्या कवेत घेतलेत्यांची मान आपल्या कवेत दाबली आणि आणिमहाराजांच्या अंगावर कट्यारीचा वार केलाअंगावरचा अंगरखा फाटला पण चिलखताने आपले काम चोख 
केले. घाव पडला पण लागला नाहीत्याच वेळी आई भवानिचं स्मरण करून महाराजांनी खानाच्या पोटात 
वाघनखे घुसवलीबिचवा काढला आणि तो खानाच्या पोटात घुसवलाखान दगा दगा म्हणून मोठ्याने 
ओरडलाखानाचा आवाज ऐकून सय्यद बंडा शामियान्यात घुसलात्याने महाराजांवर घाव घालण्यासाठी पट्टा 
हातात उचललापण तेवढ्यात तो घाव महाराजांवर पडण्यापूर्वीच महाराजांचा  सच्चा सेवक जिवा महाला हा 
धावून पुढे आलात्याने एका घावातच सय्यद बंडाला यमसदनास पाठवले  राजांच्या जीवचे रक्षण केलेआणिसेवक धर्माचे पालन केलेया पराक्रमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला गेला त्या वेळी सर्वांच्या तोंडून जे शब्द 
निघाले ते शब्द होते होता जिवा म्हणून वाचला शिवा.....





BY - INTERNET

जिवा महाला यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर...


जिवा महाला यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर




म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शिवाजी महाराजांच्या जीवाला जिवा देणाऱ्या जिवा महाला या शूरवीरांच्या तेराव्या वंशजांवर आर्थिक आपत्ती ओढवली असल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने २९ मेच्या अंकात सर्व प्रथम प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत राज्यातील अनेक दानशुरांची पावले या कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावली होती. यामध्ये टिटवाळ्याच्या विजय देसेकर यांच्या समवेत समाज कल्याण न्यासचे संस्थापक डॉ. सोन्या पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला होता. मात्र नऊ ऑक्टोबर रोजी महाला यांच्या जयंती निमित्ताने या मंडळींनी महाला कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या नवीन घराचे भूमिपूजन केल्याने महाले कुटुंबाना आता सुरक्षित हक्काचा निवारा मिळणार आहे.

ठाण्यातील शारदा एज्युकेशन सोसायटी महाला यांचे पंधरावे वंशज प्रतिक महाला याच्या शिक्षणाची पुढील जबाबदारी घेणार असल्याने आनंद विश्व गुरुकुल कॉलेजमध्ये महाला कुटुंबीय २८ मे रोजी आले होते. त्यावेळी राजश्री महाला यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले होते. महाले कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कोंढवली या ठिकाणी लहानश्या झोपडीवजा मातीच्या घरात राहत होते. कुटुंबातील प्रकाश महाले यांना पाच वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने सध्या ते घरातच असतात. त्यामुळे या कुटुंबावर आर्थिक अंधार दाटला आहे. परिणामी कुटुंब सावरण्यासाठी हिरकणीसारख्या प्रकाश यांच्या पत्नी जयश्री सध्या कुटुंबाची जबाबदारी पेलत आहेत. दोन मुलांसह अर्धांगवायूमुळे अंथरूणाला खिळलेल्या पतीचा त्या सांभाळ करत आहेत.

समाजसेवक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी नवीन घर बांधून देण्याची उस्फूर्तपणे जबाबदारी स्वीकारली आणि त्या दृष्टीने पावलेही उचलली आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांना हक्काचा सुरक्षित निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


कायमस्वरूपी मदत केव्हा?
या कुटुंबाची परिस्थिती तेथील स्थानिक राज्यकर्ते, तसेच प्रशासकीय मंडळींना माहित आहे. मात्र तरीही या कुटुंबाकडे कानाडोळा केला जात आहे. कुटुंबाला तुटपुंजी मदत मिळत आहेच. पण कायमस्वरूपी मदत सरकारने केली तर कुटुंबाचा 'उदय' होईल, असा विश्वास जयश्री सपकाळ (महाल) यांना वाटतो.






BY - Maharashtra Times | Updated:Oct 13, 2017 

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

मनात न्यूनगंड असल्यास कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. अनेकदा निर्णय घेताना भीती वाटते. खरे व्यक्तिमत्त्व बाहेर येत नाही. तेव्हा मनातील न्यूनगंड सोडून स्वत:ची क्षमता ओळखा आणि यशोशिखर गाठा - बोमन इराणी ...

वयाच्या ४४व्या वर्षी पहिला सिनेमा साइन करणारा ऍक्टर...


वयाच्या ४४व्या वर्षी पहिला सिनेमा साइन करणारा ऍक्टर


सर्व्हिस वेटर ते बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता…बोमन इराणीचा थक्क करणारा प्रवास वाचण्याजोगा आहे

सिनेसृष्टीत प्रत्येकालाच कष्ट करणे अनिवार्य आहे आणि असेच कष्ट करून अनेक अभिनेते- अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशाच यशस्वी आणि कष्ट करून मोठा झालेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ‘बोमन इराणी…’ बोमन इराणी यांना अभिनेता म्हणून वयाच्या ४४ वर्षी यश मिळाले. तोपर्यंत त्यांचे आयुष्य कष्ट करण्यामध्येच गेले. त्यांनी मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स, डॉन, हॅपी न्यू इयर, पीके आणि दिलवाले यासारख्या एक से बढकर एक सिनेमांमध्ये काम केले आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेला लोकांनी दाद दिली.
बोमन इरानी यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ रोजी मुंबई इथे झाला. बोमन यांनी त्यांचे शिक्षण सेंट मॅरी हायस्कूल पुणे येथून पूर्ण केले. तेव्हा त्यांना Dyslexic या नावाचा आजार होता. या आजारामुळे त्यांना काही शब्दांचा उच्चार करणे आणि शब्दांची ओळख करणे अवघड जात होते. काही काळानंतर वैद्यकीय उपचारानंतर त्यांचा हा आजार कमी झाला आणि नंतर पूर्णपणे नाहीसा झाला.
हॉटेलमध्ये वेटरची नोकरी

बोमन इराणी यांनी मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून वेटर बनण्याचा अभ्यास केला आणि तो पूर्ण करून त्यांनी ‘ताज महाल पॅलेस अँड टॉवर’ या हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस म्हणून काम केले. तसेच, त्यांनी फ्रान्सच्या एका हॉटेलमध्ये देखील काम केले आहे. साधारण २ वर्ष त्या हॉटेलमध्ये काम केल्यानंतर ते पुन्हा भारतात त्यांच्या घरी परतले आणि परत आल्यावर त्यांनी त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेली बेकरी सांभाळायला सुरुवात केली. हि बेकरी बोमन इराणी यांच्या अगोदर त्यांची आई सांभाळत होती. त्यांनी त्यांच्या वयाच्या ३२ वर्षापर्यंत बेकरी चालवली. बोमन इराणी यांची बेकरी मुंबईच्या ग्रांट रोडवर होती.



बोमन इराणी यांना आधीपासूनच सिनेमाची आवड होती पण त्या सोबतच ते फोटोग्राफी देखील करायचे. बोमन इराणी यांनी १९९१ मध्ये मंबईत होणाऱ्या बॉक्सिंग वर्ल्ड कप चॅम्पियनशिपचे अनेक फोटोज काढेल. तसेच त्यांनी शाळेतील कार्यक्रमांचे, शाळेतील स्पोर्ट्सचे आणि इतर इव्हेंट्सची देखील फोटोग्राफी करायचे.
अभिनयाचे वेड

इतर कामं करत असताना त्यांच्या डोक्यातील अभिनयाचे वेड मात्र जात नव्हते. त्यांनी अभिनेता बनण्यासाठी १९८१ ते १९८३ पर्यंत अभिनयाचे गुरु हंसराज सिद्दीकी यांच्याकडे अभिनयाचे शिक्षण घेतले. बोमन इराणी यांनी आपल्या अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी अनेक थियेटर शोमध्ये काम करणे सुरु केले आणि या शोमधील सर्वात जास्त लोकप्रिय झालेला शो ‘आय एम नॉट अ बाजीराव’ हा होता. पुढे जाऊन बोमन इराणी यांची फंटा, क्रॅकजॅक बिस्कीट आणि सिएट टायर्स या ब्रॅण्ड सोबतच इतर जाहिरातींमध्ये काम केले.
असेच काम करत असताना ‘विनोद चोप्रा’ यांना बोमन मधील कलाकार दिसला आणि त्यांनी बोमन यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या हातात २ लाखाचा चेक देऊन त्यांच्या पुढच्या चित्रपटामध्ये घेतेले.

बोमन इराणी यांचा पहिला चित्रपट ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा होता जो राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला होता आणि या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्व प्रेक्षकांना खूप आवडली आणि या चित्रपटनानंतर बोमन इराणी यांनी यशाची एक एक पायरी चढायला सुरुवात केली

























by- https://marathi.infobuzz.co.in/boman-irani-biography-in-marathi/

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.. खरा इतिहास जाणून घ्या..

तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.. खरा इतिहास जाणून घ्या


तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या अत्यंत विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत शिवाजीबरोबर होते. सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले, पुढे ते पुण्यात स्थायिक (स्वराज्यात रुजू ) झाले. (स्वराज्यासाठीचा त्यांचा पुढचा प्रवास आम्ही चित्रामार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत आहोत.)
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धेवट सोडली आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.”
गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला काबीज करणे गरजेचे होते.
(तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मुळात घोरप हा पाळीव प्राणी नाही आणि त्याच्याकडून पाळीव प्राण्याप्रमाणे काम करून घेणे अर्थात किल्ला चढणे वगैरे तर अशक्यच… हि घोरपड कथा का वापरण्यात आली आणि कोणी हा खोटा इतिहास पसरवला हे सांगणे कठीण.. ह्यामुळे मराठ्यांचे सामर्थ्य दडले गेले ) शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जायचं त्यात खडकावर चढणे, डोंगर दऱ्या तसेच उभ्या कडावर चढणे यांवर जास्त भर असायचा. मराठ्यांत इतके सामर्थ्य होते कि त्यांनी ह्या उभ्या कडा रात्रीत चढल्या आणि मग वर गेल्यावर खाली दोऱ्या सोडल्या मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.
शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले “गड आला पण सिह गेला”. अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या ‘उमरठे’ (पोलादपूरजवळ) या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘वीरगळ’ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले आहे.
तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरबीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे. रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.


















by - http://bolkyaresha.in

बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी


बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी


वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला.

बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता बोमन इराणी.

हरहुन्नरीने अभिनय करणारे बोमन इराणी आज प्रत्येकाचे आवडते कलाकार असल्याचं पाहायला मिळतं. आजही ते त्याच जोमाने अभिनय करुन प्रेक्षकांना प्रेमात पाडत असतात. ते इंडस्ट्रीतील असे एक अभिनेते आहेत, ज्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या करिअरला सुरुवात केली. बालपणापासूनच अभिनयात रुची असलेल्या बोमन यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेटर आणि हॉटेल स्टाफची नोकरी केली होती. मुंबईतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करुन त्यांनी प्रसिद्ध ताज महल पॅलेस अँड टॉवरमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस म्हणून नोकरी सुरु केली होती. काही वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी आपल्या आईला बेकरी सांभाळण्यात मदत केली.

१९८१ ते १९८३ याकाळात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. १९८७ मध्ये त्यांनी फोटोग्राफीला सुरुवात केली. याच काळात बोमन यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. २००० साली राहुल बोस दिग्दर्शित 'एव्हरीवन सेज आय एम फाइन' या सिनेमात त्यांनी पहिली संधी मिळाली. अभिनेता म्हणून २००३ मध्ये रिलीज झालेला 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा त्यांचा पहिला हिट सिनेमा होता.

बोमन इराणी हे बलराज सहानी, अमिताभ बच्चन यांचे फॅन आहेत. बोमन इराणी अमिताभ बच्चन यांच्या बद्दल म्हणतात. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट मी अनेकवेळा पाहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. त्यांच्यासोबत मी केवळ कामच केले नाही तर भूतनाथ या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्यासोबत मी झळकलो होतो. आपण ज्या व्यक्तिचे चाहते आहोत, त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याचा, त्यांच्यासोबत पोस्टरवर झळकण्याचा आनंद मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. अनेकवेळा हे सगळे खरे आहे का? मी कोणत्या स्वप्नात तर नाही ना असा मी विचार करतो.

बोमन इराणी यांचे काही चित्रपट 
मैं हूं ना, लगे रहो मुन्नाभाई, दोस्ताना, खोसला का घोंसला, वक्त, नो एंट्री, थ्री इडियट्स वीर-जारा, मैंने गांधी को नहीं मारा, लक्ष्य, हनीमून ट्रैवल्स प्रा. लि. सॉरी भाई,पेज-3 ,माई वाइफ्ज मर्डर, फरारी की सवारी. मराठीतील 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात डॉक्टर श्रॉफ यांच्या भूमिकेत बोमन इराणी यांनी धमाल उडवली होती.




























संजीव वेलणकर पुणे. 
९४२२३०१७३३ 
संदर्भ.इंटरनेट

माझ्याबद्दल