बुधवार, १० जुलै, २०१९

महासागरांच्या पोटात...

महासागरांच्या पोटात
डॉ. विनय देशमुख
Friday, June 07 | 12:15 PM
Share this story    

पृथ्वीतलावरील सुमारे एक्काहत्तर टक्के भाग सागरांनी व्यापलेला आहे, तरीदेखील आजच्या घडीला जेवढे ज्ञान माणसाला आकाशातील ग्रह आणि ताऱ्यांविषयी आहे, त्याच्या तीळमात्रसुद्धा ज्ञान सागरात काय दडले आहे, याबद्दल नाही, असे म्हटले जाते. पृथ्वीवर विस्तीर्ण असे ५ महासागर व आकाराने लहान ६४ समुद्र (सागर), सामुद्रधुनी व उपसागर आहेत. पॅसिफिक (प्रशांत), अटलांटिक, इंडियन (हिंदी), आर्क्टिक व अंटार्क्टिक किंवा दक्षिणी महासागर पृथ्वीवरच्या खंडांना विभागतात आणि इतर सर्व महासागरांच्या कानाकोपऱ्यात व भूभागांनी वेढलेले आहेत. महासागरांची विशालता, भयानक वादळे व प्रचंड खोली यांमुळे मनुष्याच्या मनी नेहमीच भीती आणि त्यापोटी असलेली उत्सुकता होती. परंतु व्यापार आणि नवे जग किंवा देश शोधण्याची धाडसी मानवी वृत्ती आणि तिला मिळालेली खगोलशास्त्रीय अभ्यासाची जोड यांतून सागरी प्रवासाची दिशा व अंतर यांचे ज्ञान प्राप्त झाले, आणि महासागरांची उपयुक्तता व महत्त्व वाढले.             

महासागरांचा अभ्यास मात्र तितकासा लवकर म्हणजे व्यापारी-समुद्रमार्ग सोडल्यास सोळाव्या शतकापर्यंत झाला नाही. याला मुख्य कारण म्हणजे सागरांची खोली आणि तिथे असलेला पाण्याचा प्रचंड दाब! पृथ्वीवरील सागरांची सरासरी खोलीच ३,७०० मीटर इतकी प्रचंड आहे. प्रशांत महासागरात असलेली मारियाना घळ ही ११,००० मीटर खोल आहे... म्हणजे इतकी खोल, की तिथे हिमालय पर्वत हा आपल्या एव्हरेस्ट शिखरासकट बुडून त्याच्यावर पुन्हा दोन किलोमीटर पाणी राहू शकेल! अशा प्रचंड खोलीमुळे १९५० सालापर्यंत सागरतळाशी जाण्याचे माणसाचे अनेक प्रयत्न तंत्रज्ञानाअभावी निष्फळ ठरले. या प्रकाशहीन वातावरणात प्राणिसृष्टी नसावी, असाही समज होता. परंतु या खोल सागरातही वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी दडली आहे. या जीवसृष्टीची ओळख करून घेण्यापूर्वी सागराखालची भूरचनाही आपल्याला माहीत हवी.

किनारपट्टीलगतचे सागराचे क्षेत्र हे भरती-ओहोटीचे क्षेत्र (आंतरभरती) असून दररोज साधारण बारा तासांनी समुद्राला येणाऱ्या भरतीला ते तुडुंब भरते तर ओहोटीला ते उघडे पडते. हा आंतरभरती भाग समुद्रकाठी फिरणाऱ्या सर्वसामान्यांच्या ओळखीचा असतो. त्यापुढील समुद्राच्या दोनशे मीटर खोलीपर्यंतचा भाग हा उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जगभरातील मासेमारी मुख्यतः याच भागात केली जाते, तसेच बऱ्याचशा तेल व वायू विहिरी याच भागात उत्खनन केल्या आहेत. किनाऱ्यावरील वाळूतून आपण सरळ समुद्रात चालत गेलो तर सुरुवातीचा उतार संथ असतो. हा समुद्रात शिरलेला जमिनीचा भू-भाग असून या ‘भूखंडीय मंचाची’ उतरण किंवा रुंदी भरतीच्या रेषेपासून वेगवेगळी असू शकते. यानंतर मात्र खोल समुद्र सुरू होतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, मुंबईला लागून असलेला भूखंडीय मंच खूप रुंद असून तो दोनशे किलोमीटरपर्यंत समुद्रात शिरला आहे, तर कन्याकुमारीला तो केवळ २५ ते ४० किलोमीटर इतकाच आहे. म्हणजे, खरा खोल समुद्र मुंबईपासून दूर अंतरावर आहे, पण केरळ व कन्याकुमारीला तो जवळ आहे.

समुद्राच्या पाण्याखाली साधारणपणे शंभर-दीडशे मीटर खोलीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो. त्यामुळे या प्रकाशित भागात हरितद्रव्ये असलेली एकपेशीय वनस्पतीप्लवके, शैवाल, तसेच वनस्पतींच्या विविध प्रजाती आढळतात. त्यांची वाढ प्रकाशसंश्लेषणाद्वारे होत असते. या वनस्पतींना खाऊन प्राणिप्लवके जगतात. या प्लवकांवर छोटे प्राणी व माशांची गुजराण होऊन समुद्रातील अन्नसाखळी निर्माण होते. या प्रकाशमान भागातील पाण्याचे तापमान व परिस्थिती जीवसृष्टीच्या वाढीस पोषक असते. म्हणून समुद्रातील हा भाग सर्वात जास्त उत्पादक असतो. जगभरातील जवळपास नव्वद टक्के मत्स्योत्पादन याच क्षेत्रात होते. या भागातील सागरतळ हा शंख-शिंपले, संधिपाद प्राणी, खेकडे, प्रवाळ, तारामासे, समुद्रकाकडी, समुद्रपंखे अशा बहुविध आणि बहुरंगी जीवसृष्टीने समृद्ध असतो. इतकेच नव्हे तर सागरी कासवे, डॉल्फिन व अनेक प्राण्यांच्या वैविध्यपूर्ण प्रजातीही येथे दिसून येतात. तसेच, भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणाऱ्या किनाऱ्यावरील जागेत कृमी, किडे, वाळूत लपून राहणाऱ्या तिसऱ्या, कालवे, खुबे व शंख-शिंपल्यांची विविधता बहरते. किनाऱ्यापासून फारशी खोलवर आणि दूर नसलेली उथळ समुद्रातील ही जीवसृष्टी आपल्याला बहुतांश ज्ञात आहे. या २०० मीटरपर्यंत भू-खंडीय भागात अनेक लक्ष वर्षांपूर्वी डायअॅटम वर्गातील एकपेशीय वनस्पतींचे पाण्याच्या प्रचंड दाबाने व भूस्तरीय हालचालीने क्रूड तेल व वायूत रूपांतर झाले व तेच आपण मोटारी व कारखान्यांत वापरत आहोत. हा भूगर्भीय साठा मर्यादित असून काही काळातच संपुष्टात येईल.      

सुमारे दोनशे मीटर खोलीनंतर समुद्रतळाचा उतार तीव्र होतो व पाण्याची खोली चार हजार मीटरपर्यंत वाढत जाते. त्यानंतरचा तळ सर्वसाधारणपणे सपाट असला तरी याचा काही भाग हा उंच पर्वतरांगा व अतिखोल घळींनी व्यापलेला असतो. दोनशे मीटरपेक्षा अधिक खोल असलेल्या समुद्राच्या पाण्यात सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पोचतो. येथे सुमारे आठशे मीटर खोलीपर्यंत निळसर-हिरवट रंगाचा मंद प्रकाश जाणवतो. या क्षीण प्रकाशात वनस्पती व हरितप्लवके वाढू शकत नाहीत. या भागातील प्राणिप्लवकांचे प्रमाण वरच्या प्रकाशित भागातील प्राणिप्लवकांच्या प्रमाणाच्या तुलनेत एकदशांशसुद्धा नसल्याने येथे अन्नाची उपलब्धता कमी असते. त्यामुळे येथे जैविक पदार्थांचे प्रमाण एकूणच तुटपुंजे असते. इथले प्राणी पाण्याच्या वरच्या थरांतून तरंगत खाली येणाऱ्या अन्नावर अवलंबून असतात. पाण्याच्या वरच्या थरातील प्लवके, प्राण्यांची विष्ठा, मृत प्राणी येथे पोचतात. या भागात पोचणाऱ्या मृत जीवांच्या शरीराच्या कुजण्याच्या प्रक्रियेतील जिवाणूवाढीमुळे जिवाणूयुक्त आकारहीन कण सेंद्रिय गाळाच्या स्वरूपात तयार होतात. हा गाळ पावसाच्या थेंबांसारखा सतत खाली पडत असतो. त्यांना झेलून खाण्यासाठी अतिशय छोटे मिक्टोफिड माशांचे थवे, मोठ्ठा ‘आ’ केल्यासारखे आपले जबडे उघडून वावरत असतात. पृथ्वीवरच्या या मिक्टोफिड माशांचे वस्तुमान सुमारे पावणेसहा अब्ज टन इतके प्रचंड म्हणजे दरवर्षी जगभरात होणाऱ्या मासेमारीच्या पाचपट आहे! सुदैवाने यांची मासेमारी होत नाही. सेंद्रिय गाळ जरी इथल्या प्राणिमात्रांचे प्रमुख अन्न असले तरीही मिक्टोफिड माशांना खाणारे वैविध्यपूर्ण भक्षक मासे व प्राणीही येथे आढळतात. पाण्याच्या या थरातील कुजण्याच्या क्रियेमुळे येथे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. या संकटाला इथले प्राणी तोंड कसे देतात हे गूढ आहे. येथे एकूणच प्राणीवस्ती विरळ असते; तसेच येथे जे प्राणी आढळतात त्यांच्या हालचालीही संथ असतात, जेणेकरून ऑक्सिजनची गरज कमीत कमी राहील. भूमध्य समुद्रतळातील १९८३ साली सापडलेला लोरीसिफर नावाचा सूक्ष्म प्राणी प्राणी कायम ऑक्सिजनविरहित अवस्थेत कसा राहतो हे गूढ अजून सुटलेले नाही.

पाण्यात दोनशे मीटरच्या खोलीपर्यंत राहणारे आणि त्याखाली राहणारे मासे व प्राणी सहसा वर-खाली स्थानांतर करत नाहीत. कारण समुद्राच्या वरच्या भागातील पाणी काहीसे कोमट असते, तर खालच्या भागातील पाणी थंड असते. मात्र इथले मिक्टोफिड मासे रात्री, प्राणिप्लवकांचे सेवन करण्यासाठी पाण्याच्या वरच्या थरात स्थानांतर करतात व दिवसा भक्षकांपासून दूर राहण्यासाठी खालच्या कमी प्रकाश असलेल्या पाण्यात लपून राहतात. हे मासे वैशिष्टपूर्ण असतात. त्यांच्या उदरात हवेची पिशवी असून त्यातील हवेचा दाब कमीअधिक करून ते पाणबुडीप्रमाणे पाण्यात वरखाली ये-जा करू शकतात. त्यांचे मोठे डोळे, रुंद जबडा आणि शरीराच्या दोन्ही अंगांना अंधारात चमकणारे आठ-दहा स्वयंप्रकाशी जैवअनुदीप्ती (बायोफ्लुरेसन्ट) ठिपके, प्राणिप्लवके पकडण्यास मदत करतात. चमकण्याच्या या गुणधर्मामुळे यांना इंग्रजीत लॅन्टर्न फिश म्हटले जाते.

समुद्राच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी ध्वनिपरावर्तन यंत्रातून सोडलेल्या लहरी या माशांच्या उदरातील पिशवीमुळे परावर्तित होऊन जहाजाच्या कप्तानाला सागराच्या खोलीचा चुकीचा अंदाज देऊन दिशाभूल करतात. याच चकवेगिरीचा फायदा घेऊन दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्या या माशांच्या थव्याखाली लपवल्या जात असत. मात्र प्रचंड दाब असलेल्या खोल समुद्रातून हवेची पिशवी असलेले हे मासे पकडून वर आणले की पिशवी फुटून मासे विदीर्ण होऊन त्यांच्या मांसाचा चिखलासारखा गोळा होतो. अरबी समुद्रात पावसाळा संपताना दोनशे मीटर ते एक हजार मीटर खोलीवरून जेव्हा मिक्टोफिड मासे जाळ्यात येतात, तेव्हा त्यांचा असाच चिकट गोळा होतो म्हणून आपले मच्छीमार त्यांना ‘चिकटा’ किंवा ‘गिम’ म्हणतात.       

साधारणपणे एक हजार मीटरपेक्षा अधिक खोल पाण्यात प्रकाश अत्यंत अंधूक असतो. या पाण्यात माशांच्या रंगी-बेरंगी दुनियेची वानवा असते. तरीदेखील इथले अनेक प्राणी लाल रंगाचे असतात, कारण लाल रंगाच्या प्रकाशलहरी सागराच्या पाण्यात शोषल्या जातात व त्यामुळे इथल्या पाण्यात प्रकाश निळसर-हिरवा दिसतो. लाल रंग पाण्यात शोषला जात असल्याने, अंधुक प्रकाशात लाल रंगाची प्रतिमा काळी दिसते व या लालरंगी भक्ष्यांचा भक्षकांपासून बचाव होतो. परंतु इथले स्वयंप्रकाशी जैवअनुदीप्ती असणारे मासे मात्र प्रकाशाची उघडझाप करत भक्ष्यावर नजर ठेवतात. इथल्या प्राण्यांची दृष्टीदेखील बहुतांशी रंग न ओळखता येणारी अशी पांढरी-काळी असते. ऑक्टोपससारखे महाकाय नळ (स्क्वीड) व माकलीदेखील (कटलफिश) तांबड्या रंगाचे असतात. इथले शक्तिशाली ताडमासे (स्वोर्डफिश) व देवमासे (स्पर्मव्हेल) हे पाण्याच्या वरच्या थरात सहज फेरफटका मारून येतात. सुळ्यासारखे दात असलेले, भयंकर दिसणारे छोटे मासे येथे आढळतात, तर काही रिबिनीसारखे लांब पण चपटे सुमारे बारा मीटर लांबीचे ओअर मासे येथे आढळतात. अॅरगायरोपेलेकस या माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजू आरशासारखा, प्रकाश परावर्तित करतात त्यामुळे स्वयंप्रकाशी जैवअनुदीप्ती मासे गोंधळून जाऊन याचे भक्ष्य बनतात. इथले काही मासे मात्र काळे अथवा तपकिरी रंगाचे असतात, ते सहसा भक्षकाला सहजासहजी दिसत नाहीत.

जसजसे खोल जाऊ तसतसे पाणी थंड होऊन लागते व त्याचे तापमान चार अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. त्याचबरोबर येथे पाण्याचा दाबही वाढलेला असतो. दर दहा मीटर खोल पाण्यात हा दाब समुद्रसपाटीवरच्या दाबाच्या दुप्पट  वाढतो. चार हजार मीटर खोलीवरचा दाब हा समुद्रसपाटीवरील दाबाच्या तुलनेत चारशे पट इतका प्रचंड असतो. या प्रचंड दाबाने मासेच नव्हे तर त्यांचे शरीर सर्वसाधारणपणे ज्या जैविक रेणूंचे बनलेले असते तेदेखील चिरडून त्यांची रचना बदलू शकते. यामुळे इथल्या काही माशांचे शरीर जेलीसारखे असते. जेलीतील मांसउतींचे जैविक रेणू अशा प्रचंड दाबाला प्रतिकार करू शकतात. या माशांच्या शरीरातील सेंद्रिय रेणूंपैकी एक रेणू म्हणजे ट्रायमिथिल-अमायीन-ऑक्साइड हा असून मासे खाणाऱ्यांना तो परिचित असतो. माशांना असणारी मंद हिंवसाण ही याच रेणूंमुळे येते. खोलीनुसार वाढत्या दाबाचा प्रतिकार करण्यासाठी माशांच्या शरीरातील ट्रायमिथिल-अमायीन-ऑक्साइडचे प्रमाण खोलीनुसार वाढत जाते.

क्षीण अंधुक प्रकाश आणि मोजकी संख्या यामुळे नर माशांना मादीस हुडकणे कठीण असते, त्यामुळे त्यांच्या  जननक्रियेत व पुनरुत्पादनात अडचणी येतात. अँग्लर नर मासे त्याच्या नाकासमोर असलेल्या गळदोरीतील जैवअनुदीप्ती प्रकाशाची विशिष्ट प्रकारे उघडझाप करून मादीस निमंत्रित करतात. वस्तुतः गळदोरी व तिच्या टोकावरील अनुदीप्ती भक्ष्याला तोंडाजवळ आकर्षून पकडण्यासाठी असते. या काळोखात वसती करणाऱ्या काही प्रजातीत नर इतका लहान असतो की तो मादीच्या शरीराला चिकटून परजीवी बनतो त्यामुळे प्रजनन सोपे होते.

सुमारे चार हजार मीटर या खोलीवरच्या सागरतळावर उंच-सखल भाग, पर्वतरांगा व शेकडो-हजारो किलोमीटर खोल घळींना सुरुवात होते. येथे पाणी शून्याखाली एक अंश सेल्सिअस इतके अतिथंड असते, पाण्याचा दाब प्रचंड असतो व संपूर्ण अंधार असतो. तापमान इतके कमी असले तरी, समुद्राच्या पाण्यात क्षार असल्याने पाणी गोठून त्याचा बर्फ होत नाही. समुद्राखालील या भागात ऑक्सिजनची कमतरता मात्र नसते. याचे मुख्य कारण ध्रुवीय प्रदेशातून विषुयवृत्तीय भागाकडे सतत वाहणारे सागरतळावरचे जलप्रवाह. विषुववृत्तावर सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी गरम होते व ते पृष्ठभागावरील ऑक्सिजनयुक्त प्रवाहांद्वारे ध्रुवीय प्रदेशांत येते. परंतु ध्रुवप्रदेशातील शीत वातावरणामुळे तेथे थंड झालेले ऑक्सिजनयुक्त पाणी सागरतळाला जाते व खोल प्रवाहांद्वारे पुन्हा विषुयवृत्तीय भागाकडे वाहते. त्यामुळे समुद्राखालील या खोल भागातील प्राणिमात्रांना ऑक्सिजनची कमतरता भासत नाही.      

समुद्राच्या खालच्या या खोल भागात डोंगरकडे आहेत. त्यातील काहींच्या माथ्यावर ज्वालामुखी आहेत. काही ठिकाणी समुद्रतळाला पडलेल्या भेगांतून (औष्णिक छिद्रे) पृथ्वीच्या भूगर्भातला शिलारस, अतिउष्ण वायू, गंधक व अन्य क्षारयुक्त विषारी पाणी बाहेर पडत असते. या क्षारयुक्त अतिउष्ण पाण्याचे तापमान १३० अंश सेल्सिअस इतके असू शकते. मात्र येथे अगदी ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यातदेखील जीवसृष्टी आढळते. येथे विनॉक्सि-श्वसनी जिवाणू व महाकाय ट्यूबवर्म, तसेच काही सहजीवी प्राणीही आढळतात. ट्युबवर्मच्या नळ्या सुमारे दोन मीटर लांबीच्या असून, त्यांना पचनसंस्था नसते. तोंडाच्या जागी त्यांना शेंदरी-लाल रंगाच्या तंतूंचा झुबका असतो. झुबक्यांत आश्रयास असलेले विनॉक्सी-श्वसनी जिवाणू औष्णिक छिद्रांतून बाहेर येणाऱ्या गंधकयुक्त रासायनिक पदार्थांचे विघटन करून संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात. मजेची बाब म्हणजे इतक्या भयानक दाबाखाली काळोखात आणि तरीही उष्णोदकात राहणाऱ्या या मोठ्ठ्या किड्यांच्या झुबक्यांचा लाल रंग चक्क त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनमुळे असतो.

थंड वातावरणामुळे येथील प्राण्यांचे चयापचय मंद असते, म्हणून या खोल पाण्यात अन्नाचे दुर्भिक्ष असले तरी इथले प्राणी तग धरून जीवन जगू शकतात. सर्वसाधारण माशांच्या शरीरात सोळा टक्के ते वीस टक्के प्रथिने असतात, परंतु जेलीसारखे शरीर असणाऱ्या इथल्या माशांत या प्रथिनांचे प्रमाण केवळ पाच टक्के ते आठ टक्के इतकेच असते. या खोलीवरील भागात वरून येणारा अन्नाचा प्रत्येक कण हा उपयोगात आणण्याच्या दृष्टीने, त्यांच्या तोंडाची व दातांची रचना अनुकूल झालेली असते. तसेच, त्यांच्या भक्ष्य पकडण्याच्या युक्त्याही यासाठी पूरक असल्याचे दिसून येते. इथल्या माशांच्या बहुसंख्य प्रजाती लहान आकाराच्या व अंध आहेत. या प्रकाशहीन भागात दृष्टीचा फारसा उपयोग नसल्याने बहुतेक प्रजातींचे डोळे लहान तरी असतात किंवा नसतातही. माशांचा रंग काळा अथवा मातकट तपकिरी असतो. इथले सर्वच प्राणी एकमेकांचे भक्षक असून एका जागी बसून भक्ष्याची वाट पाहत असतात, त्यामुळे ते विचित्र आकारांचे, मोठ्या तोंडाचे व दातांचे मोठे सुळे असणारे आहेत. काळपट चंदेरी रंगाच्या व्हायपर माशाचे सुळ्यासारखे दात एवढे मोठे असतात की तो तोंड मिटू शकत नाही. त्याच्या डोक्यावर शेंडीसारखी अनुदीप्ती गळदोरी असून त्यावरील प्रकाशाच्या साहाय्याने तो भक्ष्य पकडतो. अतिशय पातळ, चपटे अंग असलेल्या हॅचेट फिशला चंदेरी खवले असून आपल्याच अनुदीप्ती प्रकाशाला परावर्तित करून तो भक्षकाला गंडवतो.

येथे आढळणाऱ्या गल्पर ईल माशाच्या शरीराचा आकार लहान, पण तोंड व जबडे एवढे मोठे असतात की भक्ष्य आकाराने मोठे असले तरी हा मासा त्याला गिळतो. असाच एक स्नॅपर ईल मासा, जो पातळ रीबिनीप्रमाणे दीड मीटर लांब व दीड सेंटिमीटर रुंद असतो आणि त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे दिसते. वरच्या पाण्यात आढळणारे देवमासे व अजस्र आकाराचे इतर मासे मरून या थरात येतात, तेव्हा इथल्या प्राण्यांची चंगळ होते. हॅगफिश नावाचा इथला मासा सरळ मृत देवमाशाच्या कलेवरात गोलाकार दात गिरमिटासारखा एका बाजूने घुसवतो, आत शिरतो व खात खात दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो.

येथे आढळणारे अपृष्ठवंशीय प्राणी महाकाय शरीराचे असतात. त्यातलाच एक बॅथिनोमस आयसोपोड, जो या कुळातला आकाराने सर्वात मोठा प्राणी आहे. पुराणातला आणि साहसी सागरकथांमधला जहाजे उलटवून टाकणारा भयंकर प्राणी म्हणजे राक्षसी ऑक्टोपस! या खोल पाण्यात असा ऑक्टोपस दिसून आलेला नाही, पण त्याच कुळातील राक्षसी माकूळ (जायंट स्क्वीड) २००४ साली जपानी शास्त्रज्ञांना दिसला. जवळपास तेरा मीटर लांबीचा हा मृदुकाय संघातील प्राणी असून त्याचे शरीर दोन मीटर लांब असते. त्याला आठ पाय व दहा मीटर लांबीचे दोन शुंडक (टेंटकल्स) असतात. पाय व शुंडकांवर अनेक मोठ्या वाडग्यांच्या आकाराचे शोषक असतात ज्यामुळे भक्ष्याला तो घट्ट पकडून खातो. स्पर्मव्हेल या देवमाशाचे माकूळ हे आवडते खाद्य असल्याने दोघांच्यात तुंबळ लढाई झाल्याच्या गोलाकार खुणा देवमाशाच्या कातडीवर दिसून आल्या आहेत. म्हणजे हा देवमासा या माकुळाच्या शिकारीसाठी पाच हजार मीटर खोल पाण्यात जात असला पाहिजे.

सागरातल्या चार हजार मीटरहून अधिक खोल असणाऱ्या, पूर्ण अंधार असणाऱ्या आणि अतिप्रचंड दाब असणाऱ्या अतिखोल प्रदेशातील परिस्थिती जगण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असते, तेथे अन्नपदार्थांचीही वानवा असते. त्यामुळे येथे सजीवांची संख्या कमी होत जाते. असे असले तरी येथेही जीवसृष्टी अस्तित्वात आहेच. उदाहरणार्थ, सुमारे सात हजार मीटर खोलीवर रॅट-टेल, लीपारीड व ग्रेनेडीयर मासे, तसेच संधिपाद प्राण्यांपैकी खेकडे, शेवंडी व कोलंबीच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. मरियाना ट्रेंच या पृथ्वीवरील सर्वांत खोल सागरी घळीत, सुमारे ८,१०० मीटर खोलीवर ग्रेनाडीयर मासे आढळले आहेत. हे आतापर्यंत सर्वांत खोलवर सापडलेले मासे आहेत. इतकेच काय, मरियाना घळीच्या तळावरही म्हणजे ११ हजार मीटर खोलीवरही सजीव सापडले आहेत. मात्र हे सजीव आदिकालातील सजीवांसारख्या एकपेशीय आर्किया आहेत.

जमिनीवरील कानाकोपरा ज्ञात असला तरी एकूण खोल सागरतळाची एक टक्कासुद्धा माहिती मनुष्यास नाही. या खोल समुद्राच्या तळाला काय आहे, हे जाणून घेण्याचे प्रयत्न गेली कित्येक वर्षे चालू आहेत. याला आता आधुनिक तंत्रज्ञानाचीही साथ मिळत आहे. यासाठी वेगवेगळी साधने विकसित केली जात आहेत. या नवनवीन साधनांद्वारे सागराच्या अंतरंगाचा शोध यापुढे चालूच राहील व त्यातून आज अपुऱ्या असणाऱ्या आपल्या सागरविषयक ज्ञानात मोलाची भर पडत राहील.  













by - http://www.zeemarathidisha.news/

गुरुवार, २८ मार्च, २०१९

दारूचा जन्म कसा झाला माहितीये? वाचा दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी !

दारू म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. परंतु आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या दारूची निर्मीती कशी झाली? कोणी लावली दारू प्यायची सवय? खरंच दारू म्हणजे अमृत आहे का, की नुसतं रसायन? या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी कुतूहलाचा विषय नक्कीच आहे शिवाय दारू घर संसारांची कशी राखरांगोळी करते हे पण जाणून घेतलंच पाहीजे ना !
असं म्हटलं जातं की दारूची निर्मीती सुमारे ९ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. ही दारू म्हणजे वाईन आंबवलेल्या तांदळाचं पाणी आणि मधाची मिसळ असायची.
२ हजार वर्षांनंतर ही दारू युरोपीय देशातही निर्मीली जाऊ लागली. पुरातत्वीय उत्खननात इतक्या वर्षांनंचतर सुध्दा दारू बनवण्याचं साहित्य आणि दारूच्या साठ्यांसाठी बनवलेली विशेष भांडी सापडलीत. अशाच काही प्रकारची उत्खनने युरोपीय देश, पश्चिम आशिया या ठिकाणी केली असता तिथेही दारूचं अस्तित्व असल्याचं जाणवतं. परंतु दारूची खरी सवय ही चीनने साऱ्या जगाला लावली.

wine-inmarathi
en.wikipedia.org
इसवी सन पूर्व ७०००-६६०० मध्ये चीनमध्ये दारूची निर्मीती केली जायची याचे भक्कम पुरावे आपल्याला पहायला मिळतात.
तांदूळ,मध आणि टार्टारिक एसिड असणारी काही फळांचा वापर करून ही दारू बनवली जायची. जी तेव्हा घरातील सर्रास प्रत्येकजण प्राशन करत असे. द्राक्षांच्या बीया, हॉथर्न, लाँगयान किंवा कॉर्लियान चेरी यांच मिश्रण अथवा या फळांपैकी कोणत्याही दोघांचं मिश्रण बनवून वाईन तयार केली जायची.
चीनच्या झोऊ डायनॅस्टी या प्रांतात इसवी सन पूर्व १०४६ ते २२१ या कालखंडात ही फळे वापरल्याचे पुरावे सापडतात. चीनमध्ये केवळ वाईनसाठीचे ४० ते५० प्रकारचे द्राक्ष वापरल्याचे पुरावे मिळतात.
इसवीसन ५४०० ते ५००० मध्ये पूर्वी आशियामध्ये दारू अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. दारूसाठी बनवलेले मोठे मोठे जार आजही अस्तित्वात आहेत. युरोपीय देशात प्रामुख्याने ग्रीस आणि फ्रांसमध्ये सुमारे १० ते १२ हजार वर्षांपूर्वी दारू अस्तिवात असल्याच्या कथा आहेत मात्र केवळ इसवीसन पूर्व ४०००वर्षांपूर्वीचेच पुरावे इथे पाहायला मिळतात.
फ्रान्समध्ये प्रामुख्याने दारू ही द्राक्षांपासूनच बनवली जायची. त्यामुळे पुरावे जर पाहिले तर सगळ्यात आधी दारूडा देश कोणता होता तर चीन असं म्हणायला हरकत नाही.
भारतामध्येसुधा पुराण कथांमध्ये मदिरेचा उल्लेख आढळतो. दारू पिऊन नशेत झुलणारे मालिकांमधले राक्षस आणि देवता अजूनही डोळ्यासमोर उभे राहतात अर्थात झुलत- झुलत. याचाच अर्थ भारत देखील दारू निर्मीतीत मागे नव्हता. पुर्वी दारू हे विरंगुळ्याचं किंवा थकावट दूर करण्याचं साधन होतं.

Wine taste better with age.Inmarathi1
nzwine.com
परंतु आज दारू हे व्यसन बनल्यामुळे समाजाचं स्वास्थ्य बिघडत चालल्याचं आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय. उच्चभ्रू समाजासाठी महागडी दारू आणि वाईन मिळते तर अगदीच चिंधीचोर दारूड्यासाठीसुध्दा पाचची देशी हातभट्टी मिळते. मोठ मोठे दारूचे ब्रँड आपण पाहतो. हे ब्रँड दररोज किती जणांच्या घरांना उध्वस्त करतं हे सुध्दा आपल्याला माहिती आहे.
अगदी गावाकडे गाळली जाणारी हातभट्टीसुध्दा भल्या-भल्यांची मती गुंग करते. काही लोक प्रमाणत घेतात परंतु काही पेक्षा जास्त लोक हे प्रमाणाच्या बाहेर दारू पितात त्यामुळे संसाराची राखरांगोळी होते.
आज वाईन आणि दारू शक्यतो द्राक्ष, उसाची मळी, नवसागर आणि मळीचा गुळ यांच्यापासून बनवली जाते. द्राक्षांची बनवलेली वाईन ही महागडी असते तर नवसागर आणि उसमळीच्या घाणेरड्या गुळापासून बनवलेली हातभट्टी मात्र स्वस्त असते.

याचा मध्यम पर्याय म्हणजे संत्र्याचा अर्क आणि उसमळी घालून बनवेली क्वार्टर ही देखील आजकाल चाळीस- पन्नास रूपयांना मिळून जाते. दारू म्हटलं की एखादा हाडाचा दारूडा सरणावरूनही उठून बसेल. विजय माल्यासारख्या दारू बनवणाऱ्या माणसाची सुध्दा दारूमुळेच वाट लागली.
दारू बनवल्यामुळे देखील एखादी व्यक्ती बर्बाद होणं म्हणजे माल्याचं उत्तम उदाहरण. भले त्याला कारणं अनेक असतील पेशेवार दारूभट्टीवाला म्हणून माल्याची गणणा करायला काही हरकत नाही.
भारतीय इतिहासातसुध्दा दारूचं महत्व फार होतं. प्राचीन कालापासून आपण दारू प्राशन करत आलोय. दारूचं महात्म्य हे केवळ दारूच्या प्रशंसकांना आणि चाहत्यांनाच माहिती आहें. दारूची इतकी प्रशंसा करणं म्हणजे दारूच्या पिण्याचं, निर्मीतीचं आणि विक्रीचं समर्थन करणं नव्हे हे वाचकांनी लक्षात घेतलं पाहिजे.

daru-inmarathi
youtube.com
हौशेपोटी दारू पिणं किंवा व्यसन म्हणून दारू पिणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आजकाल टेन्शन, घरगुती वाद, स्ट्रेस ही कारणं दारू पिणारे लोक देतात. दारूमुळे सर्व कलहातून काही वेळेपुरते का होईना त्यांना सुटल्याचं समाधान मिळतं. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी न घेता दारूच्या आहारी जाऊन पैसा, वेळ आणि आरोग्य या तिन्ही अनमोल गोष्टी आपण नष्ट करतोय हे न समजण्याईतकी झिंग दारूड्यांच्या मनावर आणि मेंदूवर चढत असेल का?
दारूच्या सुरूवातीचा जन्म हा कदाचित व्यसन म्हणून झाला नसेल परंतु तिची नशा अशी काही समाजमनावर चढलीय की आज तिच्या शिवाय जमतही नाही आणि करमतही नाही.
===










by - https://www.inmarathi.com/origin-of-wine/

पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला?...

पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला?

मानवाच्या विजयाची गाथा सांगणारी ही लेखमाला आहे.. पण यातील मानवाने कुणावर विजय मिळवला?



मानवाच्या विजयाची गाथा सांगणारी ही लेखमाला आहे.. पण यातील मानवाने कुणावर विजय मिळवला? किंवा, जयगाथा गाण्याइतका – म्हणजे प्रेरक ठरण्याइतका – मानवाने संपादन केलेला विजय कोणता? याsam06मालेतील लेख दर सोमवारी उलगडत जाण्याआधी हे स्पष्ट केले पाहिजे, की हा मानवाने कुणाच्या विरुद्ध मिळवलेला विजय नव्हे.. किंवा, मानवाने विजय संपादन केला म्हणजे कोणी तरी हरलेच असेही नव्हे.. हा विजय मानवाने, स्वतच्याच वृत्तींवर मिळवला आहे. आजघडीला ‘कृत्रिम प्रज्ञा’ निर्माण करू पाहणाऱ्या या भूतलावरील एका प्रजातीने, आधी स्वतच्या बुद्धीपुढील अशास्त्रीय आव्हाने पेलली, म्हणून मिळालेला हा विजय आहे.. मात्र, ही आव्हाने कधी संपणारी नाहीत, याची विनम्र जाणीवही ही लेखमाला सादर करताना नक्कीच आहे..
विज्ञान आपल्याला सांगते की, अगणित सूर्यानी बनलेल्या आपल्या विश्वाचे वय सुमारे तेराशे कोटी वर्षे असून, त्यात आपला सूर्य सुमारे फक्त ५०० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या जन्मदात्या हय़ा सूर्यापासून आपली पृथ्वी बनलेली आहे, पण तेव्हा ती एक अतिउष्ण जळता गोळा होती. ती थंड आणि जलमय व्हायला सुमारे शे-सव्वाशे कोटी वर्षे लागली. त्या सुमारास केव्हा तरी म्हणजे सुमारे तीन-साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठे तरी काही रासायनिक प्रक्रिया निसर्गत: होऊन आधी अल्गी शेवाळ व नंतर केव्हा तरी अगदी साधे अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू किंवा एकपेशी सजीव निर्माण झाले. नंतरची सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर फक्त असलेच प्राथमिक अवस्थेतील सजीव होते. तेव्हा आजच्यासारखी जंगले किंवा पशू-पक्षीसुद्धा पृथ्वीवर नव्हते. नंतर सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वीपासून सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर बहुपेशीय पण कमी गुंतागुंतीची शरीरे असलेल्या सजीवांचे ‘प्राचीन जीवयुग’ होऊन गेले. पुढे वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते पाच कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर सरपटणारे प्राणी व वेगवेगळे डायनॉसॉर आणि अनेक वनस्पती वगैरेंचे ‘मध्यजीवयुग’ होऊन गेले. त्यानंतर हय़ा शेवटच्या पाच कोटी वर्षांपूर्वी आज जगात दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांचे ‘नवजीवयुग’ सुरू झाले. हय़ाच नवजीवयुगात सुमारे सव्वाकोटी वर्षांपूर्वी, मानवाचा पूर्वज असलेला बिनशेपटीचा, चतुष्पाद असलेला, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागलेला ‘मानव-पूर्वज-मर्कट’ पृथ्वीवर वावरत होता. हय़ाचे पुरावे शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात मिळालेले आहेत.
हीच वन्यप्राणी असलेली मर्कट जात शेवटची एक सव्वा कोटी वर्षे उत्क्रांत होत राहिलेली आहे. ती जात मागील दोन पायांवर, पण जरा पुढे वाकून चालू लागली व पुढील दोन पायांचा हातासारखा उपयोग करू लागली. उदाहरणार्थ, झाडावर चढताना फांद्या धरायला, जमीन खरवडून कंदमुळे खाण्यासाठी काढायला किंवा बीळ खणून लहानसहान प्राणी पकडून खायला किंवा झाडांच्या फांद्यांचा वा प्राण्यांच्या हाडांचा काठीसारखा हत्यार म्हणून उपयोग करायला वगैरे. हय़ा उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या. एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. दुसरे म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत  होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे ‘काही शब्द’ आणि नंतर ‘भाषा’ निर्माण झाली व तिसरे म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली.
नंतर अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी हय़ा ऑस्ट्रेलोपिथेक्स किंवा ज्याला दाक्षिणात्य वानर असेही म्हणतात, त्याच्यापासून दोन पायांवर सरळ ताठ चालू शकणारा आदिमानव (होमो इरेक्टस) निर्माण झाला आणि त्यानंतर आजपासून अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी ‘होमो सॅपियन’ ऊर्फ ‘शहाणा मानव’ ही आजची मानवजात निर्माण झालेली आहे व त्याचीही उत्क्रांती होतच आहे. आदिमानव असतानाच तो हाताने दगडांपासून साधीसुधी हत्यारे बनवायला शिकला. जंगलात किंवा उघडय़ावर एकटय़ादुकटय़ाने स्वसंरक्षण करून राहण्यापेक्षा तो माणसांच्या टोळ्या व नंतर संघसमाज बनवू लागला, घरे बांधू लागला, समाजात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचे काही शब्द व हळूहळू त्याची भाषा बनू लागली. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्याचा मेंदू वाढू शकल्याने तो विचार करू लागला. भाषा आणि मेंदू एकमेका साहय़ करू लागले. स्मृती वाढली, विचार वाढले, आता काय झाले पाहा. मूलत: वन्य -प्राणी असलेला आदिमानव, उत्क्रांतीच्या त्याच्या पुढच्या पायरीवर तो आता स्वत:च्या हाताने स्वत:च आपली हत्यारे बनवू शकणारा, विचार करू शकणारा, एकमेकांशी गुंतागुतीचे संवाद भाषेद्वारे करू शकणारा, स्वत:ची घरे बांधू शकणारा, पशुपालन करणारा व नंतर मानवरूपात येऊन काही हजार वर्षे जीवन जगल्यावर शेवटच्या दहा-बारा हजार वर्षांत शेती करून धान्योत्पादन करून ते साठवूनही ठेवू शकणारा, हुशार मानव बनला. हय़ा इतक्या कुवती प्राप्त झाल्यामुळे ही द्विपाद मनुष्यजात पृथ्वीवरील इतर सर्व पशू-पक्ष्यांशिवाय वरचढ ठरली, समर्थ ठरली. बिनशेपटीच्या एका मर्कट जातीपासून अनेक टप्प्यांनी अखेर आजची बुद्धिमान, शहाणी, कुशल व सुसंस्कृत मानवजात बनायला त्याला एक-सव्वा कोटी वर्षांचा दीर्घ काळ मात्र घ्यावा लागला, हे खरे. ते असो.
याचा अर्थ असा होतो की ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाल्यापासून, सुमारे ४५९ कोटी वर्षेपर्यंत मानवच नव्हे तर मानवाचा कुणी पूर्वजही पृथ्वीवर नव्हता. म्हणजे मानव नवागत आहे, आदिमानवरूपात अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी व शहाण्या मानवरूपात तो पृथ्वीवर अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आलेला आहे.
गेल्या काही शतकांत वैज्ञानिकांनी अतिशय परिश्रमाने संशोधन व सिद्ध केलेली अशी ही माहिती आज आपणाला उपलब्ध आहे. परंतु अवघ्या आठ-दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागून शरीराची भूक सहजतेने भागून, सुरक्षित व स्थिर मानवी जीवन शक्य झालेल्या आपल्या शहाण्या मानव पूर्वजांना हय़ापैकी काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी ईश्वर व धर्मविषयक काही कल्पना रचायला सुरुवात केली असावी. जगात आज अस्तित्वात असलेले सगळे मोठे धर्म, गेल्या अवघ्या चार-पाच हजार वर्षांत मनुष्याने आपल्या कल्पनेने स्थापन व विस्तार केलेले आहेत. त्यापूर्वी मनुष्य जातीला ‘भूक आणि भीती’ यांच्याबरोबर ‘भगवंत कल्पनेने’ गाठले असणे शक्य आहे, पण तत्कालीन ईश्वर कल्पनांचे संघटित धर्म बनले नाहीत व कुठे बनले असले तर ते टिकले नाहीत.
जगातल्या प्राचीनांसह बहुतेक धर्मानी अशी कल्पना केली की ‘आकाशात दिसणारे हे विश्व आणि पृथ्वीवरील जग-निसर्ग हे निर्माण करणारा कुणी ईश्वर आहे, दोन पायांवर चालणारा शहाणा माणूस हा इतर प्राणिसृष्टीहून वेगळा, अशी ईश्वराची खास निर्मिती आहे आणि त्याच्या इच्छेनेच सगळी जगरहाटी सुरू आहे. त्याने असेही मानले की हे सर्व जग ईश्वराने माणसासाठीच निर्माण केलेले आहे. खरे तर विश्व फार जुने आहे व त्यामानाने माणूस त्यात अगदी अलीकडे निर्माण झालेला आहे हे त्यांना माहीतच नसल्यामुळे, ‘आधीच अस्तित्वात असलेल्या पृथ्वीवरील जगाचा, उत्क्रांत मानव उपयोग करून घेत आहे’ हे त्यांना कळलेच नाही व त्यामुळे ‘ईश्वराने माणसासाठी जग निर्मिले’ असे त्यांनी मानले. आणि केवळ माणसासाठीच का? माणसाचे एवढे मोठे असे काय महत्त्व आहे, की ईश्वराला खास त्याच्यासाठी योजनापूर्वक जग निर्मिण्याची गरज वाटली? किंवा त्याचे विश्व आधीच अस्तित्वात असले तर नंतर कोटय़वधी वर्षांनी ईश्वराने त्यात हा माणूस कशासाठी (कोणत्या हेतूने) निर्मिला? भौतिकशास्त्राचे ज्ञान नसलेल्या तत्कालीन माणसाला असे प्रश्न पडलेच नाहीत. त्यामुळे तो ईश्वर कल्पना व धर्मकल्पना रचण्यात गुंग झाला. एकदा ईश्वर-अस्तित्व आपल्या मनात मान्य केल्यावर, तो असा आहे, तसा आहे, तो हे करतो, ते करतो’ असे तो म्हणू लागला. जगात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठय़ा नद्यांच्या काठी वेगवेगळ्या मानवसमूहांनी आपापल्या संस्कृती आणि धर्म निर्माण केले. त्यातील काही टिकले व काही कालौघात नष्ट झाले. ‘ईश्वर अस्तित्वात नाही’ असा वेगळा विचार मांडणारेही काही विचारवंत विशेषत: भारतात होऊन गेले. आपण ह्य़ा प्रकरणात, मानव पृथ्वीवर केव्हा आणि कसा आला व त्याच्या प्रगतीचा आरंभ कसा झाला, त्यावर फक्त एक नजर टाकलेली आहे.
- शरद बेडेकर








by - Loksatta First Published on January 5, 2015 1:07 am

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

बलूचिस्तान, जो 255 दिनों तक आजाद देश रहा


बलूचिस्तान, जो 255 दिनों तक आजाद देश रहा


बलूचिस्तान में अशांति का माहौल क्यों है? क्या है वहां का इतिहास और कैसे बलूचिस्तान पाकिस्तान का हिस्सा बना. आइए जानने हैं, क्‍योंकि इसी में परेशानी की जड़ है.


दरअसल बलूचिस्तान की जड़ें भारत विभाजन से जुडी हुई हैं. विभाजन में तय हुआ कि भारत और पाकिस्तान दो अलग राष्ट्र होंगे. लेकिन उन रियासतों को लेकर कोई सीधा फैसला नहीं हुआ जो ब्रिटिश साम्राज्य के आधीन तो थी पर उनपर ब्रिटिश हुकूमत का सीधा शासन नहीं था. ऐसी रियासतें अपने आंतरिक फैसले लेने के लिए स्वतंत्र थी और कुछ संधियों के तहत ब्रिटिश साम्राज्य का हिस्सा थी. बलूचिस्तान (कलात,  खारान, लॉस बुला, मकरान) ऐसी रियासत थी जिस पर ब्रिटिश साम्राज्य का सीधा शासन नहीं था. इन रियासतों को ये अधिकार दिया गया कि ये भारत और पाकिस्तान दोनों में से किसी भी देश के साथ विलय कर सकती हैं या फिर स्वयं को स्वतंत्र राष्ट्र घोषित कर सकते है. यही से समस्या की शुरूआत होती है.
मकरान, लास बेला और ख़रान ने तो मोहम्मद अली जिन्ना के दबाव में पाकिस्तान में अपना विलय कर लिया लेकिन कलात के खान मीर अहमद ख़ान ने ख़ुद को स्वतंत्र घोषित कर दिया. मार्च 1948 को पाकिस्तानी सेना ने कलात को जबरन पाकिस्तान में मिला लिया और खान ऑफ कलात मीर अहमद यार खान को जेल में डाल दिया.
खान ऑफ कलात मीर अहमद यार ख़ान जिसने कि पाकिस्तान के निर्माण को लेकर उत्साह दिखाया था, जिन्ना को अपना कानून सलाहकार नियुक्त किया. ताकि वह ब्रिटेन के सामने अपना पक्ष रख सके. 1946 में जब कैबिनेट मिशन भारत आया तो उसने इस पक्ष को मजबूती से रखा कि उसकी संधि ब्रिटेश इंडिया साम्राज्य के साथ नहीं बल्कि सीधे ब्रिटिश क्राउन (वाइट हाल) के साथ थी. कैबिनेट मिशन इसका कोई कानूनी समाधान नहीं ढूंढ पाई और मामले को बिना सुलझाए छोड़ दिया. इसके बाद 4 अगस्त 1947 को दिल्ली में एक राउंड टेबल मीटिंग हुई जिसमें लॉर्ड माउंटबेटन, खान ऑफ कलात, चीफ मिनिस्टर ऑफ कलात और मोहम्मद अली जिन्ना मौजूद थे जिसमें जिन्ना ने उनका पक्ष रखा. मुलाकात में तय हुआ कि 5 अगस्त 1947 को कलात ब्रिटिश साम्राज्य से स्वतंत्र होगा. साथ ही खारान, लॉस बुला को कहा गया कि वे अपना विलय कलात में करे. साथ ही मारी और बुग्ती इलाके भी कलात में शामिल हो ताकि पूरा बलूचिस्तान कलात में शामिल हो सके.
balooch650_082416065913.jpg
 खान ऑफ कलात मीर अहमद यार ख़ान
कलात का कानूनी दर्जा अन्य भारतीय प्रिंसली स्टेट्स से अलग था. जहां 560 भारतीय राज्य कैटेगरी A के तहत आते थे, वही कलात, सिक्किम और भूटान कैटेगरी B में शामिल थे. 1876 की संधि के अनुसार ब्रिटेन ने उन्हें आतंरिक स्वतंत्रता दे रखी थी, साथ ही आतंरिक मामलों में हस्तक्षेप ना करने का वादा भी था. वो कभी भी चेंबर ऑफ प्रिंसली स्टेट्स का सदस्य भी नहीं रहा. यही आधार था कि कलात भारत या पाकिस्तान दोनों में से किसी के साथ शामिल होने को मजबूर नहीं था. अंत में कलात के अंतिम शासक मीर अहमद खान ने दोनों देश से अलग एक स्वतंत्र राष्ट्र बनाने का फैसला किया. 15 अगस्त 1947 को पाकिस्तान के निर्माण के एक दिन बाद कलात ने स्वंय को एक स्वतंत्र राष्ट्र घोषित कर दिया. स्वतंत्रता की घोषणा के साथ ही खान ने कलात संसद के उच्च और निम्न सदन बनाए. कलात की नेशनल असेम्बली में 15 अगस्त 1947 को एक बैठक में यह निर्णय लिया गया कि कलात एक स्वतंत्र राष्ट्र होगा और पाकिस्तान के साथ उसका संबंध दोस्ताना रहेगा.
11 अगस्त 1947 को मुस्लिम लीग और कलात के बीच एक साझा घोषणा पत्र पर हस्ताक्षर भी हुए जिसमें माना गया कि कलात एक भारतीय राज्य नहीं है और उसकी अपनी एक अलग पहचान है और मुस्लिम लीग कलात की स्वतंत्रता का सम्मान करती है. कलात के खान जिनके की जिन्ना के साथ अच्छे संबंध थे और जिन्होंने मुस्लिम लीग को काफी आर्थिक मदद की थी. इन सबके बावजूद 1 अप्रैल 1948 को पाकिस्तानी सेना ने कलात पर हमला कर दिया और कलात के खान ने आत्मसमर्पण कर दिया और विलय के दस्तावेज पर हस्ताक्षर कर दिये. इसी के साथ ही 225 दिनों के आजाद कलात का पाकिस्तान में विलय हो गया. 
इसके बाद खान के भाई प्रिंस अब्दुल करीम के नेतृत्व में पहला विद्रोह हुआ. लेकिन उन्हें भी जल्द गिरफ्तार कर लिया गया. लेकिन इतिहास में सबसे बड़ा मोड़ आया वो साल 1954 था जब पाकिस्तान के प्रधानमंत्री मोहम्मद अली बोगरा ने पाकिस्तान को वन यूनिट बनाने का फैसला किया. ईस्ट पाकिस्तान और वेस्ट पाकिस्तान और साल 1955 में अयूब खान ने इस पर मोहर लगा दी. वेस्ट पाकिस्तान के सभी स्टेट्स, प्रोविंसिज और कबिलाई इलाकों को मिलाकर वेस्ट पाकिस्तान बनाया गया. इन इलाकों के सारे अधिकार और स्वायत्ता छिन ली गई. बलूचिस्तान में इसका जबरदस्त विरोध हुआ. अक्टूबर 1957 में बलूच नेताओं ने पाकिस्तानी राष्ट्रपति इस्कन्दर मिर्ज़ा से मुलाकात कर कलात को वन यूनिट से बाहर रखने की मांग की. लेकिन अयूब खान ने ऐसा करने से मना कर दिया और इसके बाद वहां विद्रोह शुरू हो गया. 6 अक्टूबर 1958 को अयूब खान ने पाकिस्तानी आर्मी को बलूचिस्तान में भेज कलात के खान और उनके सहयोगियों को गिरफ्तार कर लिया. लेकिन खान के सहयोगी नवाब नवरोज खान ने संघर्ष जारी रखा लेकिन उन्हें भी जल्द गिरफ्तार कर जेल में डाल दिया गया और नवरोज खान के बेटों और भतीजों को फांसी दे दी गई. नवरोज खान की भी जेल में रहने के दौरान मौत हो गई. इस पूरे संघर्ष में हजारों बलूच मारे गए.
इसके बाद साल 1973-74 में एक बार फिर बलूच और पाकिस्तान आर्मी के बीच संघर्ष हुआ जिसमें हजारों की संख्या में लोग मारे गए. 1971 के चुनाव में जहां पश्चिमी पाकिस्तान के सभी प्रांतों में पीपीपी की जीत हुई वही बलूचिस्तान और एनडब्लूएफपी (North-West Frontier Province) में नेशनल अवामी पार्टी की जीत हुई जो कि नेशनलिस्ट बलूचों की पार्टी थी. बलूचों पर आरोप लगे कि वो ईरान के साथ मिलकर एक बड़ा संघर्ष करने वाले है नतीजतन वहां की सरकार को बर्खास्त कर दिया गया और जनरल टिक्का खान को बलूचिस्तान भेजा गया. पाकिस्तान 1971 की घटना से उभर नहीं पाया था और उसने बलूच आंदोलनकारियों पर बड़ी ही सख्ती से कार्रवाई की. वहां लगभग 80 हजारों पाकिस्तानी सैनिकों को भेजा गया और बलूचों पर हवाई हमले भी किये. बलूचिस्तान की तरफ जाने वाले सभी रास्ते बंद कर दिये गए. ज्यादातर बलूच नेता अफगानिस्तान भाग गए. ये 60 के दशक में हुए विद्रोह से काफी बड़ा था.
the-baloch650_082416070303.jpg
 1973-74 में एक बार फिर बलूच और पाकिस्तान आर्मी के बीच संघर्ष हुआ जिसमें हजारों की संख्या में लोग मारे गए
इसके बाद साल 2005 में बलूच नेता नवाब अकबर खान बुग्ती और मीर मार्री ने पाक सरकार के सामने 15 सूत्री मांग रखी. जिसमें प्रांत के संसाधनों पर ज्यादा नियंत्रण और सैनिक ठिकानों के निर्माण पर रोक जैसे मुद्दे शामिल थे. इनकी यह मांग खारिज कर दी गई और संघर्ष चलता रहा. अगस्त 2006 में 79 साल के अकबर बुग्ती की सेना से मुठभेड़ में मौत हो गई. इसी संघर्ष में 60 पाकिस्तानी सैनिक और 7 अधिकारियों की भी मौत हो गई. बुग्ती की हत्या कराने का इल्ज़ाम परवेज़ मुशर्फ के ऊपर लगा हुआ है. इस घटना के कुछ दिन बाद सशस्त्र आंदोलनकारियों द्वारा परवेज मुशर्रफ के ऊपर राकेट से हमला किया गया जिसमें वे बाल-बाल बचे.
1948 से लेकर आज तक बलूच का विद्रोह जारी है. बलूच का मानना है कि वो पूर्व में एक स्वतंत्र राष्ट्र थे और सामाजिक और सांस्कृतिक रूप से वो एक अलग पहचान रखते है. पाकिस्तान ने कलात के खान से बंदूक की नोंक पर विलय करवाया. आज बलूचिस्तान में हजारों बलूच लड़ाके पाकिस्तानी सेना के खिलाफ लड़ रहे है. बलूचिस्तान के लोग चाहते है कि भारत मामले में दखल दे जिस तरह उसने बांग्लादेश के मामले में किया था. लेकिन भारत अभी तक इसे पाकिस्तान का आंतरिक मामला मान चुप बैठा था. लेकिन लालकिले की प्राचीर से नरेंद्र मोदी द्वारा बलूचिस्तान का जिक्र आने के बाद लगता है कि भारत ने अपनी रणनीति बदली है. इससे बलूच लोगों में भी एक बार फिर आशा जगी है कि वो भारत की मदद से अपना हक पा सकेंगे.
इस लेख में लेखक ने अपने निजी विचार व्यक्त किए हैं. ये जरूरी नहीं कि आईचौक.इन या इंडिया टुडे ग्रुप उनसे सहमत हो. इस लेख से जुड़े सभी दावे या आपत्ति के लिए सिर्फ लेखक ही जिम्मेदार है.

लेखक

आशुतोष शुक्लाआशुतोष शुक्ला @ashutosh.shukla.90
लेखक आजतक में प्रोड्यूसर हैं












https://www.ichowk.in/politics/how-an-independent-country-kalat-became-pakistan-occupied-baluchistan/story/1/4296.html

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

चामडा बाजार, धारावी


बाजारगप्पा : कातडीपासून पर्सपर्यंत..
अशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली.












भूलभुलैय्याशीच तुलना करता येईल अशा धारावीच्या छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये आज लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबंच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच गल्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात. यातलाच एक म्हणजे चामडा बाजार.

मध्य रेल्वेच्या शीव स्थानकापासून उजव्या दिशेला साधारण एक किलोमीटर अंतरावर आशियातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीला सुरुवात होते. स्थानकाच्या एक क्रमांकाच्या फलाटापासून उजव्या हाताने दगडी पुलाच्या चिंचोळ्या बोगद्यातून पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा मासळी बाजार लागतो. पुढे गेल्यावर चामडय़ाचे कमरेचे पट्टे, बॅगा, जॅकेट्स, वॉलेट्स यांची छोटय़ामोठय़ा दुकानांची दुतर्फा रांग नजरेला पडते. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक गल्ल्या दिसतात. या गल्ल्या म्हणजे भूलभुलैय्याच! एका गल्लीत शिरलात की पुन्हा त्याच गल्लीतून बाहेर पडाल याची शाश्वती नाही. गल्लीच्या दुतर्फा दोन-तीन मजल्यांची घरे दिसतात. प्रत्येक घरासमोर एक लोखंडी शिडी. चढताना पडू नये म्हणून आधाराला लटकणारी दोरी हमखास दिसते. प्रत्येक घरासमोर छोटे-छोटे नाले. कुठे तर नाला तुंबल्यामुळे पाणी साचून राहिलेले असते. त्यावर शेकडो माशा आणि डास घोंगावत असतात. अशा या धारावीच्या गल्ल्यांमध्ये लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबेच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच गल्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात.



धारावीच्या उद्यमशीलतेला मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळात, म्हणजे १८८२ साली विविध वस्तूंच्या उत्पादनांच्या निमित्ताने धारावी वसू लागली. ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधासाठी आलेल्या स्थलांतरितांनीच ती वसवली. मोकळी जागा मिळेल तिथे घरे बांधली गेली. गरजेप्रमाणे वाढविली गेली. अशी ही धारावी आज सुमारे सात लाख चौरस फुटापर्यंत पसरली आहे. येथे मराठी, हिंदी, दाक्षिणात्य, बंगाली, गुजराती, राजस्थानी, मुस्लीम अशा विविध जाती-धर्माचे लोक पाहावयास मिळतात. धारावीतील कारखान्यांमध्ये काम करणारे बहुतांश कारागीरही स्थलांतरित आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, दिल्ली या भागातून पैसे कमविण्यासाठी हे लोक धारावीत येतात. धारावीच्या एकेका गल्लीत किमान दहा कारखाने वसले आहेत. तेथे सतराशे साठ वस्तूंचे उत्पादन आणि विक्री होते. त्यापैकी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे चामडय़ाची.

देवनार कत्तलखान्याबरोबरच मुंबईभरातून आलेल्या बकऱ्या, मेंढय़ा, बैल आणि म्हशी यांच्यापासून कातडे कमावण्याचा मोठा व्यवसाय इथे चालतो. याला ‘चामडा बाजार’ म्हणतात. कातडय़ापासून पुढे बॅगा, पट्टे, जॅकेट्स तयार करण्याचा व्यवयास पुन्हा इथल्याच चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये वसला आहे. पशूंच्या कातडीचा उग्र दर्प नाकात घुसू लागला की चामडा बाजार आल्याचे आपोआप कळते. अशा वातावरणात सामान्य माणूस फार काळ राहू शकत नाही. परंतु येथील कामगार हा उग्र वास सहन करत कारखान्यांमध्ये तासनतास काम करीत असतात. नव्हे इथेच ते राहतात. त्यांचे जेवणखाण, झोप येथेच असते. धारावीतील प्रत्येक कारखान्यात हीच परिस्थिती आहे.

एका लहानशा खोलीत पशूंचे चामडे जाड मीठ लावून ठेवले जाते. बकरी आणि मेंढय़ाचे चामडे ५० ते ८० रुपयांपर्यंत खरेदी केले जाते. तर म्हैस किंवा बैल यांचे चामडे दीड ते दोन हजारापर्यंत खरेदी केले जाते. चामडे खराब होऊ नये यासाठी २४ तासांच्या आत त्यावर मीठ चोळतात. हे मीठ वापरातले नसते. मीठ लावल्यानंतर चामडे सात ते आठ फूट उंचीच्या रोलरमध्ये पाणी आणि काळ्या रंगाच्या पावडरचे रसायन टाकून धुतले जाते. १५ ते १७ तास हे चामडे धुतले जाते. तितका वेळ हे यंत्र सुरू असते. धुतलेले चामडे एकावर एक रचून ठेवतात. पाणी गळून गेल्यावर ते मऊ होण्याकरिता मोठय़ा यंत्राच्या साहाय्याने त्यावर इस्त्री फिरवली जाते. त्यानंतरही चामडे कडक वाटले तर कारखान्याबाहेरील दगडावर आपटून ते मऊ केले जाते. पुन्हा त्यावर इस्त्री फिरवून काही वेळ वाळवून हे चामडे रंगकाम करण्यासाठी पाठविले जाते.

ही एक वेगळीच खोली असते. खोलीभर दोरी बांधलेल्या असतात. चामडय़ावर रंगकाम करून वाळवण्यासाठी ते येथे टांगले जाते. त्यानंतर चामडे बॅगा, बेल्ट, शूज बनविणाऱ्या कारखान्यात पाठविले जाते. हा तयार माल शीव स्थानकाजवळील दुकानांमध्ये विक्रीकरिता येतो. महिलांसाठीच्या चामडय़ाच्या बॅगेची किंमत येथे २ हजारांपासून सुरू होते. तर चामडय़ाचे जॅकेट्स ३ हजारापासून पुढे १० हजारापर्यंत विकली जातात. यापुढे वांद्रे, अंधेरी, बोरिवली, मुलुंडच्या बडय़ा दुकांनांमधून ती कोणत्याही किमतीला विकली जाऊ शकतात. त्याशिवाय छोटय़ा पर्सेस आणि प्रवासाकरिता लागणाऱ्या मोठय़ा बॅगा ही देखील या बाजाराची खासियत. इथे बनलेल्या चामडय़ाच्या वस्तू गेली कित्येक वर्षे अनेक नामांकित ब्रँडने विकल्या जात आहेत. अशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली. कारण धारावीकरांच्या आयुष्याबद्दल भारतीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षण असते. आज धारावी एका वेगळ्या प्रकारच्या पर्यटनाचा आनंद लुटू पाहणाऱ्या पर्यटकांकरिता ‘पिकनिक स्पॉट’ बनली आहे. कातडय़ांच्या या बाजारात अशी ‘गोरी’ कातडी फिरताना अनेकदा दिसते. पण धारावीच्या चामडा बाजाराला त्याचे अप्रूप राहिलेले नाही.



गोवंश हत्याबंदीचा रोजगारावर परिणाम

‘लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार धारावीत कातडी वस्तू उत्पादनाचे १५ हजार लघुउद्योग आहेत. येथे चामडय़ाच्या बाजारात काम करणाऱ्या कामगारांना महिन्याला ८ ते १० हजार इतका रोजगार मिळतो. मात्र गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर देवनार कत्तलखान्यातून येणाऱ्या कातडीच्या प्रमाणात घट झाल्यामुळे येथील कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.

अस्सल ‘लेदर’ कसे ओळखाल?

लेदरच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बॅगा किंवा वस्तू या नेहमीच चामडय़ापासून बनलेल्या असतीलच असे नाही. बऱ्याचदा चामडय़ासारख्या दिसणाऱ्या बॅग फोम कापडापासून तयार केल्या जातात. मात्र चांगल्या दर्जाच्या लेदरला पशूंच्या कातडीचा उग्र वास येतो. तर लेदरला जाळले असता ते जळत नाही. या दोन पद्धतीतून खऱ्या लेदरची शहानिशा केली जाते. तर बकरी आणि मेंढीची कातडी पातळ असल्याने यांपासून तयार केलेल्या वस्तू पातळ असतात. तर म्हैस किंवा बैलांची कातडी जाड असल्याने हे लेदर टिकाऊ असते. त्यामुळे हे कातडे महागही असते.

















धारावीच्या उद्योगाला डिजिटल ओळख!

अशा प्रकारचा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आल्याचे प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी सांगितले.  

‘आयडीसी’च्या विद्यार्थ्यांने तयार केलेले उपकरण. 

‘आयडीसी’तील विद्यार्थ्यांचा अभिनव प्रकल्प
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली मुंबईच्या कुशीत वसलेल्या धारावी या महाकाय झोपडपट्टीत अब्जावधींची उलाढाल करणारे उद्योगही सुरू आहेत. एका विशिष्ट पठडीत उद्योग करणारी ही मंडळी आता आपल्या उद्योगाला वेगळय़ा वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर महिन्यात देशाच्या चलनातील पाचशे व एक हजार रुपयांची नोट रद्द केल्यानंतर या उद्योगांनी मोबाइल पाकिटांची मदत घेत डिजिटलकडे पहिले पाऊल टाकले. पण आता त्यांचे विपणन करण्यासाठीही डिजिटल माध्यमाचा वापर केला जाणार आहे. ही संकल्पना आयआयटी मुंबईतील अभिकल्प संस्थे (आयडीसी)तील चिन्मय परब या विद्यार्थ्यांने मांडली आणि ती यशस्वीही करून दाखविली.
गुगलने २०१५मध्ये बीकॉन उपकरण बाजारात आणले. या उपकरणाने काय करता येईल असे एक आव्हानही त्यांनी जगातील तमाम विद्यार्थ्यांपुढे ठेवले. यासाठी १०० उपकरणे ‘आयडीसी’मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. हे उपकरण इंटरनेटवर आधारित असून इंटरनेटशी जोडणारी कोणतीही यंत्रणा याद्वारे काम करू शकणार आहे. मग या उपकरणाचा काय वापर करता येईल, यावर ‘आयडीसी’मध्ये विचार सुरू झला. यात संस्थेत ‘इंटरअ‍ॅक्शन डिझाइन’ या अभ्यासक्रमात शिकत असलेल्या चिन्मय परब या विद्यार्थ्यांने उद्योगांसाठी या उपकरणाचा वापर करता येईल अशी संकल्पना मांडली. त्याच्या या संकल्पनेला आयडीसीतील प्रा. अनिरुद्ध जोशी आणि ब्रिटनमधील स्व्ॉनसी विद्यापीठातील प्रा. मॅट जॉन यांनी मार्गदर्शन केले व ती संकल्पना प्रत्यक्षात आणली.
अशा प्रकारचा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आल्याचे प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी सांगितले. सध्या हे उपकरण अकरा दुकानांमध्ये बसविण्यात आले असून येत्या काळात १०० दुकानांमध्ये बसविण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच आज हे उपकरण परदेशातून मागवावे लागते.
यामुळे त्याची किंमत ८०० रुपयांपर्यंत जाते पण जर भविष्यात या उपकरणाची निर्मिती आपल्या देशात झाली तर त्याचा खर्च ५०० ते ६०० रुपये इतकाच होणार असल्याचेही चिन्मयने नमूद केले.
ग्राहकांनाही फायदा
जेणेकरून धारावीत विशिष्ट गोष्टींची खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला या यंत्रणेचा फायदा होईल. तसेच दुकानदाराला त्याला पाहिजे तो ग्राहक मिळू शकतो, असा विश्वास चिन्मयने व्यक्त केला.
संकल्पना काय?
हा प्रकल्प धारावीत उभारत असताना चिन्मयने एक ‘अँड्रॉइड टूल’ विकसित केले. या टूलच्या माध्यमातून अवघ्या चार क्लिकवर धारावीतील दुकानदाराचे संकेतस्थळ विकसित होते. हे संकेतस्थळ विकसित झाल्यावर त्यात दुकानातील उत्पादनांची माहिती दिली जाते. दुकानात बीकॉन उपकरण ठेवलेले असते.या उपकरणाला जोडण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या स्मार्टफोन किंवा इंटरनेट जोडणी असलेल्या फोनमधले ब्लू-टूथ सुरू असणे आवश्यक आहे.  या उपकरणामुळे दुकानाच्या आसपासच्या परिसरात ब्लू-टूथ सुरू असलेल्या फोनवर क्रोम ब्राऊझरच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन जाते. या नोटिफिकेशनमध्ये दुकानाची थोडक्यात माहिती व एक लिंक दिलेली असते. ती लिंक सुरू केली की आपल्याला त्या दुकानात नेमकी कोणती उत्पादने आहेत व ती किती रुपयांना उपलब्ध आहेत याचा तपशील मिळतो.
धारावीची आजपर्यंतची ओळख ही एक झोपडपट्टी म्हणूनच होती. मात्र तेथे अनेक उद्योगही सुरू आहेत. यातील अनेक उद्योगांना भेटी देण्यासाठी तसेच धारावी नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी अनेक पर्यटकही तेथे येत असतात. या पर्यटकांना आपल्या दुकानाकडे आकर्षित करून घेण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल.’
– चिन्मय परब, ‘आयडीसीचा विद्यार्थी

















by - Loksatta नीरज पंडित |

बुधवार, २ जानेवारी, २०१९

कादर खान : 30 रोचक जानकारियां..


कादर खान : 30 रोचक जानकारियां








1) 1973 में अपने फिल्मी करियर की शुरुआत करने के बाद से, कादर खान 300 से अधिक फिल्मों में काम कर चुके हैं। उनकी पहचान अभिनेता और लेखक के रूप में है।


2) अपनी पहली फिल्म दाग में कादर खान ने, अभियोजन पक्ष के वकील की भूमिका निभाई थी।


3) कादर खान बॉम्बे युनिवर्सिटी के इस्माइल युसुफ कॉलेज से इंजीनियरिंग ग्रेज्यूएट हैं।


4) फिल्मों में करियर बनाने के पहले, कादर खान एमएच सैबू सिद्दिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में सिविल इंजीनियरिंग के प्रोफेसर थे।


5) उनके पिता अब्दुल रेहमान खान कंधार के थे तो माता इकबाल बेगर पिशिन (अंग्रेजों के समय भारत का हिस्सा) से थीं।





6) कादर खान द्वारा कॉलेज में किए गए ड्रामा काम करने के बाद, दिलीप कुमार इतने प्रभावित हुए कि उन्होंने कादर खान को अपनी दो फिल्मों सगीना और बैराग के लिए साइन कर लिया।


7) कादर खान के तीन बेटे हैं। उनके एक बेटा कनाडा में रहता है और ऐसा कहा जाता है कि कादर खान के पास कनाडा की भी नागरिकता है।


8) कादर खान ने 250 से ज्यादा फिल्मों के संवाद लिखे हैं।


9) फिल्म 'रोटी' के लिए मनमोहन देसाई ने कादर खान को संवाद लिखने के लिए 1,20,000 रुपये जैसी बड़ी रकम अदा की थी।


10) कादर खान टेलीविजन पर एक कॉमेडी शो 'हंसना मत' प्रसारित कर चुके हैं। जिसे उन्होंने खुद बनाया था।



11) अमिताभ बच्चन के अलावा, कादर खान ऐसे कलाकार थे जिन्होंने प्रकाश मेहरा और मनमोहन देसाई के आपस में प्रतिस्पर्धी कैंपों में काम किया।



12) अमिताभ की कई सफल फिल्मों के अलावा, कादर खान ने हिम्मतवाला, कुली नं वन, मैं खिलाडी तू अनाड़ी, खून भरी मांग, कर्मा, सरफरोश और धर्मवीर जैसी सुपर हिट फिल्मों के संवाद लिखे हैं।


13) 2013 में, कादर खान को उनके फिल्मों में योगदान के लिए साहित्य शिरोमनी अवार्ड से नवाजा गया।


14) कादर खान 1982 और 1993 में बेस्ट डायलॉग के लिए फिल्म फेयर जीत चुके हैं।


15) कादर खान को 1991 को बेस्ट कॉमेडियन का और 2004 में बेस्ट सपोर्टिंग रोल का फिल्म फेयर मिल चुका है।

16) कादर खान 9 बार बेस्ट कॉमेडियन के तौर पर फिल्म फेयर में नामांकित किए जा चुके हैं।


17) अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम फ्रॉम इंडिया (AFMI) कादर खान को उनकी सफलताओं और भारतीय मुस्लिम कम्युनिटी की भलाई में उनके कामों के लिए सराह चुकी है।


18) फिल्म 'रोटी' के अशरफ खान, अपने एक नाटक के लिए एक युवा लड़के की तलाश में थे तब उन्हें लोगों ने बताया कि एक लड़का रात में कब्रों के बीच बैठकर डायलॉग चिल्लाता है। यह कादर खान थे।


19) कुछ समय पहले सोशल मीडिया पर फैलाई गई उनकी मौत की खबर से, कादर खान बहुत आहत हुए थे और उन्होंने कहा इससे उनके परिवार को खासा दुख पहुंचा है।


20) अपने बचपन के दिनों में कादर खान बहुत गरीब थे। गंदी बस्ती की झोपड़ी में रहने वाले कादर की मां उन्हें मस्जिद प्रार्थना के लिए भेजती थीं जहां से वे कब्रिस्तान चले जाते थे।

21) कादर खान के पास बचपन में चप्पल तक नहीं हुआ करते थे। उनकी मां उनके गंदे पैर देखकर समझ जाती थीं कि वह मस्जिद नहीं गए।


22) कादर खान की उनके पहले ही ड्रामे में एक्टिंग देखकर एक बुजुर्ग ने उन्हें सौ रूपए का नोट दिया था। कुछ साल अपने पास रखने के बाद, गरीबी के कारण कादर खान ने इस नोट को खर्च कर दिया जिसे वह एक ट्राफी समझते थे।

23) कादर खान के जन्म के पहले काबुल में रहने वाले उनके परिवार में उनके तीन बड़े भाई थे जो आठ वर्ष के होते-होते मर गए। इससे घबराकर कादर खान के जन्म के बाद, उनकी मां उन्हें लेकर मुंबई आ गईं।


24) कादर खान मानते हैं कि अच्छा लेखक बनने के लिए जिंदगी में बहुत दुख से गुजरना जरूरी है।


25) कादर खान कभी भी फिल्मों का हिस्सा नहीं बनना चाहते थे क्योंकि उसके समय फिल्मों को निचले दर्जे की चीज समझी जाती थी।


26) कादर खान एक लेखक के तौर पर बहुत ही जल्दी सफल हुए क्योंकि वह बोलचाल की भाषा में संवाद लिखते थे वहीं दूसरी ओर पहले से जमे हुए लेखक कठिन मुहावरों से भरी भाषा लिखने के आदी थे।

27) कादर खान गालिब की गजलों को समझाती किताबें लिख चुके हैं। जिनमें 100 से भी अधिक गजलों के मतलब लिखे हुए हैं।


28) एक दौर ऐसा भी था जब कादर खान कई हीरो से ज्यादा लोकप्रिय थे और दर्शक पोस्टर पर उनका चेहरा देख टिकट खरीदते थे।


29) अश्लील और द्विअर्थी संवाद लिखने के कारण कादर खान कई बार आलोचकों के निशाने पर रहे।


30) बीमार होने के बाद कादर खान इस बात से हताश हो गए कि लोगों ने उनसे दूरी बना ली और काम देना बंद कर दिया।























by-http://hindi.webdunia.com/bollywood-focus/kader-khan-30-interesting-facts-115102100037_1.html









माझ्याबद्दल